सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्यातील सीएसटी रस्त्यावरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला नाला येथे उभारण्यात येणाऱ्या केबल स्टे पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त (१) विक्रम कुमार यांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पस्थळास भेट देऊन अंतिम तयारीचा आढावा घेतला.
Read More
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारता’च्या संकल्पावर विश्वास दर्शवत, देशभरात गुंतवणुकीचा घेतलेला निर्णय हे नवभारताच्या पायाभरणीचे द्योतक म्हणावे लागेल.
चीन हा आशियामध्ये सैन्य कारवाईची तयारी करत असल्याचा इशारा अमेरिकेच्या संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी दिला आहे. त्याचबरोबर आशियामधील अमेरिकेच्या भागीदारांनी संरक्षण खर्चात वाढ करून संरक्षण सिद्धता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शनिवार, दि. 31 मे रोजी सिंगापूरमधील शांग्री-ला परिषदेत संबोधित करताना अमेरिकेच्या इंडो-प्रशांत भूभागातील अमेरिकेच्या बदलत्या रणनीतीविषयी बोलताना चीनच्या वाढत्या धोक्याविषयी भाष्य केले.
मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदर विभागामार्फत राज्यात अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या प्रकल्पांना आशियाई बँकेकडून निधी उपलब्ध होण्याबाबत आज मंत्रालयात मंत्री नितेश राणे यांनी आशियाई बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
Operation Sindoor confirms that India is the best military force in Asia ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारत ही आशियातील सर्वश्रेष्ठ लष्करी ताकद आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. भारताने आपल्या जबरदस्त लष्करी सामर्थ्याने पाकिस्तानची लंका करून टाकली. त्यामुळे मोदींच्या पोलादी नेतृत्वाचा डंका जगभर वाजत आहे. भारतासारख्या एका अण्वस्त्रसज्ज देशाने पाकिस्तानसारख्या दुसर्या अण्वस्त्रसज्ज देशावर हल्ला करून केवळ तीन दिवसांत त्याची हवाई ताकद नष्ट करण्याची अभूतपूर्व कामगिरी केली. याद्वारे पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांचे भांडवल करून क
भारताबाहेर मानवनिर्मित भूभागांची बंधने ओलांडून, सार्या नात्यांच्या पलीकडले असे रामायणाचे नाते, समस्त जगभरातील मानवसमूहाशी जुळले आहे. कोण वाल्मिकी, कुठे राहिले, कधी होऊन गेले, याची काहीही उठाठेव न करता सगळ्याच आशियाई देशवासीयांनी, रामकथेचे आकंठ रसपान केले आहे. भारतीय दर्यावर्दी प्रवासी, व्यापारी आणि बौद्घ भिक्षू यांच्याबरोबर, रामायणसुद्घा दक्षिण-पूर्वेकडील देशांत पोहोचले. रामायणातील शाश्वत जीवनमूल्ये आणि कर्तव्यपरायणतेची शिकवण यामुळे भारावून जाऊन, त्यांनी ते काव्य आत्मसात केले आणि आपापल्या भाषेत त्याचा अविष
२०२५ साली मलेशिया ‘आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटने’चे (आसियान) अध्यक्षपद स्वीकारून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे. वाढत्या गुंतागुंतीच्या भू-राजकीय परिस्थितीतून ‘आसियान’चे यशस्वी मार्गक्रमण करण्याचे महत्त्वाचे लक्ष्य मलेशियासमोर आहे. अमेरिकेतील नेतृत्वबदल, आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक आव्हाने वाढत असताना, मलेशियाचे नेतृत्व प्रादेशिकता मजबूत करण्यासाठी, आंतर-प्रादेशिक भागीदारी वाढवण्यासाठी आणि जागतिक दक्षिणेचे हितसंबंध पुढे नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
आशियातील पहिली महिला लोको पायलट आणि हजारो महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिला लोकोपायलट सुरेखा यादव यांच्याविषयी....
ठाणे जिल्ह्यातील तानसा वन्यजीव अभयारण्यातून युरेशियन ससाणा (eurasian goshawk) या पक्ष्याची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. शिवाय या दुर्मीळ शिकारी पक्ष्याची ही महाराष्ट्रातील चौथीच नोंद आहे. अभयारण्यातील वनपाल योगश शिद यांना शनिवार दि. ८ मार्च रोजी या पक्ष्याचे दर्शन झाले.
