ज्ञानदेवांपासून एक एक ज्योत लावण्याचा आपला इतिहास आहे. ज्ञानदेवादी ज्ञानज्योतींनी हा महाराष्ट्र प्रकाशित केला. छत्रपती शिवाजी महाराज, पहिले बाजीराव, महादजी शिंदे आदी शूरांनी, क्षात्रज्योतींनी महाराष्ट्र तेजस्वी केला. त्या तेजाचा अनुभव महाराष्ट्राने घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि सत् प्रवृत्त जनतेने एक कौल दिला. त्याचा विश्वासघात महाराष्ट्रातील काही लोकांनी केला. आज विश्वासघाताचा अंधकार निर्माण केला आहे. म्हणूनच संकल्पज्योतींचा निर्धार करून परिवर्तनाचा प्रकाश पुन्हा एकदा प्रज्वलीत करावा लागेल.
Read More