मनसे अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करतात. यावर्षीदेखील रविवार, ३० मार्च रोजी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी मैदान सज्ज आहे.
Read More
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क मैदानावर भव्य अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार असून अनेक दिग्गज मंडळी कविता वाचन करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली.
दादर येथील शिवाजी पार्कमधील धुळीच्या प्रश्नाबाबत तात्काळ उपाययोजना करा, असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेला दिले.
शिवाजी पार्कमधील धुळीच्या समस्येवर १५ दिवसांत आराखडा तयार करा, अशा सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिकेला दिल्या आहेत. सोमवार, ६ जानेवारी रोजी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पाहणी दौरा केला.
प्रतिनिधी दादरच्या शिवाजी पार्क येथे आज होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मंगळवार दि.१२ रोजी वाहतूक निर्बंध आणि वळवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह १४ नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर आयोजित महायुतीच्या जाहीर सभेत मोठ्या संख्येने समर्थक जमू शकतात.
Uddhav Thackeray भाजपची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला स्वाभिमान अभिमान गहाण ठेवला आहे. मतांच्या हव्यासोपोटी आता त्यांनी दिवाळी सणाला विरोध दर्शवला आहे. मुंबई महापालिकेच्या दादर शिवाजी पार्क येथे काही मनसे कार्यकर्त्यांनी आणि हिंदू बांधवांनी दिवाळी साजरी केली. मात्र आता याला उद्धव ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे. छत्रपती शिवाजीपार्क हे मुंबई महापालिकेच्या आखत्यारित्या असल्याचे सांगत आता उबाठा गटाने हिंदू सणाला विरोध दर्शवला आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकाराने दादर शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी सिंघम अगेन चित्रपटाची टीम उपस्थित होती. दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अजय देवगण आणि अगेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, आता अखेर अर्जुननेच ब्रेकअपवर शिक्कामोर्तब केलं आहे.
एकही जागा न लढवणाऱ्या पक्षाला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी मिळते. मात्र ४८ जागा लढवणाऱ्या पक्षाला परवानगी नाकारण्यात येते, असे उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत. मनसेला १७ तारखेला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावर दानवेंनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
मुंबई वाहतूक पोलिसांची अधिसूचना जारी
काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवार, दि. १६ मार्च रोजी मुंबईत दाखल झाली. रविवारी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर त्यांची सभा होणार आहे.
लवकरच शिवाजी पार्कवर काँग्रेस नेते राहूल गांधींच्या भव्य सभेला सुरुवात होणार असून या सभेला इंडी आघाडीतील अनेक नेते उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतेही या सभेकरिता शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. लवकरच सभेला सुरुवात होणार असून राहूल गांधी शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवाजी पार्क तुम्ही निवडले त्याबद्दल धन्यवाद देतो. भाजपा हा फुगा आहे. त्यामध्ये हवा भरण्याचे काम आम्हीच केले. पण त्यांच्याच डोक्यात हवा गेली आहे.- चारशे पार म्हणजे ही काही फर्निचरची लढाई आहे का, देशभरातील राज्यातून महत्त्वाचे नेते या ठिकाणी आले.
इकडे येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यास महराष्ट्रातील जनता राहूल गांधींना इथे फिरु देणार नाही, अशा इशारा मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिला आहे. राहूल गांधींच्या भारत जोडो न्याययात्रेचा समारोप महाराष्ट्रात होणार आहे. तसेच येत्या १७ तारखेला शिवाजी पार्कवर राहूल गांधींची मोठी सभा होणार आहे. दरम्यान, त्याआधी मनसेकडून राहूल गांधींना इशारा देण्यात आला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या दि. २६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू होणार आहे. दरम्यान, आपला मोर्चा आता मुंबईच्या दिशेने वळवायला सुरूवात केली आहे. राज्य सरकारला मराठा आरक्षणाप्रश्नी ठोस भूमिका घेण्यासाठी मराठा आंदोलक मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क व आझाद मैदानाची मागणी करण्यात येत आहे.
महापालिका जी/उत्तर विभागात न केलेल्या कामाचे पैसे दिल्यामुळे माहिती अधिकाराच्या उत्तरात खोटे पुरावे तयार करुन सादर केल्याबद्दल अमोल गावित, सहाय्यक अभियंता अमोल गावित यांचेवर भादंसं १७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी दादर येथील रहिवासी प्रकाश बेलवाडे यांनी परवानगी मागितली आहे
ज्या लोकांनी धर्मांतर केले आहे, त्यासोबतच ज्यांनी आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती सोडली आहे. त्यांना अनुसूचित जनजातीच्या आरक्षणाचा लाभ घेण्याचा कोणताच अधिकार नाही, असे प्रतिपादन लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा यांनी केले. रविवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी जनजाती सुरक्षा मंच कोकण प्रांत तर्फे मुंबईत ’ज्वाला डी लिस्टिंग महारॅली’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला, गुरुवारी रात्री शिवतीर्थावर शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पहायला मिळाले.
