'दै. मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंकासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्याशी सुसंवाद साधताना त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. गांधी या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेमुळे त्यांना एक नवी ओळख मिळाली. पण या भूमिकेसाठी मुंबईहून रोहिणी हट्टंगडी तर स्क्रिन टेस्टसाठी गेल्या होत्याच पण त्यांच्याशिवाय अभिनेत्री स्मिता पाटील आणि भक्ती बर्वे देखील त्याच भूमिकेसाठी इंग्लंडला पोहोचल्या होत्या. तो किस्सा काय होता हे रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितला.
Read More
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मानाचे समजले जाणारे राज्य शासनाचे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार हे राज्यातील १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून राज्य शासनामार्फत दिले जातात. हे पुरस्कार अनमोल असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मराठी रंगभूमीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. काही नवी नाटकं तर काही जुनी नाटकं पुर्नजिवित्त करुन त्याचे सादर केले जाणारे प्रयोग प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. अशा अनेक अजरामर नाटकांपैकी एक नाटक म्हणजे १९९० ते २००० पर्यंत दबदबा राखणारं नाटक चारचौघी. आणि ३१ वर्षांनंतर नव्या कलाकारांसह दमदार कमबॅक करणारं 'चारचौघी' हे नाटक आता पुन्हा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून २०२४ रोजी पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार करण्यात आला. तसेच, या सोहळ्याच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण नाटय संकुलाच्या नूतनीकरणानंतर यशवंत नाट्य मंदिर रसिकार्पण सोहळा देखील संपन्न झाला.
प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो. ह्या वर्षी मा.श्री. अशोक सराफ आणि मा.श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार व इतर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सदर ‘पुरस्कार वितरण समारंभ’ शुक्रवार, दिनांक १४ जून २०२४ रोजी यशवंत नाटय मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून यशवंतराव
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या वतीने दरवर्षी १४ जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे निश्चित झाले.
इच्छामरण या विषयावर आत्तापर्यंत कधी मनमोकळेपणाने बोलले गेले नाही. किंवा कोणत्या माध्यमातून तो विषय मांडला गेला नाही. मात्र, ‘आता वेळ झाली’ या चित्रपटातून दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने दिलीप प्रभावळकर यांच्याशी ‘महाएमटीबी’ने गप्पा मारल्या.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत. यातील अनेक चित्रपट हे प्रदर्शनापुर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवत आहेत. याच यादीतील एका चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर इच्छा मरण या विषयावर भाष्य करणाऱ्या आता वेळ झाली या चित्रपटात एकत्रित दिसणार आहेत. अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले. दरम्यान, या चित्रपटाची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे.
‘गांधी’ या चित्रपटात कस्तुरबा गांधींची भूमिका साकारत त्यांनी सगळ्यांची वाहवा मिळवली. हिंदी-मराठी-गुजरातीसह इतर भाषिक नाटकं आणि चित्रपट गाजवणार्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्याविषयी...
नटसम्राट हे नाटक झी मराठी आता रंगभूमीवर परत घेऊन येत आहे.