राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला येत्या विजयादशमीच्या दिवशी शंभर वर्षे पूर्ण होत आहे. संघशताब्दीच्या निमित्ताने गोरेगावात शारदीय नवरात्रात कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मसुराश्रम आणि संस्कार भारती(उत्तर पश्चिम समिती कोकण प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात हा कीर्तन महोत्सव संपन्न होणार आहे. दररोज सायंकाळी ४:३० ते ६:३० या वेळात गोरेगाव पूर्व येथील पांडुरंगवाडीमधील मसुराश्रम येथे ही कीर्तने होणार आहेत.
Read More
ईशान्य भारतातील कनेक्टिव्हिटीला मोठी गती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरमच्या आयझॉल येथे ९,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे आज भूमिपूजन व उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. या निमित्ताने पंतप्रधानांनी आयझॉल आता भारताच्या रेल्वे नकाशावर अधिकृतपणे स्थान मिळाल्याचे घोषित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील चुराचांदपूर येथे ७ हजार ३०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचा भूमिपूजन व शुभारंभ केला. या वेळी त्यांनी मणिपूरच्या जनतेच्या धैर्यशीलतेचे कौतुक केले आणि राज्याला आशा व आकांक्षांची भूमी असे संबोधले. मोदी म्हणाले की, मणिपूर ही संस्कृती, परंपरा, विविधता आणि रंगत यांचा अद्वितीय संगम असून ती भारताच्या एकात्मतेची मोठी ताकद आहे. मणिपूर या नावातच ‘मणि’ म्हणजे रत्न आहे. हे रत्न ईशान्य भारताच्या तेजात भर घालणार आहे, असे ते म्हणाले.
कुर्ला पश्चिम येथील सहा धोकादायक इमारती पाडण्याबाबत महापालिकेने बजावलेली नोटीस रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. तसेच, या नोटिशीविरोधात रहिवाशांनी केलेली याचिका फेटाळून लावली. इमारतींची योग्य ती देखभाल न केल्याबद्दल न्यायालयाने रहिवाशांना फटकारले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील ११ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत ईशान्य भारताचा विकासही गतिमान झाला. स्वातंत्र्योत्तर काळापासून दुर्लक्षित राहिलेल्या या प्रदेशात रस्ते, पूल, रेल्वेमार्गांच्या उभारणीने प्रवासी वाहतुकीसह उद्योग, पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बैराबी-सैरंग रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार असून, मिझोरामसाठी हा रेल्वेमार्ग एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. त्यानिमित्ताने ईशान्य भारताची विकासगाथा अधोरेखित करणारा हा लेख...
उत्तर अमेरिकेतील ग्रेटर टोरांटो एरियात भगवान शिवाची तब्बल ५४ फूट उंच भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. ही मूर्ती ब्रॅम्प्टन येथील भवानी शंकर मंदिरात बसवण्यात आली असून, या सोहळ्याला हजारो भक्त आणि पर्यटक उपस्थित होते. या रंगतदार आयोजनात रथयात्रा आणि पारंपरिक पूजा-अर्चाही पार पडल्या. ही देखणी मूर्ती नरेश कुमार कुमावत यांनी साकारली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खीळे लावण्यात आल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रस्त्यावर लावलेल्या खिळ्यांमुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाल्याने मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने यावर अधिकृत खुलासा जरी केला आहे. त्यानुसार, महामार्गावर खीळे नव्हे तर, रस्त्यावरील सूक्ष्म तडे भरताना वापरण्यात आलेले ‘अॅल्युमिनिअम नोजल्स' आहेत.
सेरोपेगिया मोहनरामी, किंवा मोहनरामची सेरोपेगिया, ही एक अत्यंत धोक्यात आलेली, ताठ, कंदयुक्त वनस्पती आहे जी भारतातील महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम घाटातील लॅटरिटिक पठारांवर आढळते. हिरव्या, फ्लास्क-आकाराच्या फुलांनी वैशिष्ट्यीकृत, पिंजऱ्यासारख्या अनोख्या लोबसह, या वनस्पतीचे नाव प्राध्यापक एच.वाय. मोहन राम यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे आणि अधिवास नष्ट होण्यापासून आणि चराईमुळे तिला मोठ्या धोक्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे आययूसीएनने तिला "गंभीरपणे धोक्यात आलेले" दर्जा दिला आहे.
