राज्य सरकारकडून वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास केला जात आहे. त्याच कामाची पाहणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे तेथे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. चाळीचं काम सुरू असलेल्या ठिकाणची राज ठाकरेंनी पाहणी केली. चाळीतील स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. या समस्या घेऊन अनेकदा बीडीडी चाळीतील रहिवाशी आणि व्यापारी राज ठाकरे यांच्या भेटीला येत होते.
Read More
मुंबई : तब्बल तीन दशकांपासून प्रलंबित असलेला बीडीडी चाळीतील स्टॉलधारकांचा प्रश्न फडणवीस-शिंदे सरकारने मार्गी लावल्याने येथील रहिवाशांनी शासनाचे आभार मानले आहेत, तसेच या प्रश्नाची ठळकपणे दखल घेणारे वृत्त शुक्रवार, दि. ३० जून रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने प्रसिद्ध केले आहे. त्यानिमित्त स्टॉलधाकरकांनी आभार मानत वरळीतील अनेक चौकात त्या आशयाचे भव्य फलक लावले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर राज यांनी माध्यमांशी संवाद साधला. खारघर दुर्घटनेबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, "तो एक अपघात होता. त्याच राजकारण करु नये. अपघाताचं काय राजकारण करायचं? तसंच म्हटलं तर मग कोरोनामध्ये किती माणसं गेली. त्या प्रकरणातसुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल."
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे नायगांव व वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र गाळेधारकांना वितरित करावयाच्या ४६० पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती आज करण्यात आली. या पात्र गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या व मालकी तत्वावर दिल्या जाणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचा क्रमांक, इमारतीचा क्रमांक, इमारतीची विंग, इमारतीतील सदनिकेचा मजला आज निश्चित करण्यात आ
बीडीडी चाळ पुनर्विकास : बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची कामे सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करुन वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास व इतर विषयांबाबत मंगळवारी सविस्तर आढावा बैठक घेतली. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आम्ही वरळीच्या याच ‘बीडीडी’ चाळींमध्ये मागील किमान ५० वर्षांपासून अधिवासास आहोत. मुळात ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्वसन आणि पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिक आधीच त्रस्त आहेत, तर दुसरीकडे या चाळीतील इमारतींच्या अंतर्गत वाहतुकीसाठी बनविण्यात आलेल्या रस्त्यांची इतकी वाईट अवस्था झाली आहे की, त्यातून चालणे तर सोडा,
भाजप आमदार सुनील राणे यांनी वरळीतील ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली.
वरळीतील बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरे नगर, नायगांव येथील बीडीडी चाळीला शरद पवार नगर आणि ना. म. जोशी बीडीडी चाळीला राजीव गांधी नगर नाव देण्यात आले असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच गोरेगाव येथील पुर्नविकास होत असलेल्या पत्रा चाळीला यापुढे सिद्धार्थनगर नावाने ओळखले जाईल असेही आव्हाड यांनी जाहीर केले.
धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. जवळपास २०० हेक्टरहून अधिक जागेत पसरलेल्या या अवाढव्य झोपडपट्टीत सुमारे ७ लाखांच्या आसपास लोकसंख्या वसली आहे