एकीकडे मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चा सुरु असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात शरद पवारांनी मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
Read More
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशिव या चार जिल्ह्यातील कांग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला खिंडार पडले आहे. मंगळवार, १७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता करात वाढ झाल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी आता यावरून तत्कालिन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. शुक्रवार, ३० मे रोजी त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत मविआ सरकारचा भ्रष्ट कारभार उघड केला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार प्रविण दरेकर यांना अटक करण्याचा प्लॅन असल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, ११ मार्च रोजी केला. मुंबई शहरातील अभ्युदय नगर येथील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५१ व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
उबाठा गटाचे आणि मविआचे १० ते १२ आमदार टप्प्याटप्प्याने शिंदेंचे नेतृत्व स्विकारणार, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला धडा शिकवला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पददेखील त्यांना मिळू नये, अशी तजवीज केली. तरीदेखील हे पद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची विशेषतः उबाठा गटाची धडपड सुरू असल्याचे दिसते. मुळात या पदासाठी अपेक्षित संख्याबळ नसताना, असे धाडस करणे मूर्खपणाचेच. पण, देवेंद्र फडणवीस दया दाखवतील, या एकमेव आशेने उद्धव ठाकरे धडपडताना दिसतात. फडणवीसांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणार्या उद्धवरावांनी त्यासाठीच तर नागपुरात त्यांची भेट घेतली. ते देवेंद्र फडणवीस होते म्हणून
मुंबई : दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadanvis ) यांनी महाराष्ट्रासाठी तब्बल १५ लाख, ७० हजार कोटी गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार केले. त्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आक्षेप घेतला जात आहे. मात्र, हीच मविआ जेव्हा सत्तेत होती, तेव्हा त्यांना केवळ ८० हजार कोटींचे परकीय गुंतवणुकीचे करार करता आले. त्यांच्या तुलनेत फडणवीसांनी २० पट अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे.
नाशिक जिल्ह्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रातून महायुतीने महाविकास आघाडीला ( MVA ) धोबीपछाड दिल्यानंतर, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मविआची नौका किनार्याला लागण्यापूर्वीच बुडण्याच्या मार्गावर आहे. एक-एक करुन मविआतील तिन्ही घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत असून, उबाठा आणि काँग्रेसला चांगलीच गळती लागली आहे. ज्यांची पूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली, अशा उत्तम कांबळे यांचा मुलगा जॉय कांबळे यांनी नुकताच काँग्रेसचा ‘हात’ सोडत, हाती शिवबंधन बांधले. त्यांच्या पाठोपाठ ३० व
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा नारा उबाठा गटाने दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिल्याचे संजय राऊतांनी शनिवार, ११ जानेवारी रोजी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत फाटाफूट झाल्याची शंका उपस्थित करण्यात येत आहे.
महाविकास आघाडी एकत्र लढणार की, वेगळी लढणार याकडे आमचे लक्ष नसून महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शनिवार, ११ जानेवारी रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जागावाटपात घालवलेला वेळ हेदेखील महाविकास आघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. परंतू, हा वेळ घालवण्यामागे काही षडयंत्र होते का? असा संशय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार, १० जानेवारी रोजी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांवर पराभवाचे खापर फोडले.
विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तीन पक्षात अजिबात समन्वय राहिलेला नाही, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होणार का? या चर्चांना उधाण आले आहे.
कालपर्यंत ईव्हीएम मशीनला दोष देणारे आता वस्तुस्थितीवर आलेत, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. शुक्रवार, १० जानेवारी रोजी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाला. निवडणूक निकाल लागल्यानंतर मविआला निकालावर विश्वासच बसेना. त्यानंतरही मविआतील उखाळ्या पाखाळ्या निघायचे काही थांबेना. उबाठा गटाची गत तर कुणीही यावं आणि टपली मारून जावं, अशी. आमदारकीची शपथ घेण्यासाठी उबाठा गटाने चांगलेच आढेवेढे घेतले.
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत त्यांना डिवचले आहे.
काँग्रेस नेतृत्वहीन असून त्यांचे विचार स्पष्ट नाहीत, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी केली आहे. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने ईव्हीएम मशीनवर आरोप करण्यात येत आहे. यावर आता केशव उपाध्येंनी आपल्या 'X' अकाऊंटवरून त्यांना प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेला कौल विरोधकांच्या पचनी पडल्याचे दिसत नाही. हा निकाल स्विकारणार नसल्याची भूमिका काही जणांनी मांडली असून ईव्हीएम वर आपल्या अपयशाचे खापर फोडले जात आहे. अशातच आता यूट्यूबर अभिसार शर्मा खोट्या आकडेवारीचा आधार घेत जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करीत आहेत.
Uddhav Thackeray स्वतंत्र लढणार? कार्यकर्त्यांचं म्हणणं काय?
पक्ष संघटनेची बांधणी, लोकाधार या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव का झाला ? Prithviraj Chavan | Maha MTB
(Radhakrishna Vikhe Patil) मुंबईतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील गुरुवार २८ नोव्हेंबरपासून आपल्या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यांनी अहिल्यानगरमधील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांसहीत मविआला खडेबोल सुनावले.
विदर्भातून महाविकास आघाडी हद्दपार!
विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर उबाठा गटाच्या पराभूत आणि विजयी उमेदवारांची मंगळवारी मातोश्रीवर बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीत उमेदवारांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र लढण्याची आग्रही मागणी केली आहे. अंबादास दानवेंनीदेखील या मागणीला दुजोरा दिला आहे.
महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी कोराडी(नागपूर) येथील जनसंपर्क कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Uddhav Thackeray Lose सिंधुदुर्ग: ग्रामपंचायतीची निवडणूक असो, विधानसभा किंवा लोकसभा, तळकोकणात राजकीय शिमगा ठरलेलाच. नारायण राणे जेव्हापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हापासून इथल्या सर्व निवडणुका त्यांच्याभोवती फिरू लागल्या. काँग्रेसमध्ये असताना, एकवेळ त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला, तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यांच्या विजयामुळे कोकणात पहिल्यांदाच भाजपचे ‘कमळ’ फुलले.
भाजप-महायुतीने उत्तर महाराष्ट्राचा आपला बालेकिल्ला यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही शाबूत ठेवला आहे. केवळ शाबूतच नव्हे, तर यंदा हा बालेकिल्ला आणखी मजबूत झाल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले. उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश असून विधानसभेचे एकूण 47 मतदारसंघ या भागात मोडतात. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीतही या विभागात भाजप-महायुतीचाच वरचष्मा पहायला मिळाला होता.
नाशिक : संपूर्ण नाशिक ( Nashik ) जिल्ह्यातून महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारत हद्दपार करण्याचे काम केले आहे. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ झालेला सामना महायुतीने १५ पैकी १४ जागा असा जिंकला आहेत. तर मालेगाव मध्य या एका जागेवर एमआयएमने अपक्ष उमेदवाराचा पराभव करत ७५ मतांनी निसटता विजय मिळवला. शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांवरून नाशिक जिल्हा भगवामय झाल्याचे दिसून आले. दरम्यान, शेतकरीबहुल असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा देताना वीजबिल माफ केले. तसेच लोकसभेला
(Sana Malik and Nawab Malik) २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा महानिकाल आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. तसेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
(Ajit Pawar) महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा महानिकाल आज जाहीर होणार आहे
राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून महायूतीने २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी मात्र, ५१ जागांवर पिछाडीवर आहे. दरम्यान, हा आकडा पाहून उबाठा गटाच्या संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे आपले रडगाणे सुरु केले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत हा निकाल लावून घेतला असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : राज्यात महायुतीला लाडक्या बहिणींनी ओवाळणी म्हणून विजयाची माळ गळ्यात टाकली आहे. महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. महायुती २८८ जागांपैकी २२४ जागांवर महायुतीला कौल मिळाला आहे. महायुतीच्या ( Mahayuti ) दिग्गज उमेदवारांना लाडक्या बहिणींचा आशीवार्द मिळाला आहे. तेच दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीचा खेळ केवळ ५४ जागांवर आटोपला आहे. इतर आणि अपक्ष मिळून १० जागा आहेत. बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी संपुर्ण महाराष्ट्र राज्यात मतदान झाले असून शनिवार
Panvel Vidhansabha Election 2024 राज्याच्या विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल २३ नोव्हेंबर रोजी सुरू आहे. राज्यातील १८८ विधानसभा जागांवर महायुती, महाविकास आघाडी, तिसऱी आघाडी आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. अशातच पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार आणि उमदेवार म्हणून प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांचा संधी देण्यात आली. अशातच प्रशांत ठाकूर यांची विक्रमी आघाडी आहे.
नाना पटोले मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार आहे. ते कधीच शक्य होणार नाही, अशी टीका भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वातच महाविकास आघाडीचे सरकार बनणार असल्याचे वक्तव्य नाना पटोलेंनी केले होते. यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.
विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची खलबते सुरु आहेत, असा खोचक टोला शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला आहे. विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर मविआतील बैठकांना वेग आला आहे. यावर शिरसाटांनी टीका केली.
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत नाही तर महाराष्ट्रातच होईल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. विधानसभा निवडणूकीचे निकाल लागण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरु झाला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले आणि संजय राऊतांकडून मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळणार असून आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी केला आहे. विधानसभा निवडणूकीनंतर विविध एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात पून्हा एकदा महायूतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
(Solapur) सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर दक्षिण मतदारसंघात मतदानाच्या दिवशी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ऐनवेळी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde)आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघातील उबाठाचे अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना पाठिंबा दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे गट आक्रमक झाला असून येथील उबाठाचे स्थानिक नेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी प्रणिती शिंदे यांना इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी राज्यभरात मतदान पार पडले. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. मात्र, त्याआधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा घमासान सुरु झाले आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक वॉर पाहायला मिळाला.
महाराष्ट्रात जर पुन्हा मविआचे सरकार आले, तर काय होईल, याचे संकेत स्पष्ट उद्धव-आदित्य ठाकरे या पितापुत्रांच्या जोडगोळीने आपल्या प्रचारादरम्यानच्या भाषणांतून दिले. विरोधकांवर सूडबुद्धीने कारवायांच्या धमक्यांपासून ते त्यांना बर्फाच्या लादीवर लोळवण्यापर्यंतचे हे क्रूर, विद्ध्वंसक विचार या कुटुंबाच्या सत्तेसाठीच्या तडफडीचीचेच द्योतक!
(Vasant Gite) महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच व्होट जिहादच्या मुद्द्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सगळ्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा व्हिडीओ आमदार नितेश राणेंनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांउटवर शेअर केला आहे.
महाविकास आघाडी धर्माचा वापर करून वोट जिहाद करत आहे. देशाच्या इतिहासात निवडणूकीमध्ये इतके लांगूलचालन आम्ही बघितले नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सज्जाद नोमानी यांचा वादग्रस्त व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून यावर राजकारण तापले आहे.
(President's Rule) महाराष्ट्रात २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या काही घटना घडल्या. राष्ट्रपती राजवट लागू झाली, पहाटेचा शपथविधी होऊन औटघटकेचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर पुढच्या अडीच वर्षाच्या काळात राजकीय वर्तुळात सुरू झालेली नाट्यमय घडामोडींची मालिका अजूनही सुरूच आहे. परंतु या सर्व घडामोडींना कारणीभूत असलेली राष्ट्रपती राजवट कुणामुळे लागू झाली या मुद्यावर आता उपमुख्यमंत्री द
Sajjad Nomani विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांची गोळाबेरीज करण्यासाठी मविआ वाटेल ते करेल याची प्रचिती पहिल्यांदाच आली नाही. वक्फ बोर्डाचे प्रवक्ते नोमानी यांनी महाविकास आघाडीला निवडून देण्यासाठी त्यांनी आपल्या काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. मात्र आता त्याच अटी आणि शर्थी देशविघातक असल्याचे संकेत दिसून येत आहेत. वक्फ बोर्ड दुरूस्ती करण्याच्या विधेयकाला विरोध केला आहे.
ठाणे : महाराष्ट्रात डबल इंजिनच्या सरकारने उत्तम काम केले असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास धरतीवर अवतरला आहे. तर, विरोधक आघाडी बनवुन सर्व प्रकल्प रोखण्याचे तसेच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम करीत आहेत. तेव्हा, येत्या २० तारीखला यांना रोखण्याचे काम करून जनतेने कायमचे घरी बसवावे. असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जगतप्रकाश (जे.पी.) नड्डा ( J P Nadda ) यांनी केले.
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडीओ शेअर करत 'उघडा डोळे, बघा नीट' असे आवाहन जनतेला केले आहे. तसेच एक है तो सेफ है, या घोषणेचाही त्यांनी उल्लेख केला.
Chhatrapati Shivaji Maharaj राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सभा होत आहेत. या सभांमध्ये विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे इचलकरंजी येथील प्रचारासाठी गेले असता त्यांनी दोनवेळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(Devendra Fadnavis) “आपली जी महायुती आहे, ती गती आणि प्रगतीची आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती आहे,” अशा शब्दात महायुती आणि महाविकास आघाडीमधील फरक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी पेण येथे स्पष्ट केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी योजना राबवून राज्यात महायुतीचे सरकार गतिमान पद्धतीने काम करीत आहे. या सरकारला साथ देत महायुतीचे उमेदवार आ. रविशेठ पाटील यांना निवडून द्या,” असे आवाहनही त्यांनी केले.
(CM Eknath Shinde) “महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून टाकले,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, “या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहाता महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे,” असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष भाजपने आपले संकल्पपत्र जाहीर केले असून महायुती सरकारच्या माध्यमातून गती देण्यात येणाऱ्या मेट्रो, रेल्वे, हवाई आणि रस्ते प्रकल्पांना गती देण्याची घोषणा केली आहे. इतकेच नाहीतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडविणाऱ्या आणि प्रगतीपथावर असणाऱ्या अनेक प्रकल्पांना गती देणार असल्याची माहितीही दिली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रानाम्यामध्ये मात्र पायाभूत सुविधा प्रकल्पांचा विसर पडल्याचे चित्र दिसून येते आहे. मविआच्या
महाविकास आघाडीने पंचसुत्री आणली. पण ही तर थापासुत्री आहे. थापा मारणाऱ्या थापाड्यांनी आमचा वचननामा कॉपी पेस्ट केला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीगरमध्ये महायूतीची प्रचारसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
छत्रपती संभाजीनगर नावाचा सर्वात जास्त त्रास काँग्रेस आणि आघाडीला झाल, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. गुरुवार, १४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महायूतीची प्रचारसभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.