Ashish Shelar राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतीक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार आणि कॉंग्रेस नेते राजीव शुक्ला यांची आज एशियन क्रिकेट कौंसिलच्या (एसीसी) च्या डायरेक्टर बोर्डात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एशियन क्रिकेट बोर्डात जाण्याचा महाराष्ट्राचे सुपुत्र शेलार यांना बहूमान मिळाला आहे.
दक्षिण आशियातील देशांवर आपली हुकूमत असावी, हे चीनचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. मात्र, दक्षिण आशियातील अनेक देश चीनच्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षेने त्रस्त आहेत. अशावेळी या देशांना दक्षिण चिनी समुद्रात, चीनच्या अरे ला कारे करण्यासाठी भारताच्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची गरज भासत आहे. याच माध्यमातून भारताने देखील चीनला शह दिला आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासने आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा २०२५चे यशस्वीरित्या आयोजन केले. २१ ते २४ दरम्यान झालेल्या या स्पर्धेच्या समारोप समारंभात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. या उपक्रमात सहभागी आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना रेल्वेमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला नाविन्यपूर्णतेच्या दिशेने पुढे नेण्यासाठीच्या दूरदृष्टी वर भर दिला.
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या सीमेवर वसलेल्या खारेपाटण गावात दुर्मीळ युरेशियन ग्रिफाॅन प्रजातीची स्थलांतरी गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे (eurasian griffon vulture). गावातील मच्छी मार्केट परिसरात रविवार दि. २ जानेवारी रोजी ही गिधाडे आढळून आली (eurasian griffon vulture). स्थलांतरी असणारी ही गिधाडे हिवाळ्यात युरोपमधून भारतात स्थलांतर करुन येतात. (eurasian griffon vulture)
भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाच्या २१ व्या थर्ड आशियाई चित्रपट महोत्सवाचे बिगुल १० जानेवारी २०२५ रोजी वाजले. यावेळी गीतकार दावेद अख्तर यांना एशियन कल्चर या पुरस्काराने गौरवण्यात आले. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते अख्तर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना जावेद अख्तर यांनी अलीकडच्या चित्रपटांमध्ये संगीतांचा अभाव दिसतो अशी खंत व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजलेलाआणि कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेला ‘ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाने २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (MFSCDCL) व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल 'एशियन कल्चर’ या विशेष पुरस्काराने सुप्रसिद्ध पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना गौरविण्यात येणार आहे
राज्याच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि गतिमान विकासासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉरमेशन’च्या (‘मित्रा’) माध्यमातून आरोग्य, ग्रामीण रस्ते वाहतूक, कौशल्य विकास आणि बांबू प्रकल्प या क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. या प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी राज्यात सुरु असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांना आशियाई विकास बँकेने (ADB) मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेला केली आहे. ‘एडीबी’च्या संचालक मिओ ओका यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात मंगळवार, दि.१७ रोजी हा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते. भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईतील रोड शोने भारताच्या आर्थिक केंद्रातून गुंतवणूकदारांचे प्रचंड लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के. संगमा आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, पूर्वोत्तर राज्यांतील सरकारी अधिकारी उपस्थित होते.
मुंबईच्या आकाशात दुर्मीळ युरेशियन ग्रिफाॅन प्रजातीची स्थलांतरी गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. (eurasian griffon vulture). शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी शिवडीमध्ये या गिधाडाचे दर्शन झाले असून वडाळ्यामध्ये जखमी अवस्थेत सापडलेल्या गिधाडाचा बचाव करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात देखील मुंबईच्या समुद्रामधील जवाहर द्वीप बेटावरुन युरेशियन गिधाडाचा बचाव करण्यात आला होता. त्यामुळे या गिधाडांनी मुंबईत स्थलांतर केल्याची शक्यता आहे. (eurasian griffon vulture)
मुंबई : बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर झालेले हल्ले ( Violence ) आणि धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या कृत्यांमुळे असंख्य लोक भयभीत झाले आहेत. त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. या अस्थिर परिस्थितीकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर त्याचे परिणाम बांगलादेशच्या पलीकडे पसरतील. ज्यामुळे संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशातील स्थिरता आणि शांतता धोक्यात येईल, असा इशारा ‘नोबेल शांतता पुरस्कार’ विजेते कैलाश सत्यार्थी यांनी दिला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना उद्देशून पुढे ते म्हणाले की
देशातील अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्याबरोबरच, शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवणे तसेच, विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराला चालना देण्यासाठी भारत आणि आशियाई विकास बँक यांच्यात नुकताच झालेला करार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. उत्पादकता तसेच कार्यक्षमता वाढवणारे हे क्षेत्र आहे.
