( Opposition to Thane-Borivali subway ) ठाणे - बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाला होत असलेला विरोध अखेर शमला आहे. शनिवारी मानपाडा येथील सभागृहात एमएमआरडीए आणि रहिवाश्यांच्या बैठकीत खा. नरेश म्हस्के यांनी यशस्वी शिष्टाई केल्याने रहिवाश्यानी तुर्तास नमते घेतले.
Read More
मुंबई महानगरपालिकेच्या 'ए'विभाग अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भूयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी नव्या तंत्रज्ञानासह अद्ययावत वायूविजन (व्हेंटिलेशन) प्रणाली बसविण्यात आली आहे. यामुळे भूयारी मार्गातील हवा खेळती राहण्यासोबतच तापमान कमी होण्यासाठी मदत होणार आहे. परिणामी, भूयारी मार्गाच्या ठिकाणी गर्दी असताना होणारी अस्वस्थतता कमी होण्यास मदत होईल. त्यासोबतच भूयारी मार्गातील गरम हवा बाहेर टाकण्याचे काम या मध्यवर्ती यंत्रणेमार्फत करण्यात येईल.
सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. दरम्यान, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच यासाठी एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मरीन लाईन्स येथे चर्चगेट दरम्यान साचलेले पाणी पंपाद्वारे उपसण्यास सुरुवात केली आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. चर्चगेटजवळ रेल्वे परिसरात पाणी साचलं आहे. रेल्वे रुळांवरच पाणी रस्त्यावर आल्याने सखल भागात पाणी साचलं आहे.
गेल्या काही दिवसांपासुन राज्यात पावसाने हाहाकार केला आहे. कोकणात ही मुसळधार पाऊस सुरुच आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेत. तर, आता मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, दि. १९ जून रोजी प्रगती मैदान एकात्मिक संक्रमण मार्गिका प्रकल्पाचा मुख्य बोगदा आणि पाच भुयारी मार्ग राष्ट्राला समर्पित केले.
थोडासा पाऊस जरी पडला तरी पाण्याखाली जाणाऱ्या मुंबईतील हिंदमाता आणि मिलन सबवेमध्ये यंदा पाणी भरणार नसल्याचा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. हिंदमाता आणि मिलन सबवे येथे साठवण टाक्यांची निर्मिती करण्यात आली असून या टाक्यांमुळे यंदा पावसात इथे पाणी तुंबणार नाही अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मुंबई शहर सात बेटांवर वसलेले आहे, हे आता सर्वांनाच माहीत आहे. मात्र, वाढत्या बांधकामांमुळे या बेटांच्या सीमा आकुंचन पावत त्यांच्याभोवतीचे पाणी बाहेर फेकले गेले. त्याचा परिणाम इतर भूभागांवरही दिसूमन आला. हे एक उदाहरण आहे. अर्थात, जगात अनेक ठिकाणी समुद्रात भराव टाकून बांधकामे होतात. Article on rivers in Mumbai
गेल्या आठवड्यापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. पावसामुळे मुंबईसह अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहेत.