Bus accident Balochistan पाकिस्तानातील बलुचिस्तानच्या नोशकीमध्ये रविवारी १६ मार्च २०२५ रोजी झालेल्या एका ताफ्यातजवळील स्फोटात पाकिस्तानच्या फ्रंटियर कॉर्प्सच्या तीन सैनिकांसह पाच जण ठार झाले आणि किमान ३० जखमी झाले आहेत. बीएलएच्या बंडखोरांना सुमारे ४४० प्रवाशांसह ट्रेनचे अपहरण केल्यानंतर काही दिवसांनंतर ही घटना घडली आहे.
Read More
(Ratnagiri Bus Accident) दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसचा रविवार, दि. १२ जानेवारीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरीच्या शेनाळे घाटातील चिंचाळी धरणाजवळील एका वळणानजीक असलेल्या दरीत ही बस कोसळली. झाडाझुडपांमधून खाली घरंगळत जाताना बस त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून तिथेच अडकून पडल्याने जागेवर थांबली. जर ही बस पूर्णपणे दरीत कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले.
(Jalgaon Accident News) गुजरातहून अकोल्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसचा जळगावजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत एक महिला जागीच ठार तर, पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात ९ डिसेंबर २०२४ रोजी भीषण अपघात ( Kurla Bus Accident ) घडला होता. त्या बस अपघाताच्या जखमा अजुनही ताज्या आहेत. या अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बस चालक संजय मोरे याला कुर्ला दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच संजय मोरेचा परवाना रद्द करण्यासाठी आरटीओने प्रक्रिया सुरु केली असल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पुणे : लोहगाव येथून रायगड जिल्ह्यात महाड येथे लग्नासाठी जाणार्या खासगी बसला ताम्हिणी घाटात ( Tamhini Ghat ) भीषण अपघात झाला. या अपघातात पाचजण ठार झाले, तर २७ जण जखमी झाले आहेत. शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. सर्व २७ जखमींना माणगाव येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.
(Kurla Bus Accident) कुर्ला भागात झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अशातच माणुसकीला कलंकित करणारी घटना घडली आहे. या अपघातात मृत पावलेल्या फातिमा कनिस अन्सारी या ५५ वर्षीय महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने एका अज्ञात व्यक्ती काढत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच, फातिमा यांच्या कुटुंबियांनीदेखील त्यांच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याचा आरोप केल्यानंतर कुर्ला पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.
कुर्ला येथे बेस्ट बस दुर्घटनेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील रहदारीच्या ठिकाणांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूना रस्त्याच्या कडेला लावण्यात येणारी अनधिकृत वाहने, पदपथावर लावण्यात येणारी अनधिकृत दुकाने आणि अनधिकृतरित्या उभारण्यात येणारे व्यवसाय यांचा विळखा मुंबईतील रस्त्यांच्या भोवती घट्ट होताना दिसतो आहे. विशेषतः रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि स्थानकांच्या ५०० मीटरच्या परिसरात अशी अनधिकृत कारवायांमुळे स्थानकांकडे जाणारे रस्ते निमुळते झाले आहे. अशातच बेस्ट चालकांना या स्थानकांच्या परि
(CSMT Best Bus Accident) कुर्ला बेस्ट बस अपघात दुर्घटना ताजी असताना सीएसएमटी परिसरातील बेस्ट बस अपघातात आणखी एकाचा निष्पाप बळी गेल्याचे वृत्त समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बेस्ट बस खाली चिरडल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. सीएसएमटी स्थानकाजवळ हा अपघात घडला असून जवळच्या रुगणालयात नेत असतानाच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
Kurla Bus Accident मुंबईतील कुर्ला येथे ‘बेस्ट’ बसची जी दुर्घटना घडली, ती केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांच्या मुंबईविषयीच्या आजवरच्या अनास्था आणि भोंगळ कारभारातूनच. कारण, ठाकरे यांना मुंबईचे हित नाही, तर केवळ स्वहित साधण्यातच स्वारस्य. ठाकरेंनी ‘बेस्ट’च्या कंत्राटीकरणातून मुंबईतील सार्वजनिक वाहतूकसेवेचे चाकच खोलवर रुतवले. म्हणूनच कुर्ल्याची घटना ही सर्वस्वी ठाकरेंच्या अनास्थेचे दुर्दैवी बळीच म्हणावे लागतील.
(kurla) कुर्ला येथे सोमवारी ९ डिसेंबर रोजी झालेल्या भीषण बेस्ट बस अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखाची मदत जाहीर केल्याचे मलबार हिल मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत सांगितले आहे. तसेच त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत अपघाताविषयी शोक व्यक्त केला आहे.
