स्वातंत्र्यदिनादिवशी इस्त्रो तिसरे विकास उड्डन लाँच करणार आहे. तर आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून याचे प्रक्षेपण होणार आहे, इस्त्रोने सांगितले (SSLV) चे तिसरे आणि अंतिम विकास उड्डान या वर्षी १५ ऑगस्ट च्या दिवशी सकाळी ९ : १७ वाजता होईल.
Read More
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने आणखी एक इतिहास रचला आहे. भारताची पहिली सौर मोहिम आदित्य एल-१ यशस्वीपणे पार पडली आहे. आदित्य एल १ लांग्रेज पॉईंटवर (एल-१) पोहोचवण्यात इस्त्रोला यश आले आहे. याद्वारे सुर्याचा जवळून अभ्यास करणे शक्य होणार आहे.
चांद्रयान-३ च्या अभूतपूर्व यशानंतर आता भारताने गगनयान मोहिमेची पहिली चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गगनयानचे क्रू मॉड्यूल यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे.
भारताच्या गगनयान मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील भविष्यातील प्रयत्नांची रूपरेषा ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
चांद्रयान ३ आणि आदित्य एल १ या मह्त्त्वपूर्ण अवकाश मोहिमांनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आणखी एका मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी गगनयान मिशनच्या पहिल्या चाचणीचे उड्डाण केले जाणार आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने यासंदर्भात ट्विट केले आहे.
गेल्या काही दिवसांत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) प्रगतीचे नवनवीन शिखर गाठत असतानाच आता इस्त्रोकडून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. इस्त्रोवर दररोज १०० हून अधिक हल्ले होत असल्याची माहिती पुढे आली आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग करुन भारत दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे. आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आपल्या गगनयान मोहिमेसाठी मानवरहित उड्डाण चाचणी सुरू करणार आहे. या चाचणीसाठी विकसित केलेल्या अंतराळयानातून अंतराळवीरांना बाहेर काढणारी यंत्रणा 'क्रू एस्केप सिस्टीम'ची चाचणी घेण्याची योजना आहे.
भारताने चांद्रयान-३ यशस्वीपणे चंद्रावर प्रक्षेपित केले. तसेच विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण धृवावरील माहितीही दिली आहे. त्यानंतर चंद्रावर अंधार पडल्याने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आले होते.
भारताच्या चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगला आता जवळपास एक महिना पुर्ण होत असून उद्याचा दिवस या मोहिमेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पुन्हा सुर्य उगवणार आहे. त्यामुळे उद्या इस्त्रोकडून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
चांद्रयान-३ नंतर आता भारताने सौर मोहिम हाती घेतली असून आदित्य एल-१ असे या मोहिमेचे नाव आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ चे प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपणासाठी इस्त्रो पुर्णपणे सज्ज असून बुधवारी आदित्य एल-१ ची पूर्व चाचणीही करण्यात आली आहे.
भारताची पहिली सौर मोहिम आदित्य एल-१ लवकरच प्रक्षेपिण होणार आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता श्रीहरीकोटा येथून आदित्य एल-१ प्रक्षेपित केले जाणार आहे. चांद्रयान-३ च्या यशानंतर आता आदित्य एल-१ कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या आठवड्यात चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी प्रक्षेपण झाले. तेव्हापासून प्रज्ञान रोव्हर कामाला लागले आहे. चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा आज आठवा दिवस आहे. आज इस्त्रोने पुन्हा एकदा प्रज्ञान रोव्हरचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रज्ञान रोव्हर सुरक्षितपणे फिरताना दिसत आहे.
भारताचे नाव इतिहासजमा करणाऱ्या चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पहिल्यांदाच विक्रम लँडरचा चंद्रावरील फोटो समोर आला आहे. हा फोटो प्रज्ञान रोव्हरने घेतला आहे. प्रज्ञान रोव्हरवर असलेल्या नेव्हिगेशन कॅमेऱ्यामध्ये हा फोटो घेण्यात आला आहे.
चांद्रयान-३ च्या यशानंतर आता भारत सुर्यावर पाऊल ठेवणार आहे. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ मिशन लाँच करण्यात येणार आहे. त्यापुर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने प्रक्षेपणाची चाचणी पुर्ण केली आहे.
शेकडो पक्ष्यांचा आवाज एकत्रित करुन चित्रपटतातील गीताला निसर्गातील पशुपक्ष्यांच्या आवाजातील संगीत देणारे नाशिकचे संगीतकार धनंजय धुमाळ यांनी भारतीय चंद्रयान मोहिमेला समुहगीताने अभिवादन केले आहे. या गीताची लिंक यूट्यूबवर प्रसारित होताच हजारोच्या संख्येने त्यांना लाईक मिळत आहेत.
