(Ashok Dhodi Murder Case) तलासरी येथील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला रविवारी ८ जूनला सिलवासा येथून अटक करण्यात आली आहे. अशोक धोडींची ह्त्या करुन पाच महिन्यांपासून फरार झालेल्या मुख्य आरोपी अविनाश धोडीचा पोलिसांकडून शोध सुरु होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला दादरा नगर हवेली येथे अविनाश थोडी लपून बसला असल्याची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी छापा टाकून त्याला अटक केली.
Read More
Uddhav Thackeray राजकीय पक्षाचा वारसा हा विचारांचा असतो. शिवसेनेचा वारसा हा हिंदुत्वाचा होता, हिरव्या बावट्यांचा नव्हता. भगव्या ध्वजाला ‘फडकं’ म्हणणार्यांची मतदारांनी निवडणुकीत चिंधी करून टाकली. उद्धव ठाकरे यांनी आता कितीही त्रागा केला, तरी मतदारांनी आपला निवाडा दिला आहे, हे वास्तव उद्धव ठाकरे यांना स्वीकारावेच लागेल. आता बाळासाहेबांच्या आवाजाची मदत घेऊनही त्यांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही. कारण, त्यांनी आपल्या हातानेच हा वारसा धुडकावून लावला आहे.
Bhaskar Jadhav ‘करून करून भागला आणि देवपूजेला लागला’ अशी उबाठा गटाच्या भास्कर जाधव यांची गत. पण, त्यांची कुकर्मे विसरून जातील, इतके महाराष्ट्रातील लोक विसरभोळे नाहीत. विधानसभेचा विरोधी पक्षनेता होण्यासाठी त्यांनी ना ना तर्हेचे प्रयत्न करून पाहिले, पण ते अयशस्वीच ठरले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या घटिकेपर्यंत ते आशावादी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी शेवटपर्यंत पायघड्या घातल्या, भर सभागृहात त्यांचे तोंडभरून कौतुक वगैरेही केले. देवाभाऊ राग विसरतील आणि पदरात घेतील, अशी त्यांना अपेक्षा होती.
सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात भाजप-शिवसेना युती २०१४ साली कशी तुटली? याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा करून दिली. “२०१४ साली शिवसेनेला १४७ जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल व आमचा उपमुख्यमंत्री होईल, हेसुद्धा ठरले होते. पण, शिवसेना १५१ जागांवर ठाम राहिली आणि युती तुटली,” असे ते म्हणाले. मात्र, राऊतांनी यावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा उबाठा गटाची गोची झाली. ‘भाजपने युती तोडली’, ‘धोका दिला’, ‘दिलेला शब्द मोडला’, अश
( Sunil Raut ) विक्रोळी मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सुनील राऊत शिवसेना उमेदवार सुवर्णा करंजे यांची कत्तल करायला कसाई पाठवणार असून निवडणूक आयोगाने रक्षण करावे, असे म्हात्रे यांनी म्हटले.
( MahaVikas Aghadi ) महाविकास आघाडीच्या अवघ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने फुटीरतावादी आणि हिंदूंविरोधी शक्तींना अभय दिल्याचेच दिसून आले होते. त्यामुळे पुन्हा मविआचे सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यास, तुष्टीकरणाचे राजकारण कळस गाठेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
( MahaVikas Aghadi ) महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेला गुंता सुटण्याचे काही नाव नाही. जवळपास महिनाभर चर्चेच्या फेर्या झडल्यानंतर अखेर बुधवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी त्यांना केवळ २५५ जागांवरील फॉर्म्युला जाहीर करता आला. त्यानुसार, काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या वाट्याला प्रत्येक ८५ जागा येणार आहेत.
