महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ तर ३ ते ९ ऑक्टोबर हा सप्ताह ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. या निमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषा दूत” ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Read More
गणेश २१ पत्री – म्हणजे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या फक्त पहिल्या दिवशीच्या पूजेत गणपतीला वाहिली जाणारी २१ प्रकारच्या झाडे, झुडपे, वनस्पतींची पानं आणि त्यांची नावे, विविध उपयोगाविषयी माहिती देणारी ही मालिका हिंदू धर्मातील प्रत्येक सण आणि उत्सवामध्ये काहीतरी अर्थ निहित आहे. काहीतरी शास्त्र अंतर्भूत आहे. काहीतरी सामाजिक आशय आहे. आणि मुळात संस्कृत भाषेतील प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे. मनात आले म्हणून तो शब्द ऋषींनी बनवलेला नाहीये. गणेश चतुर्थीला गणपतीला त्याची पूजा करताना २१ प्रकारची
जगाला शांती, करुणा यांची मौलिक शिकवण देणार्या भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणार्या महेंद्र भारती यांच्याविषयी...
भारतामध्ये रिलिजन आणि धर्म या दोन्ही एकच संकल्पना असल्याचे म्हटले जाते. मात्र, वास्तव तसे नाही. पाश्वात्य देश अथवा अब्रहामिक रिलिजन आणि हिंदू धर्म यांच्यातील फरक हे मूलत: असून, हेच समजून सांगण्याची गरज आज निर्माण झाली आहे. या फरकांचा घेतलेला आढावा...
भाषा, संस्कृती आणि अभिव्यक्ती यांच्या अन्योन्यसंबंधांचा मागोवा आपण गेले काही लेख पाहत आहोत. आतापर्यंतच्या चिंतनाचा धागा हा भाषिक वसाहतवादामुळे भारतीय संस्कृतीच्या भारतीय अभिव्यक्तीवर येणार्या मर्यादांच्या दृष्टिकोनातून होता. आज आपण त्याच्या एका वेगळ्या बाजूचा विचार करू.
"सध्याची परिस्थिती आणि देशाचं नेतृत्व आपल्याला सांगत आहेत की भारताने आता आत्मनिर्भर व्हायलाच हवं. आपली प्रगती आपल्याच बळावर करावी लागेल. सर्व प्रकारच्या बळात वाढ झाली पाहिजे. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं असेल, तर आपला ‘स्व’ संपूर्णपणे समजून घेतला पाहिजे." असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही. आतंकवादाचा आणि जिहादचा रंग हिरवाच आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी गुरुवार, ३१ जुलै रोजी दिली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाने पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
भाषा हे संवादाचे माध्यम आहे हा भाषेविषयीचा व्यावहारिक दृष्टीकोन आज सर्वमान्य दिसतो. तो योग्यही असला तरीही, यामुळे भाषा शिकण्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनातही फरक हा पडतोच. संस्कृत सारख्या ज्ञानभाषा शिकण्याकडे अधिक कल वाढावा असे वाटत असेल, तर भाषा हे माध्यम व्यवहाराबरोबरच ज्ञानार्जनाचेही माध्यम झाले पाहिजे.
"अतिंद्र सरवडीकर यांच्या ग्रंथांचा विचार करायचा झाल्यास आपल्याला असं लक्षात येईल की प्राचीन परंपरेचे असलेलं नवं नातं यातून उलगडते. आपल्या शास्त्रीय संगीताचे हे संचित सर्व भाषांमध्ये, सगळीकडे पोहोचायला हवं" असे प्रतिपादन संगीतकार कौशल इनामदार यांनी केले. रवींद्र नाट्यमंदिर येथील पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात ते बोलत होते.
