Chief Minister Atishi दिल्ली विधानसभा निवडणुकीला काही तास उरले आहेत. काही तासानंतर मतदार आपल्या लोकशाहीचा अधिकार बजावणार आहेत. निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या असताना मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीमध्ये आचारसंहितेचा भंग केला असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या कालकाजीमध्ये ३ फेब्रुवारी २०२५ रोजी बराच वेळ गोंधळ उडाला. अखेर गोविंदपुरी पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
(Delhi Assembly Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी पत्रकारपरिषदेत केली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
Waqf Board) राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये निधी देण्याचा शासन निर्णय जाहीर केला. मात्र, राज्यात काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वक्फ बोर्डाला जाहीर केलेला दहा कोटी रुपये निधी देण्याचा जीआर सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.
ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता ( code of conduct ) लागु आहे. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात ३१ ऑक्टोबर दुपारपर्यंत ३४८ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींमधील ३०६ तक्रारींचे १०० मिनिटांच्या आत जलद निराकरण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मुंबई- Election commission news : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून बुधवार, दि. ३० ऑक्टोबरपर्यंत राज्यात १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातूंचा त्यात समावेश असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
( Model Code of Conduct ) विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १५ ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. दि. १५ ते १८ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यातील तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. तेव्हापासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात निष्कासन कार्यवाही जोमाने सुरू केली आहे. महानगरपालिकेने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून ४८ तासांत म्हणजेच दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर याकालावधीत संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मिळून एकूण ७ हजार ३८९ इतके भित्तीपत्रके, फलक, बॅनर्स, झेंडे हटविले आहेत.
( Irshalwadi )ईर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना आचारसंहितेआधी घरांचा ताबा देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी दिली. खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी या आदिवासी वस्तीवर दरड कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५७ जण बेपत्ता झाले होते.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबईतील १७३ दुकानांचा ई लिलाव ११ वा १२ जून रोजी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे आता हा ई-लिलाव लांबणीवर पडला आहे. ई-लिलावासाठी अनामत रक्कमेसह अंदाजे ५५० अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळे हे ५५० अर्जदार प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. ई-लिलावपूर्व प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर मंडळाने या दुकानांचा मंगळवार, दि. ११ जून किंवा बुधवार १२ जून रोजी ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. येत्या दोन दिवसात हा लिलाव पार पडण्याची शक
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबईतील १७३ दुकानांच्या ई- लिलावासाठी नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली असून या दुकानांसाठी ५७० अर्ज सादर झाले आहेत. आता बोली निश्चित करून ११ किंवा १२ जून २०२४ रोजी १७३ दुकानांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे.
वारंवार सूचना करूनही अनेक ठिकाणी आदर्श आचारसंहितेचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याद्वारे १०० मिनिटांच्या आत संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या आचारसंहिता समितीसमोर हजर राहण्यास नकार दिला आहे. समितीने त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतू, त्यांनी काही कारणे पुढे करत हजर राहण्यास नकार दिला आहे.
सर्व सन्मानीय सदस्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. राज्यातील जनता या सभागृहातील सदस्यांच्या वर्तनाचे बारकाईने लक्ष ठेवून असते. इथे येणारे सदस्य सहकार क्षेत्रातील अनुभवी, नगरपालिकेचे सदस्य, काही नविकोरी पाटी असतात मात्र त्यांना जनतेची काम करण्याची ईच्छा, पंचायत समितीचे सदस्य ही आपली परंपरा आहे.
सार्वत्रिक विधानसभा निवडणुका २०१९ दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ॲप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ॲपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या १ हजार १९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
प्रचारापुर्वी उमेदवारांना घ्यावी लागणार 'हि' काळजी
या निवडणूक हंगामातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई रेल्वे पोलिसांकडून आज बोरिवली रेल्वे स्थानकावर करण्यात आली.
देशभरासह जगाचे आकर्षण असलेल्या मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, सजावटीसाठी वारेमाप खर्च न करता त्यातील निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावा, अशी आचारसंहिताच सावर्जनिक गणेशोत्सव समन्वय समितीने तयार केली असून मंडळांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही आहे
निवडणूक आयोगाने राज्यातील गंभीर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काम करण्याची राज्य सरकारला परवानगी दिली आहे. जिथे निवडणुकीची प्रक्रिया पार पडली, तिथे काम करण्यास कोणताही बंधन नसल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेशी निगडीत इतर स्वरुपाचे २२ हजार ७९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
‘खड्ड्यात गेला तुमचा कायदा, आचारसंहितेचेही आम्ही बघून घेऊ’ हे शिवसेना खा. संजय राऊत यांचे वादग्रस्त वक्तव्य सध्या चर्चेत आहे. या वक्तव्यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री मीरा-भाईंदर येथील एका सभेला संबोधित करताना राऊत यांनी हे वक्तव्य केले होते.
लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून राज्यात विविध कारवायांमध्ये आतापर्यंत १०४ कोटी १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने दिली
अंतराळात हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांना भेदण्याची क्षमता असलेल्या 'ए-सॅट’ या क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. 'मिशन शक्ती' ही मोहीम डीआरडीओच्या शास्रज्ञानी यशस्वीरीत्या पार पाडून देशाला अंतरिक्ष महासत्ता बनविल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याचा निवडणूकीशी संबंध लावत विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला होता.
ॲपवर दाखल झालेल्या तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात आली. ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे, तर ३८७ तक्रारी ह्या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय