( Kamgar Bhushan and Vishwakarma Qualified Worker Awards ) कामगारांच्या मेहनतीमुळेच महाराष्ट्राचा विकास शक्य झाला आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या दिशेने वाटचाल करीत असताना आणि एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा ध्यास घेतलेला असताना या स्वप्नपूर्तीत कामगारांचा वाटा केवळ गरजेचा नाही तर अनिवार्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.
Read More
(Governor inaugurates refurbished Aditya Jyot Eye Hospital) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी वडाळा, मुंबई येथील नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यावेळी आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. एस. नटराजन, डॉ. अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अग्रवाल, मुख्य धोरण अधिकारी डॉ. वंदना जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे डॉ
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एप्रिल १९६५ मध्ये प्रथमच रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. जी भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशा देणारी होती. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने त्याच ऐतिहासिक स्थळी, त्याच दिवशी, साठ वर्षांनी, २२ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ आयोजन करण्यात आले होते.
मुंबई, “गागर में सागर भरना’ अशी एक म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. अगदी तसेच कार्य पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी केले. भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशादर्शक मांडणी त्यांनी केली. पंडितजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ म्हणजे राष्ट्राचा बीजमंत्र आहे,” असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल रवींद्र नारायण रवी यांनी मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी केले. एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. त्याच ऐतिहासिक स्थळी त्याच
धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...
(Karnataka Governor Thawar Chand Gehlot) कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. गेल्याच महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय सिद्धरामय्या सरकारने हे विधेयक पारित केले होते. यानंतर राज्य सरकारने हे विधेयक राज्यपालांकडे पाठवले होते.
Supreme Court orders Governor सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना कालमर्यादेत निर्णय देण्याचा आदेश द्यावा, हा क्रूर विनोदच. पण, केवळ मोदी सरकारने नियुक्त केलेल्या राज्यपालांनीच विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकांना मंजुरी देण्यास विलंब लावला आहे, असे नाही. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने बनविलेल्या दहशतवादविरोधी कायद्याला तत्कालीन काँग्रेसच्या राज्यपालांनीही वर्षभरापेक्षा अधिक काळ मंजुरी दिली नव्हतीच.
Poonam Gupta यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. त्या सध्या आर्थिक धोरण थिंक टँक नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चच्या महासंचालक आहेत. गुप्ता यांची नियुक्ती आरबीआयच्या चलनविषयक धोरण समिती अंतर्गत आर्थिक आणि धोरणात्मक संशोधन आणि वित्तीय बाजार कामकाज पाहिले. आर्थिक आणि धोरणात्मक संशोधन आणि वित्तीय बाजार कामकाज पाहिले.
( Union Minister Ramdas Athawale visit to Reserve Bank of India Governor Sanjay Malhotra ) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रोब्लम ऑफ रुपी या प्रबंधावर आधारित रिझर्व्ह बँके ची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँके ची निमिर्ति झाल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय म्हलोत्रा यांची आज केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मुंबईतील रिझर्व
कॅनडाच्या राजकारणातील आधुनिक इतिहासात जस्टिन ट्रुडो यांची कारकीर्द ही गोंधळ, दुटप्पी धोरणे आणि आंतरराष्ट्रीय अपयश यांचे मूर्तिमंत उदाहरण ठरली आहे. त्यांनी खलिस्तानसारख्या अतिसंवेदनशील मुद्द्यावर घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमुळे केवळ द्विपक्षीय संबंधांवरच नव्हे, तर कॅनडाच्या जागतिक विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण झाले. ‘जागतिक हरित धोरण’ आणि मानवाधिकाराच्या नावाखाली त्यांनी, आंतरराष्ट्रीय मंचांवर अनेक भावनिक भाषणे केली. पण, त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणातील अस्थिरतेने कॅनडाच्या व्यापार, गुंतवणूक आणि परराष्ट्र
“वाढवण बंदर आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे राज्याची अर्थव्यवस्था उंचीवर जाणार आहे. त्यातून ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगां’ना चालना मिळेल. औद्योगिक विकासात लघु आणि मध्यम उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवार, दि. ५ मार्च रोजी केले.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. गुरुवार, ९ जानेवारी रोजी न्यायालयाने यावर निर्णय दिला असून यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
(Tamil Nadu) विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान झाल्याने तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित न करताच सभागृह सोडले.
