(Governor inaugurates refurbished Aditya Jyot Eye Hospital) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी वडाळा, मुंबई येथील नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यावेळी आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. एस. नटराजन, डॉ. अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अग्रवाल, मुख्य धोरण अधिकारी डॉ. वंदना जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे डॉ
Read More
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एप्रिल १९६५ मध्ये प्रथमच रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. जी भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशा देणारी होती. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने त्याच ऐतिहासिक स्थळी, त्याच दिवशी, साठ वर्षांनी, २२ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ आयोजन करण्यात आले होते.
मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच
धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...
( Governor on employment opportunities ) जगातील अनेक देश आज आपल्या कुशल कार्यबळाच्या पूर्ततेसाठी भारताकडे पाहत आहेत. मात्र अनेक देशात नोकरीसाठी तेथील भाषा येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवा वयातच अधिकाधिक अधिक भाषा शिकाव्या. जर्मन, जपानी, इटालियन, फ्रेंच यांपैकी किमान एक भाषा शिकावी, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी शनिवार, दि. १९ एप्रिल रोजी केले.
कॅनडाच्या राजकारणातील आधुनिक इतिहासात जस्टिन ट्रुडो यांची कारकीर्द ही गोंधळ, दुटप्पी धोरणे आणि आंतरराष्ट्रीय अपयश यांचे मूर्तिमंत उदाहरण ठरली आहे. त्यांनी खलिस्तानसारख्या अतिसंवेदनशील मुद्द्यावर घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमुळे केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे, तर कॅनडाच्या जागतिक विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण झाले. ‘जागतिक हरित धोरण’ आणि मानवाधिकाराच्या नावाखाली त्यांनी, आंतरराष्ट्रीय मंचांवर अनेक भावनिक भाषणे केली. पण, त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणातील अस्थिरतेने कॅनडाच्या व्यापार, गुंतवणूक आणि परराष्ट्र
वरिष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवार, १८ जानेवारी रोजी केले.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. गुरुवार, ९ जानेवारी रोजी न्यायालयाने यावर निर्णय दिला असून यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
(Tamil Nadu) विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान झाल्याने तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित न करताच सभागृह सोडले.
(Mumbai Police) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस दलातील अधिकारी व जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. पोलीस दलातर्फे आयोजित १६ व्या हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे जाऊन पुष्पचक्र वाहिले.
आंतरराष्ट्रीय वित्तीय रचनेत बदल घडवून आणण्याची गरज रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी नुकतीच अधोरेखित केली. ‘विकसनशील राष्ट्रांना सध्याच्या यंत्रणेत न्याय मिळत नाही,’ असे त्यांनी म्हटले. तसेच विकसित राष्ट्रेच या रचनेचा सर्वाधिक लाभ घेत असल्याने, शाश्वत विकासासाठी या रचनेत बदल घडवून आणण्याची त्यांची मागणी योग्य अशीच. त्याचे आकलन...
नुकतीच महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यापैकीच पहिल्यांदाच आमदार झालेले भाजपचे युवा आमदार विक्रांत पाटील यांचा युवा कार्यकर्ता ते विधानपरिषद आमदार असा प्रवास सांगणारा हा संवाद...
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी मंगळवारी शपथ घेतली. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या सात आमदारांनी सदस्यत्वाची शपथ दिली.
राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यासाठी उबाठा गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणीही पार पडली. परंतू, न्यायालयाने या आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
देशात क्रेडिट वाढीच्या तुलनेत ठेवी(डिपॉझिट) जमा करणे, ही गंभीर समस्या आहे, असे विधान भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. तसेच, अर्थव्यवस्थेबाबत स्थिर वाढीदरम्यान महागाईवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असेही निरीक्षण गव्हर्नर दास यांनी नोंदविले आहे.
भारताची अर्थव्यवस्था पुढील दशकातही सुदृढ स्थिर व प्रगतीशील राहण्यासाठी आरबीआयचा प्रयत्न असणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. गेले अनेक वर्षे रिझर्व्ह बँके ऑफ इंडिया (RBI) आर्थिक समृद्धीचे स्थैर्याचे प्रतिक बनले आहे असे गौरवोद्गार दास यांनी कार्यक्रमात बोलताना काढले आहेत.
डेन्मार्क संसदेचे उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन, जेप्पे सो व करीना ऍड्सबोल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची शुक्रवार, दि. ८ मार्च रोजी राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारत - डेन्मार्क राजनैयिक संबंध स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमध्ये संसदीय सहकार्य, व्यापार, हरित ऊर्जा, शिक्षण व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या उद्देशाने भेटीचे आयोजन केले असल्याचे उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन यांनी राज्यपालांना सांगितले.
झपाट्याने बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांना पुरेशी झोप मिळेनाशी होत आहे. याचा विचार करून शाळांच्या वेळांमध्ये बदल करायला हवा, असे मत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथील ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान कार्यक्रमातील भाषणात मांडले. यानिमित्त इतक्या वर्षांत पहिल्यांदाच शाळांच्या वेळांचा मुद्दा चर्चेत आला आहे. यानिमित्त दै.'मुंबई तरुण भारत'ने शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी साधत या समस्येला वाचा फोडली.
इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोली भाषेपासून दूर जात आहेत. परंतु, आपल्या बोली भाषा नाहीशा झाल्या, तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोली भाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशव्यापी 'आयुष्मान भव' या आरोग्य विषयक उपक्रमाचा आज दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला. या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथून करण्यात आला. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी 'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
डिजिटल भारताची यशस्वी घोडदौड सुरू असताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकताच ‘डिजिटल रुपया’चा मुद्दा अधोरेखित केला. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये आलेली मरगळ झटकली जाईल शिवाय देवाणघेवाणही सुरळीत सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानिमित्ताने ‘डिजिटल रुपया’चा घेतलेला हा आढावा...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शशिकांता दास यांना ग्लोबल फायनान्स सेंटर बँकर रिपोर्ट कार्डने A + चे रेटिंग दिले आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गर्व्हनर शशिकांता दास यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. 'हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असून भारताची आर्थिक बाबतीत जगातील नेतृत्वाचे शिक्कामोर्तब असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. यापुढे X (आधीचे ट्विटर) वर लिहिताना दास यांच्या व्हिजनमुळे हे शक्य होऊ शकले अशा भावना व्यक्त केल्या.
जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांनी आपल्या समाजातील युवकांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेले आयएएस स्पर्धा प्रशिक्षण वर्ग तसेच इतर उपक्रमांचा लाभ सर्वच समाजांमधील युवकांना करुन द्यावा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. व्यापक समाज हितासाठी कार्य केल्यास ते 'लघुतेकडून प्रभुतेकडे' नेणारे मोठे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.
राज्यातील अमली पदार्थविरोधी कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी लागेल, असा इशारा पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिला आहे.
जम्मू – काश्मीरमधील नागरिकांसोबत आता न्याय होत असून त्यांच्या विकासासाठी भरीव प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे दहशतवादी झालेल्यांनी आता आत्मसमर्पण करावे, असे आवाहन दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनी तिरंगा फडकावून केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय संघटन मंत्री स्व. मदनदासजी देवी यांचे २४ जुलै रोजी निधन झाले. त्यावेळी अनेक मान्यवर आणि नेते मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा काही कारणास्तव येऊ शकले नाही. मात्र त्यांनी शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या मदनदासजींच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील त्यांच्यास
नुकत्याच एमपीसीचा झालेल्या बैठकीनंतर आरबीआयने युपीआय लाईटची पेमेंट मर्यादा २०० रुपये वरून वाढवून ५०० रुपये केली आहे.त्याच धर्तीवर इतर अनेक देशात देवाणघेवाणेसाठी युपीआयचे लिंकेज उपलब्ध करण्याचा आरबीआयचे नियोजन आहे.फेब्रुवारी २३ मध्ये सिंगापूर देशाने युपीआय प्रणाली स्विकारून पेनाऊ या सिंगापूर पेमेंट प्रणालीशी संलग्न केली होती.आता हे युपीआय जपान व काही देश स्विकारण्यासाठी इच्छुक आहेत.
आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया)चा मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक नुकतीच ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत पार पडली होती.गुरूवारी सकाळी या संदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री शशिकांता दास यांनी कमिटीचा निकाल घोषित केला.रेपो रेट जैसे थे या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. हा निर्णय समिती सदस्यांनी एकमताने ठरल्याचे असे गव्हर्नर दास यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या जोधपूर येथील केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्था येथे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. नितीन वसंतराव पाटील यांची नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ.नितीन पाटील यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.
मुंबई : बुधवार, दिनांक २१ जून, २०२३ रोजी प्रात:काली विधान भवनाच्या प्रांगणात योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम माननीय विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. सन्माननीय विधिमंडळ सदस्यांसह सुमारे २००० योगप्रेमी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७ ते ९.०० यावेळेत II योगप्रभात @ विधान भवन II हा कार्यक्रम होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकारने राज्यपाल अनुसुया उईके यांच्या अध्यक्षतेखाली शांती समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य जणांचा समावेश आहे. मणिपूरमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांती समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केली होती. त्यानुसार, राज्यपाल अनुसुया उईके यांच्या अध्यक्षतेखाली शांती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा स
मुंबई : आरबीआयने २ हजारांच्या नोटाबंदीचा निर्णय दि.१९ मे रोजी जाहीर केला होता. त्यांनतर आता आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी यानिर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली. " आम्ही आमच्या प्रेस नोटमध्ये स्पष्टपणे स्पष्ट केले आहे की, २ हजार रुपयांच्या नोटा प्रामुख्याने तत्कालीन प्रचलित १ हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांची कायदेशीर निविदा स्थिती असताना सिस्टममधून बाद केल्यानंतर केल्या जाणाऱ्या पैशाचे मूल्य त्वरीत भरून काढण्यासाठी जारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता २ हजारांच्या नोटांसंबंधी छपाईबंद करण्याचा निर्ण
नवी दिल्ली : दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा चलनातून काढून टाकल्यानंतरही कायदेशीर निविदा म्हणून कायम राहणार आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनी त्यांच्याकडील नोटा बदलून घेण्यासाठी तातडीने बँकांकडे धाव घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सोमवारी केले आहे.
