बांगलादेशात होणाऱ्या हिंदू अत्याचाराच्या मालिकेने कळस गाठला आहे. येथील गोपाळगंज जिल्ह्यातील कोटालीपारा भागात २४ तासांत तब्बल सहा हिंदू मंदिरांमध्ये लुटमार झाली. हा प्रकार रविवार, दि. १५ जून रोजी उघड झाला. नेत्रकोना जिल्ह्यात कट्टरपंथींनी हरिदास समुदायाच्या हिंदू कुटुंबांची घरे उद्ध्वस्त केली. गोपाळगंज नेत्रकोना आणि सुनामगंज जिल्ह्यातील हिंदू जास्त या अत्याचारापासून पीडित आहे.
Read More
प्यू रिसर्च सेंटर’च्या नवीन अंदाजानुसार 2020 पर्यंतच्या दशकात मुस्लिमांची लोकसंख्या इतर कोणत्याही प्रमुख धार्मिक गटांपेक्षा वेगाने वाढली आहे. ख्रिश्चनांनंतर मुस्लीम जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा धार्मिक गट ठरला आहे. ‘प्यू’ अहवालानुसार, 2010 ते 2020 पर्यंत मुस्लिमांची संख्या 347 दशलक्ष लोकांनी वाढून 2.0 अब्ज झाली आहे. त्याचवेळी ख्रिश्चन समुदाय हा जगातील सर्वात मोठा धार्मिक गट बनला आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांची लोकसंख्या 12.2 कोटींनी वाढून 229 कोटी झाली आहे. असे असले तरीही, ख्रिश्चन समुदायाचा जागत
तृणमूल काँग्रेसचा नेता प्रवक्ता रिजू दत्ता याने म्हटले आहे की, “शर्मिष्ठा ही माझी मुलगी असती, तर तिचे श्राद्ध घातले असते, तिच्याशी संबंध तोडले असते, ती काही लहान नाही,” तर दुसरीकडे शर्मिष्ठा पानोली हिला ममता बॅनर्जीच्या सरकारने अटक केली आहे. शर्मिष्ठाने मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत म्हणेे. सर्व धर्माचा आदर करावा, हे मान्यच आहे. मात्र, सदोदित एकाच धर्माचा आदर कसा राखण्यासाठी संपूर्ण कायदा-सुव्यवस्था यंत्रणा राबवणे, म्हणजे लोकशाहीला कलंक आहे. हा कलंक ममता बॅनर्जीचे सरकार दिमाखात मिरवतही आहे. मात्र,
" माणिक वर्मा यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असंख्य पैलू दडले होते, वास्तविक माणिक वर्मा म्हणजे परिपूर्णतेचा साक्षात्कार होता" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. दिवंगत गायिका माणिक वर्मा यांच्या सांगीतिक जीवनाचा आढावा घेणाऱ्या " माणिक मोती" या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, लेखक अच्युत गोडबोले, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, जेष्ठ शास्त्रीय संगीतकार विकास कशाळकर, चैतन्य कुंटे, माणिक वर्मा यांच्या शिष्य
(Pakistani Hindus With LTV Not Affected By Visa Ban) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांना जीव गमवावा लागला. भारत सरकारने या हल्ल्याला जबाबदार धरत पाकिस्तान कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी सर्व व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाचा दीर्घकालीन व्हिसा असलेल्या पाकिस्तानी हिंदूंवर कोणताही परिणाम होणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी
Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा
Hinduphobia अमेरिकेत हिंदूंविरोधात घृणा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी काही कायदे बनवले जावेत. हिंदूफोबिया विरूद्ध अमेरिकेतली जॉर्जिया राज्यात हे विधेयक आणले गेले आहे. हिंदूंच्या संरक्षणाच्या हितासाठी विधेयक आणणारे पहिले अमेरिकेतील राज्य हे जॉर्जिया आहे. यामुळे आता अमेरिकेतील हिंदूंविरोधात घृणा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
Mamata Banerjee प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हिंदूद्वेषाच्या कहाण्या वर्णाव्या त्या किती! कारण, मुख्यमंत्री म्हणून आता तिसरा कार्यकाळ सुरू असलेल्या ममतादीदींनी हिंदूंना प्रारंभीपासूनच गृहीत धरले. आपण हिंदूंशी कसेही वागलो, तरी बंगाली अस्मितेच्या नावाखाली बंगाली हिंदू आपल्या पाठीशीच सदैव उभा राहील, हा दीदींचा भ्रम. म्हणूनच हिंदूंना खिसगणतीतही न मोजणार्या दीदींनी आपले सगळे लक्ष मुख्यत्वे मुस्लीम मतदारांकडे वळवले. बंगालमध्ये मुस्लीम मतपेढीची वाढलेली ताकद हेच त्यामागचे कारण. आज बंगालमध्ये तब्बल
target Hindu shop बंगालमधील मालदा जिल्ह्यातल मोथाबाडी परिसरात गुरूवारी २१ मार्च २०२५ रोजी सांप्रदायिक हिंसा झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाला घेऊन अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत हल्लेखोरांनी रस्त्यावर उतरत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. आरोप आहे की, मुस्लिमांनी हिंदूंच्या दुकानांना लक्ष्य केले आहे.
