भावनिक आणि प्रेरणादायी अशा “आता थांबायचं नाही!” या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवल्यानंतर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेतील श्रमिकांच्या संघर्षमय आणि स्फूर्तिदायक प्रवासावर आधारित असलेला हा चित्रपट सध्या IMDb वर ८.८ इतक्या उत्तम रेटिंगसह प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वैचळ यांनी केलं असून, त्यांनी याच चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. चित्रपटात भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आशुतोष गोवारिकर यांच्या महत्त्वपूर्ण भ
Read More
(Parliament Monsoon Session 2025) संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी दि. ४ जून रोजी दिली आहे. २१ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान संसदेचे हे पावसाळी अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात देशातील विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
(PM Narendra Modi Assures Response To Pahalgam Terror Attack) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. केंद्र सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार धरत पाकिस्तानची राजकीय कोंडी करण्यास सुरुवात केली असतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना "दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना आणि त्यांच्या कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीक
Pope Election Process : रोमन कॅथलिक चर्चचे ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनने दिलेल्या व्हिडिओ संदेशातून त्यांच्या निधनाचे बातमी देण्यात आली आहे. पोप फ्रान्सिस यांच्यावर गेल्या बऱ्याच काळापासून उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती आधी ढासळली होती पण नंतर हळूहळू त्यांच
(Pope Francis Death) रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती देताना व्हॅटिकनकडून एक व्हिडीओ संदेश देण्यात आला आहे, ज्यात म्हटले आहे की, 'सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचले. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला जीवनमूल्ये शिकवली. तसेच धैर्य आणि प्रेमाचा संदेश दिला आहे
(Dawoodi Bohra Delegation meets PM Modi) सध्या देशात वक्फ सुधारणा कायद्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटना या कायद्याच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता दुसरीकडे दाऊदी बोहरा समुदायाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी दि. १७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत वक्फ दुरुस्ती कायद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले आहेत. यावेळी त्यांनीही हेही सांगितले की, ही त्यांच्या समुदायाची दीर्घकाळापासूनची मागणी होती.
(Murshidabad Violence) वक्फ कायद्यावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारात बांगलादेशी गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे. याबाबतच प्राथमिक चौकशी अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. या अहवालातून असे समोर आले आहे की, या हिंसाचारात बांगलादेशी गुन्हेगारांचा सहभाग असून त्यांना स्थानिक नेत्यांची मदत मिळाल्याचे समोर आले आहे. पुढे हेच घुसखोर नियंत्रणाबाहेर गेल्याने परिस्थिती आणखी बिकट होत गेली.
(Tensions in West Bengal's South 24 Parganas) पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या हिंसाग्रस्त भागातील परिस्थिती नियंत्रणात असताना, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात भांगर येथे सोमवारी १४ एप्रिल रोजी वक्फ कायद्याविरोधात काढलेल्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार उसळला. या ठिकाणी इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF) चे समर्थक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याने अनेकजण जखमी झाले आणि आंदोलकांकडून पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण संविधान निर्माते म्हणून ओळखतो मात्र डॉ. बाबासाहेब हे फक्त संविधानापुरते मर्यादित नसून त्यांची ओळख ही आणखीनही उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कार्य रत्नांनी जडलेली आहे. त्यावर विशेष प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. म्हणून डॉ .बाबासाहेबांकडे पाहताना बाबासाहेबांचे इतरही उल्लेखनीय कार्य जसे की "हिंदू कोड बिल", औद्योगिक क्षेत्रातील बदल, स्त्रियांसाठीचे कायदे, कामगार कल्याणासाठी केलेल्या तरतुदी अर्थतज्ञ बाबासाहेब, पाणी तज्ञ बाबासाहेब अशा एक ना अनेक आर्थिक, सामाजिक आणि
(Mehul Choksi Arrested) पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या विनंतीवरून शनिवारी १२ एप्रिलला बेल्जियममध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. हिऱ्यांचा व्यापारी असणारा मेहुल चोक्सी कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. पंजाब नॅशनल बँकेत१३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे.
(PM Narendra Modi On Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. १४ एप्रिल रोजी हरियाणा दौऱ्यावर आहेत. सकाळी दहा वाजता त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी विमानतळावरच जाहीर सभेला संबोधित केले. दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकाला काँग्रेसच्या विरोध करण्यावरुन "काँग्रेस त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम व्यक्ती का करत नाही?" असा खोचक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला.
(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(Tahawwur Rana kept Highly Secure NIA Cell) २००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला गुरुवारी अमेरिकेतून प्रत्यार्पणानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीतील एनआयए मुख्यालयात, एक लहान, कडक सुरक्षा असलेला कक्ष आहे, जो आता गेल्या काही वर्षांतील भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल दहशतवाद तपासाचे केंद्र बनला आहे. फक्त १४ फूट बाय १४ फूट आकाराच्या या कक्षात - सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली आण
(Air India Airlines 'Pee-gate' 2.0) एअर इंडिया एअरलाईन्सच्या विमानातील गैरवर्तनाची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-बँकॉक विमानामध्ये एका भारतीय नागरिकाने जपानी सहप्रवाशावर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात केबिन क्रूने यावर तातडीने कारवाई केली असून भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाला ही बाब कळवल्याचे म्हटले आहे.
(Akashwani Amdar Nivas) मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत धोत्रे असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून ते ६१ वर्षांचे होते. त्यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
(Mumbai Water Shortage Crisis) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत असून सध्या या धरणांत मिळून ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यातच तापमानवाढीमुळे बाष्पीभवन होऊन धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट तयार झाले आहे. पावसाळ्यापर्यंत हा पाणीसाठा पुरेसा नसल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने तत्पूर्वीच राज्य सरकारकडे राखीव पाणीसाठ्याची मागणी केली आहे.
(Tanisha Bhise Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे. भिसे कुटुंबाकडून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
(WAQF Amendment Bill Passed In Rajya Sabha) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर गुरुवार, दि. ३ एप्रिल रोजी राज्यसभेत सादर करण्यात आले. प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर मध्यरात्री हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे रुपांतर कायद्यात होईल.
नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत.
(Waqf Amendment Bill in Rajya Sabha) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहे. या सुधारित विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते मिळाली. त्यामुळे बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर झाले. आज म्हणजे गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी हे सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे.
(Supreme Court judges now need to declare assets) सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी आपली संपत्ती जाहीर करावी, असे निर्देश सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी दिले आहेत. संपत्तीचे तपशिल न्यायालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातून जळालेल्या अवस्थेत रोकड सापडली होती. त्या प्रकरणाची चौकशीही सुरु आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सिनेक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत, समाजभान जपणार्या वनिता राजे गडदे यांची गोष्ट...
यापूर्वीच्या लेखांतून भारतातील खगोलशास्त्र, गणितशास्त्र आणि एकूणच वैज्ञानिक प्रगतीचा आपण आढावा घेतला. पण, परकीय आक्रमणांच्या पलीकडेही भारतीय विज्ञान परंपरा विस्मृतीत जाण्यामागे अनेक कारणे आहेत. आजच्या लेखातून या विज्ञान परंपरेच्या विस्मृतीच्या कारणांचा केलेला हा उहापोह...
आर्थिक असमानता ही केवळ भारताची चिंता नसून, संपूर्ण जगाला हा प्रश्न भेडसावत आहे. स्वित्झर्लंडसारख्या श्रीमंत देशातही, मूठभरांच्या हाती देशाची संपत्ती एकवटली आहे. भारतीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी, म्हणूनच केंद्र सरकार ठोस उपाययोजना राबवताना दिसून येते.
(Hearing on Prashant Koratkar's Bail Application) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात कोल्हापूर सत्र न्यायालयात प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात झाली आहे. प्रशांत कोरटकरला व्हिडिओ कॅान्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने मागील सुनावणीत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती. यानंतर आज प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पा
भारतीयांनी वैदिक काळात स्थापत्य, ज्योतिष, खगोलशास्त्र, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये अपार असे ज्ञान आणि कौशल्य संपादित केले होते. दीर्घकाळापर्यंत भारतीय या ज्ञानाचा दैनंदिन वापर करत होते. मात्र, इंग्रजी आक्रमणानंतर त्यात खंड पडला. तेव्हा अशाच काही भारतीय वैज्ञानिक संशोधन परंपरांचा पुनःपरिचय करुन देणारा हा लेख...