( Sindhudurg ) ग्रामपंचायतीची निवडणूक असो, वा विधानसभा किंवा लोकसभा. तळकोकणात राजकीय शिमगा ठरलेलाच! नारायण राणे जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हापासून इथल्या सर्व निवडणुका त्यांच्याभोवती फिरू लागल्या. काँग्रेसमध्ये असताना, एकवेळ त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला,तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या विजयामुळे कोकणात पहिल्यांदाच भाजपचे ‘कमळ’ फुलले. लोकसभेतील या विजयाचा परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होणार आहे. कणकवली आणि सावंतवाडीच्या जो
( Shetkari Kamgar Paksh in Raigad Vidhansabha ) लोकसभा निवडणुकीत ‘शेतकरी कामगार पक्षा’ने महाविकास आघाडीला साथ दिली होती. रायगड आणि मावळ मतदारसंघात उमेदवार न देता शेकापने शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवारांना पाठिंबा दिला होता. “कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणू,” अशी हमी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिली होती. मात्र, दोन्ही मतदारसंघांतून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. विशेषतः रायगडमधून अनंत गीते यांचा झालेला पराभव उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जि
( Congress vs UBT ) राज्यात अखेर बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती व महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भातील चर्चांना उधाण आले होते. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी भाजपने पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याचे बोलले जात आहे.
जागावाटपाचा वाद विकोपाला! काँग्रेस बाहेर पडणार? l Congress l MVA
Nana Patole यांची तक्रार फक्त उद्धव ठाकरेंनीच केली असं नाही? यात नानांच्या काँग्रेसमधल्याच राजकीय विरोधकांचाही सामावेश आहे...
( Pravin Darekar ) उबाठाला आपले अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करावा लागताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना सगळे केंद्रीय नेते मातोश्री दरबारी येत होते. परंतु अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे दिल्लीच्या चरणी लोटांगण घालत होते. नाना पटोलेंच्या वादाच्या निमित्ताने चेन्नीथला यांना मातोश्रीवर यावे लागले यात उद्धव ठाकरे खुश राहणार आहेत. परंतु संजय राऊत यांनी लगेच पलटी मारली आहे. गिर गया तो भी टांग उपर, अशी त्यांची अवस्था आहे, अशी घणाघाती टीका भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केली आहे.
( MVA ) ज्या बैठकीत नाना पटोले असतील त्या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एकही नेता उपस्थित रहाणार नाही, अशी स्पष्ट आणि उघड भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. जागावाटपात सुरू असलेल्या वादामुळे ही ठिणगी पडली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नाना पटोलेंमुळे काँग्रेस आणि उबाठा गटात वारंवार ठिणग्या पडत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. मात्र, ही उघड भूमिका ऐन महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीपूर्वी जाहीर केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा पुढे जाणार नसल्याच
हरियाणा विधानसभेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीत प्रचंड कुरबुरी सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस हरल्याची जितकी खुशी भाजपला झाली नसेल, तितकी 'उबाठा' आणि शरद पवार गटाला झाल्याचं त्यांच्या बोलण्यातून पदोपदी जाणवतंय. महाविकास आघाडीत नेमकं काय सुरू आहे? जागावाटपाची बोलणी कुठवर आली आहेत? कोणाला किती जागा सुटणार आहेत? याचा आढावा.
( Sanjay Raut ) मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना योजने’विषयी दिशाभूल करणारी टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेना उबाठाचे खा. संजय राऊत यांच्याविरोधात मध्यप्रदेश पोलिसांनी बुधवारी एफआयआर नोंदवला. भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा वंदना जाचक आणि उपाध्यक्षा सुषमा चौहान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर भोपाळ गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अखिल पटेल यांनी दिली आहे.
(Pravin Darekar) उद्धव ठाकरे हे आपली ताकद कमी झाली ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नाहीत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना जरी जागा मिळाल्या असल्या तरी मूळ शिवसैनिक एकनाथ शिंदे आणि महायुतीसोबत आहेत. अमित शाह यांचे नेतृत्व देशाने स्वीकारलेले आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय या देशाने पाहिलेले आहेत. त्यांचा फडशा उद्धव ठाकरे कसा काय पाडू शकतात. ठाकरेंना फक्त तोंडाच्या वाफा घालवायच्या आहेत. त्यामुळे ते आणि संजय राऊत वाटेल ते बरळत असतात, अशी टीका भाजप गटनेते आमदार प्रविण दरेकरांनी केली आहे.
