नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी तसेच विविध विभांगासाठी १० महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. मंगळवार, २७ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही मंत्रिमंडळ बैठक पार पडली.
Read More
Chhagan Bhujbal takes oath as cabinet minister राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा महायुतीच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मंगळवार, दि. २० मे रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेत ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिली.
मुंबई मनपाच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेता, ठाकरेंना अचानक मुंबईबद्दल पुतनामावशीच्या प्रेमाचे कोरडे उमाळे दाटून येऊ लागले. ज्या ठाकरी कारभाराने मुंबईची बजबजपुरी केली, पालिकेत लूट आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घातले, मुंबईकरांचे जीवन असह्य केले, तेच ठाकरे आज अदानींच्या नावे मुंबईकरांची दिशाभूल करतात, हा विरोधाभास जनतेच्या नजरेतूनही सुटणारा नाही!
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून भारतीय नागरिक असल्याचा बनाव रचणार्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी महायुती सरकारने जन्म-मृत्यू नोंदणी नियमांमध्ये बदल केले आहेत. ‘घुसखोरमुक्त महाराष्ट्रा’साठी अशा बोगस ओळखीच्या पुराव्यांवरच मुळापासून घाव घातल्याने, घुसखोरांची कागदोपत्री निपज तरी थांबेल, अशी आशा...
‘विकसित महाराष्ट्रा’कडे वाटचाल करण्याच्या दिशेने राज्याने मोठे पाऊल उचलले आहे, असे महायुती सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पातील तरतुदींकडे पाहिल्यास म्हणता येईल. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी यात विशेषत्वाने काळजी घेतली गेली आहे.
दूरदर्शी विकासाचे व्हिजन लाभलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा सर्वसमावेशक अर्थसंकल्प काल विधिमंडळात सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वार्थाने समतोल प्रादेशिक विकासाला आणि सर्वसमावेशकतेला चालना देणारा ठरणार आहे. बळीराजा, उद्योजक, मच्छीमार, महिला, युवा, जनजाती अशा राज्यातील सर्व स्तरीय घटकांच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी महायुतीच्या या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित व्हावी. त्याचबरोबर पायाभूत
महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाबद्दल काय म्हणाले मंत्री नितेश राणे?
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर करण्यात आला. यामध्ये राज्याच्या प्रगतीची, तसेच राज्यासमोरील आव्हानांची सखोल मांडणी करण्यात आली आहे. याच आर्थिक पाहणी अहवालाचा घेतलेला हा धांडोळा...
Maharashtra Budget 2025 जगभरात आर्थिक तणावाची स्थिती असताना, महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटू न देता, अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. १० मार्च रोजी ७ लाख २० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. शेती, शेतीपुरक क्षेत्रे, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास आदी क्षेत्रांसाठी भरीव तरतूद त्यात करण्यात आली आहे. त्यामुळे ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प, असे त्याचे वर्ण करावे लागेल.
राज्यात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक केवळ नऊ महिन्यांतच झाली असून, कोणत्याही एका वर्षात आलेल्या गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकारच्या राजकीय स्थिरतेचे, विकासाभिमुख धोरणांचेच हे फळ आहे. राज्य वेगाने विकास करत असल्याचेच यातून अधोरेखित झाले आहे.
(MLA Abu Asim Azmi Suspended from the Maharashtra Assembly) “औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता”, असा फुत्कार काढत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानालाच आव्हान देणाऱ्या सपा आमदार अबू आझमी यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. बुधवार, दि. ५ मार्च रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सरकारने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, महिला आणि मुलींमध्ये एचपीव्ही लसीकरण करण्याचा विचार सुरू केला आहे, ही एक महत्त्वाची बाब आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या लसीकरणासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची भूमिका जाहीर केली असून, या निर्णयामुळे राज्यातील महिला आरोग्याच्या संरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
(Chandrashekhar Bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी विधानसभा विजयाबद्दल बावनकुळेंचे अभिनंदन केले.
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारचे ( Mahayuti ) खाते वाटप जाहीर झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण, तर अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. गृह मंत्रालयासह ऊर्जा, विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, तसेच माहिती आणि जनसंपर्क विभाग हे विभाग मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले आहेत.
(Eknath Shinde) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी १७ डिसेंबर रोजी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी फडणवीसांना पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा भेट झाली असे सांगण्यात आले असले तरी राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरु आहे. या भेटीचे वेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि भाजप यांचे राजकीय संबंध पूर्ववत होऊन ते पुन्हा एकत्र येतील, अशा चर्चां सुरु आहेत. याबाबत उ
मुंबई : 'झिरो पेंडंन्सी'साठी परिचित असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात सचिव ( Secretary ) पदावर करण्यात आली आहे. याआधी ते उपमुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर कार्यरत होते.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा भव्यदिव्य सोहळा ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच या शपथविधीला दहा हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार असून त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद ही एक तांत्रिक व्यवस्था आहे. आम्ही तिघेही एकत्रितपणे निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. बुधवार, ४ डिसेंबर रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी मिळून सत्तास्थापनेबाबतचे पत्र दिले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आम्ही सगळे महाराष्ट्राचा नावलौकिक सांभाळत देशात नंबर एकचे राज्य बनवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. बुधवार, ४ डिसेंबर रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी मिळून सत्तास्थापनेबाबतचे पत्र दिले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांच्या नावाची शिफारस करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. बुधवारी महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला असून गुरुवार, ४ डिसेंबर रोजी सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान, महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली.
