मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून मंगळवार, १० जून रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला आहे. गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.
Read More
आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या चार जणांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी भाडेवाढ न करता एसी ट्रेन आणण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवार, १० जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघाताची घटना दुर्दैवी असून जखमींचा जीव वाचवण्यास आमचे पहिले प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून समोर येईल, असे ते म्हणाले.
मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेतील जखमींना उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
मुंब्रा–दिवा रेल्वे मार्गावरील घटना मन सुन्न करणारी आहे, असे म्हणत मंत्री आशिष शेलार यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून या घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शहरांबद्दल बोललेल्या गोष्टींना आपल्याकडे किंमत नाही. आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे हेच या समजेनासे झाले आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंब्रा-दिवा रेल्वे अपघातावर संताप व्यक्त केला. सोमवार, ९ जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातामुळे संपूर्ण राज्य हळहळत असताना आता या अपघातातील मृत आणि जखमी व्यक्तींची नावे पुढे आली आहेत. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत.
मुंबई लोकलच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान सोमवार, ९ जून रोजी सकाळी ८:४५ च्या आसपास ट्रेनचा भीषण अपघात झाला. यामध्ये चालत्या ट्रेनमधून बाहेर पडून चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा अपघात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन ट्रेनमधील प्रवाशांची टक्कर होऊन झाला आहे.
मुंब्रा स्थानकदरम्यान घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर सर्वाच स्तरांतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईकरांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. आपली रोजीरोटी ही महत्त्वाची आहेच. पण, त्याचवेळी आपल्या घरातील मंडळी आपली वाट पाहत असते हेसुद्धा महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.
मराठी चित्रपटसृष्टीत धमाकेदार रहस्य आणि विनोदाची मेजवानी घेऊन येणार्या ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच देशभक्ती, शिस्त, व्यायामाची सवय आणि संघटितपणाची भावना रुजविणे हा आहे.
मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पात आता महाराष्ट्रातही कामांना गती मिळते आहे. बीकेसी ‘बुलेट ट्रेन’ स्थानकाचे बांधकाम अत्यंत वेगात सुरू असताना आता विरार ‘बुलेट ट्रेन’ स्थानकासाठी स्लॅब कास्टिंग सुरू झाले असल्याची माहिती ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने दिली आहे.
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आता महाराष्ट्रात ही कामांना गती मिळते आहे. बीकेसी बुलेट ट्रेन स्थानकाचे बांधकाम अत्यंत वेगात सुरू असताना आता विरार बुलेट ट्रेन स्थानकासाठी स्लॅब कास्टिंग सूरु झाले असल्याची माहिती, नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने दिली आहे.
मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने काही तास विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून लोकल सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे.
वाढवण बंदर प्रकल्प, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प यांसारखे पालघर जिल्ह्याला आंतराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणार आहेत. अशा मोठ्या प्रकल्पांसोबतच पालघर जिल्हा आता चौथी मुंबई म्हणून ओळख मिळविण्यासाठी सज्ज होतो आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील तरुणांनीही आवश्यक कौशल्ये विकसित करून या विकासधारेत यावे यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय प्रयत्नशील आहे. याच मुद्यावर पालघरच्या जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. राज्यातील विविध भागांत गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुंबईतील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली असून ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे.
(Jyoti Malhotra) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये ज्योतीने चारवेळा मुंबई दौरा केल्याची खळबळजनक बाब तपासातून समोर आली आहे. याचदरम्यान मुंबईत ज्योती नेमकं कुठे-कुठे फिरली, या दौऱ्यामागे नेमकं काय कारण होतं, याचा तपासयंत्रणाकडून शोध सुरु आहे.
(Separate skill development training course on AI in Maharashtra) “शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करून कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत.
(BKC underground bullet train station) “मुंबईतील ‘बीकेसी’ बुलेट ट्रेन स्थानकाचे काम अत्यंत गतीने सुरू आहे. भूमिगत स्थानकांपैकी तिसर्या मजल्याचे काम सुरू आहे. या भूमिगत स्थानकांना आधार आणि मजबुती देणारे काम पूर्ण झाले आहे. आता स्थानकांच्या भिंती उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यासोबतच भुयारी मार्गाचे कामही वेगात सुरू आहे.
शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. ५ मे रोजी मं
पश्चिम रेल्वेवरील प्रवाश्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या माहिम आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान दि. ३ मे व ४ मेच्या रात्री ४ तासाचा जंम्बो मेगा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बीकेसी भूमिगत बुलेट ट्रेन स्थानकाचे काम वेगात
स्त्री-पुरुष समानतेचे खरे प्रणेते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे संविधानिक चौकटीत शक्य झाले आहे. बाबासाहेबांचे योगदान एका विशिष्ट समाजासाठी नव्हे, तर सर्वसमावेशक दृष्टिकोनातून झाले आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या सामाजिक न्याय, नगरविकास व परिवहनमंत्री ना. माधुरी मिसाळ यांनी केले
२०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार!
