खासगी विकासकाच्या भरवश्यावर न राहता स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास करता यावा यासाठी स्वयंपुनर्विकास कृती समिती, नवी मुंबईतर्फे आज, रविवार दि. २९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता स्वयंपुनर्विकास विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिराला भाजपा विधान परिषद गटनेते, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकासाचे शिल्पकार आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
Read More
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) आणि महागृहनिर्माण योजना, यांसारख्या प्रकल्पांमुळे नवी मुंबईचा वेगाने विस्तार होत आहे. याचा परिणाम म्हणून या प्रकल्प क्षेत्रांमध्ये पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याची ही वाढती मागणी पूर्ण करण्यासह नवी मुंबईच्या गतिमान विकासाला आधार देणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची आखणी सिडकोकडून करण्यात येत आहे.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोेकल रेल्वेच्या प्रवासावर मुंब्रा येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. साहजिकच मुंबईकरांच्याही लोकल रेल्वे यंत्रणेकडून सुधारणेच्या प्रचंड अपेक्षा आहेत. पण, मागील ११ वर्षांत मुंबई लोकलच्या सेवेमध्ये निश्चितच काही सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांचाच यानिमित्ताने आढावा घेणारा हा लेख...
सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड प्रकल्पाच्या अखेरच्या टप्प्यातील सीएसटी रस्त्यावरून पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला नाला येथे उभारण्यात येणाऱ्या केबल स्टे पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि अतिरिक्त महानगर आयुक्त (१) विक्रम कुमार यांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पस्थळास भेट देऊन अंतिम तयारीचा आढावा घेतला.
मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 24/2019 व रिट याचिका क्र.13864/2018 मध्ये पारीत केलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतू भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न करता वापर सुरू केलेल्या इमारतींची यादी नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेची सर्व 8 विभाग कार्यालये याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकनेते दि.बा. पाटील यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्याच्या मागणीस बळकटी देण्यासाठी मंगळवारी एक भव्य वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले. “दि.बा. पाटील नामकरण समर्थनार्थ भव्य कार, बाईक आणि रिक्षा रॅली” या उपक्रमाचे आयोजन लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आले.
मेट्रो ४च्या कामामुळे ठाण्यातील वाहतूक वळवली मुंबई मेट्रो लाईन ४ प्रकल्पांच्या अंतर्गत स्ट्रक्चरल गर्डर बसवण्याचे काम सुरु आहे. यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यानुसार, २२ जून ते १४ जुलै या कालावधीत रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत घोडबंदर रोडवरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
धारावीत सुमारे ५,००० ते ६,००० उद्योग प्रकल्प चामडी उद्योगाशी संबंधित विविध कामांमध्ये गुंतलेली आहेत. धारावीतील चर्मोद्योग व्यावसायिकांनीही आता धारावी पुनर्विकास प्रकल्पात आपला सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुनर्विकासावर चर्चा करून तोडगा निघावा, अशी केली मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे केली आहे.
"उबाठा सेनेची अवस्था धोकादायक आणि जिर्ण!" मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांची टीका शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
मुंबईतून प्रथमच शास्त्रीय स्तरावर 'इंडियन लायनफिश' माशाची नोंद करण्यात आली आहे (Lionfish in mumbai). सागरी संवर्धकांना या माशाचे दर्शन वांद्रे येथील कार्टर रोडच्या किनाऱ्यावर घडले (Lionfish in mumbai). यासंबंधीची नोंद 'आय-नॅचरललिस्ट' या आंतरराष्ट्रीय सिटीझन सायन्स संकेतस्थळावर करण्यात आली आहे. लायनफिशला शरीरावरील विषारी काट्यांसाठी ओळखले जाते. (Lionfish in mumbai)
प्रतिकुलतेवर मात करत समाजात सेवाकार्याने सकारात्मकता पेरणारे मूळचे बिदरचे, पण मुंबईत स्थायिक झालेले डॉ. ओमप्रकाश गजरे त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
शिवसेना संपली नाही म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना शहराच्या बाहेरील भागात नाही तर मुख्य शहरात घरे प्रदान करणे, हे खऱ्या समानतेच्या दिशेने एक पाऊल आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार, दि. १९ रोजी व्यक्त केले आहे. ‘एनजीओ अलायन्स फॉर गव्हर्नन्स अँड रिन्यूअल’ (NAGAR) या संस्थेनी विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली, (डीसीपीआर) २०३४ ला उच्च न्यायालयात एका याचिकेनद्वारे आव्हान दिले होते.
नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे. आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
एकीकडे मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चा सुरु असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात शरद पवारांनी मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
जागतिक संगीत दिनानिमित्त उद्या दि. २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव अंतर्गत आशा रेडिओ पुरस्कार २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ५ नामांकित आर जे देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. नरिमन पाँईट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी २ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी मान्
राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवार, १९ जून रोजी सकाळपासूनच राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई-पुण्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही पक्षांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, त्याआधीच मुंबईत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. उबाठा गटाच्या मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
अहमदाबाद येथे घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट AI171 च्या भीषण अपघातात जवळपास २७४ नागरिक मृत्यूमुखी पडले होते. हा अपघात विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे झाला असला, तरी ते विमान ज्या प्रकारे वसतिगृहाच्या इमारतीवर आदळले होते, त्याचा विध्वंस पाहून यशवंत शेणॉय यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर कुर्ल्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी, दि. १८ जून रोजी उच्च न्यायालयाला सांगितले की, उड्डाणांसा
हिंदू अस्मितेच्या जागृतीसाठी झपाटलेली संस्था म्हणजे नवी मुंबईची ‘सेवाभावी सामाजिक संस्था’, तसेच ‘स्वराज्य मावळा प्रतिष्ठान.’ या संस्था म्हणजे राष्ट्रनिष्ठा, हिंदू संस्कृतीरक्षण आणि सामाजिक समरसतेचा संगम. ‘घर-घर जिजाऊ’पासून गडकिल्ल्यांच्या सन्मानापर्यंत ते स्वसंरक्षण प्रशिक्षणांपासून रक्तदान मोहिमांपर्यंत संस्थेचे कार्य विस्तारित आहे. या संस्था म्हणजे नव्या पिढीतील मावळ्यांची हिंदुत्वाशी निष्ठावान बांधिलकी. या संस्थांनी मिळून केलेल्या उपक्रमांचा आढावा घेणारा हा लेख...
ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या मुंब्रा परिसरातील अतिक्रमण झालेल्या जमिनीवर बांधलेल्या १७ अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, त्यावर मंगळवार, दि. १७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देत याचिका फेटाळली आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देश हादरलेला असताना आता एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड झाल्याची माहिती पुढे आली आहे. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे.
राज्यभरात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आगामी वाहतूककोंडी मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रकल्पांना गती असतानाच आता बहुप्रतीक्षित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला आता राज्य सरकारकडून गती देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला २२ हजार २५० कोटी रुपये कर्जास मंजुरी दिली आहे.भूसंपादनासाठी आवश्यक कर्जासाठी राज्य सरकारने शासन हमी घेतली आहे, त्यामुळेविरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे.
एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत, भायंदर पश्चिम येथील उड्डाण पुलाजवळील अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला.
'मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी अधिकृत इरादापत्रेप्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. हे इरादापत्र प्रदान समारंभ आज शनिवार, दि. १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित
टाटा, बेस्ट, अदानीसोबत आता महावितरणलही हवीय मुंबईत वीज वितरणाची परवानगी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली भारत अंतर्गत सुरक्षेत एका नव्या स्वदेशी स्वरूपात सक्षम झाला आहे. मागच्या ११ वर्षात मजबूत झालेली अंतर्गत सुरक्षा ही देशाच्या स्थिरतेचा कणा बनली आहे. एखाद्या देशाची अंतर्गत सुरक्षा केवळ दहशतवाद आणि हिंसाचाराशी लढण्यापुरती मर्यादित नाही, तर ती त्या देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासावर देखील परिणाम करते.
आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या चार जणांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी भाडेवाढ न करता एसी ट्रेन आणण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवार, १० जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेल्या लोकल ट्रेन अपघाताच्या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्घटनेत जवळपास ५ ते ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघाताची घटना दुर्दैवी असून जखमींचा जीव वाचवण्यास आमचे पहिले प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून समोर येईल, असे ते म्हणाले.
मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेतील जखमींना उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
मुंब्रा–दिवा रेल्वे मार्गावरील घटना मन सुन्न करणारी आहे, असे म्हणत मंत्री आशिष शेलार यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून या घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४६ वर्षीय महिलेला परदेशातून महागडे गिफ्ट मिळणार असल्याचे सांगून एका सायबर फसवणूकदाराने तब्बल ४९.५९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.ही घटना गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान घडली आहे.