उरुस-दंगलीनंतर हिंदूंचे नुकसान करण्याचा काळ आता संपला आहे. सर्वसामान्य हिंदूंपासून ते प्रशासन, राजकीय पक्ष दंगेखोरांना योग्य धडा शिकवण्याच्या मानसिकतेत आले आहेत. त्यामुळे समाज म्हणून आपले आदर्श कोण, औरंगजेब की अब्दुल कलाम, हे आता मुस्लीम समाजाने ठरवावे.
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास केलेल्या पवन कल्याण यांनी तमिळनाडूतील हिंदी विरोधावर टीका करताना, तमिळ राजकीय नेते ढोंगी असल्याचा आरोप केला. त्यांनी विचारले की, "तमिळनाडूतील नेते हिंदीच्या सक्तीला विरोध करतात, पण त्याचवेळी त्यांच्या चित्रपटांचे हिंदीत डबिंग करून व्यावसायिक लाभ घेतात. यामध्ये नेमका कोणता न्याय आहे?"
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही.
मानवी स्थलांतर ही खरं तर मानवी उत्क्रांतीपासूनचीच निरंतर सुरु असलेली प्रक्रिया. अशा स्थलांतरातून नवीन प्रदेशात प्रत्येक धार्मिक समुदायाची तेथील स्थानिक समाजांशी जुळवून घेण्याची प्रक्रियाही वेगवेगळी असते. काही गट नव्या देशांत गेल्यावरही आपली वेगळी ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकसंख्येच्या बळावर स्थानिक संस्कृतीत मोठे बदल घडवण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. मात्र, हिंदू समाजाचा दृष्टिकोन प्रारंभीपासूनच यापेक्षा पूर्णतः वेगळा राहिला आहे. हिंदू जिथे जातो, तेथील स्थानिक संस्कृतीशी तो समरस होतो, त्या
हिंदू हिंदूशी जोडण्यासाठी ‘विश्व हिंदू परिषदे’च्या ‘मातृशक्ती आयामा’तर्फे मुंबईतील पवई, विक्रोळी येथे सेवा वस्तीतील महिलांसाठी शिलाई केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले. स्वयंरोजगारातून आता महिलाशक्ती एकवटली आहे. या हिंदूहितैषी उपक्रमाचा आढावा घेणारा हा लेख...
Save Hindus बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यादरम्यान, देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. ही घटना सिराजगंजच्या काजूपूर उपजिल्ह्यात घडली आहे. शनिवारी १ मार्च २०२५ रोजी सोनामुखी बाजारपेठेत असलेल्या शिखा स्मृती सर्वजन दुर्गा मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. या मंदिराचे पुजारी जतिन कुमार कर्माकर यांनी सांगितले की, अज्ञातांनी बाहेरून मंदिराच्या आतमध्ये स्फोटक फेकले. यावेळी मूर्तींवर हल्ला करत मूर्तींची विटंबना करण्यात आली.