नवी दिल्लीच्या नॉर्थ अव्हेन्यू परिसरात गेल्या दहा दिवसांपासून भक्तिरसाचा अनोखा जल्लोष अनुभवायला मिळाला. राष्ट्रपती भवन, संसद आणि राष्ट्रीय राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या या ल्युटन्स दिल्लीत “सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची” पासून ते “ओम् जय जगदीश हरे” पर्यंत विविध आरत्यांचे स्वर दुमदुमत होते. भाजप नेते व पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांच्या २११, नॉर्थ अव्हेन्यू या निवासस्थानच्या ‘समरसता गणेशोत्सवा’ने देशाच्या राजधानीत सामाजिक एकतेचा अनोखा संदेश यंदाही दिला.
चीनने नुकतीच तियानमेनमध्ये आजवरची सर्वांत मोठी लष्करी परेड आयोजित केली होती. दुसर्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ८० वर्षांनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनेकजण याकडे चीनच्या लष्करी ताकदीचे आणि भविष्यासाठीचे शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहतात. विशेष म्हणजे, या लष्करी परेडला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्यासह अनेक परदेशी नेत्यांना निमंत्रित केले होते. त्यानुसार ते उपस्थितसुद्धा होते.
(Shikhar Dhawan Summoned by ED) भारताचा माजी फलंदाज शिखर धवनला ईडीने एका ऑनलाइन बेटिंग ॲप जाहिरातीशी संबंधित प्रकरणात समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीसाठी गुरुवारी ४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता तो ईडी कार्यालयात हजर होता. ऑनलाइन बेटिंग ॲपशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूकीची शक्यता तपासण्यासाठी ईडीने हे पाऊल उचलले आहे.
कल्याण जवळील टिटवाळा मांडा परिसरात एका इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. या मोबाईल टॉवरला टिटवाळा मांडा ग्रामस्थांनी कडून विरोध केला आहे. याबाबत मांडा टिटवाळा ग्रामस्थांनी टिटवाळा पोलीस स्टेशन सह कल्याण डोंबिवली महापालिकेला तक्रार केली आहे. संबंधित टॉवर उभारल्यास परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
बारामतीतील एका सामान्य कुटुंबात लहानाचे मोठे होत, पुढे समाजसेवेचे व्रत अंगीकारणाऱ्या अॅड. अक्षय गायकडवाड यांच्याविषयी...
काँग्रेसप्रणित इंडी आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह २० नेते प्रस्तावक बनले. नामांकनाच्या वेळी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संसद संकुलातील प्रेरणा स्थळावर महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली. उपराष्
ब्रिटन असो भारत अथवा अन्य कुठलाही देश, प्रारंभीपासूनच राजघराण्यांविषयी सामान्यांच्या मनात प्रचंड कुतूहल. राजघराण्यातील सदस्यांचा ऐषोरामी थाट, त्यांची लखलखणाऱ्या सोन्यापासून ते उंची गाड्यांपर्यंतची आलिशान जीवनशैली आणि जगावेगळे श्रीमंतीचे शौक, हे कायमच लोकचर्चेच्या आणि माध्यमांच्याही केंद्रस्थानी असतात. आज ही राजघराणी बहुतांशी नामधारी सत्ताकेंद्र असली तरी, त्यांचे राजकारणातील, समाजातील स्थान हे अबाधित आहेच. पण, जेव्हा राजघराण्यातील सदस्यांवर गंभीर आरोपांचे शिंतोडे उडतात, तेव्हा त्यांची प्रतिष्ठा, समाजातील मान
भारतामधील भटके आणि वनवासी समुदायांचा देशातील वन्यजीवांशी शतकानुशतकांचा गाढ(दृढ) संबंध आहे. अनेक समुदाय जंगलातील उत्पन्नावर आणि काही वेळा वन्यप्राण्यांच्या मांसावर अवलंबून असतात. परंतु, त्यांच्या पारंपरिक पद्धतींमुळे वन्यजीवांच्या लोकसंख्येवर फारसा विपरीत परिणाम झालेला नाही. अलीकडच्या काळात अशा अनेक समुदायांचा अधिक बारकाईने अभ्यास होऊ लागला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे समुदाय आता राज्य यंत्रणा किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू असलेल्या मुख्य प्रवाहातील वन्यजीव संवर्धनकार्यात सहभागी होत आहेत.
