विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना पॅलासिओस यांची भेट घेतली.
Read More
(PM Narendra Modi Holds Roadshow in Vadodara) ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी (२६ मे) दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले आहेत. वडोदरा येथे झालेल्या रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या वडोदरा रोड शोमध्ये भारतीय लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही भाग घेतला. पंतप्रधानांचे स्वागत करताना कुरेशी कुटुंबियांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या.
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत भारताच्या पर्यटन क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेतली.
( PM Modi on war ) भारताच्या आदमपूर हवाईतळावर हल्ला केल्याची ‘फेकन्यूज’ पाकिस्ताने पसरविली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदमपूर हवाईतळावर जाऊन आणि तेथील वायुयोद्धांशी संवाद साधून खोट्या बातमीचा सणसणीत ‘फॅक्टचेक’ केला.
दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने सुरु केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाक पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्याचा चंग भारताने बांधला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवायचा निर्णय घेतला आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. इंग्रजी भाषेमध्ये सावरकरांचे द्विखंडात्मक चरित्र लिहीणारे तरुण लेखक विक्रम संपथ यांनी या पोस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांपूर्वी झालेल्या भेटीचा उल्लेख केला
(CM Devendra Fadnavis On Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे
PMP PMRDA पुण्यातील दोन महत्त्वाच्या घटकांच्या कार्यपद्धतीवर पुण्याचे जीवनमान अवलंबून आहे. सध्या यातील ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा‘च्या कारभाराची अवस्था अतिशय निराशाजनक आणि त्यापेक्षाही संतापजनक आहे. पुणे महानगराचा विस्तार गेल्या अडीच वर्षांत अतिशय झपाट्याने वाढला. त्यामुळे येथील दळणवळण व्यवस्था आणि पायाभूत सुविधांची कामे, नजीकच्या परिसरातील बांधकामविस्तार आणि त्यातच स्थायिक होणार्या रहिवाशांमुळे, पुण्यातील जीवनमान गतिमान झाले. त्यासाठी या नागरिकांना अतिशय सोयीची आणि सुविधाजनक असलेली बससेवा, हे महामंडळ आज
पुणे शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. शहरातील कात्रज, धायरी, आंबेगाव आणि सिंहगड काही भागांमध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कपात सोमवार दि. ५ मे पासून करण्यात येणार आहे.
(WAVES 2025 - Rajinikanth praises PM Modi) 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फायटर आहेत. ते सध्या सुरू असलेल्या परिस्थितीशी लढतील. काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करतील', असा विश्वास सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत सुरू असलेल्या चार दिवसीय जागतिक जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज) ते बोलत होते.
(Congress deletes Gayab post targeting PM Modi) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. यादरम्यान राजकीय वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावरील काँग्रेस पक्ष यांच्यामध्येही या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाद पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अधिकृत अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत एक पोस्ट करण्यात आली होती. मात्र त्यावरून चांगलाच वाद पेटल्यानंतर आता ती पोस्ट हटवण्यात आली आहे. पक्षाच्या अंतर्गत
(Dawoodi Bohra Delegation meets PM Modi) सध्या देशात वक्फ सुधारणा कायद्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटना या कायद्याच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता दुसरीकडे दाऊदी बोहरा समुदायाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी दि. १७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत वक्फ दुरुस्ती कायद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आहेत. यावेळी त्यांनीही हेही सांगितले की, ही त्यांच्या समुदायाची दीर्घकाळापासूनची मागणी होती.