बॉलिवूड दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक फराह खान यांनी हिंदू सण होळीबद्दल कथितरीत्या अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर विकास फाटक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी त्यांच्या वकिलामार्फत मुंबईतील खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत फराह खानने होळी साजरी करणाऱ्यांना ‘छपरी’ संबोधून हा सण विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘छपरी’ हा शब्द सामान्यतः संस्कारहीन किंवा असभ्य व्यक्तींना उद्देशून वापरला जातो, त्यामुळे हा शब्दप्रयोग हिंदू समाजाच्या भावना दुखावणा
वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयाने चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्माती एकता कपूर हिच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्हेगारी तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ अंतर्गत चौकशी अहवाल ९ मेपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे.
convert छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातून धर्मांतरण (convert) करण्याचा प्रकार समोर आला आहे. साक्री पोलीस ठाण्यातील पाद्री संतोष मेशो आणि पत्नी अनु मेशो या गरीब लोकांना आमिष दाखवत धर्मांतरणाच्या जाळ्यात अडकवले जात असल्याचे बोलले जात आहे. या संबंधित माहिती एका पीडितेने दिली आहे.
Bangladeshi Hindu बांगलादेशात एका रेस्टॉरंटमध्ये कट्टरपंथी हृदय रेहान नावाच्या युवकाने बांगलादेशी हिंदू युवतीवर अत्याचार केला. संबंधित युवतीचे नवय हे १९ असून तिने घरी जात आत्महत्या केली आहे. ३० वर्षे आरोपी रेहान बौफल हा उपजिल्हा राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष मोहसीन हवालदार यांचा मुलगा आहे.
Hindu हिदूंमध्ये फूट पाडून त्यांच्यावर राज्य गाजविणे सोपे होते, हे ब्रिटिशांना ठावूक होते. पण हेच हिंदू एकवटले, तर ते काय करू शकतात, त्याची जाणीव जगाला आता होऊ लागली आहे. या हिंदूंच्या जागृतीचा धसका घेतलेल्या ब्रिटनने हिंदू राष्ट्रवादाला नामोहरम करण्यासाठी, त्याचे सांस्कृतिक खच्चीकरण करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
मुंबई : बांगलादेशात इल्सामिक कट्टरपंथींकडून हिंदू अल्पसंख्याकांना ‘टार्गेट’ करत त्यांच्यावर हल्ले, अत्याचार करण्याचा प्रयत्न अद्यापही सुरूच आहे. इस्लाममध्ये मूर्तिपूजा-मंदिरे हराम म्हणून त्यांनी हिंदूंच्या या प्रतिकांवर हल्ले केले. बांगलादेशात एका अर्थाने युनूस सरकार येताच कट्टरपंथी इस्लामिक गटांनी देशातील शिक्षण ( Education ) क्षेत्रावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण क्षेत्रात इस्लामिक कट्टरतावाद्यांची घुसखोरी हा अचानक घडलेला प्रकार नव्हे, तर शेख हसीना यांच्या राजवटीत इस्लामी गटांनी या क्ष
शेख हसीना यांचे सरकार उलथवल्यापासून ते आजतागायत बांगलादेशातील हिंदू जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यात ‘इस्कॉन’च्या चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपांखाली झालेली अटक, त्यांना जामीन मिळू नये म्हणून केलेली कायदेशीर कोंडी, यावरुन बांगलादेशमधील हिंदूंची विदारक परिस्थिती समोर यावी. त्यामुळे अमेरिकी ‘डीप स्टेट’चे हस्तक असलेल्या युनूस राजवटीत बांगलादेशी हिंदूंचे भय संपण्याची चिन्हे नाहीत.
(Bangladeshi Hindus) बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने होत असलेले हल्ले तसेच बांगलादेशातील हिंदू धर्मगुरु इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांना झालेली अटक या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील राज्य विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांबाबत मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी धार्मिक आणि मूलभूत मानवी हक्कांसह मूलभूत स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन केले.
बांगलादेशात २३ नोव्हेंबर रोजी भारतातून एक हिंदू युवक आपल्या मित्राकडे गेला होता. त्यावेळी बांगलादेशात आपण भारतीय हिंदू असल्याची ओळख सांगत त्याच्यावर हल्ला करण्यास सुरूवात केली . युवकाचे नाव सायन घोष असून तो प. बंगालची राजधानीच्या उत्तरेकडे बेलघरिया भागातील रहिवासी आहे.
आता लढाई फेक नरेटीव्हशी! ( Hindu )
मुंबई : “एकीकडे हिंदू बांधव जातीयवादात अडकले आहेत, तर दुसरीकडे सगळे अफजल, बाबर, तुगलक, घोरी, गझनी, औरंगझेब एकत्र झाल्याचे पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत, तोपर्यंत संविधान सुरक्षित आहे. त्यामुळे अफजलशाही विचार रोखण्याकरिता आगामी विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान होणे आवश्यक आहे.” असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय ( Ashwini Kumar Upadhyay ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी साधलेल्या संवादातून केले आहे.
Hindu बांगलादेशात एका हिंदू (Hindu) तरुणाला मौलाना आणि लष्कराने बेदम मारहाण केली. मुस्लीम तरुणावर प्रेम असल्याने तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी सांगितले की, अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांचे वृत्त खोटे असून अतिशयोक्ति असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मुस्लिमांच्या ‘व्होट जिहाद’ला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मतांचे धर्मयुद्ध छेडले आहे. मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळावीत, यासाठी ‘उलेमा’च्या १७ मागण्या मविआच्या नेत्यांनी मान्य केल्या आहेत. बहुसंख्या हिंदूंना जातीपातीत विभागून मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठीचे हे षड्यंत्र म्हणूनच हाणून पाडण्याची गरज तीव्र झाली आहे.
मुंबईत हिंदू ( Hindu ) अल्पसंख्याक होणार असल्याचा दावा! काय #TISS च्या अहवालात? मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा. https://www.amazon.in/dp/B0DKTSZVRF
Bangladeshi Hindu बांगलादेशात कट्टरपंथींसह पोलीसांनी हिंदू समाजावर अत्याचार केला आहे. हिंदू आणि त्यांच्या उपासकांवर टीका -टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना लक्ष केले आहे. ही घटना बांगलादेशातील चितगावा येथे मंगळवारी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली आहे. यावेळी पोलिसांनी हिंदूंवर आत्याचार केल्याचे वृत्त आहे.
Hindus कॅनडातील ब्रॅम्प्टन येथील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पण यामुळे हिंदूंचा क्रोध शांत होत नाही. कॅनडात मोर्चा काढून त्यांनी आपल्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
परदेशांतील हिंदू समाज आणि मंदिरांवर होणार्या हल्ल्यांवर फक्त भाजपचे नेतेच टीका करताना का दिसतात? देशातील विरोधी पक्षांकडून या हल्ल्यांचा निषेध कधीच का केला जात नाही? टीव्हीवरील चर्चेत हिंदूंची बाजू फक्त भाजपचेच प्रवक्ते का मांडतात? कारण, विरोधी पक्ष हे सत्तेसाठी केवळ मतांचे राजकारण करीत आहेत. सामान्य हिंदूंच्या आस्था आणि समस्यांशी या पक्षांना काही देणे-घेणे नाही. पॅलेस्टाईनमधील मुस्लीम जनतेचा त्यांना कळवळा येतो. पण, आपल्याच देशात आणि परदेशातही हिंदूंवर अत्याचार झाल्यावर ते मूक गिळून गप्प बसतात. हेच ते मुस्
निजामाच्या क्रूर अत्याचाराविरोधात मराठवाड्याच्या हिंदूंनी तीव्र संघर्ष केला. प्रचंड बलिदान आणि त्यागाने मराठवाडा स्वतंत्र झाला. अशा या मराठवाड्यामध्ये नुकत्याच ‘लव्ह जिहाद’विरोधी अनेक सभा घेतल्या. त्यानिमित्ताने ‘लव्ह जिहाद’बद्दलचे मराठवाड्यातील वास्तवाचा मागोवा घेताना जे सत्य समोर आले, ते या लेखात सारांश स्वरूपात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न....
सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांक लाल रंगात बंद झाले आहेत. पश्चिम आशियाई देशांमधील तणाव, एफपीआयकडून मोठ्या प्रमाणात होणारी समभाग विक्री या सर्व कारणांचा नकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला आहे. सेन्सेक्स ८०,०६५.१६ पातळीवर तर निफ्टी ५० २४,३९९.४० च्या पातळीवर बंद झाला.
मध्य प्रदेशात उच्च न्यायालयाने पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देणाऱ्या एका व्यक्तीला काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्याने एका महिन्यातून दोन वेळा पोलीस ठाण्यात यावे आणि २१ वेळा राष्ट्रध्वजाला वंदन करावे, जर त्याने असे केले तरच त्याला जामीन दिला जाईल, असे न्यायालयाने सांगितले.