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर समुद्रात असणाऱ्या जवाहर द्वीपावर रविवार दि. १ डिसेंबर रोजी दुर्मीळ युरेशियन ग्रिफाॅन गिधाडाचे दर्शन झाले (eurasian griffon vulture rescued). मात्र, हे गिधाड जखमी अवस्थेत असल्याने वन विभागाने त्याला पकडून पुण्यातील वन्यप्राणी बचाव केंद्रात उपचाराकरिता पाठवले आहे (eurasian griffon vulture rescued). युरेशियन ग्रिफाॅन गिधाड ही संकटग्रस्त श्रेणीतील दुर्मीळ प्रजात असून ते स्थलांतरी आहे. (eurasian griffon vulture rescued)
देशात सध्या क्रीडा क्षेत्राला सोन्याचे दिवस आले आहेत. खेळाकडे करिअर म्हणून बघणार्या युवकांची संख्या देशात वाढते आहे. यासाठी अनेक राज्य सरकारे पुढाकार घेत आहेत. खेळासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर निर्मितीपासून खेळाडूंना प्रत्येक पावलावर सहकार्य मिळत आहे. या सगळ्यात हॉकीचे स्थान विशेषच. या खेळाच्या वाढत्या प्रसाराचा घेतलेला हा आढावा...
Indian women's hockey team बिहार येथील राजगीर येथे नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत महिला गटाच्या भारतीय संघाने तिंरगा फडकवत चीनला चारी मुंड्या चीत केले असून तिसरा विजय मिळवला आहे. 'गोल्डन गर्ल' दीपिकाने या स्पर्धेत ११ व्या गोलाच्या जोरावर रौप्यपदक विजेत्या चीनचा पराभव करत धूळ चारली आहे.
गेले काही दिवस देशात चर्चा सुरु आहे ती, निकालाचीच. निवडणुकीचा निकाल काय लागणार, अशी चर्चा महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सुरु असताना, बिहारमध्ये आशियाई महिला चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता टीपेला पोहोचली आहे. बिहारमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेचा घेतलेला हा आढावा...
पुणे जिल्ह्यातून प्रथमच अत्यंत दुर्मीळ युरेशियन पाणमांजराची नोंद करण्यात आली आहे (Eurasian otter seen in pune). इंदापूरमध्ये विहिरीत पडलेल्या या युरेशियन पाणमांजराचा बचाव करण्यात आला असून सध्या त्याच्यावर बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत (Eurasian otter seen in pune). यानिमित्ताने पाणमांजरासारख्या दुर्लक्षित जीवाचा महाराष्ट्रातील अधिवास आणि त्याच्या संचारावर संशोधन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (Eurasian otter seen in pune)
मी बुद्धांच्या भूमितून आलो आहे. आम्ही सातत्याने सांगतो की ही वेळ युद्ध करण्याची नाही. जागतिक समस्यांवरची उत्तरं युद्धभूमीवर मिळत नाही
(West asia) पश्चिम आशियातील संघर्षही संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच सोडविणे आवश्यक आहे, अशी अधिकृत भूमिका भारताने बुधवार, दि. २ ऑक्टोबर रोजी मांडली आहे. इराणने इस्रायलवर केलेला क्षेपणास्त्र हल्ला आणि त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिलेली धमकी यामुळे पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झाले आहे. त्याचवेळी, भारतानेही प्रथमच सद्य स्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने संवाद आणि मुत्सद्देगिरीने प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने
भारत हा आता आशिया खंडातील तिसरा प्रबळ देश म्हणून नावारुपाला आला आहे. ऑस्ट्रेलियामधील ‘लोवी’ या संस्थेने नुकताच प्रसिद्ध केलेल्या ‘आशिया पॉवर इंडेक्स-2024’ या अहवालात भारताने जपानला मागे टाकत आशियातील सर्वांत शक्तिशाली देशांमध्ये तिसरा क्रमांक पटकावला असल्याचे म्हटले आहे.
