“चांदवडचा रंगमहाल ही वास्तू डोळे दिपवणारी आहे. अहिल्याबाई होळकर यांनी महिलांची ताकद ओळखली होती. त्यांनी अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्यांनी प्रशासक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. 300 वर्षांपूर्वी त्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व ओळखले होते. अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादनासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. होळकर साम्राज्याची उपराजधानी असलेल्या चांदवड येथे अहिल्याबाई होळकर यांचे शिल्प साकारण्यात येईल. तसेच, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची
Read More
पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग वाढावा, महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागाने आई हे महिला केंद्रित धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गतच महिला उद्योजिकांसाठी नवी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
र्शाळगड दुर्घटनेत विस्थापित झालेल्या नागरिकांचे राज्य शासनाकडून पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. तसेच, राज्य शासन या दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत शासनाकडून करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चादेखील केली. तसेच, चॉपर्सची मागणीही करण्यात आली, परंतु खराब हवामानामुळे याची मदत घेता आली नाही, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
प्रतिष्ठेच्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकिची मतमोजणी 11 रोजी सकाळी 10.30 वा.सुरु झाली. 12 वाजेपर्यंत मतमोजणी पुर्ण होवून 2 हजार 900 मतांनी भाजपाच्या विजया खलसे या शेंदुर्णीच्या प्रथम नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. नगरसेवकपदाच्या 17 जागांपैकी 13 जागी भाजपाने तर 4 जागी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे. शिवसेना व मनसेला खातेसुध्दा उघडता आले नाही.
तालुक्यातील केकतनिंभोरे येथे मराठा समाजबांधवांतर्फे जळगावहून जामनेरकडे येत असताना ना. गिरीश महाजन यांचे नुकतेच स्वागत करण्यात आले.
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवार, २५ रोजी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान तालुक्यातील दुष्काळसदृश भागातील पिकांची पाहाणी केली. मंत्री महाजनांच्या प्राथमिक स्वरूपाच्या दौर्यामध्ये त्यांनी तालुक्यातील वाडीकिल्ला, सोनारी, मालदाभाडी आणि वाडी या परिसरातील शेती पिकांची आस्थेवाईकपणे पाहणी केली.राज्य शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक मंत्र्यांना किमान चार तालुक्यांचा दुष्काळी पाहणी दौर्याचे नियोजन देण्यात आले आहे.
येथील मॉडर्न जिमनॅशियम हॉल, गुळवे विद्यालय येथे २० सप्टेंबर २०१८ (रविवार) रोजी विभागीय एस.आय.पी. अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,या स्पर्धेमध्ये अबॅकस च्या सहाय्याने अवघ्या ५ मिनिटात विद्यार्थ्यांना १२५ अंकगणितीय समीकरणे सोडविण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.
जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे भरधाव चारचाकीने शालेय विद्याथ्र्यांसह दुचाकीस्वारास धडक दिल्याने 7 जण जखमी झाले. जखमींपैकी दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
निवडणूकमा भाजपा, शिवसेनामाच शे खरी लढाई
देशभरातील दुर्मीळ औषधी वनस्पतींवर संशोधन व अध्यापन करणारी नँशनल इन्स्टीट्युट ऑफ मेडिसीनल प्लाँट या संस्थेची जामनेरला उभारणी होणार असुन, दिल्ली येथील आयुष मंत्रालयाच्या पथकाने शनिवारी जागेची पाहणी केली. अशा स्वरुपाची ही देशातील पहिलीच संस्था असेल, असे पथकातील सदस्यांनी सांगितले.