भाषा आणि भाषेवरून होणारे वाद हा सध्या सगळीकडे गाजणारा विषय. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून, भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. साहित्य, संगीताच्या प्रांतापासून ते अस्मितेच्या राजकारणापर्यंत, भाषा ही सर्वव्यापी असते. परंतु, असं असूनसुद्धा भाषेच्या विचारविश्वाची खोली अद्याप आपल्याला गवसली नाही. भाषा म्हणजे केवळ शब्द नाही, त्या शब्दांच्या अंतरंगातसुद्धा अनेक पैलू आपल्याला सापडतात. भाषा विश्वात आपण जितके खोल जाऊ, तितका हा समुद्र आपल्या आकलनाच्या टप्प्यात येईल.
राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वातावरण तापले असताना अभिनेत्री केतकी चितळे हिने एक वादग्रस्त विधान केले आहे. मराठी न बोलल्याने भोकं पडतात का? असा सवाल तिने केला आहे. या विधानानंतर तिच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे.
सध्या देशात भाषेवरून वादंग सुरु आहेत. या वादंगातील समान धागा म्हणजे समान प्रदेशातील भाषेला विरोध करताना, परकीय भाषेला आपलेसे करण्याची वृत्ती! मात्र, भाषा येताना सोबत तिची संस्कृतीही घेऊन येते असे म्हणतात, याचाच विसर आज पडलेला दिसतो. त्यामुळेच भाषांतर हा मुद्दा कायमच वादग्रस्त ठरला आहे. त्यानिमित्ताने भाषांतर आणि भावांतर यातील फरकाचा घेतलेला आढावा...
महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये तीन भाषांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत शिक्षण मंत्रालयाने लोकसभेत माहिती दिली.
(Manoj Tiwari On Raj Thackeray) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून वाद चांगलाच पेटला आहे. मिरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरुन अभिनेता, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. "राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तोही संपणार", असे खासदार तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांचे नाव घेऊन म्हटले आहे
मराठी भाषा सातासमुद्रापार पोचवण्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. सध्या मराठी भाषा १७ देशांपर्यंत पोचली असून, येत्या वर्षभरात ७४ देशांमध्ये बृहन्मराठी मंडळांची स्थापना करून मराठीचा प्रसार करण्याचा संकल्प मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत व्यक्त केला. यासोबतच देशातील सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य संग्रहालय उभारण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
भाषिक वसाहतवाद हा अ-युरोपीय देशांना समतल स्पर्धेच्या संधी नाकारतो. भाषिक क्षमतांच्या एकांगी विकासाच्या आग्रहाने युरोपीय देशांना आर्थिक विकासामध्ये सतत झुकते माप मिळत राहते. आर्थिक सामर्थ्याच्या आधारावर भाषिक वसाहतवाद आणि पर्यायाने वंशश्रेष्ठत्वाची अथवा राष्ट्रीय श्रेष्ठत्वाची भावना जरी उघडपणे दाखवली गेली नाही, तरी मनातून सतत जागृत ठेवली जाते. भाषिक वसाहतवादाचे उघडपणे दिसणारे हे पैलू आपण मागच्या आठवड्यात पाहिले. परंतु, ही भाषिक भिन्नता प्रगतीच्या मार्गातील अडसर नेमका कसा बनते आणि या भिन्नत्वाच्या मुळाशी असले
महाराष्ट्रातील भाषावादाच्या पार्श्वभूमीवर, “देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून, प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे,” अशी रा. स्व. संघाची जाहीर भूमिका परवा अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. त्यामुळे ‘मातृभाषेतून शिक्षण’ हा मूलभूत विचार अधोरेखित करण्याबरोबरच, संघ हिंदी भाषा अन्य भाषकांवर लादू इच्छितो, या अपप्रचारही आता धुळीस मिळाला आहे. मातृभाषा
सध्या महाराष्ट्रात भाषावादावरुन वादंग उठलेला दिसतो. पण, या विषयाच्या अधिक खोलात गेल्यास लक्षात येते की, या वादाची मुळे ही वसाहतवादी मानसिकतेत आहेत. त्यानिमित्ताने वैचारिक वसाहतवादाची पायाभरणी करणार्या या भाषिक वसाहतवादाचे विविधांगी पैलू उलगडणारा हा लेख...