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. मंगळवार, १७ डिसेंबर रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी अभिनंदन प्रस्तावाला विरोध करत असताना राज्यपालांचा अवमान केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम कृष्णा ( S. M. Krishna ) यांचे मंगळवारी (१० डिसेंबर) रोजी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ९२व्या वर्षी बंगळुरू येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. एस. एम. कृष्णा हे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रमंत्रीदेखील होते.
मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ( C. P. Radhakrushnan ) यांची शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी राजभवन येथे भेट घेऊन संवाद साधला. ‘नेहरू युवा केंद्र संघटन संस्थे’तर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले होते. “काश्मीर हा भारताचा सर्वात सुंदर प्रदेश आहे आणि जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला असते,” असे सांगून एम. जी. रामचंद्रन यांच्या तामिळ चित्रपटात आपणा
(Mumbai Police) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस दलातील अधिकारी व जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. पोलीस दलातर्फे आयोजित १६ व्या हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे जाऊन पुष्पचक्र वाहिले.
(RBI) ज्या बँक खात्यात सरकारी योजनांचे थेट लाभाचे (डीबीटी) पैसे हस्तांतरीत होतात, त्या खात्याची केवायसी नसली तरी ती खाती गोठवू नका, असे स्पष्ट निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. डीबीटीद्वारे केंद्र सरकारकडून सबसिडी, पेन्शन आणि काही विशेष योजनांचे पैसे देशभरातील लाभधारकांना हस्तांतरित केले जातात. केवायसीअभावी खातेच बंद झाल्यास या योजनांच्या मार्गात अडथळा निर्माण होत आहे.
आंतरराष्ट्रीय वित्तीय रचनेत बदल घडवून आणण्याची गरज रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी नुकतीच अधोरेखित केली. ‘विकसनशील राष्ट्रांना सध्याच्या यंत्रणेत न्याय मिळत नाही,’ असे त्यांनी म्हटले. तसेच विकसित राष्ट्रेच या रचनेचा सर्वाधिक लाभ घेत असल्याने, शाश्वत विकासासाठी या रचनेत बदल घडवून आणण्याची त्यांची मागणी योग्य अशीच. त्याचे आकलन...
नुकतीच महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. त्यापैकीच पहिल्यांदाच आमदार झालेले भाजपचे युवा आमदार विक्रांत पाटील यांचा युवा कार्यकर्ता ते विधानपरिषद आमदार असा प्रवास सांगणारा हा संवाद...
राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यासाठी उबाठा गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणीही पार पडली. परंतू, न्यायालयाने या आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथील कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. राज्यपालांनी कुटुंबातील सदस्य, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती केल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप दिला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात जाणीवपूर्वक कमी कॅलरी असलेले अन्न घेत आहेत, असे पत्र दिल्लीचे नायब राज्यपालांतर्फे दिल्लीच्या मुख्य सचिवांना लिहिले आहे.
देशात क्रेडिट वाढीच्या तुलनेत ठेवी(डिपॉझिट) जमा करणे, ही गंभीर समस्या आहे, असे विधान भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. तसेच, अर्थव्यवस्थेबाबत स्थिर वाढीदरम्यान महागाईवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असेही निरीक्षण गव्हर्नर दास यांनी नोंदविले आहे.
जम्मू – काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ च्या कलम ५५ अंतर्गत नियमांमध्ये बदल केले आहेत.
संसदेत घुसखोरी करणाऱ्या सर्व आरोपींवर दिल्ली पोलिसांकडून युएपीए कलमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. युएपीए कलमांतर्गत कारवाई करण्याची परवानगी दिल्लीचे नायब राज्यपाल यांनी पोलिसांना दिली आहे. यानंतर आता दिल्ली पोलीस संसदेवरील हल्ल्यातील सर्व आरोपींवर युएपीए कलम लावणार आहेत.
पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये बुधवार, दि. २२ मे २०२४ तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार निदर्शने केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हत्येच्या निषेधार्थ जागोजागी रस्तारोको करून आपला विरोध केला.
केंद्र सरकारने टी रवीशंकर यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उप गव्हर्नर म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात एक वर्षाची भर पडलेली आहे.ही नेमणूक ३ मे २०२४ पासून लागू होणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात एम फील पदवी प्राप्त केली होती.