नवी दिल्ली : भारताच्या जी२० अध्यक्षतेखालील पर्यटन कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकी सोमवारपासून जम्मू – काश्मीरमधील श्रीनगर येथे प्रारंभ झाला. यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यात आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. ‘सेवा विवेक’चा उपक्रम तसेच महिलांच्या बांबू हस्तकलेच्या कार्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी कौतुक केले आहे. ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक पद्मश्री रमेश पतंगे, ‘सेवा विवेक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (बांबू विभाग) लुकेश बंड, सामजिक कार्यकर्ता सेवा विवेक राजकुमारी गुप्ता, बांबू सेवक सुमन चौबे आणि बांबू सेवक खुशबू कोटक यांनी राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘सेवा विवेक’च्या क
राज्यपाल हे त्या त्या राज्यातील विद्यापीठांचे कुलपती. पण, राज्यपालांचे हे पद आणि दायित्व केवळ शोभेचे-समारंभांपुरते मर्यादित नसून, विद्यापीठांच्या कारभाराला शिस्त लावणेही तितकेच महत्त्वाचे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती असलेल्या रमैश बैस यांनी परवाच्या बैठकीत कुलगुरुंची निकालविलंबावरुन केलेली कानउघडणी म्हणूनच स्वागतार्ह ठरावी.
दंगल आणि हिंसाचारा करून शांततेने जगणाऱ्यांचा हक्क हिरावून घेणाऱ्याविरोधात कठोरात कठोक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी मंगळवारी दिले आहेत.
महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, छत्रपती शिवाजी महाराज अवमान याबाबत तक्रार केल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या भेटीनंतर त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या. गृहमंत्री अमित शाह नक्की मार्ग काढतील. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
पंचायत राज प्रणालीमुळे ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींना अधिक शक्ती देण्याचे कार्य केंद्र सरकारने केले आहे. गावासाठी असणारा निधी सरळ ग्रामपंचायतींना देण्यात येत आहे.
नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली.
पोलंड गणराज्याचे भारतातील राजदूत प्रो. ऍडम बुराकोवस्की यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी राहुल भट या काश्मिरी हिंदूची हत्या केली होती. आता राहुल भट्ट यांच्या पत्नी मीनाक्षी रैना यांना सरकारी नोकरी मिळाली आहे. त्यांना सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, नोवााबाद, जम्मू येथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशारी सभागृहात येताच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर विरोधी पक्षानेही आक्रमक होत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. प्रचंड गदरोळात राज्यपालांनी आपल्या भाषणास सुरुवात केली.
कवी बकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या 'संपूर्ण वंदे मातरम्' या गीतावर आधारित नृत्याविष्कारसह ध्वनिचित्रमुद्रणाचे अनावरण सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, व्हाईस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई, प्रिया प्रभुदेसाई हे उपस्थित होते.
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्यावर आधारित विविध मान्यवरांच्या लेखांचे संकलन असलेल्या ‘कर्मयोद्धा राम नाईक’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
भाजप नेत्यांची राज्यपालांकडे तक्रार ; चौकशी आदेश देण्याचे राज्यपालांचे आश्वासन
नाहर मल्टीस्पेशिलिटी रुग्णालयाचे मालक आणि मनसे कल्याण शीळचे विभागाध्यक्ष दिनेश पाटील यांनी मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त सात दिवसांसाठी 53 रूपयांत बेड सेवा देत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी यांनी खाजगी रुग्णालयामध्ये 5 बेड गोरगरीब रुग्णांसाठी अल्प दरात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी रुग्णालयाचे व्यवस्थापक अरूण जांभळे यांनी केली आहे.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्षासाठी कळीच्या ठरलेल्या विधान परिषदेतील १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीकडून पाठविण्यात आलेल्या १२ नावांच्या यादीबाबत माहिती देण्यास शासनाच्यावतीने नकार देण्यात आल्याचा आरोप ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.
देशात पेट्रोल-डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहेत. देशभरात इंधन दरवाढीवरून होणारी चर्चा काही माविन नाही. परंतु, आतापर्यंत या दर वाढीवर फक्त सर्वसामान्य जनतेने आवाज उठवला होता. पण आता सरकारमधून देखील पेट्रोल-डिझेल दर वाढीला विरोध होत आहे.
राज्यपाल आणि महाविकास आघाडीतील वाद काही नवीन नाही. हा वाद कधी संपेल याचाही काही नेम नाही. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरून ते नुकतेच विमान प्रवासावरून राज्यपाल आणि महाविकास आघाडीत वाद सगळ्यांनी पाहायलाय . राज्यपाल नियुक्त आमदारांवर राज्यपालांनी निर्णय न घेतल्याने , आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना अल्टीमेटम दिले. मात्र, राज्यपालांनी ते जुमानले नाहीत.त्यामुळे आघाडीच्या नेत्यांच्या संयमाचा बांध फुटत चालला असून याबाबत काय कायदेशीर भूमिका घेता येईल असा नेत्यांचा विचार सुरू झाला आहे