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा. स्व. संघ) शताब्दी वर्षानिमित्ताने देशभरात हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रभाषा असून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे, असे संघाचे मत असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सोमवारी प्रांत प्रचारकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत केले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी वरळीच्या डोम मैदानात झालेला मेळावा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. या मेळाव्याला भाकपचे प्रकाश रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, माकपचे अजित नवले, रासपचे महादेव जानकर, विनोद निकोले आणि भालचंद्र मुणगेकर यांनी हजेरी लावली. मात्र, काँग्रेसने या मेळाव्यापासून जाणीवपूर्वक अंतर राखले. राज ठाकरेंच्या याआधीच्या आक्रमक भूमिकेमुळे बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याची भीती काँग्रे
(Sushil Kedia) गेल्या महिन्याभरापासून मुंबईसह राज्यात सुरु असलेल्या मराठी - हिंदी भाषेच्या वादात केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियावरुन आव्हान दिले आहे. केडिया यांनी राज ठाकरे यांना एक्सवर टॅग करत 'आपण मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा' अशी पोस्ट केली आहे.
मीरारोडच्या परराज्यातील हिंदी भाषिक हॉटेल मालकाला झालेल्या मारहाणीचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहेत. दरम्यान या घटनेवर महाराष्ट्राचे गृहमंत्री यागेश कदम यांनी हॉटेल मालकाला सज्जड दम देताना म्हणाले की, “महाराष्ट्रात राहतोस तर तूला मराठी बोलता यायलाच हवी, येत नाही वैगरे महाराष्ट्रात एकून घेतले जाणार नाही. येत नसेल तर शिकण्याचा प्रयत्न कर.” असा दम मंत्री कदम यांनी दुकान मालकाला दिला आहे.
मराठी भाषेला मिळालेला 'अभिजात' दर्जा केवळ कागदोपत्री न राहता, जनमानसात रुजवण्यासाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मराठीच्या गौरवशाली अडीच हजार वर्षांच्या परंपरेचा जागर करण्यासाठी, आता दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस 'अभिजात मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' देखील साजरा केला जाईल, असे मराठी भाषा विभागाने शुक्रवारी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि संशोधनाला गती मिळणार
त्रिभाषा सूत्रावरून उगाचचा गोंधळ घालणाऱ्या ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्यासाठी कारण मिळालं. सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर दोघांनीही 'विजयी सभा' जाहीर केली, जणू काही हा लढा त्यांनीच उभारला होता! ५ जुलै रोजी वरळीच्या डोम मैदानावर ही सभा होणार आहे. पण या तथाकथित एकजुटीला ना मराठी भाषेचं भान आहे, ना मराठी माणसाच्या भविष्याची चिंता. फक्त एकत्र येण्याचं निमित्त हवं होतं, ते मिळालं इतकंच. बरं, इतकं करूनही आतल्या गोटात सध्या गोंधळ आहे तो ‘शेवटी भाषण कोण करणार?’ या मुद्द्यावर! राज ठाकरे हे प्रभावी भाषणांसाठी ओळखले
राज्यात लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, "एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. "हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी रविवार, दि. २९ जून रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठकपार पडली.
भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर राष्ट्राचा आत्मा आहे. भाषा जिवंत ठेवणे आणि त्यांना समृद्ध करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केले. दिल्लीतील अधिकृत भाषा विभागाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात ते बोलत होते.
“महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून, राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही. तर, पूर्वीपासून पाचवी ते आठवीपर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली, तसेच अन्य पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा अवाजवी, अतार्किक आणि अवास्तव आहेत. आम्ही मराठीचे आणि विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कर्ते आहोत”, अशी स्पष्ट भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सो
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज ठाकरेंनी राज्यतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे. हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही, कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, असे ते म्हणाले. बुधवार, १८ जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला.