माणूस सिनेमा का करतो? कादंबरी का लिहितो? कारण त्याला काहीतरी सांगायचं असतं. सांगायचं म्हणजे उपदेश नव्हे. मी माझी गोष्ट सांगितली. हे जे सांगणं आहे, त्या सांगण्याबरोबर जो पर्यंत सांगणारा राहतो, तोपर्यंत तो चांगला सिनेमा होतो. सिनेमा हे अतिशय precise माध्यम आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ने अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात दाट लोकवस्ती असलेल्या आणि पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील झोनमध्ये ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने मार्गावर व्यापक ध्वनी अडथळे बसवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
(No ceasefire violation along LoC in J&K, says Indian Army) नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर आले होते. तथापि, आता हे वृत्त भारतीय लष्कराने फेटाळले असून, नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघन झालेले नाही, असे स्पष्ट केले आहे. आहे.
मुंबईकरांची पहाट आरोग्यदायी आणि सायंकाळ आल्हाददायक करणारा मरीन ड्राइव्ह अधिक सुंदर ठेवायला हवा. नरिमन पॉईंटपासून स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी)पर्यंत आणि त्यापुढील परिसराचे सौंदर्य अधिक खुलविण्यात सातत्य ठेवा, अशा सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केल्या आहेत.
जगाला धर्मनिरपेक्षता, मानवाधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्याचे धडे देण्यातच आयुष्याचे सार्थक मानणार्या अमेरिका नावाच्या तथाकथित महासत्तेच्या मुखवट्याआडचा असहिष्णु आणि सांस्कृतिकदृष्ट्या दीन चेहरा, पुन्हा एकदा समोर आला. अमेरिकेतील ओहियो या राज्याच्या सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती झालेल्या भारतीय वंशाच्या मथुरा श्रीधरन यांना केवळ टिकली लावल्यामुळे समाजमाध्यमांवरून द्वेषपूर्ण टीकेचा सामना करावा लागला.
राज्य सरकारच्या अधिकारांचा गैरवापर केलेल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्या.आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देत म्हटले आहे की “बेकायदेशीर नोटिसी प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणे आणि चौकशी करणे हे एक संवैधानिक न्यायालय म्हणून आमचे कर्तव्य आहे.” या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अधीन असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधणी मंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र
गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
सरन्यायाधीश भुषण गवई यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या नोटकांड सुनावणीतून माघार घेतली आहे
राज्य विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपाल आणि राष्ट्रपती मान्यता देताना निश्चित कालमर्यादा व प्रक्रिया ठरवता येतील का, या संदर्भावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार व सर्व राज्य सरकारांना नोटीस बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जुलै रोजी होणार आहे.
उत्तर भारतीय मतदारांचे मुंबईच्या राजकारणातील वाढते वजन लक्षात घेता काँग्रेसने ‘मुंबई विरासत मिलन’ नावाच्या विशेष अभियानाची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसपासून दुरावलेल्या या समाजाला पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर उचललेले हे पाऊल केवळ मतांवर डोळा ठेवून आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
आरे कॉलनी मयूर नगर येथील ३० वर्ष जुन्या व नादुरुस्त अवस्थेत असलेल्या तसेच पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील ११ इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, त्याचबरोबर आदर्श नगर येथील झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी ३ सी नुसार कार्यवाही सुरु करण्याच्या सुचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार रविंद्र वायकर यांच्या समवेत पार पडलेल्या संयुक्त बैठकीत एसआरएला देण्यात आल्या आहेत.
भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांनी माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, केरळचे शिक्षक आणि भाजप नेते सी. सदानंदन मास्टर तसेच इतिहासकार मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी शनिवार, दि.१२ जुलै रोजी जारी केलेल्या राजपत्रात या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मुंबईतील धार्मिकस्थळे भोंगेमुक्त झाल्याची माहिती शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्यातील ३ हजार ३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. यापैकी मुंबईत १ हजार ६०८ भोंगे हटवले असून, त्यात १ हजार १४९ मशिदी, ४८ मंदिरे, १० चर्च, ४ गुरुद्वारे आणि १४७ इतर धार्मिक स्थळांचा समावेश आहे. मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर आता भोंगा नाही. यासंदर्भातील अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांचे आश्वासन राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून पुढील तीन महिन्यांत अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत दिले.
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दि. ८ आणि ९ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करत आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर आपल्या अनुदानासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. यासाठी राज्याभरातील हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याभरातील शाळा शाळा बंद राहणार असा संभ्रम विद्यार्थीं-पालकांमध्ये तयार झाला होता. मात्र शिक्षण विभागाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मंत्रालयातील विविध विभागांमध्ये आदिवासींसाठी राखीव असलेल्या अनेक जागा बिगर-आदिवासी कर्मचाऱ्यांनी बळकावल्याचा गंभीर आरोप सोमवारी विधानसभेत करण्यात आला. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
बईच्या पूर्व उपनगरातील पाच मशिदींच्या व्यवस्थापनाने अजानसाठी वापरले जाणारे लाऊडस्पीकर हटवण्याच्या नोटीशीप्रकरणी मंगळवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात याचिकाकर्त्यांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, या मशिदींना निरर्थक नोटिसा बजावून मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पानगाव इथे गावकर्यांनी ठराव संमत करून पारधी समाजाच्या दहा कुटूंबावर बहिष्कार टाकला. राज्यभरात या घटनेचा तिव्र निषेध होत आहे .
दादरस्थित जुन्या महापौर बंगल्याचे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात रूपांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या २०१७ च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका मंगळवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पानगाव येथील आदिवासी पारधी समाजातील दहा कुटुंबांना गावकऱ्यांनी एकमुखी ठराव संमत करून बहिष्कृत करण्याची लांच्छनास्पद घटना घडली आहे.या धक्कादायक प्रकारामुळे पारधी समाजाच्या मानवाधिकारांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध होत.या घटनेनंतर काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी हा विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.
दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे ३४ मजली इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम झाल्याबद्दल मुंबई महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने, मंगळवार दि.१ जूलै रोजी फटकारले. या प्रकरणी ‘विलिंग्डन व्ह्यू’ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य सुनील बी. झवेरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठने सुनावणीदरम्यान इमारतीच्या बेकायदेशीर बांधकामवर चिंता व्यक्त केली.
प्रख्यात लेखक, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या सीता या कादंबरीने प्रकाशनानंतर अल्पावधीतच यशाची अनेक शिखरं गाठली. अशातच आता पुन्हा एकदा या कादंबरीवर पुरस्कारांचा वर्षाव झाल्याचे दिसून येत आहे. इचलकारंजी येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकारंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्यावतीने 'सीता' या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात नागपूरच्या 'अभिव्यक्ती' वैदर्भीय लेखिका संस्थेच्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार 'सीता' या साहित्यकृतीला प्रदान करण्या
वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांवर विशेष जबाबदारी विशेष प्रतिनिधी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्धचा सिंधू जलकरार रद्द केला. आता सरकार या निर्णयाबद्दल जनतेमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवणार आहे. हा करार रद्द केल्याने आपल्या देशाला कोणते फायदे मिळू शकतात, हे सांगण्यावर केंद्र सरकारचा भर असणार आहे.
(Iran) इराण आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेला संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे. त्यातच इराणच्या उत्तरेकडील भागात शुक्रवारी २० जूनला रात्री सलग दोन भूकंपाचे धक्के जाणवल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या भूकंपाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या इस्त्रायल इराणच्या अणु केंद्रांवर हल्ले करत असल्याने, हे भूकंप इस्रायली हल्ल्यांमुळे किंवा इराणच्या अणुचाचण्यांमुळे झाले असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
इराण-इस्त्रायल युध्द पार्श्वभुमीवर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवार, दि. १६ जून रोजी अण्वस्त्र प्रसारबंदी करार (NPT) सोडण्याची घोषणा केली आहे. हा करार सोडण्यासाठी इराणी संसदेत एक विधेयक मांडले जाणार आहे, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितले आहे.
