श्वान निर्बीजीकरणावर कल्याण-डोंबिवली महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, तरीही शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत (मे २०२३ पर्यंत) भटक्या श्वानांनी ४८ हजार, १४ जणांचा चावा घेतला आहे. शहरातील वाढत्या भटक्या श्वानांची दहशत पाहता निर्बीजीकरणावर केला जाणारा खर्च याविषयी साशंकता निर्माण होत आहे. निर्बीजीकरणावर एवढा खर्च केला जात असला तरी शहरातील भटक्या कुत्र्यांची दहशत अजिबात कमी झालेली नाही.
Read More
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ‘अमृत मिशन योजने’अंतर्गत २७ गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी ठेकेदाराला सुरू असलेल्या सर्व जलकुंभाची कामे एप्रिल २०२३ अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट सुरू आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने आरोग्य सुविधांवर भर देणारा यंदाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या वर्षी जमेची १७०० कोटी रुपयांची बाजू अपेक्षित धरून १६९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
कल्याण खंबाळापाडा रोडवरील डोंबिवली एमआयडीसीत असलेल्या शक्ती प्रोसेस या टेक्सटाईल कंपनीला आज सायंकाळी भीषण आग लागली.या आगीत कंपनीतील कच्चा माल जळून खाक झाला आहे. आग विझविण्याचे अग्नीशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. आग रात्री उशिरार्पयत नियंत्रणात आली नव्हती. शक्ती प्रोसेस ही टेक्साटाईल कंपनी बंद आहे. या कंपनीत देखभाल दुरुस्तीचे काम काही कामगार करीत होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतून १८ गावांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला जोरदार टोला
कचरा प्रश्नावर नाचक्की झालेल्या कल्याण -डोंबिवली शहरात गेल्या सहा महिन्यांपासून 'शून्य कचरा मोहिम' राबविली जात आहे. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेतर्फे सुका कचरा देखील वेगळा करून त्यांचा पुनर्वापर कसा करता येईल हे पाहिले जात आहे.
कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर असतानाच गुरुवारी पहाटे डोंबिवलीच्या कोपर रोड भागात 2 मजली धोकादायक इमारतीचा भलामोठा भाग कोसळला. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून रात्री उशिरापर्यंत टिव्ही पाहत असणाऱ्या व्यक्तीमुळे इमारतीतील लोकांचा अगदी थोडक्यात जीव बचावला.
८ मे पासून हा निर्णय लागू होणार
गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक चणचणीने ग्रासलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी आता वेगवेगळे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना यात आता केडीएमटीचा भारही कडोंमपाला उचलावा लागत आहे.
दिव्यांगांना स्वबळावर काहीतरी करता यावं यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्यावतीने विशेष योजना तयार करण्यात येणार आहे.
डोंबिवलीकरांसाठी वाहतूककोंडीचा प्रश्न सुटतो न् सुटतो तोवर त्यांच्या जीवाला घोर लावलाय तो बेकायदेशीर भाडेवाढीने
राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा अध्यादेश दोन महिन्यांपूर्वी जारी केला. त्यानुसार ही बंदी लागू करण्यात आली. याबाबत पालिका जनजागृती साधणारे उपक्रम राबवत असली तरी त्याची माहिती व्यापकपणे लोकांपर्यंत पोहचलेली नाही.
स्वच्छतेच्या व शहर सौंदर्याच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम नागरिकांनी केले