पूर्वी जगातील एकमेव हिंदूराष्ट्र असलेले नेपाळ, आता पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या बुलंद आवाजाने दुमदुमून गेले आहे. नेपाळी नागरिक मोठ्या संख्येने राजेशाही आणि हिंदूराष्ट्राच्या पुनर्प्रस्थापनेसाठी ओली सरकारविरोधात एकवटले आहेत. त्यानिमित्ताने नेपाळचा हिंदूराष्ट्र ते सेक्युलर राष्ट्र हा धार्मिक, राजकीय, सामाजिक इतिहास विशद करणारा हा लेख...
देव, देश आणि धर्मासाठी झटणारा, स्वातंत्र्ययोद्धा आणि संस्कृतीरक्षक असा भटके-विमुक्त समाजबांधवांचा पूर्वेतिहास आहे. समाजबांधवांना यथोचित सन्मान मिळावा, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातात. या अनुषंगाने समाजासाठी दि. २० फेब्रुवारी व दि. २१ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील गिट्टीखदान भागातील मैदानावर ‘भटके-विमुक्त कल्याणकारी परिषद’, विदर्भ प्रांतद्वारा बिर्हाड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा मागोवा घेणारा हा लेख...
( Disha Salian Case) दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेऊन दिशा सालियन हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. आहे. दरम्यान, सतीश सालियन आणि वकील निलेश ओझा यांनी ही तक्रार केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणात उद्धव ठाकरेंनी प्रकरण दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
(Prashant Koratkar Arrest in Telangana)प्रशांत कोरटकरला तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आल्याची माहिती माध्यामांमधून समोर आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प हा महाराष्ट्र सरकारचा कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी व विदर्भातील जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प. आजच्या जागतिक जल दिनानिमित्ताने महाराष्ट्राचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीष महाजन यांचा वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा विविध पैलू उलगडणारा हा लेख...
कम्युनिस्ट पक्षांनी आजवर जी अयोग्य धोरणे राबविली, त्याच्या परिणामस्वरुप केरळ हे आज देशातील सर्वाधिक महागाईने उच्चांक गाठलेले राज्य म्हणून समोर आले आहे. अर्थशून्य कारभारात सुधारणांऐवजी आपल्या चुकांचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा धडाकाच लावलेल्या, अशा या सर्वाधिक साक्षर राज्याचे भवितव्य म्हणूनच अंधकारमय!
मार्च महिना म्हटला की, कॉर्पोरेट क्षेत्रात कर्मचार्यांना वेध लागलेले असतात ते पगारवाढीचे आणि व्यवस्थापनाचे लक्ष असते ते कर्मचार्यांच्या वार्षिक कामगिरीच्या मूल्यमापनाकडे. याबरोबरच काही कंपन्या वर्षभर सामाजिक वा परोपकारी क्षेत्रात आपल्या कर्मचार्यांनी त्यांच्या इच्छेनुसार काम करावे, यासाठी देखील प्रयत्नशील असतात. तेव्हा, कॉर्पोरेट क्षेत्रातील अशाच या आगळ्यावेगळ्या प्रोत्साहनाविषयी...
वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच वन विभागाचे सुवर्णपदक मिळालेले विभागीय वन अधिकारी डॉ. सुजित नेवसे यांच्याविषयी...
