हज हा मुस्लिम धर्मीयांच्या पाच मोठ्या धार्मिक कार्यांपैकी एक आहे. आयुष्यात एकदा तरी सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना दरम्यान धार्मिक तीर्थयात्रा करणे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे. मात्र यंदा सौदी अरेबियात हज यात्रा पूर्ण करण्याच्या नादात लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कडक उन्हामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत २२ हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. तर उष्माघातामुळे २७०० हून अधिक लोकांची अवस्था गंभीर आहे.
Read More
सप्टेंबर महिन्यात धुवाँधार बरसात केल्यानंतर परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात दडी मारली. परिणामी, उन्हाचा पारा चढला असुन हवेत आद्रता असल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढताच राहिला असुन गेले काही दिवस तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यत पोहचले आहे. सोमवारी ठाण्यात ३५.०६ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. तेव्हा, कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा (हीटस्ट्रोक) धोका वाढला आहे.
एप्रिल महिन्यात उन्हाच्या कडाक्याने कहर केला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस चढताच राहिला आहे. बुधवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाने 42 अंश सेल्सिअस ओलांडले असून, सूर्य आग ओकत असल्याने जीवाची काहिली होत होती.
एकामागोमाग एक येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे यंदा मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात २५ जणांचा उष्माघाताने मृत्यू झालाआहे , तर ३७४ जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे.
मुंबईसह राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. राज्यातल्या बऱ्याच भागांतील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.