शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीमुळे नुकत्याच चौदा वर्षाच्या बालकाच्या सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी आज दुपारी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
Read More
एकीकडे राज्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असतानाच आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर पक्षातील युवा नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ते शरद पवारांकडे तक्रार करणार असल्याचीही माहिती आहे.
देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी 'MY भारत' पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवार, १४ मे रोजी केले.
(Sanjay Patil appointed as Chief Engineer of Mahavitaran Bhandup) महावितरणच्या वांद्रे येथील मुख्य कार्यालयात नवीकरणीय उर्जा विभागात मुख्य अभियंतापदी कार्यरत असलेले श्री.संजय पाटील यांची बदली भांडूप नागरी परिमंडलाचे मुख्य अभियंता पदी करण्यात आली आहे. आज मंगळवार दि. १३ मे २०२५ रोजी श्री. पाटील यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
राज्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतेसोबतच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे तसेच गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वच्छतेला अधिक गतीमान करण्यासाठी शासनाने लोकसहभागावर भर दिला आहे. सार्वजनिक व घरगुतीस्तरावरील घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने करून व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. त्याचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत "कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू" या मोहिमेची ग्रामीण भागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सदर
विरार, दि. 24 : प्रतिनिधी खा. डॉ. हेमंत सवरा व आ. राजन नाईक यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. 23 एप्रिल रोजी वसई-विरार महापालिकेत विकासकामे आणि महत्त्वाच्या विषयांवर आढावा घेण्यासाठी बैठक झाली. बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय झाले असून प्रलंबित विकासकामांना यामुळे गती मिळणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वसईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचा झेंडा जाळून जाहीर निषेध नोंदवला.
पुणे हवेली येथील भूमि अभिलेख उप अधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अंतर्गत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अमरसिंह पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे.
जगाला नवा मार्ग दाखविण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यासाठी वसाहतवादी वैचारिक वारसा सोडून भारतीय विचारांना बळकट करण्याची गरज आहे. त्यामध्ये ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’ची भूमिका महत्त्वाची ठरते,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मंगळवार, दि. 22 एप्रिल रोजी केले. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (अभाविप) प्रायोजित आंतरराज्य छात्र जीवनदर्शनच्या (एसइआयएल) नव्या वास्तूचे ‘यशवंत’चे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाले
( dombivali west manadal president Pawan Patil ) डोंबिवली पश्चिममधील भाजप कार्यकर्ते पवन पाटील यांची डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Mohan Narsu Patil महाविद्यालयीन जीवनापासून सायकलस्वारीची आवड जोपासताना आता वयाच्या 57व्या वर्षीदेखील तोच उत्साह राखणार्या, मोहन नरसू पाटील यांच्या ‘लाईफ ऑन व्हील’विषयी जाणून घेऊया.
धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका आल्याचे विधान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले होते. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी स्वत: 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांच्या आजाराबद्दल माहिती दिली.
Pandit Patil BJP आपल्याच पोळीवर तूप ओढण्याची शेकाप नेते जयंत पाटील यांची तशी जुनीच सवय. राज्यातून शेतकरी कामगार पक्ष हद्दपार झाला, तो या सवयीमुळेच! आता घरापर्यंत झळ पोहोचल्याने जयंतरावांचे डोळे उघडले. त्यांचे सख्खे बंधू पंडितशेठ पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. भगिनी (माजी आमदार) दिवंगत मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव आस्वाद पाटील यांनीही मामांची साथ सोडली. आस्वाद हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच रायगड जिल्हा बँकेचे संचालक होते. पण, इतकी वर्षे जयंत पाटलांच्या खांद्याला खांदा लावून इमानेइतबारे काम
( Panditsheth Patil joins BJP ) रायगडमध्ये शेकाप नेते जयंत पाटील यांच्या घरात उभी फूट पडली आहे. त्यांचे बंधू तथा माजी आमदार पंडितशेठ (सुभाष) पाटील यांनी बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला.