शहरांबद्दल बोललेल्या गोष्टींना आपल्याकडे किंमत नाही. आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे हेच या समजेनासे झाले आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंब्रा-दिवा रेल्वे अपघातावर संताप व्यक्त केला. सोमवार, ९ जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
मुंब्रा स्थानकदरम्यान घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर सर्वाच स्तरांतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईकरांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. आपली रोजीरोटी ही महत्त्वाची आहेच. पण, त्याचवेळी आपल्या घरातील मंडळी आपली वाट पाहत असते हेसुद्धा महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.
भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगर भागातून येणाऱ्या सर्व लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे लावले जाणार आहेत. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थांनकांजवळ ही घटना घडली आहे. रेल्वे प्रवासी एकमेकांना घासलेगेल्यांने ही घटना घडली आहे. गेल्या २० वर्षांत मृत्यू झालेल्यांचा ही रेकॉर्ड आहे.
रविवार, ८ जून रोजी मुंबईतील रेल्वेसेवा मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार आहे. पश्चिम, हार्बर, ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वे मार्गांवर देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.
मुंबईतील स्व. अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू हा भारतातील सर्वांत मोठा सागरी सेतू आणि कालच पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेला चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वे पूल ठरला. अटल सेतू शिवडी ते नवी मुंबईच्या पुढे न्हावा-शेवा असा तब्बल २१ किमीचा. असाच अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव देणारा दुसरा पूल आहे, तो मुंबई सागरी किनारा रस्ता, ज्यावरून पावसाळ्यात मुंबईकरांचा विलोभनीय दृश्य अनुभवत प्रवासाचा आनंद अगदी द्विगुणित होतो. मात्र, हे प्रकल्प जगभरातील अनेक प्रकल्पांतून प्रेरणा आणि अभ्यास क
मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच पथकर नाक्यांवर हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. या पथकराच्या सवलतीपोटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास भरपाई देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंगळवार, दि.3 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच पथकर सवलतीचा कालावधी दि. १७ सप्टेंबर २०२९पर्यंत वाढविण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
पहिल्या पावसात मुंबई पाण्यात गेली आणि नालेसफाईचा फुगा पुन्हा फुटला. चौफेर टीका झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर गाळ उपसा सुरू करत, बुधवारअखेर ८२.३१ टक्के गाळ उपसल्याचा दावा केला आहे.
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांमधील अंतर केवळ आठ तासांवर आले आहे . या दोन शहरांना जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या आणि महत्त्वाच्या टप्प्याचे लोकार्पण आज, गुरुवार दि.५ जून रोजी होणार असून इगतपुरी येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे या ७६ किलोमीटर अंतराच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याचवेळी सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नव्या खाडीपूल मा
खारघर पूर्वमधील तळोजा हा दक्षिण नवी मुंबईतील वेगाने विकसित होणारा नोड असून, पायाभूत सुविधा आणि विकास यामुळे त्याचे भरभराटीच्या केंद्रात रूपांतरण होत आहे. खारघर, पनवेल, कल्याण आणि डोंबिवली जवळ मोक्याच्या ठिकाणी स्थित असलेला तळोजा नोड आधुनिक सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि परवडणाऱ्या किमतीचे एक अद्वितीय मिश्रण देतो, ज्यामुळे रहिवासी आणि व्यवसायांसाठी हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे. सिडकोने विकसित करत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यामुळे तळोजा नोडचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे.
‘डेटा सेंटर्स’ ही डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची पायाभूत सुविधा. या खेळात मुंबईने लंडन आणि डब्लिन सारख्या आघाडीच्या जागतिक शहरांना मात देत, सहावा क्रमांक पटकावला आहे. डेटा सेंटर्सच्या उपयुक्ततेचे हे आकलन...
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंच्या विभागाला सूचना
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण झाले आहे. आता वाहतुकीच्या अनुषंगाने मार्ग रेषा आखणी, वाहतूक बेट, वाहतूक दिवेउभारणी कामे प्रगतिपथावर आहेत. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून लवकरच विक्रोळी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
एका रात्रीत आठ गर्डर उभारत मुंबई मेट्रोचा नवा विक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग आता पूर्णपणे सुरू होणार असून नागपूर ते मुंबईपर्यंत हा प्रवास केवळ आठ तासांत करता येणार आहे.
महानगरपालिका सेवेतून मे महिन्यात सेवानिवृत्त होणा-या ३१ अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांचा सेवानिवृत्ती समारंभ महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, परिमंडळ दोन उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, भांडार विभाग उपआयुक्त शंकर खाडे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहा. आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण, शिक्षणाधिकारी अरूणा यादव व्यासपीठावर उपस्थित होते.