(cleanliness campaign in Kalyan-Dombivali) “कल्याण, डोंबिवलीत आधुनिक तंत्रज्ञानातून ‘शहर स्वच्छता अभियान’ राबविले जात आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक शहराची ओळख ही त्या शहरातील स्वच्छतेवरून होते. त्यामुळे हे अभियान कल्याण-डोंबिवली शहराच्या स्वच्छतेचे एक नवे पर्व असून, या अभियानामुळे ही दोन्ही शहरे राज्यातीलच नव्हे, तर देशातील स्वच्छ शहरे म्हणून नावारूपास येतील,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
Read More
कल्याण डोंबिवली शहरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक शहराची ओळख ही त्या शहरातील स्वच्छतेवरून होते. त्यामुळे हे अभियान कल्याण डोंबिवली शहराच्या स्वच्छतेचे एक नवे पर्व असून या अभियानामुळे ही दोनही शहरे राज्यातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ शहरे म्हणून नावारुपास येतील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राज्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतेसोबतच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे तसेच गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला अधिक गतीमान करण्यासाठी शासनाने लोकसहभागावर भर दिला आहे. सार्वजनिक व घरगुतीस्तरावरील घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने करून व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. त्याचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत "कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू" या मोहिमेची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सदर
शासकीय, महानगरपालिका रूग्णालयांसह खासगी रूग्णालय परिसरांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून 'विशेष स्वच्छता मोहीम' राबवण्यात येणार आहे. दिनांक ३ मार्च २०२५ पासून या अभियानाला सुरुवात होणार असून १५ दिवसांचे हे व्यापक अभियान असेल.
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वागळे प्रभाग समितीतील किसन नगर ( Kisan Nagar ) परिसरात ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात आली.
सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. गुरुवारी 'स्वच्छता ही सेवा' राज्यस्तरीय अभियानाचा गिरगाव चौपाटीवर शुभारंभ पार पडला. यावेळी त्यांनी स्वतः कचरा उचलून या अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी शनिवार, दि. ८ जून रोजी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्ह) राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात ८५ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ६५ मेट्रिक टन कच-याचे संकलन करण्यात आले. तर, ३१६ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले.
सार्वजनिक स्वच्छता हे महानगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्य असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मुंबई स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरु असलेले सखोल स्वच्छता अभियान हे फक्त नावलौकिकासाठी नव्हे तर त्याहून जास्त सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. सखोल स्वच्छ मोहिमेला लोकचळवळीमध्ये रुपांतरित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ही मोहीम यापुढे देखील सातत्याने व जोमाने सुरू राहील, अशी ग्वाही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. स्वच्छता मोहीम
घर, वस्ती स्वच्छ करण्यासाठी स्वच्छताकर्मी असतात. त्या महिला आणि पुरुषांच्या कष्टाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्यांच्या जागी क्षणभर स्वत:ला ठेवून पाहू. जावे त्यांच्या वंशी! मग आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो?
पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात स्वच्छता राखण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. यांच्या वतीने हे रुग्णालय दत्तक घेतल्याचे महापाालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे.
‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम दि. १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या पंधरवड्यात राबवली गेली. या मोहिमेची काल दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत, आपल्या पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, राष्ट्रव्यापी स्वच्छता श्रमदानाने सांगता झाली. त्यानिमित्ताने या मोहिमेचे स्वरूप आणि भविष्यातही, अशीच यशस्वी लोकचळवळ राबविण्याची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंडियन स्वच्छता लीग मोहिमेत १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हा पंधरवडा स्वच्छता लीग म्हणून साजरा केला जात आहे. इंडियन स्वच्छता लीग या उपक्रमातंर्गत ठाण्यातुन 'ठाणे टायटन्स' मैदानात उतरले आहे. या संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण संघाचे कर्णधार व प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मंगळवारी करण्यात आले.
पुनीत सागर अभियानांतर्गत डोंबिवली पूर्व येथील आयरेगावमधील तलाव आणि त्याचा परिसर स्वच्छ करण्याचे अभियान डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिर आणि धनाजी नाना चौधरी या शाळांनी राबविले. या अभियानांतर्गत परिसरातून एक मेट्रिक टन कचरा काढण्यात आला.
नाशिकमध्ये पुढील महिन्यापासून शहरातील सर्व रस्ते स्वच्छ दिसणार आहेत. ३३ कोटींचे चार यांत्रिक झाडू इटलीहून याच महिन्यात नाशिकनगरीत दाखल होत आहेत. स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिकचा खालवत जाणारा क्रमांक उंचावण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपने यांत्रिक झाडू खरेदीसाठी पुढाकार घेतला, तो निर्णय योग्यच.
