एम्प्लॉइर्स फेडरेशन ऑफ इंडिया (EFI) आणि भारतीय उद्योग परिसंघ (CII) यांच्या या उपक्रमातून उद्योग आणि शासन यांच्यातील सहकार्याचे मूर्त स्वरूप दिसते. महाराष्ट्राने देशात औद्योगिक पुढाकार घेतले असून, कामगार धोरणातील सुधारणा, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, आणि रोजगार संधी वाढवण्याच्या दिशेने राज्याने ठोस पावले उचलली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी आज केले.
Read More
Women Participation in the Cooperative Sector and Available Opportunities आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 व आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘महिलांचा सहकार क्षेत्रातील सहभाग व उपलब्ध संधी’ या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘ईशान्य मुंबई सहकार भारती’ व ‘म्हाडा कॉलनी नवरात्र उत्सव मंडळा’तर्फे दि. 17 मे रोजी मुंबईतील मुलुंंड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा सारांश या लेखात मांडला आहे.
Various skills and opportunities in the solar energy sector ऊर्जा क्षेत्रांतर्गत सौरऊर्जा क्षेत्रात होणार्या वेगवान प्रगतीचे विविध स्तरांवर आणि विविध संदर्भात परिणाम होत आहेत. ऊर्जेची वाढती मागणी, हरितऊर्जेला पाठबळ आणि वाढता प्रचार यांमुळे सौरऊर्जा क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान, वाढते कौशल्य व संधी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत, त्याचाच या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...
आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी हे वर्षानुवर्षे चिकटलेले 'बिरूद', मूलभूत सुविधांसाठी दैनंदिन संघर्ष, बेताची आर्थिक स्थिती, उच्च शिक्षणाचा अभाव, रोजगाराभिमुख शिक्षणाची वानवा, अनुभवाची कमतरता या आणि अशा अनेक कारणांमुळे धारावीतील उमेदवारांना बऱ्याचदा नावाजलेल्या कंपन्यांकडून नोकरीच्या संधी नाकारल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही वर्षभरापासून धारावी सोशल मिशनच्या (डीएसएम) माध्यमातून करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे चित्र काहीसे बदलले आहे.
( Governor on employment opportunities ) जगातील अनेक देश आज आपल्या कुशल कार्यबळाच्या पूर्ततेसाठी भारताकडे पाहत आहेत. मात्र अनेक देशात नोकरीसाठी तेथील भाषा येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी युवा वयातच अधिकाधिक अधिक भाषा शिकाव्या. जर्मन, जपानी, इटालियन, फ्रेंच यांपैकी किमान एक भाषा शिकावी, असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी शनिवार, दि. १९ एप्रिल रोजी केले.
मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) अप्रेंटिस पदासाठी भरतीची सुवर्ण संधी आहे. १ डिसेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
( Apple )'ॲपल' कंपनी सध्या भारतात व्यवसायविस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार चार नवीन रिटेल स्टोअर्ससाठी ॲपल कंपनी तब्बल ४०० लोकांना नियुक्त करणार असल्याची माहिती आहे. हे स्टोअर्स देशातील बेंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई या ४ शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत.