दसरा मेळावानिमित्त उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरेंनी शिवाजी पार्क येथे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित केले. यावेळी शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांनी पुन्हा एकदा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींवर टीका केली आणि घराणेशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीची वकीली केली, असा घणाघात महाराष्ट्र भाजपने उबाठा गटावर केला.
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाने शीवतीर्थावर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला सुरूवात झाली आहे. मुंबईचा डान्सबार करु नका. बुडाखाली अंधार दिसतोय. क्षमा कोणालाच करायची नाही. निवडणूक लागू द्या, मग त्यांना दाखवून देऊ. असं पेडणेकर म्हणाल्या आहेत. शीवतीर्थावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी ही दिसुन येत आहे.
अंबादास दानवे यांच्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाषण केले. मी महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडत आहे. हा महाराष्ट्र ड्रग्जमुक्त, नशामुक्त झाला पाहिजे. आज सद्गुणांनी दुर्गुणांवर मात करण्याचा दिवस आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने भूमिका मांडतोय. मला नाही अब्रू मी कशाला घाबरु अशी अनेकांची अवस्था आहे. असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यात येतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि दोन्ही गटाचे वेगवेगळे मेळावे होऊ लागले. यंदा शिवाजी पार्कवर उबाठा गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. यापूर्वी उबाठा गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात भाजपकडुन जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मुंबईच्या शिवाजीपार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या नक्की कोणत्या गटाचा दसरा मेळावा होणार याबाबत चर्चा सुरु होती. अखेर या प्रश्नाचा निकाला लागला असून ठाकरे गटाला मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना क्रॉस मैदान देण्यात आलं आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार? याची उत्सुकता संपूर्ण राज्याला होती. शिवाजी पार्कसाठी शिवसेना आणि ठाकरे गट आग्रही होता. मात्र, हा वाद आता निवळला आहे.
गेल्या वर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने आले होते. या पार्श्वभूमीवर यावर्षी एक महिन्याच्या आधीच दोन्ही गटांकडून शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे.
मुंबई : मागील काही दिवसांपासून अनेक खेळाडूंचे माहेर घर असणाऱ्या शिवाजी पार्कवर धुळीचे साम्राज्य असल्याचा प्रत्यय येत होता. मात्र धुळीचे हे साम्राज्य काही केल्या कमी होत नसल्याने येथील स्थानिक हैराण झाले आहेत. शिवाजी पार्कवर उडणाऱ्या धुळीसंदर्भात येथील स्थानिकांनी मुंबई महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र अध्याप मुंबई महापालिका ठोस पावले उचलत नसल्याचे मत येथील स्थानिकांनी मांडले आहे.
मुंबई : विक्रांत आचरेकर फाऊंडेशन च्या वतीने मुंबईच्या दादर भागात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क जवळच्या बीएमसी क्रीडा भवन येथील ‘आंबा महोत्सव’ कार्यक्रमाला भेट दिली आणि मार्गदर्शन केले. १२, १३ आणि १४ मे दरम्यान छत्रपती शिवाजी पार्क जवळच्या बीएमसी क्रीडा भवन येथे दुपारी ४ ते रात्री १० या वेळात हा आंबा महोत्सव भरविण्यात आला होता.
मुंबई : आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने १३ ऑगस्ट २०२३ ते १३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची रुपरेषा निश्चित करण्यासाठी साने गुरुजी विद्यालय, शिवाजी पार्क येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.
दि. 21 डिसेंबर, 1909 हा दिवस भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात महत्त्वाचा ठरला आहे. कारण, नाशिकचा जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सन याचा अनंत कान्हेरे या तेजस्वी तरुणाने वध केला, तो हा दिवस. पुढच्या काळात खटला उभा राहिला. अनंत कान्हेरे आणि त्याचे दोन कोवळे सहकारी कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा तिघांना इंग्रजांनी ठाण्याच्या तुरुंगात फासावर चढविले. तो दिवस होता दि. 19 एप्रिल, 1910.
मुंबई : मुंबईतील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरत आहेत. या धुळीच्या प्रदूषणामुळे येथील नागरिक हैराण झाले असून ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना दमा आणि इतर श्वसनाचे आजार जडत असल्याचे येथील स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच येथील रहिवाशांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेकडे धाव घेतली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी एक आरोपी अशोक खरात हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली असून यासंदर्भात आज संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत काल हल्लेखोरांनी माझ्या हातापायावर मारण्याऐवजी थोबाडावर मारायला पाहिजे होते. कारण मी घोटाळ्यांवर बोलत राहणार आणि घोटाळे बाहेर काढणार, असे स्पष्ट केले आहे.