Devendra Fadanvis on Bullet train राज्यात २०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमी कॉरिडॉर समिट २०२५मध्ये ते बोलत होते.
( Students of Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) achieve impressive success in the UPSC examination ) डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. तसेच मुख्य परीक्षा व मुलाखत चाचणीकरिता पात्र झालेल्या उमेदवारांना आर्थिक साहाय्य दिले
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने सोमवारी सांगितले की, “महानगरातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकासाठी सुमारे ७५ टक्के उत्खनन काम पूर्ण झाले आहे.”
मुंबईत येणार पहिली ‘अमृत भारत एक्सप्रेस
train attack त्तर प्रदेशातील लखनऊमधील रेल्वे ट्रॅकला लक्ष्य करण्यात आले आहे. ही घटना आठवड्यातून दुसऱ्यांदा घडली असल्याचे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. यावेळी बक्कस-उत्रेथिया रेल्वे ठाणेदरम्यान डाउन लाईनवर रेल्वेलाईनवर एक मोठा लोखंडी दरवाजा ठेवण्यात आला होता, ज्यात अवजड वाहनामुळे अडथळा निर्माण झाला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला आढळले की पँड्रोल क्लिपही अवजड वाहनासोबत गायब करण्यात आली होती.
( steel bridge launched bullet train project ) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांनी गती घेतली आहे. अशा वेळी या प्रकल्पासाठी दहा हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त स्टील असलेले सात स्टील पूल लॉन्च करण्यात आले. अशाच प्रकारचा आणखी एक पूल गुजरातमधील वडोदरा येथे दोन ‘डीएफसीसीआयएल’ ट्रॅकवर 70 मीटर लांबीचा स्टील पूल यशस्वीपणे लॉन्च करण्यात आला. मंगळवार, दि. 8 एप्रिल रोजी हा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल लॉन्च करण्यात आला.
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांनी गती घेतली आहे. अशावेळी या प्रकल्पासाठी १० हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त स्टील असलेले सात स्टील पूल लाँच करण्यात आले. अशाच प्रकारचा आणखी एक पूल गुजरातमधील वडोदरा येथे दोन डीएफसीसीआयएल ट्रॅकवर ७० मीटर लांबीचा स्टील पूल यशस्वीपणे लाँच करण्यात आला. मंगळवार, दि.८ एप्रिल २०२५ रोजी हा ‘मेक इन इंडिया स्टील पूल लॉन्च करण्यात आला.
मुंबई महानगरपालिका आणि केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन 'नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' आणि 'टीव्हीएस' यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. आमदार मंगेश कुडाळकर, दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ.प्राची जांभेकर आदींसह महिला बचत गटाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या रिक्षांचे वाटप करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रश
लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबईसाठी उच्च दर्जाच्या २३८ लोकल गाड्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे.
पाकिस्तान हा जगाच्या पाठीवरचा असा देश आहे, ज्याने भारताचे नुकसान करण्याच्या नादाने स्वतःच्या पायावरच धोंडा मारून घेतला आहे. वास्तविक पाहता, स्पर्धा ही चांगलीच; मात्र त्यातील हेतू स्वतःची प्रगती हा असावा. मात्र, स्वतःला मिळाले नाही, म्हणून भारतालादेखील मिळता कामा नये. यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले आहे. मात्र, त्यांच्या हाती काहीही आजवर लागलेले नाही. त्यांनी पेरलेला दहशतवाद आज त्यांच्यावरच उलटला आहे. दि. १० मार्च रोजी बलुचिस्तानमधील नसीराबाद येथे घडलेली प्रवासी रेल्वे अपहरणाची घटना ही पाकिस्तानच्या अंतर्गत सु
पाकिस्तानात संपूर्ण रेल्वे हायजॅक! कोण आहे बलुचिस्तान आर्मी? काय आहे मागण्या?