महायुती सरकारच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी सुरु असून महायूतीच्या नेत्यांकडून या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासह अनेक नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली.
मराठवाडा जातीयवादी नाही, मराठा-ओबीसी-अन्य जाती अशी फूट पाडून राजकीय पोळ्या भाजणार्या नेत्यांना व पक्षांना मराठवाडा थारा देत नाही, याचे प्रत्यंतर दाखवून देणारी 2024 सालची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली. निवडणुकीच्या प्रारंभी निश्चित करण्याचा प्रयत्न झालेला ‘जरांगे फॅक्टर’ पूर्णतः निष्प्रभ करत संपूर्ण समाजाने एकजुटीने मतदान केले आणि जातीभेदांच्या भिंती उभारण्याचा जाणत्या नेत्यांचा प्रयत्न पूर्णतः हाणून पाडला. ‘जिहादी’ मानसिकतेला खतपाणी घालून आणि हिंदू समाजात फूट पाडून यश मिळविण्याचा लोकसभ
विधानसभा निवडणूका पार पडल्या आणि आता सर्वांच्याच नजरा निकालाकडे लागल्या आहेत. दरम्यान, अशातच राज्यात १०० टक्के महायूतीचे सरकार येणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : “महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या आणि मुंबईत शपथविधीची तयारी करा,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी मुंबईकरांना केले. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सुनिल राऊत यांच्या पराभवाचा वीडा उचललेल्या सुवर्णा करंजे यांच्याशी साधलेला विशेष संवाद.
नागपूर : भाजपा महायुती विधानसभा निवडणूक विकासासाठी लढत आहे तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमधील ( MVA ) नेते मुख्यमंत्री होण्यासाठी निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा रोज बदलत असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महाराष्ट्राच्या भल्यासाठी महायुतीचा एक-एक उमेदवार विधानसभेत पोहचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
रिपोर्ट कार्ड देण्याकरिता धाडस लागतं. त्यासाठी काम करावं लागतं, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे. बुधवारी महायूती सरकारने संयुक्त पत्रकार परिषद घेत दोन वर्षांतील कामांचं रिपोर्टकार्ड सादर केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
(Mahayuti Sarkar) महाराष्ट्र राज्यात बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाकडून विधानसभा निवडणुक २०२४ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
( Mumbai Toll Exemption )एकापेक्षा एक महत्त्वाकांक्षी निर्णयांचा धडाका लावलेल्या महायुती सरकारने सोमवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी मुंबईकरांना अनोखी भेट दिली. मुंबईतील पाच प्रवेशमार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सोमवारी मध्यरात्री १२ वाजेपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
(Mukhyamantri Vayoshri Yojana) मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर महायुती सरकारने राज्यातील वयोवृद्धांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री वयोश्री योजने' अंतर्गत १४ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या ४ लाख १२ हजार ११३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे प्रति लाभार्थी ३ हजार प्रमाणे १२३.६३ कोटी रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे.
(Atul Save)"अनेक दिवसांपासून गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात घरे बांधण्यात येत आहे. आजमितीला गिरणी कामगारांचे १ लाख ६५ हजार अर्ज अर्ज प्राप्त झाले. त्यात कामगार विभागाने १ लाख १८ हजार अर्ज वैध ठरविले. त्यामुळे या वैध अर्जाचा विचार करण्यात येत आहे. यापुढेही जास्तीत जास्त घरे बांधण्याचा आमचा मानस आहे", असे प्रतिपादन गृहनिर्
सर्वांगीण विकासापासून कोसो दूर असलेल्या बंजारा समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘बार्टी’च्या धर्तीवर 'वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था' (वनार्टी) स्थापन करण्याचा निर्णय सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर अमित गोरखे यांनी २५ हून अधिक जिल्हे आणि १५० हून अधिक तालुक्यांतील नागरिकांशी 'बहुजन संवाद यात्रे'द्वारे संपर्क साधला असून, ठिकठिकाणी या यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा बघावा. ज्या काश्मीरमध्ये ज्या ‘कलम ३७०’ मुळे काश्मीर भारतापासून वेगळे झाले होते. ते ‘कलम ३७०’ रद्द करणारे मोदी यांच्यासोबत गृहमंत्री अमित शाह आहेत.
विधानसभेवर पून्हा एकदा महायूतीचाच झेंडा फडकेल, असा विश्वास भाजप नेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने विविध सर्व्हे पुढे येत आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी बुधवारी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.
शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना या आरोग्य योजनांचा लाभ मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडली. त्यानंतर पुणे येथे पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी आपल्या पहील्या उमेदवाराची Sunil Tatkare Raigad घोषणा केली आहे. यावेळीच अजित पवार यांनी महायुतीच्या सर्व जागांच्या घोषणेसाठी निश्चित तारखेची माहीती दिली.
दिनांक २८ मार्चला एकत्रित महायुतीची ( mahayuti candidates ) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल. आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
देशात लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये देशात लोकसभा निवडणूका होणार आहेत. निवडणूकांच्याआधी कोणाची सत्ता येईल. याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सुद्धा वेगवेगळे दावे करत आहेत. त्यातच आता टाईम्स नाऊ नवभारतच्या सर्व्हेक्षणामध्ये २०२४ लोकसभा निवडणूकीत कोणाचे पारडे जड असेल याविषयी आपल्या सर्व्हेक्षणामध्ये अंदाज बांधला आहे.
महाराष्ट्रात सूर्यास्तानंतर ही महायुती दिसेल
भाजप कोअर कमिटीची 'वर्षा'वर बैठक सुरू