“प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला मुंबईवर हवाई हल्ला होऊ शकतो,” असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. दहशवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सतर्कता बाळगण्यात येत आहे. शहरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनाचा शासकीय समारंभ होत असतो. त्यामुळे संभाव्य हल्ला लक्षात घेता मुंबई पोलिसांकडून दादरच्या शिवाजी पार्कला ‘नो फ्लाय झोन’ घोषित करण्यात आले आहे.
यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट की शिंदे गट?
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने महापालिकेकडे अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज केला.
गणेश विसर्जन दरम्यान शिवसेनेच्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार राडा झाला. यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. गुन्हे दाखल होताच शिवसेना आक्रमक झाली
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचारांवर चालतात. दसरा मेळावा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे दसरा मेळावा शिंदे गटाचा होईल असे सांगून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी, उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा घेतला तर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्टेजवर बोलवावे, म्हणजे लोकांना कळेल कोण बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेले आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात वरळीच्या जांबोरी मैदानावर घेण्यात आलेल्या दहीहंडीचा कार्यक्रम म्हणजे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीचे फुंकलेले रणशिंग आहे, असे मानले जात आहे. भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमामुळे जांबोरी मैदानाची दुरवस्था झाल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला.
महाराष्ट्राचे माजी पर्यावरण, पर्यटनमंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबई महापालिका क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या अनेक वादग्रस्त प्रकल्पांच्या मागे स्थगितीचे शुक्लकाष्ठ लागले आहे.
दरच्या सुप्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर करण्यात आलेल्या विविध कामांवरून रंगलेल्या वादाला आता नवीन वळण लागले आहे. शिवाजी पार्कवर पावसाळापूर्व कामे करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कोट्यवधींचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. मात्र,
"स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी करण्यात आली. त्याला आता ३० एप्रिल रोजी १२ वर्षे पूर्ण होतील परंतु या कलादालनाकडे आपण हेतूपूरस्परपणे दुर्लक्ष करत आहात.१ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कलादानवर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे," अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळामुळे आपली अडचण होत असल्याची तक्रारवजा विनंती करणारे पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे धाडण्यात आल्याचे वृत्त बुधवारी सर्वत्र प्रसारमाध्यमांमध्ये झळकले. परंतु, हा माध्यमांचा खोडसाळपणा असून वास्तविकता काही वेगळीच आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परळ विभाग धर्मजागरण संयोजक नितीन म्हात्रे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला सांगितले.
"राज्य सरकारला मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरववेच लागतील. प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र ज्या मशिदींच्या बाहेर अनधिकृत भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाईल.", असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा मशिदींबाहेरच्या अनधिकृत भोंग्यांविषयी वाचा फोडली आहे. गुढीपाडवा निमित्त शनिवारी (दि. २ एप्रिल) मनसेकडून शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवाजी पार्कमधील रस्त्यात पर्यावरणास हानिकारक घटक वापरण्याच्या विरोधात मनसेने बुधवारी आंदोलन करून सुद्धा पालिकेने रस्त्याचे काम पूर्ण केले आहे
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यविधी आणि स्मारकावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. लतादीदींच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांमध्ये विविध राजकीय मंडळींमुळे स्मारकाराच्या विषयावर चर्चांना तोंड फुटले आहे. दरम्यान, दादर शिवाजी पार्क परिसरातील स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी शिवाजी पार्कवरील स्मारकांच्या विरोधात याचिका दाखल केली असून, आम्ही रहिवासी कुठल्याही परिस्थितीत शिवाजी पार्क मैदानाची स्मशानभूमी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मंगळवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी प्
शिवाजी पार्क मध्ये बांधल्या जाणाऱ्या रस्त्यासाठी सल्लागाराची सल्ला धुडकावून खडी आणि मातीचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे
शहरातील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच करण्यात यावा, याठिकाणी थोर व्यक्तिंची स्मारके उभारणे आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी या मैदानाचा वापर करण्यात येवू नये, या मागणीला स्थानिक रहिवाश्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी रविवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिली.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यानिमित्त दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आला. शिवाजी पार्क मैदानात लतादीदींचे स्मारक उभारावे यासंदर्भात भाजप आमदार राम कदमयांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले होते. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्राकडे बोट दाखवत या विषयाचे राजकारण करण्यास सुरुवात केली आहे.
'तेजोमय स्वर' अनंतात विलीन
मात्र पुढील सभा शिवाजी पार्कवरच होणार : भाई जगताप
महाराष्ट्रात येऊन हिंदूंविरोधी गरळ ओकणार्या शरजील उस्मानी याच्या अटकेची मागणी करणार्या भाजप कार्यकर्त्यांनाच पोलिसांकडून अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला वंदन करत असतानाच शिवाजी पार्क येथे ही अटक करण्यात आली.
तब्बल ७३ वर्षांनी दादरमधील सुप्रसिद्ध मैदानाचे बदलले नाव