( Give Bharat Ratna to industrialist Ratan Tata MLC uma khapre to CM ) उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या, अशा मागणीचे पत्र आ. उमा खापरे यांनी मंगळवार, 25 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
Read More
( MLC Vikrant Patil )तरुण चेहऱ्यांनी राजकारणात यायला हवं : आमदार विक्रांत पाटील
भाजपचे नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी बहुजन आणि दलित समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी दि. ५ ऑगस्टपासून 'बहुजन संवाद यात्रा' सुरू केली आहे. राज्यभरात या यात्रेचे जंगी स्वागत होत असून, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मोदी सरकारकडून लवकरच केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक किमान कर कायद्याचा मसुदा तयार करण्यात येत असल्याची चर्चा कॉर्पोरेट जगतात सुरू झाली आहे.
मोठी वहिनी आईसमान वाटते तर आई विरोधात निवडणुकीत उभे राहू नये, असा सल्ला भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दिला आहे. तसेच महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करणारा नेता कोण हे जनतेला नीट माहित असल्याचा टोलाही दरेकरांनी सुळेंना लगावला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचाच हात आहे. आंदोलन काळात केवळ शरद पवारच जरांगेंना फोन करत होते. जरांगेही केवळ त्यांच्यावरच विश्वास दाखवत होते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी. जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावे, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली.
गेली अनेक वर्ष आपले राज्य मागे गेले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अडीच वर्षात महाराष्ट्राचे वाटोळे झाले. महाराष्ट्र ठप्प होता, असा जोरदार हल्लाबोल भाजप विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी अकोल्यात पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात केला. तसेच आपल्याला या देशासाठी काम करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला कर्तव्यदक्ष कार्यकर्ता म्हणून भूमिका पार पडायची आहे, असे आवाहनही दरेकरांनी यावेळी केले.
अमेरिकन कंपनी FrontDeskने आपल्या तब्बल २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. गुगल मीटद्वारे २ मिनिटांत निर्णय घेत ही कार्यवाही कंपनीने केली आहे. दरम्यान, कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयानंतर कंपनीने दिवाळखोरी टाळण्यासाठी अर्ज केला आहे.
राज्यातील अर्बन सहकारी बँका अडचणीत आहेत. योग्य वेळी शासनाने या बँकांना आधार दिला नाही, तर अनेक ठेवीदार, कर्मचारी यांच्यावर गंडान्तर येणार आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार राज्यातील अर्बन बॅंकिंग सहकार चळवळ वाचविण्यासाठी तरतूद करून मदत करेल, असा विश्वास भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.
आपले आई-वडील काबाडकष्ट घेऊन आपल्याला शिक्षण देत आहेत. शिक्षकवर्ग मेहनत घेऊन आपल्याला शिक्षण देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयुष्यात जे काही करायचे आहे ते ध्येय्यवेडे होऊन करा, असा मोलाचा सल्ला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमावेळी दरेकर बोलत होते.
आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २८ हजार मतांची मोजणी झालेली आहे. त्यांपैकी सुधाकर अडबाले यांना १४ हजार मते मिळालेली आहे. एकूण मतांपैकी तब्बल निम्मी मते एकट्या सुधाकर अडबाले यांनी घेतलेली आहेत. आतापर्यंत १४ हजार मतांचा लीड म्हणजे अडबालेंच्या विजयाची खात्री दिली जात आहे. विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा अद्याप ठरला नसला तरी अडबाले हा कोटा पूर्ण करतील, असे सांगितले जात आहे.
आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी शिवसेनेतर्फे शनिवारी आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. मात्र, ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेमध्ये नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा आहे. मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना यंदा संधी देण्यात आलेली नाही.
कोकण-मुंबई पदवीधर आणि मुंबई-नाशिक शिक्षक मतदार संघाच्या चार जागांचे निकाल जाहीर झाले असून या चार जागांपैकी दोन जागांवर शिवसेनेनी बाजी मारली आहे.
गेल्या सोमवारी विधान परिषदेच्या या चार जागांसाठी मतदान घेण्यात आले होते.
राष्ट्रवादी पुरस्कृत पक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा अवघ्या चाळीस मतांनी परभाव करत धस यांनी विजय मिळवला आहे.
यापाच जागांपैकी शिवसेना दोन, भाजप दोन आणि राष्ट्रवादी एका जागेवर विजयी झाली असून कॉंग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.
नाशिक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे मुळातच संख्याबळ हे कमी होते परंतु तरी देखील सहाणे यांनी प्रयत्न केले