(Sanjay raut) उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिकेला शिवसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. “संजय राऊत तुम्ही गोमातेला नाही तर, सोनिया मातेला मानणारे आहात. राऊत आता केवळ तुमची सुंता करायची बाकी राहिली आहे. खुर्चीसाठी तुम्ही तेही करणार आहात, यात काहीही शंका नाही,” असा टोलाही खा. म्हस्के यांनी राऊत यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारची प्रगतीची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र
(Asim sarode)“बदलापूरसारख्या संवेदनशीलप्रकरणी पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील असीम सरोदे उबाठाचे निकटवर्तीय असून, ते सिलेक्टिव्ह अॅक्टिव्हीझम करतात,” अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी केली. “चिमुरड्यांवर अत्याचार करणार्या नराधम अक्षय शिंदेचा सरोदे यांना एवढा पुळका का आला?” असा सवाल त्यांनी केला.
Congress काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेचाच मुख्यमंत्री होणार अशी घोषणा केली. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही काँग्रेसचा स्ट्राईक रेट जास्त राहणार असल्याचं विधान केलं. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे एकटे पडलेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, ते या व्हिडीओतून जाणून घेऊया.
(Sushma andhare) शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘बिग बॉस’मधील एका व्हायरल विधानाचा वापर करत हे खड्डेमय रस्ते महाराष्ट्रातील असल्याचा दावा केला. मात्र, सुषमा अंधारे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा महाराष्ट्रातील नसून भारतातीलही नाही, तर थेट चार वर्षांपूर्वीचा चीनमधील आहे. भाजप महाराष्ट्राने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत पोस्ट केलेल्या या व्हिडिओमार्फत सुषमा अंधारे यांनी पसरविल्या ‘फेक नॅरेटिव्ह’ची पोलखोल केली आहे. विशेष म्हणजे नेटकर्यांनीही याबाबत माहिती देऊनही सुषमा अंधार
बाळासाहेबांचे पुत्र हेच ज्यांचे एकमेव कर्तृत्व आहे, त्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी पुन्हा आपली वर्णी लागावी, यासाठी नुकतेच दिल्लीला जात, सोनिया-राहुल यांच्यासमोर लोटांगण घातले. महाराष्ट्रातील लाखो भगिनींसाठी ‘लाडकी बहीण योजना’ महायुती सरकारने आणली, तिला अर्थातच ठाकरे आणि पवार कंपनीने विरोध केला आहे.
सांगली आणि भिवंडी हे काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ. मात्र, उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्यावर अडून बसल्याने अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे त्यांनी या जागांचा हट्ट न सोडल्यास स्वतंत्र उमेदवार देण्याबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.
महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाकडुन कसबा विधानसभा kasaba vidhansabhaमतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे. आगामी लोकसभेला पुणे लोकसभा मतदारसंघातुन कसब्याचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. ती जागा आगामी विधानलभेला ठाकरे गटाला मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
माजी मंत्री आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे ( Vijay shivtare Baramati ) यांनी मी कमळ चिन्हावर निवडणुक लढवण्यास तयार आहे. असं म्हटलं आहे. हे बंड नसुन मतदारांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मी ही निवडणुक लढवत आहे. असंही विजय शिवतारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
कुटुंबासोबत सुट्यांवर असताना एका चुकीच्या पद्धतीने काढलेला फोटो व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. दिवाळीच्या सुट्यांमध्ये ते कुटुंबासह हाँगकाँगच्या ट्रीपवर गेले होते.