काँग्रेसच्या कार्यकाळात इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून आली मग तीही रद्द करायची का? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना केला आहे. तसेच भाषेचे राजकारण सोडा आणि वस्तुस्थिती पाहा, असा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यभरात सध्या शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीवरून गोंधळ सुरु असताना आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तिसरी भाषा शिकवण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादासाठी तामिळला अधिकृत भाषा बनवण्याची मागणी केली आहे. याद्वारे पुन्हा भाषिक अस्मितेच्या मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न स्टॅलिन यांनी केला आहे.
कमल हसन यांचा तमिळ चित्रपट 'ठग लाईफ' हा कर्नाटक वगळता संपुर्ण भारतात ५ जून ला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पूर्वी हसन यांनी 'कन्नड ही भाषा तमिळ भाषेतून जन्माला आली', असे वक्तव्य केल्याने, कर्नाटक राज्य सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनावर भाषिक भावनेला ठेच पोहचल्यामुळे बंदी घातली होती. या बंदीच्या विरोधात जनहीत याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेत बाबत न्यायालयाने शुक्रवारी, दि.१३ जून रोजी कर्नाटक राज्याला नोटीस बजावली आहे.
चेन्नईमध्ये झालेल्या त्यांच्या आगामी चित्रपट Thug Life च्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात दिलेल्या विधानामुळे दिग्गज अभिनेते आणि राजकारणी कमल हसन सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. “तमिळ भाषेने कन्नड भाषेला जन्म दिला” असे विधान करत त्यांनी जे बोलले, त्याचा अर्थ सांस्कृतिक ऐक्य निर्माण करण्याच्या हेतूने घेतला गेला असावा, मात्र ते विधान कर्नाटकमध्ये प्रचंड रोषाला सामोरे गेले आहे.
" भाषेच्या विकासासाठी, आपल्याला प्रथम भाषाविचाराला प्राथमिकता देणे आवश्यक आहे. भाषेचा विकास कसा होतो, त्याच्या विचारविश्वाची व्याप्ती काय हे समजून घेणे गरजेचे आहे " असे मत भाषा अभ्यासक तथा बदलापूरच्या स्वायत्त मराठी विद्यापीठाचे विश्वस्त श्याम जोशी यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या " मराठी भाषा : अभिजातता आणि वस्तुस्थिती" या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुंबई मराठी साहित्य संघाचे उपाध्यक्ष मधुकर वर्तक, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष उषा तांबे उपस्थित होते.
vulgar and casteist language used by director Anurag Kashyap against the Brahmin community
इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठले विचार आहे. याचे मला कधी कधी आश्चर्य वाटते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असून अनेकांकडून याला विरोध करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
मराठी भाषेबद्दल कुणीचीही तडजोड नाही. पण हिंदी भाषासुद्धा प्रत्येकाला आली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, १९ एप्रिल रोजी दिली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Compulsion Hindi Language नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय जाहीर होताच, भाषिक राजकारणही पेटले. या विषयावर समाजमाध्यमांमध्येही वाद-प्रतिवाद सुरू आहेत. यानिमित्ताने भाषा, संस्कृती, साहित्य यांच्यातील परस्पर संबंध, शिक्षणातील त्रैभाषिक सूत्र याविषयीचे विविध कंगोरे ज्येष्ठ लेखक, माजी प्राचार्य आणि ‘साहित्य भारती, महाराष्ट्र’चे कार्याध्यक्ष नरेंद्र पाठक यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उलगडून सांगितले.
Children's drama भाषा या विषयावरून सध्या अनेक मतप्रवाह समोर येत आहेत. मातृभाषेतून शिक्षण ते प्रांतिक अस्मिता असे अनेक कंगोरे या मुद्द्याला आहेतच. पण, भाषा ही समाजाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी असल्याने नाटकामध्येही अशा अनेक पैलूंचा विचार करणे क्रमप्राप्तच. बालरंगभूमीवर भाषेचा हा मुद्दा कसा प्रभाव टाकतो, याचा घेतलेला आढावा...
मुंबई 'मेट्रो- ३'च्या टप्पा २अ मधील कामे प्रगतीपथावर आहेत. या टप्प्यातील मेट्रो स्थानकांवर सध्या नामफलक लावण्याचे काम सुरू असून, लवकरच सर्व स्थानकांची नावे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ठळकपणे लावली जातील याची हमी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने दिली आहे. यापूर्वी आरे ते बीकेसी दरम्यानचा मेट्रो-३ चा टप्पा सुरू झाला असून, त्या मार्गावरील सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजीत नामफलके आहेत.
(MNS News) मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी याचिका उत्तर भारतीय विकाससेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. मनसैनिक आणि त्यांचे नेते राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप करणारी ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देणार, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
Australia मध्ये नुकतेच ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्राच्या अनेक शाखांना टाळे ठोकण्यात आले आहे. या केंद्रांच्या शाखा जगभरातल्या 160 देशांमध्ये आहेत आणि यामध्ये दहा दशलक्ष विद्यार्थी चिनी भाषा आणि संस्कृती शिकत आहेत. अशा या केंद्रांना बंद करण्याचे पाऊल ऑस्ट्रेलियाने का उचलले? ‘सेंटर फॉर लँग्वेज एक्सचेंज अॅण्ड को-ऑपरेशन’ केंद्र नक्की काय आहे?
भाषा म्हटले की, हल्ली अवतीभोवतीचे अनेक वाद आपल्याला आठवतात. भाषा म्हणजे संस्कृतीची वाहक आहे, भाषा ही माणसाची अस्मिता आहे. भाषा म्हणजे अनेक प्रश्न आणि भाषा म्हणजे, अनेक प्रश्नांची उत्तरेसुद्धा. थोडक्यात काय, तर भाषा हा तुमच्या माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग. परंतु, भाषा जीवनाचा अविभाज्य भाग कधीपासून झाला, याचा आपण कधी विचार केला आहे का? अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये, या संदर्भात एक महत्त्वाचे संशोधन सुरू होते. या संशोधनामधून अनेक नवीन गोष्टी पुढे येत आहेत. या विद्यापीठातील एका प्रबं
Hindi आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तामिळनाडूवर ढोंगीपणाचा आरोप करण्यात आला आहे. ते म्हटले की, त्यांचे नेते आर्थिक फायद्यासाठी त्यांचे तमिळ चित्रपट आतापर्यंत हिंदी भाषेत डब करत होते. पक्षाच्या स्थापना दिनी बोलताना जनसेवा प्रमुख म्हणाले की, देशाच्या अखंडतेसाठी भारताला तमिळसह अनेक भाषांची आवश्यकता आहे.
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषेचा मुद्दा राजकारणात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण, ‘दक्षिण विरुद्ध उत्तर’ वगैरे तणाव हे भारतविरोधी ‘सोरोस टूलकिट’चा भाग आहेत, हे आता जनतेला कळून चुकले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.
Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.
मराठी भाषेवर प्रेम करीत तिला सौंदर्य बहाल करणार्या आणि संदर्भसूचीच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविणार्या तपस्विनी शिल्पा सबनीस यांच्याविषयी...
अमेरिका हा स्थलांतरितांचा देश असून, गेली अडीचशे वर्षे या देशात कोणत्याही एका भाषेला अधिकृत दर्जा देण्यात आला नव्हता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, आता इंग्रजीला अधिकृत भाषा घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाने राष्ट्रीय एकात्मता वाढेल, असे काहींचे मत असले तरी, भाषिक अल्पसंख्याकांसाठी हा मोठा धक्का ठरण्याची शक्यताही आहे.