छत्रपती संभाजीनगर येथे एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना 'व्हॅलेंटाईन डे' च्या दिवशीच उघडकीस आली. ही घटना लव्ह जिहादचे एक उदाहरण असलं तरी पुन्हा एकदा सावधानतेचे आवाहन आहे. #LoveJihad #ChhatrapatiSambhajiNagar #Jalna #IrfanShaikh #MonikaNirmal #News #MahaMTB
Read More
इ.व्ही.रामास्वामीं सारख्या हिंदूद्वेशी व्यक्तीचा पुतळा उभारून उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगरमध्ये होत होता. विवेक विचार मंचने कायदेशीर दणका देत तो हाणून पाडला. अशा इतकं उदात्तीकरण आताच का होऊ लागलंय? नेमकं प्रकरण काय पाहा संपूर्ण व्हिडिओ...
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव या तालुक्याच्या गावाजवळ एक नितांत सुंदर आणि खणखणीत बांधणीचा गिरिदुर्ग उभा आहे. या किल्ल्याचं नाव वेताळवाडी! बघताचक्षणी डोळे दिपून जावेत अशी आजच्या स्थितीतही भक्कम असणारी रेखीव तटबंदी, किल्ल्याचे बुलंद दरवाजे आणि त्यावरची शरभशिल्प, गडावरील प्रचंड आकाराचा बांधीव तलाव आणि दुर्गस्थापत्यातील अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला हा किल्ला म्हणजे जिल्ह्याचे एक अपरिचित दुर्गरत्न.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये सहा कामगारांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रविवार, ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री ही घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मृत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी नगरमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहू शकतील, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
chhatrapati sambhaji nagar riots केलेल्या दंगल प्रकरणी राज्य सरकार कठोर कारवाई करणार आहे. रामनवमीनिमित्त कट्टरपंथींनी धुडगूस घालत एकूण तीन कोटींचे नुकसान केल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी एकूण ५०० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजकंटकांनी पोलीसांच्या एकूण १५ गाड्या जाळल्या होत्या. या दगडफेकीत एकूण २०हून अधिक पोलीस जखमीही झाले होती.
धर्मवीर Sambhaji Maharaj यांची आज (मंगळवार) पुण्यतिथी. विक्रम संवत्सराचा शेवटचा दिवस आणि एका युगपुरुषाचा अंत फाल्गुन अमावास्येला झाला. या दिवसाची इतिहासात विशेष नोंद झाली आहे. त्यानिमित्त ख्यातनाम लेखक व अनेक पुरस्कारप्राप्त कादंबरीकार विश्वास पाटील यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या प्रतिनिधी मृगा वर्तक यांनी साधलेला संवाद...
"कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसून सरकार स्थापन करता येत नाही. छोटे छोटे गट पाडून सत्ता मिळवता येत नाही. आज सत्य जनतेसमोर आहे. कुणालाही महाराष्ट्रात गद्दारी केलेली आवडत नाही. चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला जात आहे. सरकार प्रेमावर आणि जनमतावर तयार होतं. त्यामुळे सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.", असा टोला माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हाणला राऊतांना टोला संजय राऊतांच्या टीकेला उत्तर द्यायला मला वेळ नाही. त्यांना सकाळी उठून तेच काम असतं. मला सकाळी उठून दुसरीही काम आहेत. पूरपरिस्थितीचा आढावा, जनहिताचा निर्णय सर्वच महत्वाची कामे मला आहेत, असे म्हणत संजय राऊत यांना शिंदेंनी टोला लगावला आहे. मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात राऊतांनी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारत असताना त्यांनी हे उत्तर दिले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे.
संभाजी नगरच्या नामांतराचा वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एमआयएम पक्षाने औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यास कडाडून विरोध दर्शवलेला आहे. या नामांतराविरोधात संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरून एममायएम आंदोलन करणार आल्याचा इशारा, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर संदिपान भुमरे यांनी सामना कार्यालयात येऊन माझ्यापुढे लोटांगण घातले आणि साहेब तुम्ही होतात म्हणून शिवसेना सत्तेत आली आणि मी मंत्री झालो, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितले आहे.
"आमचं हिंदुत्व शेंड्या जानव्याचं नाही". अश्या पद्धतीची विधान करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून शिवसैनिकांकडून होमहवन करण्यात येत आहे. संभाजी नगरच्या दौलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात ११ पुरोहित शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वतीने होम-हवन करत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाजी नगरच्या सभेला अखेर पोलीसांनी परवानगी दिली आहे.