भाजप महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना डोंबिवली शहर शाखेला सदिच्छा भेट दिली. शिवसेना शाखेतील नोटीस बोर्डवर लावलेल्या वर्तमानपत्रातील विविध बातम्यांची कात्रणे बावनकुळे यांनी पाहिली. त्यामधील २०२४ सालात कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे होणार आणि शिंदे लक्षावधी मतांनी पुन्हा निवडून येणार अशा आशयाच्या बातमीचा दाखला देत भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ सालात होणारी कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीच्या वतीने डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे निवडणूक लढवि
आमदार अपात्रता प्रकरणात सुरू असलेल्या विधिमंडळ सुनावणीचा आणखी एक टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्यावतीने करण्यात आलेल्या तीनही अर्जांवर गुरुवारी सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल अडीच ते पावणे तीन तास चाललेल्या या सुनावणीत दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावेळी पुढील कारवाई शुक्रवार, दि. २० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गट प्रमुख उध्दव ठाकरे उद्या मुंबईत शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. दादरच्या शारदाश्रम शाळेत ठाकरे गटाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उद्याचा ठाकरे गटाचा मेळावा हा विशेषकरुन कोकणवासीयांसाठी असणार आहे. यात मुंबई, ठाणे, विरार या शहरातले शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची चिन्हे आहेत. या मेळाव्याला ठाकरे गटाचे नेते उपस्थित असणार आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची बातमी ताजी असतानाच मुंबई महापालिकेसंदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचे समन्स आल्याची माहिती समोर येत असून ईडीने चहल यांना सोमवार १६ जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचेही माहिती समोर आली आहे.
जोगेश्वरी पूर्व येथील प्रभाग क्रमांक ७९ म्हणजेच पंप हाऊस विभागातील नागरिकांना नाल्यातील दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांसह इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पालिकेकडून वर्षातून फक्त एकदाच नाला साफ केला जात असल्यामुळे येथील डेंगू, मलेरिया अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे, अशी व्यथा येथील स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना मांडली. "स्थानिक प्रशासनाकडे जेव्हा आम्ही लिखित अर्ज नेऊन देतो त्यानंतर फक्त पावसाळ्यापूर्वीन हा नाला साफ करण्यात येतो. त्यानंतर वर्षभर हा नाला साफ करण्या
परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे युवा सेना पदाधिकारी मेळावा पार पडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभेटीसाठी शिवतीर्थावर !
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रीपद मिळालं.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर संदिपान भुमरे यांनी सामना कार्यालयात येऊन माझ्यापुढे लोटांगण घातले आणि साहेब तुम्ही होतात म्हणून शिवसेना सत्तेत आली आणि मी मंत्री झालो, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले आहे.
शिवसेना माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सोपवलेला आहे. अडचणींच्या काळात पक्ष नेतृत्व आपल्या पाठीशी उभे राहिले नाही वा आपली विचारपूस देखील केली गेली नाही अशी खंत अडसुळांनी पत्रातून व्यक्त केली.
एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडाने शिवसेनेसह महारष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. पूर्वी शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कृत्याची जबर किंमत मोजावी लागत असे. शिंदेनी मोठ्याप्रमाणावर बंड करून देखील काही अपवाद वगळल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे दिसले नाही. परंतु राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर गुवाहाटीमध्ये दाखल होताच, क्षीरसागर यांचा निषेध नोंदवत कल्हापूरचे शिवसैनिक रस्त्यवर उतरले.
शिवसेना नेते व राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याने शिवसेनेत खळबळ माजली आहे. या घटनेसंबंधी शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राऊत यांना चांगलाच टोला लगावला आहे. राऊतांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये "राऊत यांची 'सुरत' बघण्यासारखी झाली आहे". असा टोमणा मारून पाटील यांनी राऊतांवर टीका केली.
चाळीस वर्षापासून पायात घुंगरू व ढोलकीच्या तालावर ताल धरणाऱ्या तमाशा महिला कलावंत छबुबाई चव्हाण गेल्या वर्षभरापासून सफाईच्या कामातून उदरनिर्वाह करत आहेत. गेली कित्येक वर्ष ३५ लोकांसह तमाशाचा फड चालवून, अनेकांचे घर चालवणाऱ्या छबूताईंवर चारचाकी वाहनाच्या शोरूम मध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामावर जाण्याची वेळ आली आहे.