‘रिझर्व्ह बँक’ ही स्वायत्त असली तरी केंद्र सरकारच्या ताटाखालचे ती मांजर झाल्याचा कांगावा पी. चिदंबरम यांच्यासारखे नेते करत असतात. त्यांना रघुराम राजन यांच्यासारख्या मध्यवर्ती बँकेच्या माजी गव्हर्नरची साथ असते. हे तेच राजन आहेत, ज्यांना ‘विकसित भारत’ ही संकल्पना मूर्खपणाची वाटते. मात्र, या कांगावखोरांचा कांगावा माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव यांनी उघडा पाडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्योगविश्वाचे आरबीआयच्या पतधोरण निकालाकडे लक्ष लागलं होते. आज तो क्षण आला असून आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सलग सातव्यांदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.याआधी ३ ते ५ एप्रिल या तीन दिवसीय पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असल्याचे शक्तिकांता दास यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
भारताची अर्थव्यवस्था पुढील दशकातही सुदृढ स्थिर व प्रगतीशील राहण्यासाठी आरबीआयचा प्रयत्न असणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. गेले अनेक वर्षे रिझर्व्ह बँके ऑफ इंडिया (RBI) आर्थिक समृद्धीचे स्थैर्याचे प्रतिक बनले आहे असे गौरवोद्गार दास यांनी कार्यक्रमात बोलताना काढले आहेत.
विश्व संवाद केंद्र आयोजित लक्ष्य या सोशल मीडिया कॉन्फ्लुएंसचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंदा बोस (आयएएस निवृत्त) यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्राचे विघटन आणि नाश करणाऱ्या नरेटिव्ह विरोधात लढा देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "सोशल मीडियावर अशा प्रकारची बहुतांश नरेटिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सत्याची खरी माहिती दिली पाहिजे. भारत हे महान राष्ट्र आहे. हे सत्य साऱ्या जगाने ओळखले आहे. मात्र, आपल्या देशात
डेन्मार्क संसदेचे उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन, जेप्पे सो व करीना ऍड्सबोल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची शुक्रवार, दि. ८ मार्च रोजी राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. भारत - डेन्मार्क राजनैयिक संबंध स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमध्ये संसदीय सहकार्य, व्यापार, हरित ऊर्जा, शिक्षण व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या उद्देशाने भेटीचे आयोजन केले असल्याचे उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन यांनी राज्यपालांना सांगितले.
शेती हा आपल्या देशाचा मुख्य आधार आहे आणि ५८ टक्क्यांहून अधिक लोक उपजीविकेसाठी शेतीवर आहेत असे सांगून कृषि क्षेत्राचे भविष्य घडवण्यात कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची आहे. २०३० पर्यंत गरीबी आणि भुकेचे निवारण करण्याचे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठणे हे देशापुढील आव्हान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशव्यापी 'आयुष्मान भव' या आरोग्य विषयक उपक्रमाचा आज दूरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला. या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथून करण्यात आला. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी 'निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
फिनटेक कंपन्यांनी स्वतः चे नियामक मंडळ स्थापन करून फिनटेक क्षेत्राची व्यवस्थितपणे व्यवसाय वृद्धी प्राप्त करावी. २०३० पर्यंत २०० बिलियन डॉलरचा महसूलाचे उद्दिष्ट यानिमित्ताने पूर्ण करता येईल का हे विचारात घ्यायला हवे. ' असे रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
डिजिटल भारताची यशस्वी घोडदौड सुरू असताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकताच ‘डिजिटल रुपया’चा मुद्दा अधोरेखित केला. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये आलेली मरगळ झटकली जाईल शिवाय देवाणघेवाणही सुरळीत सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यानिमित्ताने ‘डिजिटल रुपया’चा घेतलेला हा आढावा...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हनर शशिकांता दास यांना ग्लोबल फायनान्स सेंटर बँकर रिपोर्ट कार्डने A + चे रेटिंग दिले आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गर्व्हनर शशिकांता दास यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. 'हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असून भारताची आर्थिक बाबतीत जगातील नेतृत्वाचे शिक्कामोर्तब असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. यापुढे X (आधीचे ट्विटर) वर लिहिताना दास यांच्या व्हिजनमुळे हे शक्य होऊ शकले अशा भावना व्यक्त केल्या.
जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांनी आपल्या समाजातील युवकांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेले आयएएस स्पर्धा प्रशिक्षण वर्ग तसेच इतर उपक्रमांचा लाभ सर्वच समाजांमधील युवकांना करुन द्यावा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. व्यापक समाज हितासाठी कार्य केल्यास ते 'लघुतेकडून प्रभुतेकडे' नेणारे मोठे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.
राज्यातील अमली पदार्थविरोधी कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस करावी लागेल, असा इशारा पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिला आहे.
जम्मू – काश्मीरमधील नागरिकांसोबत आता न्याय होत असून त्यांच्या विकासासाठी भरीव प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे दहशतवादी झालेल्यांनी आता आत्मसमर्पण करावे, असे आवाहन दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनी तिरंगा फडकावून केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय संघटन मंत्री स्व. मदनदासजी देवी यांचे २४ जुलै रोजी निधन झाले. त्यावेळी अनेक मान्यवर आणि नेते मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा काही कारणास्तव येऊ शकले नाही. मात्र त्यांनी शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या मदनदासजींच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील त्यांच्यास
नुकत्याच एमपीसीचा झालेल्या बैठकीनंतर आरबीआयने युपीआय लाईटची पेमेंट मर्यादा २०० रुपये वरून वाढवून ५०० रुपये केली आहे.त्याच धर्तीवर इतर अनेक देशात देवाणघेवाणेसाठी युपीआयचे लिंकेज उपलब्ध करण्याचा आरबीआयचे नियोजन आहे.फेब्रुवारी २३ मध्ये सिंगापूर देशाने युपीआय प्रणाली स्विकारून पेनाऊ या सिंगापूर पेमेंट प्रणालीशी संलग्न केली होती.आता हे युपीआय जपान व काही देश स्विकारण्यासाठी इच्छुक आहेत.
आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया)चा मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक नुकतीच ८ ते १० ऑगस्ट या कालावधीत पार पडली होती.गुरूवारी सकाळी या संदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री शशिकांता दास यांनी कमिटीचा निकाल घोषित केला.रेपो रेट जैसे थे या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. हा निर्णय समिती सदस्यांनी एकमताने ठरल्याचे असे गव्हर्नर दास यांनी स्पष्ट केले आहे.
डिजिटल इंडिया या संकल्पनेला शासनाचा प्रयत्न गेले काही वर्षे सुरू आहे.कागदी करन्सी पेक्षा डिजिटल पेमेंट साठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रति देयक मर्यादा २०० रुपयेंवरून ५०० रुपये प्रस्ताव ठेवला आहे. आणि भविष्यातही डिजिटल पेमेंटस वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आरबीआयने ठरवले आहेत.नुकतीच एमपीसी बैठकीचा निकाल गव्हर्नर शशिकांता दास यांनी घोषित केला.रेपो रेट तसाच ठेवण्याव्यतिरिक्त देखील डिजिटल पेमेंट सिस्टीमला वाव मिळावा यासाठी प्रयत्न म्हणून २०० चे लिमिट ५०० रुपये करण्यात आले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिल्ली सेवा विधेयकाबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची चर्चादेखील झाल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात राहुल गांधीसह प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली होती. दरम्यान, लोकसभेत याआधीच मंजूर झालेल्या दिल्ली सेवा विधेयकावर दि. ७ जुलै रोजी राज्यसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेल्या विधेयकावर जवळपास ८ तासाच्या चर्चेनंतर १३१ इतक्या मतांनी मंजूर झा
केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या जोधपूर येथील केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्था येथे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. नितीन वसंतराव पाटील यांची नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ.नितीन पाटील यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.
मुंबई : बुधवार, दिनांक २१ जून, २०२३ रोजी प्रात:काली विधान भवनाच्या प्रांगणात योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम माननीय विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. सन्माननीय विधिमंडळ सदस्यांसह सुमारे २००० योगप्रेमी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७ ते ९.०० यावेळेत II योगप्रभात @ विधान भवन II हा कार्यक्रम होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकारने राज्यपाल अनुसुया उईके यांच्या अध्यक्षतेखाली शांती समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य जणांचा समावेश आहे. मणिपूरमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शांती समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केली होती. त्यानुसार, राज्यपाल अनुसुया उईके यांच्या अध्यक्षतेखाली शांती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा स
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी विविध उच्चस्तरीय बैठकांच्या माध्यमातून विविध घटकांशी संवाद साधला आहे. याद्वारे मणिपूरमधील संघर्षास संपविण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.