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या 70 टक्के लाभार्थी महिला असल्याची समोर आलेली आकडेवारीही तितकीच सुखावणारी. अशी ही महिलांच्या स्वप्नांना बळ देणारी, आत्मनिर्भर भारताची अर्थ‘मुद्रा’ देशातील आर्थिक क्रांतीचे प्रतीक ठरली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
एक काळ असा होता की, हिंदू धर्मसंस्कृती भारताच्या पलीकडे अगदी दक्षिण आशियाई देशांपर्यंत पोहोचली, रुजली अन् बहरली. त्यामुळे अगदी इंडोनेशियापासून ते मलेशिया आणि पुढे थेट थायलंडपर्यंत हिंदूंचा प्रभाव वाढू लागला. भारतातील पल्लव राजांच्या काळात हे सगळे घडत होते. नवव्या शतकापर्यंत अनेक देशांत राजांपासून प्रजेपर्यंत सर्वांनी हिंदू धर्माचरणास प्रारंभ केला. दहाव्या शतकानंतर मात्र परिस्थिती काहीशी बदलू लागली. दक्षिण आशियाई देशांतील काही देश मुस्लीम देशांमध्ये धर्मांतरित होत गेले.
गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैन्यावरील लक्ष्यित हल्ल्यांची संख्या सातत्याने वाढत असून, स्वतंत्र बलुचिस्तानच्या मोहिमेने पाकिस्तानची पुन्हा झोप उडविली आहे. त्यात भारतातील मोदी सरकार आणि आता अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनेही दहशतवादाविरोधी कठोर धोरण स्वीकारल्याने पाकिस्तानची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.
जागतिक सत्ता समतोल झपाट्याने बदलत असला, तरी त्याची दखल न घेतल्याने संयुक्त राष्ट्र ही संघटना आता कालबाह्य ठरत आहे. ही संघटना केवळ अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे, जागतिक समस्यांच्या सोडवणुकीत ही संघटना अर्थहीन, निष्क्रिय आणि दुर्बळ ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या पुनर्रचनेची पुनश्च अधोरेखित केलेली मागणी म्हणूनच रास्त ठरावी.
( Like Trump PM Narendra Modi is also committed to peace Tulsi Gabbard ) अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी मंगळवारी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शांततेसाठी वचनबद्ध आहेत.
आजकाल राजकारणात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, काही रिकामटेकडे लोक समाजमाध्यमे आणि वाहिन्यांवरून प्रकाशझोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात आणि आपले हसेच करून घेतात. अशी काही स्टंटबाजी केली की, आपण नेते बनतो किंवा आपल्या ‘गॉडफादर’च्या मर्जीत राहतो, असा या दीडशहाण्यांचा भ्रम. मग केवळ उपद्रव माजविणे, एवढे एकच आपले कर्तव्य, असा समज लोकांमध्ये रुजविण्याचा घातक प्रयास अशा मंडळींनी सुरूच ठेवला आहे. वस्तुतः यातून काहीही साध्य होत नाही. ना जनतेचे प्रश्न हे लोक सरकार दरबारी नेऊन सोडवू इच्छितात आणि ना त्यातून आपल्
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने ऊर्जा क्षेत्रात व्यापक बदल अनुभवले. शेतकऱ्यांना दिलेल्या सवलती, स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या प्रकल्पांना चालना, तसेच भारनियमन कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात सक्षमपणे वाटचाल करतोय. याच उपक्रमांचा एक भाग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला, ज्यात १,९२,९३६ इंस्टॉलेशन्स पूर्ण करून महाराष्ट्राने देशात दुसर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव सनदशीर मार्गाने करता येणार नाही, ही गोष्ट भारतविरोधी शक्तींना कळून चुकली आहे. परिणामी, आता हिंसाचाराचा मार्ग अनुसरण्याच्या निष्कर्षापर्यंत या शक्ती आल्या आहेत. त्यामुळे समाजात राहूनच देशविरोधी हिंसक कारवाया करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे.