धारावीतील स्थानिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या 'धारावी सोशल मिशन' (डीएसएम) ने 'डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट' (डीबीआयटीआय) च्या सहकार्याने धारावीतील युवकांसाठी विशेष कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. या उपक्रमात 'गॅस पाईपलाईन फिटर' चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या धारावीतील ११ उमेदवारांना थेट महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) मध्ये कायमची नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये २ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
Maharashtra Budget 2025 पायाभूत सुविधांमध्ये एक रुपयाची गुंतवणूक केली, तर स्थूल राज्य उत्पन्नात २.५ ते ३.५ रुपयांची वाढ होते, हे लक्षात घेऊन विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा शासनाचा निर्धार आहे. जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करित आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार २२० कोटी रुपये असून त्यात राज्य शासनाचा सहभाग २९ टक्के
कोकण रेल्वे मार्गावर मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना नेहमीच गर्दी असते. विशेषतः कोकणातील गणेशोत्सव आणि शिमगोत्सव या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि यात ट्रेनचे तिकीट न मिळणे, रेल्वेला प्रचंड गर्दी यामुळे चाकरमान्यांचे हाल होतात. याच पार्श्वभूमीवर कोकणात गावी येण्यासाठी मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई येथील चाकरमान्यांना सोप व्हावे यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे होळी उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या
शारीरिक व्याधीवर डॉक्टरांनी दिलेला शतपावलीचा सल्ला धावण्यापर्यंत पोहोचला अन् शालेय जीवनात एकही खेळ न खेळलेल्या पन्नाशीच्या उंबरठ्यावरील प्रिती लाला यांनी तब्बल १०० मॅरेथॉन स्पर्धांचा पल्ला गाठला... त्यांचा हा अतुलनीय प्रवास ....
भारतीय रेल्वेमध्ये सरळसेवा भरतीतून थेट नियुक्ती झालेल्या आणि पश्चिम रेल्वेवरील पहिल्या मोटारवुमन प्रीती कुमारी यांच्याविषयी....
ध्यान, प्राणायाम, वेगवेगळ्या मुद्रा, घरातील संस्कारांच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत, युवा पिढी घडवणार्या रुपेश बाविस्कर यांच्याविषयी...
मुंबई-अहमदाबाद शहरांतील दळणवळणाचा वेग वाढवण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरु आहे. या मार्गातील पुलाचे काम झपाट्याने सुरू असून नुकताच गुजरात मध्ये पाचव्या प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
मुंबईस्थित चाकरमानी होळीनिमित्त कोकणातील मुळगावी जाण्याच्या तयारीत असतात. कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव या दोन्ही सणांना विशेष महत्त्व आहे. कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत.
भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला फेब्रुवारी,२०२५ रोजी १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी पश्चिम रेल्वेने उत्सवाचा भाग म्हणून एक प्रदर्शन आणि चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चगेट रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या प्रदर्शनात लोकोमोटिव्ह, ईएमयू, मेमू आदी मॉडेल्स ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी पर्वणी ठरत आहे. मोठ्या संख्येने प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक या प्रदर्शनाला भेट देत आहेत.
ITI कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे 'प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम' अर्थात 'ट्रेन द टीचर्स' या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून, विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
जपानी भाषेत बुलेट ट्रेन म्हणून ओळखल्या जाणार्या जपानी शिंकानसेनने, आपल्या अनोख्या हायस्पीड तंत्रज्ञानाने जगभरातील २४हून अधिक देशांतील वाहतूक व्यवस्था कायमची बदलून टाकली. जपानचा हाय-स्पीड रेल्वे प्रवास १९६४ साली, टोकियो ऑलिम्पिकच्या अगदी आधी, टोकाइदो शिंकानसेनच्या उद्घाटनाने सुरू झाला. या मार्गाने जपानची राजधानी टोकियो ओसाकाशी जोडली गेली. ३२० मैलांचा प्रवास अडीच तासांवर आला. यातूनच रेल्वे प्रवासात क्रांती घडली.
पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान दि. ०८/०९ फेब्रुवारी २०२५ रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येईल. ब्रिज क्रमांक ५ च्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण करण्यासाठी शनिवार/रविवार, ०८/०९ फेब्रुवारी २०२५ रोजी ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान शनिवार दि. ८ रात्री १०:०० ते रविवार दि. ९ सकाळी ११:०० पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गांवर १३ तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येईल.
भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या कौशल्याचा वापर करून भारत 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी स्वत:च्या तांत्रिक आणि भौतिक संसाधनांचा अधिकाधिक वापर करत आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी स्टील पूल हे या प्रयत्नाचे मोठे उदाहरण आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने चार रेल्वे रुळांवर 'मेड इन इंडिया' स्टील पुलांचे गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केले. मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८ किलोमीटर हायस्पीड मार्गासाठी सध्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात काम सुरु आहे.
९०च्या दशकात औद्योगिक प्रशिक्षणासारखी ( Development Trainer ) वेगळी वाट निवडून शेकडो आदिवासी विद्यार्थिनींना लघुउद्योजिका बनविण्यासाठी प्रयत्न करणार्या दिपाली कुलकर्णी यांच्याविषयी...