राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय संघटन मंत्री स्व. मदनदासजी देवी यांचे २४ जुलै रोजी निधन झाले. त्यावेळी अनेक मान्यवर आणि नेते मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा काही कारणास्तव येऊ शकले नाही. मात्र त्यांनी शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या मदनदासजींच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील त्यांच्यास
Read More
रा. स्व. संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अभाविपचे माजी संघटनमंत्री मदनदासजी देवी यांचे दि. २४ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मदनदासजींनी घडविलेले असंख्य कार्यकर्ते, स्वयंसेवक यांनी त्यांच्याप्रतीच्या भावना विविध माध्यमांतून व्यक्तही केल्या. देशाच्या कानाकोपर्यात श्रद्धांजली सभांमधून मदनदासजींना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यानिमित्ताने मदनदासजींची लहान बहीण मंगल परीख यांनी त्यांच्या लाडक्या पिलाभईंच्या स्मृतींना दिलेला उजाळा...
"मदनदासजी जेवढ्या सहजतेने अभाविपमध्ये वावरायचे, तितक्याच सहजतेने ते रा.स्व.संघातही राहायचे. असा व्यापक स्वरुपात प्रवास करणारा कार्यकर्ता आज एकाएकी थांबला. त्यांनी ईथवर आणलेले हे कार्य त्यांच्याच विचारांनी पुढे घेऊन जाणं, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) ज्येष्ठ प्रचारक सुरेश सोनी यांनी केले. रा.स्व.संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अभाविपचे माजी राष्ट्रीय संघटनमंत्री मदनदासजी देवी यांना श्रद्धांजली म्हणून दि. ८ ऑगस्ट रोजी दादर पूर्व येथील राजा शिव
‘मदनदासजी देवी’ या नावाच्या उच्चारातच विलक्षण ‘ऑरा’ सामावलेला आहे. माझ्यासारख्या त्यांना लांबूनच पाहणार्या सामान्य कार्यकर्तीला तर परमपूज्य गुरुवर्याच्या रूपात पाहताना मनोमन परिषदेची कार्यकर्ती असल्याचे समाधान वाटले. ‘दिसतं तसं नसतं’ असं बाहेरच्या जगात असतं; पण संघ परिवारात दिसते त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्यांचे प्रभावशाली असणे असते.
लाखो नवयुवकांना राष्ट्रगायत्रीची दीक्षा देत त्यांचा देशभक्तीपर नवजन्म घडवणारे मदनदासजी दि. २४ जुलै रोजी आपल्या जीवनाची पुर्णाहूती राष्ट्रयज्ञात टाकून अनंताच्या पुढील आदेशासाठी नवचैतन्यमय व्हायला रिकामी झोळी इथेच ठेवून गेले...
साधारण १९८०-८१ची घटना असेल. त्यावेळी मी अभाविप मनमाड शाखेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. मनमाड म्हणजे त्यावेळी एक मोठे जंक्शन रेल्वे स्टेशन... आपल्या अनेक ज्येष्ठ पदाधिकारी वर्गाचा नियमित प्रवास आणि मनमाड येथे रेल्वे बदलणे अथवा प्रवासात त्यांना चहा, न्याहारीच्या निमित्ताने भेटीला जाणे हे अगदी नियमितपणे होत असे. रा. स्व. संघाच्या अनेक ज्येष्ठ पदाधिकार्यांच्या लिखाणातूनदेखील असा मनमाडचा उल्लेख आलेला आहेच.
साधारणपणे १९९३-९४ साल असेल. मी ’किर्लोस्कर कंपनी’च्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. रविवार होता. त्यामुळे दिवसभर काय करायचे, हा प्रश्न होता. म्हणून ठरवले की, दिल्लीच्या झंडेवाला संघ कार्यालयात जावे. तशी काही ओळख नव्हती; पण धडकून यावे. ही मनीषा होती.
२४ जुलै रोजी सकाळी मदनदासजींच्या दुःखद निधनाची वार्ता समजली. मदनदासजी रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सह-सरकार्यवाह तसेच विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय संघटनमंत्री म्हणून आयुष्याचे अर्ध शतक म्हणजे ५० वर्ष समर्पित जीवन जगलेले व्यक्तिमत्व, उच्च शिक्षा प्राप्त विभूती. मला त्यांचा परीसस्पर्श झाला ते वर्ष होते १९८२!