Injustice against Hindus भारतातील ईशान्य भागातातील त्रिपुरा येथे जातीय ताणावाची नोंद झाली आहे. काही समाजकंटकांनी हिंदू घरांवर गोळीबार केला आणि घरे जाळून टाकण्याचे हैवानी कृत्य केले आहे. या सुरू असलेल्या हिंसाचारात हिंदूंवर हिंसाचार करण्यात आले आहेत. तर दोघेजण जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना रविवारी ९ ऑगस्ट २०२४ रोजी घडली आहे.
Durga Puja बांगलादेशातील हिंदूवरूद्ध हिंसाचार आणि भेदभावाच्या होत असल्याचे चित्र आहे. दुर्गापूजेच्या या उत्सवाला निषेध करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कट्टरपंथी गट रस्त्यावर उतरत दुर्गापूजेला परवानगी देणार नाही अशा घोषणा देत आहेत.
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड(एचयुएल)ला प्राप्तिकर विभागाकडून कोट्यवधी रुपयांची नोटीस पाठविण्यात आली आहे. एचयुएल कंपनीला प्राप्तिकर विभागाकडून ९६२.७५ कोटी रुपयांची नोटीस प्राप्त झाली असून याविरोधात अपील करणार असल्याचे कंपनीने सांगितले.
Bangladesh Violence Against Hindus बांगलादेशात अद्यापही हिंसाचार थांबलेला नाही. कट्टरपंथींनी हिंदूंच्या मंदिरांवर, घरांवर हल्ले केले. तसेच काहींच्या दुकांनांची तोडफोडही केली आहे. मात्र, अशातच आणखी एक काळीज पिळवटून टाकणारे कृत्य त्यांनी केले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या अवामी लीग पक्षातील नेत्याचे हॉटेल जाळण्यात आले आहे. ही घटना बांगलादेशातील जशूर येथे ५ ऑगस्ट रोजी घडली आहे. हॉटेलमध्ये माणसे आहेत याची माहिती असूनही कट्टरपंथींनी या हॉटेलला आग लावली. हॉटेलमध्ये काही भारतीय नागरिकही वास्तव्य
अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी कृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मशीद वादात हिंदू बाजूने दाखल केलेले १८ दावे सुनावणीयोग्य असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे हिंदू समाजाचे विजयाकडे आणखी एक पाऊल पडले असल्याचे मानले जाते. देवता आणि हिंदू पक्षांनी दाखल केलेल्या दाव्यांच्या मेंटेनिबिलिटीस अर्थात दावे सुनावणीयोग्य असण्यास शाही इदगाह मशिदीच्या व्यवस्थापनाने आव्हान दिले होते.
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका येथे हिंदूंवर हल्ल्याची घटना घडली असून त्यात ६० जण जखमी झाले आहेत. हा हल्ला ढाक्यातील मिरांजिला कॉलनीत झाला. जिथे हिंदूंची घरे पाडण्यात आली आणि मंदिरालाही लक्ष्य करण्यात आले.
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की : २८९८ एडी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून यात हिंदील आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार एकत्र झळकले आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन यांसारखे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. यादरम्यान, कमल हासन यांनी रजनीकांत यांच्याबरोबर कसे संबंध आहेत. भविष्यात ते एकत्रितपणे काम करण्याची काही शक्यता आहे का? याबद्दल खुलासा केला आहे.
संरक्षण व अंतराळ या समभागांच्या मूल्यांकनात मोठी वाढ होत असताना आज पुन्हा एकदा एचएएल (Hindustan Aeronautics Limited HAL) समभागात मोठी वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने कंपनीच्या अंतर्गत कारणांमुळे झालेली आहे. कंपनीला संरक्षण मंत्रालयाने १५६ Light Combat Helicopters साठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) दिल्याने शेअर बाजारात कंपनीच्या समभागात (Shares) मध्ये वाढ झाली आहे.
जम्मू-काश्मीर मधील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न अशा दहशतवादी हल्ल्यांद्वारे केला जात आहे, हे स्पष्ट आहे. पण, सलग तिसर्यांदा सत्तेवर आलेले मोदी सरकार इस्लामी अतिरेक्यांचे असे मनसुबे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही.