इस्त्रोने आता 'गगनयान' मोहिमेची तयारी सुरू केली आहे. इस्त्रोची ही पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. या मोहिमेद्वारे अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. पंरतू याआधी इस्त्रोकडून मोहिमेची चाचणी होईल. इस्त्रो लवकरच गगनयानचे ट्रायल मिशन लाँच करणार आहे. ज्यात मानवाआधी रोबोटला अंतराळात पाठवले जाईत, असे इस्त्रोकडून सांगण्यात आले आहे.
भारताची 'चांद्रयान-३' ही मोहिम यशस्वीपणे पूर्ण होताना आज दिसत आहे. इस्त्रोने सोडलेले चांद्रयान लवकरच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅन्ड होणार आहे. इस्त्रोने उचललेल्या या शिवधनुष्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
“रॉकेट वुमन ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितू करिधल श्रीवास्तव या सध्या भारताच्या चांद्रयान - ३ मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.
चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना ही मोहिम यशस्वी होण्याकरिता आता देशातील जनतेकडून यज्ञ तसेच पुजा-अर्चना करण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी होऊ दे, असे मागणेही मागण्यात येत आहे. आज वाराणसी येथील मंदिरात लोकांकडून ही पुजा करण्यात येत आहे.
इस्रोने आज म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हरपासून वेगळे केले. आता प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल तर लँडर-रोव्हर २३ ऑगस्टला संध्याकाळी ५:४७ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
नुकतीच इस्त्रोने चांद्रयान-३ आता चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले असल्याची माहिती दिली आहे. १७ ऑगस्ट रोजी चांद्रयानाचे प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होणार आहे. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-३ पाठवण्यात आले होते.
भारताने पाठवलेले चांद्रयान-३ आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे. आता चांद्रयान-३ ची चंद्रापासूनची कक्षा १५० किमी X १७७ किमी इतकी करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथून १४ जुलै रोजी चांद्रयान-३ प्रक्षेपण करण्यात आले होते.
१ ऑगस्ट रोजी आकाशात सुपरमून दिसणार आहे. यामध्ये चंद्र सामान्यतः मोठा आणि तेजस्वी दिसतो. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो तेव्हा असे घडते आणि या वेळी पौर्णिमाही असते. पण सुपरमूनच्या दृष्टीने ऑगस्ट महिना खूप खास आहे, कारण या महिन्यात दोन सुपरमून दिसणार आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) च्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ चे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे. चांद्रयान-३ आपल्या पूर्वनिर्धारित वेळेनुसार २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रावर जाण्याचा प्रवासाला निघाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांद्रयान-३ ची पहिली पायरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
चांद्रयान-३ भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. इस्त्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीवर देशभरातून इस्त्रोवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. चांद्रयान-३ मोहिमेनंतर इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांनी सुध्दा इस्त्रोचे अभिनंदन केले आहे.
सरकारने गुरुवारी सांगितले की भारत २०३० पर्यंत एक अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली.जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताची २०२३ पर्यंत गगनयान पाठवण्याची योजना आहे आणि त्यापूर्वी पहिल्या दोन मानवरहित मोहिमा पाठवल्या जातील. त्यांच्या रोबोटिक मिशनचा उल्लेख करून ते म्हणाले की, त्यापैकी एक पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाठवण्यात येईल आणि दुसरे मिशन वर्षाच्या अखेरीस पाठवण्याची यो
घराजवळील एका चर्चासत्रामधून प्रेरणा घेत, अंतराळविश्वाचे वेड लागलेल्या ठाणेकर युवा शास्त्रज्ञ अक्षत मोहिते याच्या अंतराळ संशोधनाची दखल ‘नासा’ने घेतली आहे. त्याच्या या ‘अक्षत’ भरारीविषयी...
इस्त्रोच्या वरिष्ठ सल्लागार आणि वैज्ञानिक डॉ. तपन मिश्रांनी आपल्याला तीनवेळा विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न गेल्या तीन वर्षात झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. डॉ. मिश्रा ३१ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी ५ जानेवारी रोजी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये हे आरोप केले आहेत. इस्त्रोचे वैज्ञानिक पुढे जावेत, अशी बाहेरच्या लोकांची इच्छा नाही. तसेच कमी खर्चात अत्याधूनिक प्रणाली तयार करते ही सलही अनेकांना बोचते.
संगमनगरी प्रयाग येथे बुधवारी एक आश्चर्यकारक प्रकरण उघड झाले आहे. सोमवारी सायंकाळपासून एकजण यमुना नदीच्या पुलावर तिरंगा घेऊन उभा होता. ४८ तासांच्या प्रयत्नानंतर त्याला पोलीसांनी सुरक्षित खाली उतरवले. दरम्यान, मी चांद्रयानाशी संपर्क व्हावा, म्हणून प्रार्थना करत, असल्याचा दावा त्याने केला आणि पोलीसही चक्रावले.
मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या डॉ. अतीश दाभोलकर यांची नुकतीच इटलीस्थित 'आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्रा'च्या संचालकपदी निवड झाली. त्यांच्या या प्रवासाविषयी थोडक्यात
'चांद्रयान-२' हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचल्यानंतर, यातील चंद्रकक्षा उपग्रहाचे आयुष्य आणखी एक वर्षाने वाढविण्यासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांनी तयारी सुरू केली आहे. या उपग्रहाचे आयुष्य आधी एक वर्षासाठी निर्धारित करण्यात आले होते. ते आता एक वर्षासाठी वाढवले जाऊ शकते.
रविवारी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी रॉकेट 'जीएसएलव्ही'-'एमके' तृतीय यानात 'क्रायोजेनिक स्टेज'वर द्रवस्वरूपात ऑक्सिजन भरण्यात आला होता. रात्री १ वाजून ४ मिनिटांनी 'चांद्रयान-२'ला नेणाऱ्या जीएसएलव्ही रॉकेटच्या क्रायोजेनिक इंजिनमध्ये लिक्विड हायड्रोजन भरण्याचे काम पूर्ण झाले होते. मात्र, २ वाजून १३ मिनिटांनी तांत्रिक कारणांमुळे काउंटडाउन थांबवण्यात आले.
'स्क्रॅमजेट'च्या यशस्वी परीक्षणाने भारतीय शास्त्रज्ञांचे मनोबलही वाढले असून विज्ञान-तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन तसेच संरक्षण क्षेत्रात भारत पुढेपुढेच झेप घेत असल्याचे यातून स्पष्ट होते
भारतीय अंतराळ संशोधन संस्थातर्फे (इस्त्रो) 'चंद्रयान २' मोहिमेवर पाठवण्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे. 'चंद्रयान २' पाठवण्यासाठी करण्यात आलेली अंतिम चाचणीही यशस्वी झाली आहे. तमिळनाडू येथील महेंद्रगिरी येथे हे परिक्षण करण्यात आले होते.
विनाशकारी ‘फनी’ चक्रीवादळाने गेल्या आठवड्यात ओडिशाच्या सागरी किनारपट्टीला जोरदार धडक दिली. या वादळामुळे माजलेल्या हाहाकारामुळे जवळपास एक कोटी नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. मात्र, हवामान खात्याचा अचूक अंदाज व ओडिशा सरकार आणि प्रशासन वेळीच सतर्क राहिल्याने मोठी हानी टळली आहे. ‘फनी’चक्रीवादळासंदर्भात अगदी अचूक अंदाज वर्तवल्याबद्दल भारतीय हवामान खात्याचा संयुक्त राष्ट्राने गौरव केला आहे.
मोठी जीवित व वित्तहानी टळली
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी रात्री प्रक्षेपित केलेले ‘मायक्रोसॅट’ आणि ‘कलामसॅट’ हे दोन उपग्रह नियोजित कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावले आहेत. पीएसएलव्ही-सी ४४ या प्रक्षेपकाद्वारे हे उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.
चंद्रावरचे पहिले पाऊल मनुष्याने ठेवले आणि इतिहास घडला. अनेक देशांनी आजवर चंद्रयान मोहिमा यशस्वी रित्या पार पाडल्या आहेत
: चंद्राच्या पृष्ठभागाचा आणखी अभ्यास करण्याच्या मोहिमेतील ‘चांद्रयान-२’ हे अंतराळयान येत्या एप्रिल महिन्यात अंतराळात झेपावणार आहे,
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) अंतराळात मानव पाठविण्याची मोहीम आखली असून या मोहिमेचे नाव ‘गगनयान’, असे ठेवण्यात आले आहे
: जगातील अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीची संस्था म्हणून ओळख असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. इस्त्रोने गुरुवारी सकाळी ‘पीएसएलव्ही-सी-४३’ प्रक्षेपकाद्वारे एकावेळी तब्बल ३१ उपग्रह अवकाशात सोडले.
भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ रविवारी ‘पीएसएलव्ही-सी ४२’च्या सहाय्याने दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन उड्डाण करणार आहे.
एरवी अमेरिकेच्या विरोधात उभे ठाकण्याचा पवित्रा घेणाऱ्या मार्क्सवाद्यांनी नंबी प्रकरणात मात्र सीआयएच्या हातचे खेळणे होत देशद्रोहाचे नवेच ‘केरळी मॉडेल’ अंमलात आणले, तर नारायणन यांची चौकशी करणाऱ्या सी. बी. मॅथ्यूज या अधिकाऱ्याला केरळच्या पोलीस महासंचालकपदीही बसवले. मार्क्सवाद्यांना या कामी मदत केली ती केरळ आणि केंद्रातील काँग्रेसने.
इस्त्रो गुप्तचर प्रकरणी शास्त्रज्ञ नांबीनारायण यांना विनाकारण अटक करण्यात आली असल्याचे सुप्रीम कोर्टाकडून आज सांगण्यात आले.