school

‘आपले विद्यालय आपला स्वाभिमान' संकल्प अभियान ; अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचा अनोखा उपक्रम

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने दि. १ सप्टेंबर रोजी ‘आपले विद्यालय आपला स्वाभिमान' हे संकल्प अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. देशातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे सर्वात मोठे राष्ट्रीय विचारांचे संघटन म्हणून देशभरात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची एक स्वतंत्र तयार झाली असून संघटनेच्या वतीने या अभियानात देशातील ५ लाखांहून अधिक शाळांचा सहभाग होत आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सर्व माध्यमांच्या शाळांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन क

Read More

कीर्ती महाविद्यालयात रंगला भारतीय ज्ञानविश्वाचा जागर!

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती एम. डुंगूरसी महाविद्यालयात दि. १४ ऑगस्ट रोजी भारतीय ज्ञान प्रणाली दिन अर्थात आय. के. एस. डे अत्यंत उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आय. आय टी मुंबईचे अभियंता चैतन्य पडाळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मागच्या वर्षी पासून कीर्ती महाविद्यालयात भारतीय ज्ञान प्रणाली दिन साजरा केला जात आहे, या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा, संशोधकांचा उदंड प्रतिसाद लाभतो

Read More

शाळांमध्ये श्रीगणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळांतून विदयार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता

लहान वयापासूनच मुलांच्या मनात पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करण्यावर आयुक्त‍ डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका भर देत असून शालेय स्तरावर शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळा शाळांमध्ये घेण्यात येत आहेत. अशाच प्रकारच्या कार्यशाळा आज कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ २ उपायुक्त संजय शिंदे व घनकचरा व्यवस्थापन परिमंडळ २ उपायुक्त स्मिता काळे यांच्या माध्यमातून राबविण्यात आल्या.

Read More

शाळा अंतर्गत फेरीमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना आपली मते प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी आणि वक्तृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल कामोठे येथे शाळा अंतर्गत फेरी उत्साहात पार पडली होती. या फेरीतून प्रत्येक इयत्तेतून ६ विद्यार्थी पुढील अंतरशालेय फेरीसाठी पात्र झाले आहेत. एकूण ६० विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, उच्चार, देहबोली व सादरीकरणाच्या कौ

Read More

पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याचा रेड अलर्ट , शाळा महाविद्यालयाना सुट्टी जाहीर

हवामान खात्याने जिल्ह्यात अतिवृष्टी चा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाना शनिवार दिनांक २६जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत तशा प्रकारचे परिपत्रक शुक्रवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ रोजी ऑरेंज आणि दिनांक २६ जुलै रोजी पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा, रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे.

Read More

कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

आषाढी एकादशीचे पावन औचित्य साधून सणाच्या पूर्वसंध्येला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व एस.पी. जुनिअर कॉलेज, जुचंद्र या विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली", "ज्ञानोबा- तुकाराम" अशा गजरात शिस्तबद्ध रितीने दिंडी काढली. सं

Read More

शालेय मुलांमधील अंमली पदार्थांचे प्रमाण चिंताजनक: केरळ उच्च न्यायालय

एर्नाकुलम शहरात शालेय मुलांमध्ये अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या सर्वाधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत, असे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने गुरुवार, दि. ४ जुलै रोजी एका याचिकेला उत्तर देताना नमूद केले आहे. ही बाब गंभीर आहे, असे म्हणत न्यायालयाने राज्य सरकारकडे या समस्येचे निराकरण करण्यासाठी कृती आराखडा मागितला आहे. या प्रकरणात याचिकाकर्ते केरळ राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरण (KELSA) आणि आपल्या मुलाच्या व्यसनाधिनतेमुळे चिंतेत असलेल्या आईने अल्पवयीन मुलांमध्ये अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली

Read More

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121