देशातील उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) यांच्या सहकार्याने, (Engage Maharashtra: Unlocking IT & IT-Enabled Services Opportunities) एंगेज महाराष्ट्र अनलॉकींग आय.टी. ॲण्ड आय.टी. ऐनेबल्ड सव्ह्रिसेस ऑर्पोच्युनिटीज, हा आगामी संवादात्मक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विकास आयुक्त (उद्योग) दीपेंन्द्र सिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली राज्यशासनाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ या कार्यक्रमाम
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार भारतातील बेरोजगारी दरात लक्षणीय घट झाली आहे. त्रैमासिक पिरीओडिक लेबर फोर्स सर्व्ह डेटानुसार ऑक्टोबर - डिसेंबर २०२३ मध्ये हा दर ६.५ टक्केपर्यंत खाली आला आहे. महिला कामगार प्रतिनिधित्वात रेकोर्डब्रेक वाढ झाली असून महिलांच्या प्रतिनिधित्व संख्येत २५ टक्क्याने वाढ झाली आहे. शहरी बेरोजगारीत देखील घट झाली आहे. आर्थिक वर्ष ऑक्टोबर डिसेंबर २२ मधील बेरोजगारी दर ७.२ वरून मागील तिमाहीत ६.६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
कल्याणात येत्या शुक्रवारी 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत साई हॉल, वायले नगर, कल्याण पश्चिम येथे रोजगार आपल्या दारी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील तब्बल 4 हजार संधी उपलब्ध होणार आहेत. ज्यामध्ये खासगी क्षेत्रासोबतच शासकीय विभागातीलही निवडक पदांसाठी इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत.
तरूण आपल्या देशाचे भवितव्य आहेत त्यामुळे आज तरूण सुशिक्षित असणे पुरसे नाही, तर ते रोजगारक्षम असणे देखील महत्त्वाचे आहे. अधिक पुढे जात आपण आपल्या लोकशाहीचा लाभ घेत भारताला नव्या उंचीवर नेले पाहिजे, ज्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राची भूमिका, त्यांचा पाठिंबा व सहयोग महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन पद्मविभूषण विजेते डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.ते मुंबईत आयोजित मेकिंग इंडिया एम्प्लॉयेबल कॉन्फरन्स अॅण्ड अवॉर्ड्स सोहळ्यात बोलत होते.
सध्या देशभर आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने इलेक्ट्रिक वाहननिर्मिती, सेमीकंडक्टर क्षेत्र यांसारख्या तुलनेने नवीन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि त्यांचे अर्थव्यवस्थेच्या वाढीतील योगदान यांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरावे. या अनुषंगाने नुकताच जाहीर झालेला ‘मॅकिन्से अॅण्ड कंपनी’चा अहवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या उद्योगक्षेत्रांविषयी व्यक्त केलेले विचार आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एकूणच सकारात्मक चित्र यांचा आढावा घेणारा हा लेख...
मासळी बाजारातून स्थानिकांना रोजगाराची संधीखवय्यांना ‘सी फूड’ ची पर्वणीदीपेश पाटील आणि राम म्हात्रे या दोन तरूणांचा पुढाकारडोंबिवली : कोरोना निर्बंधामुळे अनेकांचा रोजगार संकटात सापडले असताना स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम द
प्रत्येक घरात दूरध्वनी संभाषणात आणि प्रत्येकाच्या डोक्यात सध्या एकच प्रश्न सारखा सारखा येतो तो म्हणजे, ‘लॉकडाऊन’ केव्हा थांबणार? कोरोना केव्हा संपणार? आणि याचं खरं आणि एकमेव उत्तर म्हणजे कोरोनावर लस शोधली जाईल तेव्हाच! ही लस शोधण्यासाठी जगातील अधिकाधिक संशोधक, औषधी कंपन्या या विषयावर दिवसरात्र महेनत घेत आहेत. अर्थात, कोरोनावरील औषध हे दोन प्रकारचं असणार आहे; ते म्हणजे ज्यांना कोरोना झालाय त्यावरील उपचार म्हणून व दुसरं व अधिक महत्त्वाचं म्हणजे, कोरोना होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लस. ज्या औषध कंपन्या या लसीव
‘लॉकडाऊन’ काळात महिनाभर घरी बसल्याने नागरिकांच्या गरजा, सवयी यांमध्ये निश्चितच काही बदल होत आहेत. हे बदल ओळखून तुमच्या व्यवसायावर नेमका काय परिणाम करणारे आहेत? हे बदल तुमच्या व्यवसायासाठी चांगले आहेत की वाईट? याचादेखील सखोल अभ्यास करायला हवा.