आजवरच्या भारताशी संबंधित इतिहासलेखनात देवळांच्या संहारामागचे खरे षड्यंत्र हे कायमच गुलदस्त्यातच कसे राहील, याची अगदी पद्धतशीर तजवीज केली गेली. ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या दोन झापडांच्या आड, मंदिरांचा विध्वंस हिंदू प्रतीके म्हणून नव्हे, तर लुटीसाठी झाल्याचा खोटा इतिहास हिंदूंच्या गळी वर्षानुवर्षे अलगद उतरविण्यात आला. त्यामुळे इतिहासाकडे डोळसपणे बघून, त्याचे यथार्थ आकलन करणे हे स्वत्वाच्या शोधासाठी आवश्यक आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमनाथ मंदिराला भेट दिली. त्यानिमित्ताने गझनीच्या महमूदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा या पार्श्वभूमीवर ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन सन्मान दिन म्हणून साजरा केला जाईल तसेच ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. दि. १० मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा २०२५-२६ सालचा अर्थसंकल्प सादर करताना ते बोलत होते.
गेल्या काही वर्षांत झपाट्याने शहरीकरणात वाढ झाल्याने, अनेक नागरिकांनी रोजगारासाठी शहराची वाट धरली. त्यातून जसा लाभ झाला, तसे काही तोटेही झाले. वाहतुकीची समस्या ही त्यापैकीच एक! पुण्यासारख्या शहरात ही समस्या आता उग्र होऊ लागली आहे. पुण्यातील वाहतूक समस्यांवर अधिकाधिक झोत टाकून, येथील सर्वच प्रकारच्या माध्यमांनी प्रशासनाला जेरीस आणले आहे. ‘पीएमपी’ची अवस्था अतिशय वाईट आणि प्रवाशांना त्रास होईल, अशी असल्याचे गेल्या वर्षभरापासून दिसत आहे.
‘एमएसएमई’ क्षेत्र देशाच्या जीडीपीत सर्वाधिक भर घालणारे तर आहेच, त्याशिवाय कृषी क्षेत्राखालोखाल रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ते उदयास आले. केंद्र सरकारनेही या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत येत्या काळात जागतिक बाजारपेठेत ‘एमएसएमई’ क्षेत्र मोलाचे योगदान देताना दिसून येईल, हे निश्चित.
महाकुंभ मेळ्यात सनातनी श्रद्धाळूंचा लोटलेला महापूर आणि त्यातून जगाला दिसलेली सनातन संस्कृतीची विलक्षण शक्ती ही जगाला आश्चर्याचा धक्का देणारीच होती. या कुंभमेळ्याचे केलेले आयोजन यामुळे अनेक देशविघातक वृत्तींनाही मोठाच धक्का बसला आहे. असे असले तरीही श्रद्धाळू भक्तांना निश्चितच अलौकिक सुखाचा अनुभव मिळाला यात शंका नाही.
पावसापाण्यावर चाललेला पिकांवरचा संवाद आपल्याला जुनाच! पण ‘पावसाचा परिणाम उत्पादनावर फारसा होणार नाही,’ हे कधीतरी ऐकू येईल का? तर तशी शक्यता नाकारता येत नाही. भारतातील शेतीविषयक आमूलाग्र बदल वर्तवलेला ‘अन्नटंचाई ते धान्यसंपन्नता’ अशा आशयाचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला; त्याचेच हे आकलन...
देशभरातील शेतकर्यांना पीएम किसान योजनेचे १८ हप्ते मिळाले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९व्या हप्त्याचे वितरण आज सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे. ‘पीएम किसान सन्मान निधी’च्या वितरणाचा कार्यक्रम बिहारमध्ये पार पडणार आहे
सेमीकंडक्टर या आधुनिक तंत्रज्ञानासाठी भारत एकेकाळी, बाहेरील देशांवर अवलंबून होता. मात्र, या क्षेत्रातसुद्धा भारताने आत्मनिर्भर होण्यासाठी कंबर कसली आहे. सेमीकंडक्टरच्या निर्मितीसाठी लागणारी सर्व संसाधने, भारताकडे व्यापक स्वरूपात आहेत. त्यामुळेच सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे...
(Rekha Gupta) राजधानी दिल्लीतील भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांनी आज गुरुवारी दि. २० फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. तसेच आताच्या घडीला मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या त्या एकमेव महिला भाजप नेत्या आहेत.
