‘बिपरजॉय’ने अपेक्षेप्रमाणेच गुजरातच्या किनारपट्टीच्या भागात तांडवनृत्य केलेच. आता हे वादळ पुढे राजस्थानकडे सरकले आहे. मात्र, या चक्रीवादळाचा अतिशय यशस्वीपणे सामना करून गुजरात सरकार आणि केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापनातील नवा अध्याय नक्कीच रचला आहे. त्यामुळे गुजरात सरकारने केंद्र सरकारच्या सहकार्याने हे कसे साध्य केले, ते समजून घेणे गरजेचे आहे.
Read More
नवी दिल्ली : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वार्तांकन करणाऱ्या विविध माध्यम संस्थांचे पत्रकार, छायाचित्रकार विशेषत: खाजगी वाहिन्यांच्या माध्यमकर्मींच्या सुरक्षेबद्दलची गंभीर दखल घेत, त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच, या चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी, केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नरत राहील, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिला आहे.
मुंबई : सध्या देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागात 'बिपरजॉय' चक्रीवादळाने थैमान घातले असून त्याचा फटका आता गुजरातमधील गिर अभयारण्यापर्यंत पोहचल्याचे दिसते आहे. गीरच्या जंगलातून जवळपास १०० सिंहांचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ वेगाने भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून या चक्रीवादळाचा प्रभाव गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळमध्ये दिसायला लागला आहे.
नवी दिल्ली : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र तसेच गुजरातमधील मंत्रालये व संस्थांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुंबई : अरबी समुद्रातून जाणार्या ‘बिपरजॉय’ वादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ गुजरातमधील पोरबंदरपासून ४८० किमी, द्वारकापासून ५३० किमी आणि कच्छमधील नालियापासून ६१० किमी अंतरावर आहे. ते दि. १५ जूनपर्यंत गुजरात आणि पाकिस्तानमधील कराचीमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.