हिंदू समाजाच्या केवळ धर्मभावनेचा विचार करून थांबून चालणर नाही. त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक मानस योग्य प्रकारे समजून घेऊन पुढची रणनीती आखली पाहिजे. सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू सर्वसमावेशक असतो, समन्वयवादी असतो, सर्व उपासना स्थानांचा आदर करणारा असतो. सर्वांच्या कल्याणाची कामना करणारा असतो. या भावना जातिनिरपेक्ष आहेत. धर्म भावना, सामाजिक आकांक्षा आणि सांस्कृतिक मनोभाव याचा सुंदर मिलाप केल्यानेच राजकीय मत तयार होईल.
भारतात तिसर्यांदा पुन्हा रालोआ बहुमताने जिंकली. मोदी पुन्हा सत्तेत येतील. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार, या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरच्या प्रतिक्रिया पाहणे गरजेचे. चीनचे म्हणणे असे की, भारतात मोदी पुन्हा येणार, पण आता बहुमत मोठ्या संख्येने आले नाही. त्यामुळे आता चीनसोबत प्रतिस्पर्धा करणे किंवा भारतात उद्योग-व्यवसाय आणखी चांगले बनवण्याची मोदींची महत्त्वाकांक्षा ते पूर्ण करू शकत नाहीत.
काही वर्षांपूर्वी म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवर अन्याय-अत्याचार झाले, म्हणून मुंबईच्या रस्त्यावर रझा अकादमीने नंगानाच केला. पुढे याच रोहिंग्या घुसखोरांनी बांगलादेशसह भारतात घुसखोरी केली. भारतात काही राजकीय पक्षांनी मतपेढीच्या स्वार्थासाठी रोहिंग्यांना अभयही दिले. पण, आता म्यानमारमध्ये उरल्यासुरल्या रोहिंग्यांनी हिंदू आणि बौद्धांची पाच हजार घरे पेटवली. यावर भारतातील रोहिंग्यांच्या रक्षकांचे आणि पुरोगाम्यांचे मौन त्यांच्या दांभिकतेचे दर्शन घडविणारेच!
" पाणी भरणं, साफसफाई करणं, घर चालवणं ही गुलामगिरी इथे तुझ्यासाठी नाही. तू ख्रिश्चन होतीस, पण आता नाहीस.तू नायजेरियामध्ये नाहीस, तर तू आता इस्लामच्या राज्यात आहेस,” असं तिला पळवून आणणारा ‘बोको हराम’ संघटनेचा दहशतवादी सांगत होता. ती १४-१५ वर्षांची मुलगी भेदरली होती. ती विचारात असतानाच तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. तिने झिडकारताच तो म्हणाला, ”ठीक आहे, निकाह करू . तयार राहा.” त्याचे म्हणणे ऐकून ती अजूनच घाबरली. ती म्हणाली, ”मी लहान आहे. मी निकाह करू शकत नाही.” यावर त्याने पाच वर्षांच्या एका छ
महाराष्ट्रात मराठी अधिक मुस्लीम अशी एक नवीन मतपेढी तयार करण्याचे प्रयत्न, उद्धव ठाकरे आणि कंपू करीत आहे. देशभरात मोदीविरोधी मंडळी अशा अनेक प्रयोगांत व्यस्त आहेत. हे लोक यशस्वी झाले, तर काय घडेल, हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र, याला उत्तर द्यायचे असेल, तर हिंदूंनी हिंदू म्हणूनच मतदान करावे लागेल.
गेल्या ६५ वर्षांत देशातील हिंदूंची लोकसंख्या घटली असून, मुस्लिमांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, या वस्तुस्थितीने ‘सीएए’ आणि समान नागरी कायदा लागू करण्याचे मोदी सरकारचे धोरण किती दूरदृष्टीचे आणि देशहिताचे आहे, तेच दिसून येते. तसेच देशातील मुस्लीम समाज घाबरलेला आणि दडपणाखाली आहे, या विरोधकांच्या दाव्यातील हवाही या आकडेवारीने काढून टाकली आहे. मात्र, भविष्यात लोकसंख्यानियंत्रण कायद्यासारख्या उपाययोजना अनिवार्य कराव्या लागतील.