बांगलादेशातील सत्तांतर नाट्यानंतर मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आले. त्यानंतर तेथे हिंदू अल्पसंख्याकांवरील अमानुष अत्याचारांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. आपल्या डोक्यावर अमेरिकेचा हात आहे. त्यामुळे भारत या मुद्द्यावरून आपले काहीच वाकडे करू शकत नाही, असा समज काहीकाळ युनूस सरकारचा झाला असावा. मात्र, अमेरिकेत झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर अनेक फासे पलटले. ही एकाअर्थी मोहम्मद युनूस यांच्यासाठी धोक्याच
डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट निर्णय म्हणजे, बांगलादेशचे भविष्य आता पंतप्रधान मोदींच्याच हातात असल्याचं दिसतंय... #NarendraModi #DonaldTrump #MuhammadYunus #Bangladesh #USA #India #Hindu #News #MahaMTB
दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे वेगळेपण नेमके कशात आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून #मराठीभाषा
(Earthquake in Delhi NCR) देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीतीलच धौलाकुवा भाग होता. यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) सोमवारी सकाळी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील धौलाकुवा हा भागातील दुर्गाबाई देशमुख कॉलेज ऑफ स्पेशल एजुकेशनच्या जवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि भूकंपाची तीव्रता ही ४.० रिश्टर स्केल एवढी होत
शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण, गेल्या काही दशकांत शेतकर्यांना फक्त आश्वासनांची भुलथापच मिळाली. कधी कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्यांना फसवले गेले, तर कधी दलालांच्या जाळ्यात अडकवून शेतकर्यांना कर्जबाजारी केले गेले. मोदी सरकारने मात्र हे चित्र बदलण्याचा निर्धार केला असून, ‘ई-नाम’ या कृषी डिजिटल मंडईची निर्मिती एप्रिल २०१६ साली झाली. आता या मंडईच्या विस्तारासह दहा नवीन कृषी वस्तूंचा समावेश करून सरकारने शेतकर्यांना भेट दिली आहे.
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एआय अॅक्शन समिटला हजेरी लावली. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. या समिटनंतर काल दि. १२ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मार्सेला येथील माझारग्युस वॉर सेमेटरी (mazargues war cemetery) येथे भेट दिली.
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. नुकतेच तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यानंतर आता ते अमेरिकेत दाखल झाले आहेत. तिथे पोहोचताच भारताचे अमेरिकेतील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे तिथे स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्समधील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेला संबोधित करताना, या क्षेत्रातील भारताच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेखही मांडला. पण, केवळ भारतापुरता संकुचित विचार न करता, विश्वकल्याणासाठी ‘एआय’ची उपयोगिता, सुरक्षितता आणि जागतिक सहकार्य याबाबतही पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन उद्बोधक ठरावे.
नरेंद्र मोदी दि. १२ आणि दि. १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेला भेट देत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या महिन्याभरात हा दौरा पार पडत आहे. तसेच फ्रान्समध्येही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेला मोदींनी काल संबोधित केले. त्यानिमित्ताने मोदींच्या या फ्रान्स आणि अमेरिका दौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारा लेख...
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौर्यावर जाणार असून, ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. या दौर्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय भागीदारीची सखोल चर्चा होऊ शकते. तसेच भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडोर’वरही मुक्त चर्चाही या दौर्यात अपेक्षित आहे.