केवळ तुम्ही सत्तेत नाही. तुम्हाला यायचे आहे पण कुणी घेत नाही, म्हणून अमितभाईंचा किती दुस्वास करणार? असा खोचक सवाल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना केला आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव तर मी FB म्हणजे फेवरेट ब्रदर आहे, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सांगोला येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण व लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने उच्च शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग, पश्चिम विभाग, मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी हा सामंजस्य करार करण्यात आला.
जयंत पाटील पक्षात अस्वस्थ आहेत. लवकरच काहीतरी धक्का देणारी घटना आपल्यासमोर येईल, असा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शनिवार, २२ मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचे बोलले जात होते. यावर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. परंतू, यावरुन संजय राऊतांना पोटशूळ उठल्याचे दिसले. त्यामुळेच त्यांचे उत्तम चालले असते, असे वक्तव्य राऊतांनी केले.
(Bhaskarrao Khatgaonkar Patil) माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर (Meenal Khatgaonkar)काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या दोघांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला असून येत्या २३ मार्च रोजी नरसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे आहेत.
( Kapil patil on the Rashtriya Swayamsevak Sangh childrens wing attack ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यवीर नगर कल्याण पूर्व येथील कचोरे गावच्या बालशाखेवर रविवार, दि. १६ मार्च रोजी धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली होती. या घटनेचा डोंबिवली पाठोपाठ आता कल्याणमधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात दगडफेक करणार्या धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या प्रकरणामागे नेमकी कोणती शक्ती काम करते आहे? याचा पोलिसांनी तपास करावा, असे आवाहन भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले
( Kapil Patil birthday ) माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने भिवंडी तालुक्यातील इताडे येथे भव्य बैलगाडा बिनजोड शर्यत पार पडली. या शर्यतीत २५० हून अधिक बैलगाडे सहभागी झाले होते. हजारो ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
उबाठा गटाचे युवराज आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्यात बुधवार, दि. 5 मार्च रोजी विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. “गुलाबरावांना मंत्री म्हणून अभ्यास करून यायला सांगा,” अशी मागणी आदित्य यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.
प्रत्येकाच्या जीवनात काही प्रसंग येत असतात. मात्र, आता कपिल पाटील हे सतर्क आहेत. त्यांना समाजजीवनात मानाचे स्थान असून, राज्याच्या कानाकोपर्यात ओळखणारा वर्ग आहे. माझ्यासह महायुतीचे सरकार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना कायम ताकद देईल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
काँग्रेसकडून विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अनेक तरुण नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता येण्यासाठी यापुढे राज्यात अध्यापक भरती प्रक्रियेसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी दिली.
शरद पवार हे मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी नांदेड-हिंगोली दौरा करणार होते. परंतू, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी सर्व दौरे रद्द केले असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलाबाई यांचे निधन झाल्याची बातमी पुढे आली आहे. रविवार, १६ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
‘तीर्थाटनातून पर्यटना’च्या पारंपरिक सिद्धांताला छेद देत पर्यटनाची नवीन क्षितिजं पर्यटकांसाठी खुली करणारं नाव म्हणजे ‘केसरी टुर्स’. आपल्या पर्यटककेंद्रीत दर्जेदार सेवेने ‘केसरी’ने ‘आपलं माणूस’ ही ओळख सार्थ ठरवली. देशांतर्गत पर्यटनाबरोबर विदेशातही ‘केसरी’ने ‘एक अविस्मरणीय अनुभव’ची शिदोरी सदैव जपली. अशा या पर्यटनपंढरी ‘केसरी टुर्स’चे जन्मदाते, सर्वेसर्वा केसरी पाटील यांचे शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. इतरांना प्रवासाची गोडी लावणाऱ्या केसरींचा जीवनप्रवासही थक्क करायला लावणारा
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक पदावर अनिता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे (anita patil director). राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक पदावर पहिल्यांदाच भारतीय वन सेवेतील महिला अधिकाऱ्याची पूर्णवेळाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे (anita patil director). पाटील या २०१० च्या तुकडीच्या अधिकारी असून त्या भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रामध्ये नेमणूक झालेल्या पहिला महिला अधिकारी आहेत. (anita patil director)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांनी केलेला सत्कार सध्या चर्चेत असतानाच आता या सत्कार सोहळ्याला उद्धव ठाकरेंचा खासदार उपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे. उबाठा गटाच्या संजय दिना पाटील यांनी या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.
शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उबाठा गटाचे तीन खासदार उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या आणि सहा वेळा नगरसेविका राहिलेल्या माजी सभागृह नेत्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीतील महाराष्ट्र भवनात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
माथाडी कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याबाबत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे गुरुवार, ३० जानेवारी रोजी निवेदन दिले.
भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजारांहून अधिक महाविद्यालयांमध्ये संपूर्ण फेब्रुवारी महिनाभर 'संविधान गौरव महोत्सव' राबवण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवार, २७ जानेवारी रोजी दिली.
'मराठवाडा वॉटर ग्रीड' प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी केले.
आर. आर. पाटलांचा मुलगा आमदार झाला आणि माझा मुलगा होत नाही हे जयंत पाटील यांचे मोठे दुखणे आहे, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
मुंबई : प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान व्हावे, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागात ( Chandrakant Dada Patil ) ‘झिरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल’ उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विभागातील प्रलंबित फाईली निकाली निघण्याचा धडाका सुरू करण्यात आला असून गेल्या काही दिवसांत चार हजार, ४७० प्रकरणे निकाली काढण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी 'अटल' उपक्रम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
(Beed) बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. १४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ते २८ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.
कोथरुडमधील नामांकित शल्यविशारद आणि समाजसेवक डॉ. विलास जोग यांना मंगळवार, १४ जानेवारी रोजी दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्राच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासून, त्या माध्यमातून दुर्मीळ पक्ष्यांची नोंद करून रायगडच्या पक्ष्यांच्या विश्वाविषयी माहिती देणार्या वैभव पाटीलविषयी...
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाविद्यालये आणि विद्यापीठांचे मुल्यमापन करावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. बुधवार, ८ जानेवारी रोजी चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात (SNDT) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात गठीत केलेल्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
सचित पाटील, मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘असंभव’ ह्या त्यांच्या आगामी चित्रपटाताचा मुहूर्त नुकताच नैनीताल येथे पार पडला. हा चित्रपट येत्या १ मे २०२५ ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार असून नितीन प्रकाश वैद्य, सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस ह्या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच ‘असंभव’ या आगामी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आल्या आहेत.
(Zero Pendency) उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील एकही फाइल प्रलंबित राहू नये, यासाठी या विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला असून, येत्या ३१ जानेवारीपर्यंत 'झीरो पेंडन्सी' उपक्रम राबवला जाणार आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात दोन गटांमध्ये राडा झाल्याची माहिती पुढे आली आहे. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी किरकोळ कारणावरून पाळधी गावात दोन गटांत वाद निर्माण झाला आणि या वादाचे रुपांतर तोडफोड आणि जाळपोळीत झाले.
ठाणे : ठाणे-भिवंडी महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे खारेगाववासीयांना महामार्गावर ये-जा करण्यासाठीचा रस्ता बंद झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील ( Kapil Patil ) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केल्यानंतर, खारेगाववासीयांसाठी तात्पुरत्या स्वरुपात रस्ता तयार करण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे.
(Walmik Karad) खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशी वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता, अशी माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी जात प्रमाणपत्र सादर करण्यास दोन महिन्यांची अतिरिक्त मुदतवाढ देण्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दि. २६ डिसेंबर रोजी केली. मंत्रालयात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी याबाबत घोषणा केली.
आज रामकृष्ण रामनगौडा पाटील उर्फ आर. आर. पाटील वयाच्या 75व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या जाज्वल्य, चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणारा हा लेख...