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात केल्यानंतर काही वर्षांनी मदनदासजींची एका प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भेट झाली. जुजबी ओळख झाली. पण, त्यावेळी पहिल्याच भेटीत मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलो. ‘कार्यकर्ता कसा असावा?’ या सत्रात अनेकदा एक सुभाषित सांगितले जात असे - ‘वज्रादपि कठोराणि मृदूणी कुसमादपि।’ म्हणजे कार्यकर्ता स्वतःच्या बाबतीत कठोर, तर दुसर्याच्या बाबतीत फुलाप्रमाणे मृदू असला पाहिजे. मदनदासजी या उक्तीचे तंतोतंत पालन कार्यकर्ता म्हणून आपल्या व्यवहारात ते करीत होते.
“आम्ही सर्व घडविणारे कार्यकर्ते आहोत. ‘ये हृदयीचे ते हृदयी’ यासाठी ‘आधी ये हृदयी....’ आवश्यक असते. यासाठी माझ्यात काय पाहिजे? काय आहे? काय नाही? याचा शोध आपण सतत घेतला पाहिजे,” असे उद्बोधक विचार मदनदासजींनी दि. २६ जुलै, २००८ रोजी रा. स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या प्रांतिक बैठकीवेळी बौद्धिक वर्गात मांडले होते. सदरील बौद्धिक वर्गातील संदर्भ हे २००८ मधील असून त्याचे टिपण देत आहोत.
मदनदास देवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अर्ध्वयू आणि समाजजीवनावर आपली अमीट छाप उमटवणारे समाजशिल्पी. समाजशिल्पी एवढ्यासाठी की, त्यांनी हजारो कार्यकर्त्यांमधील सामाजिक चेतना जागृत केली. केवळ जागृत केली नाही, तर प्रवाही केली. त्या प्रवाहाने हा देश नव्याने घडला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक आहे. माझ्या विद्यार्थीदशेत मदनदासजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटनमंत्री होते. त्यामुळे तेव्हापासून अलीकडच्या काळापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाचे भाग्य मला लाभले. अभाविपची पाळेमुळे घट्ट करणे आणि त्या संघटनेचा विकास यात मदनदासजींचा सिंहाचा वाटा आहे. ते चार्टर्ड अकाऊंटन्सीमध्ये सुवर्ण पदक विजेते होते.
गेले काही वर्षं आजाराशी संघर्ष करणारे पुरुषार्थी व्यक्तिमत्त्व शेवटी आपली जीवनयात्रा पूर्ण करून स्वर्गागमन करते झाले. देवी कुल परंपरेने, प्राप्त संस्काराने युक्त, संघ संस्काराने अधिक विकसित झालेले व अभाविपच्या कार्यानुभवातून बहुमुखी घडलेले व्यक्तित्त्व म्हणजे तुमचे-आमचे सर्वांचे सुपरिचित मदनदासजी... जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा शेवटचा दिवस निश्चित असतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटनमंत्री आदरणीय मदनदासजी देवी यांचे आपल्यातून अचानक निघून जाणे मनाला वेदना देणारे आहे. मदनदास देवीजी यांनी रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून स्वतःला राष्ट्र आणि समाजासाठी समर्पित केले होते. बालपणापासूनच त्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपलं आयुष्य व्यतीत केले. मदनदासजी हे माझ्यासारख्या विविध क्षेत्रांतील अनेक कार्यकर्त्यांचे पितृतुल्य व्यक्तिमत्त्व. माणूस आणि कार्यकर्ता घडवणारे ते एक विश्वविद्यालय होते. म्हणूनच त्यांच्या जाण्याने
काही दिवसांपूर्वीच मदनदास देवीजी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, भारत देशाने मदनदास देवीजी यांच्यासारखे एक महान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या जाण्याने माझ्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लाखो स्वयंसेवकांना जे दु:ख झाले, ते या ठिकाणी शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.