(Union Budget 2025) यंदाच्या अर्थसंकल्पात १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या आहेत. युवकांसाठी विविध क्षेत्रांची दारे खुली झाली आहेत आणि विकसित भारत हे अभियान आता सामान्य नागरिक पुढे नेतील. हा अर्थसंकल्प देशाचे सामर्थ्य कित्येक पटींनी वाढवणारा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रसज्ज सेना उभारून, ब्रिटीशांच्या साम्रज्याला हादरे देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र यांची १२८वी जयंती दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी भारत देश साजरा करतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली नवी दिल्ली येथे आदरांजली अर्पण केली. बोस यांच्या शौर्याचे स्मरण करत मोदी म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका अतुलनीय होती. बोस म्हणजे जिद्द आणि शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांचं कार्य आज सुद्धा दीपस्तंभा आम्हाला प्रेरित करत अस
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर विदेशात ‘न्यू ईयर’ साजरे करण्यासाठी रवाना झालेले राहुल गांधी नुकतेच मायदेशी परतले. मग कुणी तरी त्यांना दिल्लीची निवडणूक तोंडावर आहे, आपण जागे व्हायला पाहिजे बरे, असे हलवलेले दिसते. विदेश दौर्याचा सगळा शीण अद्याप गेलेला नसतानाही, मग रडतखडत राहुल गांधींनी राजकीय तोफ डागायला घेतली. निवडणुका दिल्ली विधानसभेच्या म्हटल्यावर, सत्ताधार्यांवर तुटून पडण्याचा चंगच त्यांनी बांधला. मग काय, एका दगडात दोन पक्षी मारण्यासाठी राहुल गांधी चक्क मोदी आणि केजरीवाल यांची तुलनाच करुन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतातील संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर भारताच्या दिशेने घोडदौड करत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र नाग मार्क-२ ची चाचणी यशस्वी करून दाखवली. सुरक्षा मंत्रालयाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार राजस्थानच्या पोखरण येथे, लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली.
कलम ३७० रद्द केल्यानंतर, काश्मीरमध्ये विकासकामांना गती मिळाली आहे. अशातच आता सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोनमार्ग बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान यावेळी काश्मीरच्या जनतेला संबोधित करणार आहे. या कार्यक्रमासाठी जम्मू काश्मीरचे पोलीस, निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. झेड-मोर बोगदा हा काश्मीरसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
जम्मू काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात झेड-मोर बोगद्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी नायब राज्यपाल मनोज सिन्हा, उपस्थित होते. अशातच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं. जनतेला संबोधित करताना अबदुल्ला म्हणाले की पंतप्रधान मोदी जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी श्रीनगरला आले. जम्मू काश्मीरमध्ये निवडणूका पार पडतील आणि लोक सरकार निवडू शकतील हे वचन देखील आपण पूर्ण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचे लष्करी सार्म्यथ्य कैक पटीने वाढले आहे. आत्मनिर्भर भारतची योजना अंमलात आणत, भारतीय सैन्याला बलशाली करण्याचे काम आपल्या देशातील शास्त्रज्ञ आणि उद्योजकांनी केले आहे. अशातच आता पुण्यामध्ये पहिल्यांदाच १५ जानेवारी रोजी सैन्य दिन परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दर्शकांना भारतीय सैन्य दलातील रोबो डॉग्सची म्हणजेच ARCV-MULE यांची परे़ड बघायला मिळणार आहे.
अभिनेत्री कंगना राणावत दिग्दर्शित आणि अभिनित आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ अनेक अडचणींचा सामना करुन अखेर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी या चित्रपटाशी संबंधित एक खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून यात कंगना राणावत कशा प्रकारे प्रोस्थेटिक मेकअपच्या साहाय्याने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसू लागतात, हे दिसते.
(PM Narendra Modi) देशाची राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या ‘वीर सावरकर महाविद्यालया’चे भूमीपूजन करणार आहेत.
(Chandrashekhar Bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी विधानसभा विजयाबद्दल बावनकुळेंचे अभिनंदन केले.
नवी दिल्ली : जगविख्यात अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान ( Former PM ) डॉ. मनमोहन सिंग शनिवारी दुपारी पंचत्त्वात विलीन झाले. राष्ट्रध्वजात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव लष्करी वाहनातून दिल्लीतील निगमबोध घाटावर आणण्यात आले. येथे त्यांना २१ तोफांची सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.