मुंबईतील केवळ प्रमुख रस्ते नव्हे, तर अगदी गल्लीबोळातून त्वरीत स्वच्छता मोहीम राबवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आय. एस. चहल यांना दिले.
कधीकाळी नाशिक ‘फुलांची नगरी’ म्हणून ओळखली जायची. येथे असणारे आल्हाददायक हवामान, पाण्याची विपुलता, स्वच्छ आणि बारामही खळखळणार्या गोदेसह इतर उपनद्या यामुळे हे शहर सर्वार्थाने ‘फुलांचे-गुलाबाचे शहर’ म्हणून ओळखले जात. म्हणूनच पूर्वी नाशिकला ’गुलशनाबाद’ अर्थात ‘गुलाब नगरी’ नाव होते. फुलांच्या नगरीत नाशिक महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग, रोझ सोसायटी व ‘नाशिक सिटीझन फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुष्पोत्सव 2023’ नाशिककरांच्या उदंड प्रतिसाद संपन्न झाला.
भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या 'आझादी का अम्रित महोत्सव ' उत्सवाचा एक भाग म्हणून, दि. १७ सप्टेंबर रोजी देशाच्या संपूर्ण किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. इको मित्रम्' या ॲपद्वारे स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्थांना या मोहिमेसाठी नोंदणी करता येईल. भारत सरकारच्या वतीने यंदा दि. ३ जुलै ते दि. १७ सेप्टेंबर दरम्यान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण ७५ दिवस चालणाऱ्या मोहिमेस रविवार दि. ०३ जुलै पासून सुरुवात झाली.
मुली वयात येताना मासिक धर्म सुरू होतो. या दिवसांमध्ये शारीरिक बदल होत असतो व अशा दिवसांमध्ये दिनचर्या थोडी बदलणे महत्त्वाचे असते. मासिक स्राव योनीभागातून होत असल्यामुळे या अवयवाची व परिसराची निगा व स्वच्छता राखणे, (हायजिन मेंटेन करणे) खूप महत्त्वाचे असते. आज त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या निमित्ताने आपण योग प्रकारांची माहिती करुन घेत आहोत. मागील भागात ‘बहिरंग योग - यम’ म्हणजे नेमके काय, याविषयीची सविस्तर माहिती आपण करुन घेतली. आजच्या भागात ‘बहिरंग योग - नियम’ यासंबंधीच्या विविध पैलूंची सविस्तर माहिती करुन घेऊया.
‘स्वच्छ सर्वेक्षणा’मध्ये ठाणे देशात चौदावे, तर राज्यात तिसरे शहर
सध्या शहराशहरांत, गावखेड्यांत स्वच्छ सर्वेक्षणाची भरपूर चर्चा आहे. तेव्हा, नेमके हे स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे काय? त्यासाठीचे निकष कोणते? आणि कोणत्या शहरांनी आजवर या सर्वेक्षणात माजी मारली, याचा आढावा घेणारा हा लेख...
अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य भवताली असले की, मनुष्यप्राणी कासावीस होत असतो. सभोवतालच्या दूषित वातावरणामुळे नागरिक आजारी पडण्याचीदेखील अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र, संपूर्ण मानवी जीवनाला आसरा प्रदान करणारी आणि मनुष्य जीवनाची जीवनवाहिनी असणारी नदीच आजारी असेल तर? या प्रश्नाचे उत्तर नागरिक आणि प्रशासन यांच्याकडे सापडणे खचितच शक्य आहे.
स्वच्छ राहणे आणि स्वच्छता करणे ही सगळ्यांचच नैतिक जबाबदारी. त्यासाठी काम करणे म्हणजे काय, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आनंद जगताप यांचे आजवरचे स्वच्छतेचे कार्य...
पाचोर्यातील जारगाव चौफुली जवळील नाल्याच्या साफसफाईअभावी सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने व सांडपाण्याचा परिसरातील घरांना वेढा पडत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
मिठी नदीतून जलवाहतूक सुरू व्हावी व नदीतून निर्मल पाणी वहावे हे माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, नौकानयन आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज सकाळी पुण्यात आपल्या चाहत्यांसह मिळून एक अनोखा उपक्रम राबवला. हा उपक्रम म्हणजे गणपती विसर्जनानंतरची स्वच्छता मोहिम!
फ्रान्समधील प्यू ड्यू फोयू या ऐतिहासिक पार्कमध्ये सध्या कावळ्यांना कचरा उचलण्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे. आतापर्यंत सहा कावळ्यांनी ही कला उत्तमरित्या अवगतही केली आहे.
श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त या स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते