ठाणे : “जितेंद्र आव्हाड ( Jitendra Avhad ) यांना वाटत असेल की, ईव्हीएम मशीन हॅक होते आहे, तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देऊन बॅलेट पेपरवर निवडणुकीला सामोरे जावे,” असे खडेबोल राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सुनावले. बॅलेट पेपरवर महाराष्ट्रातील पहिली निवडणूक मुंब्रा-कळवा विधानसभेमध्ये घेऊ. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असा टोलाही त्यांनी आव्हाड यांना लगावला.
Read More
महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी जाहीर मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. बुधवारी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
ठाणे : राज्यात झालेले सत्ता परिवर्तन मविआतील घटक पक्षांच्या अद्याप पचनी पडलेले दिसत नाही.मविआतील ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडुन शिंदे गट आणि भाजपवर तोंडसुख घेण्याचा शिरस्ता सुरुच आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याला दोन मुख्यमंत्री हवेत असे विधान केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले. त्यावर राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनीही प्रतिवार करीत प्रत्युत्तर दिल्याने शिंदे गट आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाणे पालिकेच्या अखेरच्या सर्वसाधारण सभेत महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढीत, शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती असल्याचे सांगून पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. “एकीकडे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख महाविकास आघाडी झालीच पाहिजे, असे म्हणत असताना महापौर मात्र सेना-भाजप नैसर्गिक युतीचे दाखले देत आहेत. त्यामुळे ठाण्याची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर की, महापौर नरेश म्हस्के यांच्या विचाररणीवर चालते? याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ
केंद्राच्या लशीचे श्रेय लाटणाऱ्या शिवसेनेला साह्य करणाऱ्या आयुक्तांवर राष्ट्रवादीचे शरसंधान
ठाणे काँग्रेसमध्ये दुफळी