मागील श्लोक क्रमांक १८८ मध्ये स्वामींनी सांगितले आहे की, “विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे।” समर्थांनी दासबोधात व मनाच्या श्लोकांत भक्तिमार्गाची महती सांगितली आहे. मनाच्या श्लोकात सुरुवातीसच राघवाचा पंथ प्रतिपादन करताना समर्थ म्हणतात की, “मना सज्जना भक्तिपंथेचि जावे।” (श्लोक क्रमांक २). समर्थांनी विवरण केलेल्या भक्तिपंथात स्वरूपाचे, रामाचे अनुसंधान कायम ठेवून ‘विभक्त नव्हे तो भक्त’ असे ऐक्य साधूनच उपासना करावी लागते. ल. रा. पांगारकर म्हणतात त्याप्रमाणे, हे श्लोक म्हणजे सगुण-निगुर्णातीत परब्रह्माचा अभ्यास आहे. त
आता सुदर्शनचक्र काय ते पाहू. नावच आहे ‘सु-दर्शन’, म्हणजे साधकाला जी चक्रगती ‘सु’ म्हणजे चांगली वाटते, त्या दिव्य चक्रगतीला भगवान वेदव्यास ‘सुदर्शन’ असे म्हणतात. शरीराबाहेर जाताना साधारण साधकाला क्लेष होतात. कारण, त्यात त्याचे भौतिक मरण असते. म्हणून शरीराबाहेर जाताना दिसणार्या त्या दिव्य चक्राची अपसव्य (डावीकडे फिरणारी) गती सुदर्शनीय नसते. कारण ती जीवात्म्याला जड शरीरापासून विलग करीत असते, तर शरीरात पुनर्प्रवेश करताना जी सव्य चक्रगती (उजवीकडे फिरणारी) दिसते. तीच साधारण साधकाकरिता सु-दर्शनीय होय. म्हणून व्या
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आपल्या स्वप्नांच्या दिशेने गरुडझेप घेणार्या सावित्रीच्या लेकीची कथा..."संघर्ष हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा भाग आहे, त्यावर फक्त बोलून उपयोग नाही. आपल्यासमोर येणार्या प्रत्येक अडचणींवर आपण विचारपूर्वक काम करायला हवे.” रेश्मा आरोटे यांचे हे वाक्य त्यांच्या संघर्षसंचितातून आलेले.
आज गणितातील प्रमेये, सिद्धांत हे पाश्चात्त्य गणिततज्ज्ञांच्या नावे असले, तरी भारतीय गणिती परंपरा ही ज्ञानसमृद्ध आणि काळाच्या पलीकडचा विचार करणारी होती. परंतु, दुर्दैवाने वसाहतवाद आणि युरोपीय वंशश्रेष्ठत्वाच्या सिद्धांतामुळे प्राचीन भारतीय गणिती परंपरा पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्यामुळे ती काहीशी अडगळीत पडली. पण, आज सर्वच क्षेत्रांत भारतीय ज्ञानपरंपरेचे पुनर्जागरण होत असताना, गणिती परंपरेचा समृद्ध वारसाही प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे, त्याचा प्रचार-प्रसार करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, भारतीय गणित
मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालय आणि एम. ए. पोदार रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावर कार्यरत असलेल्या डॉ. संपदा संत यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...
भारत हा २०२८ पर्यंत जगातील सर्वांत मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपास येईल, असा विश्वास ‘मॉर्गन स्टॅनली’ने नुकताच व्यक्त केला आहे. वाढ अशीच होत राहिली, तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार २०३५ पर्यंत १०.३ ट्रिलियन डॉलर्स इतका असेल. त्यानिमित्ताने अर्थचिंतन...
यंदा देशात बहुतांश ठिकाणी होळी आणि धुलिवंदनाचा सण शांततामय वातावरणात पार पडला असला तरी, झारखंडमध्ये मात्र धर्मांधांनी हिंदूंच्या मिरवणुकीवर केलेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले. पण, त्याहीपेक्षा शरमेची आणि तितकीच धक्कादायक बाब म्हणजे, सोरेन सरकारने हिंदूंवर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि धर्मांधांना पाठीशी घातले.
आशियातील पहिली महिला लोको पायलट आणि हजारो महिलांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या महिला लोकोपायलट सुरेखा यादव यांच्याविषयी....
‘भारतमाला’ प्रकल्पाचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले असून, भारताच्या विकासात या प्रकल्पाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गेल्या दहा वर्षांत म्हणूनच केंद्र सरकारने देशभरात रस्ते उभारणीवर भर दिलेला दिसून येतो. त्याची गोमटी फळे येणार्या काळात सर्व भारतीयांना मिळतील.
दि. २० मार्च रोजी जगभरात जागतिक बेडूक दिन साजरा केला जाईल. आपण नेहमीच सुंदर दिसणार्या गोष्टींकडे प्रामुख्याने आकर्षित होतो. बर्याचजणांना बेडूक सुंदर वाटत नाही. मात्र, बेडूक सुंदर का वाटत नाहीत? त्यांचे आवाज काही वेळा विक्षिप्त का असतात? ते आवाज कसे काढतात? याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
(Pradeep Majhi's Inter-caste Marriage Controversy) ओडिशातील नवरंगपूरचे माजी खासदार आणि बिजू जनता दलाचे (बीजेडी) नेते प्रदीप माझी (Pradeep Majhi) यांना त्यांच्या आंतरजातीय विवाहामुळे त्यांच्या भातरा समाजाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला १२ वर्षांसाठी बहिष्कृत केले आहे. प्रदीप माझी यांनी बुधवार दि. १२ मार्च रोजी गोव्यामध्ये केंद्रपाडा जिल्ह्यातील सुश्री संगीता साहू या ब्राह्मण समाजातील महिलेशी लग्न केले. यानंतर अखिल भारतीय आदिवासी भात्र समाजाच्या केंद्रीय समितीने धामनागुडा येथे बैठक घेऊन प्रदीप आणि त्याच्या क
(Indian Student Ranjani Srinivasan Self-Deports) अमेरिकेत पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आला होता. यानंतर काही दिवसांनीच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन हिने स्वतःहून देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
(Priyanka Chaturvedi on SpiceJet Holi Celebration) देशभरात १४ मार्चला धूलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान १३ मार्चला राजधानी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांनादेखील होळीचा आनंद लुटण्याची संधी मिळाली. स्पाईस जेटच्या क्रू मेंबर्सकडून प्रवाशांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उबाठा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या सगळ्यावरुन स्पाइस जेटवर निशाणा साधत टीका केली आहे.
मीपणाचा अर्थात अहंभावाचा त्याग करून रामाचा, स्वस्वरुपाचा शोध घेत असताना ते स्वरूप, ते तत्त्व आपल्याच ठिकाणी असल्याचे आढळते असे स्वामींनी मागील श्लोक क्रमांक १८६ मध्ये सांगितले. परमात्म तत्त्वाविषयी बोलताना स्वामी म्हणाले, ‘सदा सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहे।’ अगदी जवळ असणार्या आपल्याच रुपाला आपण दुरावलो, याचे कारण आपला अहंभाव. मीपणाने आपण अंतरंगातील शाश्वत सत्याचा शोध घेऊ शकत नाही, त्या सत्याचा अनुभव घेऊ शकत नाही. स्वामींनी मनाला तेच तत्त्व शोधायला सांगितले आहे.
प्रयत्नांची शिकस्त केल्यावरही अर्जुनाला, जयद्रथाला मारता आले नाही. अर्जुनाच्या प्रतिज्ञेनुसार, आत्मदहनाची वेळसुद्धा जवळ आली होती. भगवान श्रीकृष्णांनी युक्तीने हा प्रश्न सोडविला. त्यांनी कौरवसैन्याच्या सहस्त्रदलकमल व्यूहासमोरच, अर्जुनाला चिता रचून आत्मदहन करण्यास सांगितले. अर्जुन तयार झाला. इतक्यात एकदम सूर्यास्त होऊन काळोख पडला. भगवंतानी अर्जुनाला सांगितले की, “वीर पुरुषाने स्वतःची शस्त्रे घेऊनच अग्नीत प्रवेश करावा.” अर्जुन चितेत स्वतःला कसे भस्म करणार हे पाहण्यासाठी कर्ण, दुर्योधनादि वीर जयद्रथासस्तपुढे आल
(Tamil Nadu drops official Rupee Symbol from State Budget) तामिळनाडूमधील एमके स्टॅलिन यांचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर तणावाचे वातावरण आहे. यात आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M K Stalin) यांच्या निर्णयामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपयाच्या चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई मधील पहिले अक्षर ‘रु’ वापरण्याचा निर्णय घेतला आहे.