(Kurla Best Bus Accident ) बेस्ट मध्ये भाडे करार तत्त्वावर बसेस घेण्याचे कंत्राट वर्ष २०१८ ते २०२१ या काळात तत्कालीन सत्ताधारी उबाठा सेनेच्या नेतृत्वात आणि उबाठा सेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार देण्यात आले होते. त्यावेळी भाजपने सदर प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. आता वाढणाऱ्या अपघातामुळे आणि झालेल्या जीवितहानीमुळे सदर बाबीचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी बेस्ट महाव्यवस्थापकांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच कुर्ला येथे झालेल्या बेस्ट बसच्
(Gondia) गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही बसच्या भीषण अपघातात आतापर्यंत तब्बल ११ निष्पाप जीवांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बस अपघातात अनेकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावल्याने अनेक कुटुंबावर शोककळा पसरली आहे. यातील एक सुर्यवंशी कुटुंब आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी पोलीस भरती झालेल्या महिला पोलीस कर्मचारी स्मिता सुर्यवंशी यांचे या बस अपघातात दुर्देवी निधन झाले. पतीच्या निधनानंतर आपल्या मुलाला, परिवाराला सांभाळण्यासाठी तिने मेहनत घेतली. मात्र, सुर्यवंशी क
(Gondia) गोंदिया जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणि गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील ( Bus Accident ) मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Uttarakhand bus accident) झाला असल्याची घटना उत्तराखंड येथील अल्मोडा येथे घडली आहे. या अपघातात ४० प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली आहे. वाहन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळीच्या सुमारास घडली आहे.
पाळ येथील बस अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झालेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल झाल्या आ
महाराष्ट्रातील प्रवाशांना नेपाळमध्ये घेऊन जाणारी उत्तर प्रदेशातील बस नदीत कोसळली असून यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील तानाहुन इथे हा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. या बसमध्ये एकूण ४० लोकं असल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमधून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. जम्मू-काश्मीरमधील डोडा इथे एका प्रवासी बसचा रस्त्यावरुन खाली घसरुन अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातानंतर पोलिसांनी बसचालक दानिश शेख इस्माईल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघाताबाबत पोलिसांची दिशाभूल केल्याचा आणि टायर फुटल्याचे खोटे बोलल्याचा दानिशवर आरोप आहे. दरम्यान पोलीसांनी दानिश शेख इस्माईल याला अटक करून ताब्यात घेतले. त्याच्यावर आयपीसीचे कलम ३०४ आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १३४,१८४ आणि २७९ लावण्यात आले आहेत.
नाशिक बस दुर्घटना : नाशिक बस दुर्घटना प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदतीचा ओघ सुरु झाला आहे. देशाच्या पंतप्रधानांकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी आणि जखमींसाठी मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीर राज्यात बस अपघातांचे सत्र थांबतच नाहीये. ३१ ऑगस्टला वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला झालेल्या अपघातात रक्त चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता
सोलापूर गाणगापूर बसला अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावर मोठा अपघात झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने या घटनेची दाखल घेत जखमींच्या उपचारांची व्यवस्था तातडीने करण्याचे आदेश देत, गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदतही जाहीर केली
रामदासभाई नव्हे तर आज सच्चा शिवसैनिक रडतोय!
शिवसेनेच्या माळेतील निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे रामदास कदम!
प्रबोधनकार ठाकरेंच्या हिंदुत्वावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव येथे, ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाची इंदौर- अमळनेर मार्गावरील बस सोमवारी सकाळी मध्यप्रदेशच्या नर्मदा नदीच्या पात्रात पडली.
दरडीखाली ४० ते ५० जण अडकल्याची शक्यता असल्याचे सांगत आत्तापर्यंत ३ मृतदेह बाहेर काढण्यात आले
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये दोन दुर्घटनांमध्ये एकूण १४ जणांचा मृत्यू झाला. तर ५५हून अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात बुधवारी रात्री ११.४५ वाजताच्या दरम्यान पायी जाणाऱ्या सहा मजूरांचा बस दुर्घटनेत मृत्यू झाला. चार जण जखमी झाले असून दोन जणांना मेरठ येथे पाठण्यात आले आहे.
दरीत बस कोसळून ४ ठार तर ४५ जखमी
आंबेनळी घाटात झालेल्या बसअपघातप्रकरणी सहा महिन्यानी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या बसला हा अपघात झाला होता.
जम्मू काश्मीमधील पूंछ येथे शनिवारी सकाळी एक प्रवासी बस दरीत कोसळली.
तेलंगणामध्ये बस उलटल्याने 32 प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात आतापर्यंत 28 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
दरवाजा जोराने उघडला गेला त्यामुळे दरवाजा जवळ उभा असलेला विक्की बोरसे रोडावर पडला त्याच्या डोक्याच्या मागील भागात जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता त्यास मृत घोषित करण्यात आले .