भारताकडून मदत तर सर्वच शेजारी देशांना हवी आहे, पण भारत जागतिक स्तरावर बलशाली झालेला या देशांना पाहवत नाही. त्यातच चीनने भारताच्या सर्व शेजारी देशांमध्ये भारतविरोधी राजवटी प्रस्थापित करण्याचा डाव आखला असून, त्यात तो बर्याच प्रमाणात यशस्वीही झाला आहे. परिणामी, भारताने आपली खरी ताकद दाखविण्याची वेळ आली आहे.
इराणच्या या हल्ल्यात प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलला ज्या माहिती सर्वेक्षण-टेहळणी-सर्व्हेलन्स-रिकॉनायसन्स यंत्रणांचे सहकार्य मिळाले, त्यात शेजारी अरब देशांच्या वरील यंत्रणासुद्धा होत्या. लक्षात घ्या. शिया मुसलमान इराण इस्रायलला नष्ट करण्यासाठी सज्ज झालाय आणि एकेकाळचे इस्रायलचे हाडवैरी सुन्नी मुसलमान अरब देश इस्रायलला सहकार्य करतायत.
मागील महिन्यात संपूर्ण युरोप आणि आशियातील उप्तादकांची कामगिरी कमकुवत झाली असून कारखान्यांनी तीव्र मागणीचा सामना करावा लागला, असे मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स(पीएमआय)ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
भारताचा जीडीपी सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह यंदा अर्थव्यवस्थेत सात टक्के वाढीची अपेक्षा आहे. तसेच, सात टक्क्यांच्या वाढीस महागाई वाढ सरासरी ४.६ टक्के असेल, असे आशियाई विकास बँके(एडीबी)ने एशिया डेव्हलपमेंट आऊटलूक अहवालात म्हटले आहे.
ओटीटी विश्वातील बदलती समीकरणे लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने आशिया, युरोप बाजारात अँड फ्री योजना आणण्याचे ठरवले आहे. तसे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.यामध्ये आगामी काळात प्रेक्षकांना नेटफ्लिक्स ग्राहकांना विनामूल्य बघता येणार आहे. मात्र यामध्ये जाहिरातीचा भरणा असणार आहे. प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे कंपनीने या क्षेत्रातील बाजारांचा अभ्यास करत हे मोठे पाऊल उचलले आहे.
युद्ध, संघर्ष आणि त्यामधून उमटणारे जागतिक पडसाद, अर्थव्यवस्थेवर निर्माण होणारा ताण, जीवित, वित्तहानी या सगळ्यांची प्रचीती जगाने यापूर्वी घेतली आहेच. नैसर्गिक स्रोतांच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या नुकसानाचा नैसर्गिक सृष्टीवर, जैवविविधतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. अशाचप्रकारे आत्ता जगभर चर्चेत असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचेही तसेच. या युद्धामध्ये जागतिक अर्थव्यवस्था तर कोलमडलीच; पण त्याचबरोबर प्रचंड जीवित आणि वित्तहानीसुद्धा झाली. पण, आपला आजचा विषय हा नाही.
युनायटेड नेशनने भारताच्या अर्थव्यवस्थेत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये मोठी वाढ होण्याचे भाकीत केले आहे. यावर्षी अर्थव्यवस्थेत ७ टक्क्यांनी वाढ होण्याचे अनुमान युएनने केले आहे. मुख्यतः वाढ लोकांच्या वाढलेल्या गुंतवणूकीमुळे भारतातील ग्राहकांच्या वाढलेल्या वापरामुळे (Consumer Consumption) मुळे वाढ झाल्याचे आपल्या निष्कर्षात म्हटले आहे. युएएनने आपल्या World Economic Situation and Prospects Mid 2024 या अहवालात हे नमूद केले आहे.
दक्षिणपूर्व आशियातील व्हिएतनाममध्ये ‘Save Vietnam's Wildlife' ही वन्यजीव संरक्षण संस्था बेकायदेशीर वन्यजीव व्यापारातून पँगोलिन वाचवत आहे. या पँगोलिनचा अभ्यास करण्यासाठी रेडिओ ट्रॅकिंगचा वापर केला जात आहे. रेडिओ टेलिमेट्री ड्रोन वापरल्यामुळे संस्थेला सोडलेल्या पँगोलिनच्या अस्तित्वाचे मूल्यांकन करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर पँगोलिनच्या वर्तणुकीबद्दल आणि अधिवासाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.
दान हे सत्पात्री असावे लागते, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. पश्चिम आशिया आणि आफ्रिकेतील युद्धामुळे विस्थापित झालेल्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या देशात आश्रय दिलेल्या अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स वगैरे युरोपीय देशांना या तत्त्वज्ञानाचे सत्य आता उमगू लागले आहे. ब्रिटनमध्ये आश्रयास आलेल्या या स्थलांतरित मुस्लिमांकडून या देशातील स्वातंत्र्याचा उपयोग आपली धार्मिक-सांस्कृतिक मूल्ये लादण्यासाठी केला जातो. पण, अतिउदारतेने पछाडलेल्या पाश्चिमात्य देशांना भावी धोक्याची घंटा ऐकू जाते का, हाच खरा प्रश्न.
एस अँड पी ग्लोबल या मार्केट इंटेलिजन्स कंपनीच्या सर्वेक्षणात तीन भारतीय बँकांनी पहिल्या ५० बँकेत स्थान मिळवले आहे. एशियन पॅसिफिक विभागात एचडीएफसी बँक,आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांना पहिल्या ५० मध्ये स्थान मिळाले आहे.आर्थिक वर्ष २०२२ मध्ये देखील दोन भारतीय कंपन्यांनी पहिल्या ५० बँकांत स्थान मिळवले होते. एस अँड पी ग्लोबलमधील या नव्या अहवालामुळे भारताच्या यशात अजून एक भर पडली आहे.
इराण-इस्रायल युद्धामुळे अमेरिका इस्रायलच्या बाजूने ओढली जाऊन, या परिस्थितीचा फायदा रशिया घेईल, अशी भीती आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धात युक्रेनची बाजू कमकुवत झाली असून, अमेरिकेच्या सक्रिय मदतीशिवाय त्यांना पराभव पत्करण्याची भीती आहे. युक्रेन आणि इस्रायल यांच्यापैकी अमेरिकेचा ओढा इस्रायलकडे असणार, हे उघड आहे.
युरोप खंडाच्या उत्तर पश्चिमेला असलेल्या नेदरलँडमधील (Netherlands) एका गावात राहणाऱ्या झोराया टेर बीक या २८ वर्षीय तरुणीने कायदेशीररित्या आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. (Euthanasia) अहवालानुसार, शारीरिकदृष्ट्या निरोगी असूनही, तिच्या मानसिक आरोग्याच्या संघर्षामुळे तिने इच्छामरणाचा पर्याय निवडला आहे. तिला यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला इच्छामरणाची अपेक्षा आहे. नेदरलँड्सने २००१ साली इच्छामरण कायदेशीर केले. तसे करणारा नेदरलँड्स हा जगातील पहिला देश आहे. तेव्हापासून, इच्छामरण हवे असलेल्या लोकांची वाढती
जागतिक वर्ल्ड बँकेने आशियाई राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर नवीन अंदाज व्यक्त केला आहे. ज्यामध्ये दक्षिण आशियाई राष्ट्रात विकासदर ६ टक्क्याने राहण्याची व भारतात विकास दर ७.५ टक्के राहण्याचे भाकीत केले आहे.आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत ७.५ टक्क्याने वाढ होण्याचे दर्शवतानाच श्रीलंका व पाकिस्तान या देशांच्या अर्थव्यवस्थेत 'रिक्वरी' येऊ शकते असे जागतिक बँकेने सांगितले आहे.
२०२४च्या मार्च महिन्यात मालदीव आणि चीन यांच्यामध्ये एका संरक्षण करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. त्यानुसार, चीन मालदीवला काहीही मोबदला न घेता, (ग्रॅटिस) संरक्षण देणार आहे. अशाप्रकारे मालदीवच्या बाबतीत भारतापासून दूरता आणि चीनशी जवळीक याला प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्ताने...
‘एशियानेट’तर्फे घेण्यात आलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ निवडणूकपूर्व सर्वेक्षणात ७९ टक्के लोकांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला पसंती दर्शविली आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना सर्वाधिक पसंती मिळाली असून ८० टक्के लोकांनी मोदी सरकारने जागतिक क्रमवारीत भारताची स्थिती सुधारली असल्याचे सांगितले आहे.
"द.कोरिया आणि आमच्या देशामध्ये ऐतिहासिक-धार्मिक संबंध आहेत. कोरियामध्ये बौद्ध धर्म आमच्या देशातूनच पोहोचला आहे,” असे कोण म्हणाले असेल असे वाटते? तर हे महाशय म्हणजे पाकिस्तानी राजदूत नबील मुनीर. मुनीर यांना असे म्हणायचे आहे की, द. कोरियामध्ये अतिशय भक्कमरित्या अस्तित्वात असलेला, सियोल बौद्ध धर्म (भारतातून चीनमध्ये आणि पुढे कोरियामध्ये गेलेल्या बौद्ध धर्मामध्ये कोरियन लोकांनी कोरियन संस्कृतीनुसार बदल केला. तोच सियोल बौद्ध धर्म) हा मूळचा पाकिस्तानातून आलेला. कोणे एके काळी पाकिस्तान काय नि अफगाणिस्तान काय, तिथे
आग्नेय आशियाई राष्ट्र असलेल्या कंबोडियाच्या उत्तर प्रांत ‘प्रीह विहेर’मधील जंगलात बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याचे नुकतेच समोर आले. दस्तुरखुद्द कंबोडिया सरकारमधील एका वरिष्ठ अधिकार्याच्या सांगण्यावरून ही वृक्षतोड होत आहे. या वृक्षतोडीमुळे ‘प्रीह विहेर’मध्ये असलेल्या तीन काजू प्रक्रिया कारखान्यांच्या आजूबाजूला ओसाड जमिनीचा पट्टा तयार झाला. ‘युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ (USAID) ने कंबोडियाच्या कृषी उत्पादकतेला चालना देण्यासाठी अनुदान देणारा कार्यक्रम २०१७ सुरू केला. याच अनुदानाचा फायदा
अर्थव्यवस्थेत अनेक स्थित्यंतरे होत असतात. यातील महत्वाचा गाभा लॉजिस्टिक क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील वाढीमुळे विकसनशील देशात व्यवसाय विकासाची शक्यता अधिक असते. याच धर्तीवर रिअल्टी क्षेत्रातील पायाभूत सुविधा, सामग्री, दळणवळण या गोष्टी पोचवण्यासाठी लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान असते. या क्षेत्रातील संदर्भात नुकताच कुशमन व वेकफिल्ड वार्षिक लॉजिस्टिक अहवाल जाहीर झाला आहे. या अहवालानुसार लॉजिस्टिक व इंडस्ट्रियल लिजींगमध्ये मोठी वाढ झाली आहे. यात म्हटल्याप्रमाणे मुंबईत प्रकल्प पूर्ण करण्याचा वेग मात्र थंडावला आह
आशियाई देशातील व्यापारात पुन्हा क्रुड (कच्च्या) तेलाचे भाव वाढली असल्याची प्रसारमाध्यमांनी दिली आहे. रेड सी शिपिंग हल्ला प्रकरणातील वाढती अनिश्चितता व युएस फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदर लवकर कमी होतील ही आशा दुभंगलेल्याने अखेर तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. ब्रेंट क्रुड फ्युचर ३० सेंटने (०.३६ टक्क्याने) वाढत ८२.६४ डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पोहोचले आहे .
सीबीआरई साऊथ एशिया रिपोर्टनुसार भारतात एकूण महागड्या ( लक्झरी) घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील आर्थिक वर्ष २ टक्क्यांच्या तुलनेत तब्बल दुप्पटीने म्हणजेच ४ टक्क्याने महाग घराऔची मागणी वाढली आहे. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ( वर्षांनुवर्षे) आधारावर ही मागणी ७५ टक्क्याने घरांची विक्री वाढली असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. यांमध्ये मुंबईत ४ टक्क्याने विलासी घरात वाढ झाल्याचे या अहवालात दर्शविले आहे. सर्वात जास्त मागणी दिल्ली शहरात (१४४ टक्क्याने) वाढली असून त्याखालोखाल पुण
आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पनांतर आता वांद्रे रेक्लेमेशनमधील २४ एकर जागेत व्यवसाय केंद्र उभारणीसाठी अदानी रिअल्टीने निविदाप्रक्रियेत बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या जागेत हे व्यवसाय केंद्र आणि निवास स्थाने उभारले जाणार असल्याची माहिती मिळते आहे.