राष्ट्रवादीतून आयात केलेले सचिन अहिर यांना मिळणार शिवसेनेतर्फे विधान परिषदेत जाण्याची संधी. सचिन अहिर यांना मुख्यमंत्र्यानी भेटीसाठी वर्ष बंगल्यावर बोलवले आहे.
"आमचं हिंदुत्व शेंड्या जानव्याचं नाही". अश्या पद्धतीची विधान करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून शिवसैनिकांकडून होमहवन करण्यात येत आहे. संभाजी नगरच्या दौलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात ११ पुरोहित शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वतीने होम-हवन करत आहेत.
मंगळवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद आयोजिक केली होती. यावेळी अनिल देशमुख यांच्याजागी तुरुंगात जाणाऱ्या भाजपच्या साडेतीन नावांचा उल्लेख ते करणार होते. मात्र पन्नास मिनिटांच्या पत्रकार परिषदेत यासंबंधी त्यांनी काहीच चर्चा केली नसल्याचे दिसून आले.
एकनाथ पाटील यांच्याशी या प्रकरणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सून ज्या व्हिडीओ बाबत सांगत आहे. तो व्हिडीओ तीन वर्षापूर्वीचा आहे. आता आमच्यात कोणताही वाद नाही. भाजपचे पदाधिकारी हे आमच्या घरगुती वादाचा फायदा घेत आहेत. हा माझ्या बदनामीचा डाव आहे, असे ते म्हणाले.
अमरावतीतील नगरसेवकांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू
राज्यात कोरोना वाढत असल्याने सरकार लॉक डाउनचा विचार करत आहे तर दुसरीकडे अधिवेशन देखील कमी वेळात उरकून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे.यावर कोरोना आणि अधिवेशन याबाबत भाजप नेते गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारला कुठल्याच विषयाचं गांभीर्य नाही.
राज्यपालांचा विमानप्रवास नाकारल्यामुळे पुन्हा वाद पेटला आहे. कारण राज्यसरकारने राज्यपालांना सरकारी विमान नाकारले. त्यामुळे विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरावे लागले .राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेपासून राज्यपाल आणि सरकारमध्ये वाद सुरू आहेत. तसेच राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या निवडीलाही राज्यपालांकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. सरकारमध्ये यावरून धुसफूस सुरू असतानाच आता विमानप्रवास नाकारल्याचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.पण राज्यपालांसोबत हे सरकार सूडबुद्धीने करतंय सरकार हे
दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यात अनेक वादविवाद पहायला मिळत आहेत. यावरून परदेशी व्यक्तीनी याबाबत विधानं केली आहेत. यावरून परदेशी सेलिब्रिटी आणि भारतीय क्रिकेटपटू व कलाकारांमध्ये वादविवाद पाहायला मिळत आहे. परदेशी व्यक्तींच्या वक्तव्याचे काँग्रेस व शिवसेना समर्थन करत आहे.यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत, काँग्रेससोबत शिवसेनेच्या बुद्धीचा "चक्काजाम" झालाय ? असा प्रश्न उपस्थित करत टोला लगावला आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे बहुतांश शाळा बंद असताना सुद्धा खाजगी शिक्षण संस्थांकडून सर्व प्रकारच्या फी आकारण्यात येत आहेत. अशा शिक्षण संस्थांना ताकीद देण्याचे सोडून राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड हे पालक संघटनांवरच खोटे आरोप करून त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न करीत आहेत, शिक्षणमंत्री हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे सोडून केवळ शिक्षण सम्राटांच्या फायद्यासाठीच काम करीत आहेत असा आरोप भाजपा नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभरातून शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवाजीपार्क येथे जमले आहेत. कोरोनाचे सावट असल्याने नियमांचे पालन करून अभिवादन केले जात आहे. तसेच सामाजमाध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व देशातील अनेक नेत्यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन करत आदरांजली वाहिली आहे.
ईडीकडून राऊतांची चौकशी