गेलेे काही आठवडे आपण बलुचिस्तान, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत इत्यादी पाकिस्तानी प्रांतांमधल्या बंडाळ्यांची स्थिती समजून घेत आहोत. एक बलुचिस्तान सोडला, तर इतर प्रांत स्वबळावर स्वतंत्र होऊ शकतील, अशी स्थिती नाही. इकडे भारताने हाणलेल्या जबर तडाख्याने पाकिस्तान घायाळ झालाय, असे भासते. पण, तिकडे पाकिस्तानी सेना नेतृत्व ‘आयएसके’ला पुढे करून बलुचिस्तानला तर चेपतेच आहे, पण अफगाणिस्तानावरही वरचढ होऊ पाहत आहे. जाणून घेऊया हा सत्तेच्या सारी
नॉर्वे चेस २०२५ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला पराभूत केले. या पराभवामुळे कार्लसनने टेबलवर हात आपटला, ह्यामुळे त्याच्या वागणुकीवर टीका झाली. त्याने गुकेशच्या खेळाची प्रशंसा केली आणि त्याचे कौतुक केल.
शासकीय कार्यालयातील ई सेवा केंद्रातून विविध शैक्षणिक दाखले तसेच न्यायालयातील प्रतिज्ञापत्रासाठी शंभर व पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरची करण्यात येणारी मागणी नियमबाह्य असल्याने, यापुढे मागणी करण्यात येऊ नये, अशी तंबी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहून दिली.
(Who is Madam N )पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि भारताविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रावर कारवाई सुरू असतानाच, या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. भारतीय इन्फ्लुएन्सर्सना पाकिस्तानात सहज प्रवेश मिळवून देणाऱ्या आणि 'आयएसआय'च्या सहाय्याने गुप्त नेटवर्क तयार करणाऱ्या एका महिलेचे नाव समोर आले आहे. नोशाबा शहजाद असं तिचं नाव असून ती ‘जय्याना ट्रॅव्हल अँड टुरिझम’ या ट्रॅव्हल एजन्सीची मालक आहे आणि पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध व्यावसायिक मानली जाते.
(Northeast floods worsen) आसामसह ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये पूरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधील पूरस्थितीही दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएम) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१ जिल्ह्यांतील ६.३ लाख नागरिक पुरामुळे बेघर झाले आहेत.
भारताने आपले पहिले ध्रुवीय संशोधन जहाज (Polar Research Vessel - PRV) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी कोलकात्याच्या ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स’ (GRSE) आणि नॉर्वेच्या कोंग्सबर्ग कंपनी यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला आहे. हा करार नॉर्वेतील ओस्लो येथे झाला. या वेळी केंद्रीय पोर्ट्स, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते.
युरोपमधील पोलंडच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या आणि अटीतटीच्या लढाईत प्रखर राष्ट्रवादी विचारांचे इतिहासकार कारोल नावरोस्की ५०.८ टक्के मतांसह विजयी झाले. त्यानिमित्ताने पोलंडच्या अध्यक्षीय निवडणुकांमधील चुरस आणि नावरोस्की यांच्यासमोरील आगामी आव्हाने यांचा आढावा घेणारा हा लेख...
आता शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवार, दि. २ जून रोजी याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, व्हॉट्सअपवर पाठवली गेलेली नोटीस ग्राह्य धरली जाणार आहे.
(Norway Chess 2025) नॉर्वेतील स्टाव्हांगर येथे सुरू असलेल्या नॉर्वे चेस २०२५ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय बुद्धिबळपटू डी. गुकेश याने माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन याला क्लासिकल फॉरमॅटमध्ये पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा गुकेशचा कार्लसनविरुद्ध क्लासिकल प्रकारातील पहिलाच विजय आहे.