ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी कामगिरी नाही, ती भारताच्या अन्नसुरक्षा, जागतिक स्थान आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणाची गाथा आहे.
Read More
आज अन्नाची होणारी नासाडी ही फार मोठी समस्या आहे. देशासमोरील उपासमारीच्या समस्येवर अन्नाची नासाडी थांबवणे हा सुद्धा एक पर्याय आहे. यासाठीच संतजनांनी सुद्धा अन्नाच्या ब्रह्मशक्तीची आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव वेळोवेळी करून दिली. तीच जाणीव नव्या रुपात करून देण्यार्या आणि गरजुंची क्षुधातृप्ती करणार्या रेस्टोरेंट क्रिकेट लीगविषयी...
देशातील अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्याबरोबरच, शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढवणे तसेच, विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराला चालना देण्यासाठी भारत आणि आशियाई विकास बँक यांच्यात नुकताच झालेला करार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. उत्पादकता तसेच कार्यक्षमता वाढवणारे हे क्षेत्र आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाच्या कृषी उत्पादनांना आयात शुल्कात सवलत दिल्यास, तो भारताला अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करेल, असा एक प्रस्ताव ऑस्ट्रेलियाने नुकताच भारताला दिला. तसेच साठवणूक करण्यासाठीचे प्रगत तंत्रज्ञानही भारताला देण्याचे आश्वासनही ऑस्ट्रेलियाने दिले. कृषीहित विचारात घेऊन, त्यावर निर्णय झाल्यास दोन्ही देशांना त्याचा नक्कीच लाभ होईल.
भारत जगातील सर्वात मोठा धान्य उत्पादक देश असूनही, उत्पादनाच्या तुलनेत साठवण क्षमता ही केवळ ४७ टक्के इतकीच होती. म्हणूनच शेतकर्यांना त्यांचा शेतमाल कवडीमोल दराने बाजारपेठेत आणणे भाग पडत होते. म्हणूनच देशभरात पंचायत स्तरापासून गोदामे उभी केली जात आहेत. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित करणारी, ही योजना ठरणार आहे.
युक्रेन युद्धामुळे जगभर अन्नधान्यांचे संकट निर्माण झाले. त्यामुळे दुसर्या देशातून अन्नधान्य आयात करण्याची किंमत खूप जास्त असू शकेल. देशात अनेक भागांमध्ये भाववाढ होत आहे. किमतीवरती नियंत्रण ठेवण्याकरिता सरकारने काही पिकांची निर्यात थांबवली आहे. याचे मुख्य कारण आम जनतेकरिता अन्नसुरक्षा व महागाईवर नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे.
युक्रेनमधून सुरक्षितपणे अन्नधान्याची निर्यात होण्यासाठी करण्यात आलेल्या काळा समुद्र करारातून रशियाने अंग काढून घेतले आहे. याचा विपरित परिणाम आफ्रिका आणि जगातील काही गरीब राष्ट्रांना होणार्या अन्नधान्याच्या पुरवठ्यावर होणार असून, जागतिक बाजारात धान्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. भारतात गतवर्षी विक्रमी धान्योत्पादन झाल्यामुळे भारताला नजीकच्या भविष्यात, तरी या किंमतवाढीची झळ बसण्याची शक्यता कमी आहे.
भारतातील किमान आधारभूत किमतीमुळे आणि ‘सबसिडी’मुळे जागतिक अन्नसुरक्षा धोक्यात येईल, असा अजब ठपका काही पाश्चिमात्त्य देशांनी नुकताच जागतिक व्यापारी संघटनेच्या बैठकीत ठेवला. पण, भारत जगाला उपाशी मारणारा देश नसून, तो स्वत:बरोबर गरजू राष्ट्रांचे पोट भरण्यासही समर्थ असल्याचे सांगत ‘अन्नदाता सुखी भव:’चाच संदेश भारताने दिला.
पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांची संख्या वाढावी, त्यांना विनासायास भक्ष्य मिळत राहावे, यासाठी चांदोली अभयारण्यात वाघांचे भक्ष्य चितळ प्रजनन केंद्र सुरु करण्याचा वनविभागाने घेतलेला निर्णय स्तुत्यच! चांदोली अभयारण्यातील झोळंबी परिसरात चितळ प्रजनन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे दोन नर आणि मादी चितळांच्या जोड्या सागरेश्वर अभयारण्यातून सोडण्यात आल्या. सध्या याठिकाणी ३२ चितळ आहेत. आता ते ३६ झाले आहेत.
दै. 'मुंबई तरुण भारत' च्या अंकात नुकतीच भारतात असणाऱ्या ५४ 'रामसर' स्थळांच्या यादीत आणखी पाच स्थळांची भर पडल्याची बातमी वाचली. यानिमित्ताने पाणथळ भूमी, आरोग्य व अन्नसुरक्षा यांच्यासाठी कशा महत्वाच्या आहेत, हे दाखवण्यासाठी हा लेखनप्रपंच...
देशभरातल्या गरीब आणि गरजू नागरिकांना अत्यल्प दरात रेशनकार्डवर अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जाते. परंतु, गेली कित्येक वर्षे अनेक अपात्र नागरिकही बनावट रेशनकार्डच्या माध्यमातून सरकारची फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेशनकार्डसंबंधी कठोर निर्णय घेतला असून देशातील लाखो बनावट रेशनकार्ड रद्द करण्यासाठी आता कठोर निर्णय घेण्यात येणार आहे.
आर्क्टिक क्षेत्राअंतर्गत आर्क्टिक महासागर, जवळपासचे समुद्र आणि अलास्का (अमेरिका), कॅनडा, ग्रीनलँड, आईसलँड, नॉर्वे, रशिया आणि स्वीडनचा समावेश होतो. ‘भारत आणि आर्क्टिक : स्वतंत्र विकासासाठी एका भागीदारीची निर्मिती’ या शीर्षकाने जाहीर केलेले भारताचे धोरण सहा मध्यवर्ती स्तंभांवर आधारलेले आहे. त्यात विज्ञान आणि संशोधन, हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षण, आर्थिक आणि मानवी विकास, परिवहन आणि कनेक्टिव्हिटी, शासन आणि जागतिक सहकार्य तथा राष्ट्रीय क्षमता निर्मिती यांचा अंतर्भाव आहे
पाकिस्तानात बेरोजगारी आणि गरिबीमुळे एका बाजूला लोकांच्या क्रयशक्तीत मोठी घट झाली आहे, तर दुसर्या बाजूला खाद्यपदार्थांच्या कमतरतेमुळे त्यांच्या किमती सामान्य माणसांच्या आवाक्यापलीकडे गेल्या आहेत.
२०१४ पासून ‘जागतिक आरोग्य संघटने’ने FAO (Food And Agriculture Organisation of United Nations) बरोबर संयुक्त विद्यमानाने ७ जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिन (म्हणजेच World Food Safety Day) साजरा करण्याचे घोषित केले आहे. असा जागतिक दिवस घोषित करण्यामागचे कारण म्हणजे, अन्नातून होणार्या आजारांवर, आरोग्यावर प्रतिबंधात्मक उपाय, त्याची ओळख आणि त्यावरील उपाययोजना करणे. तेव्हा, आजच्या भागात त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
डापावमध्ये मृत पालीचे पिल्लू आढळून आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथच्या रेल्वे स्थानक परिसरात घडल्याने अंबरनाथवासियांचे धाबे दणाणले आहेत.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ६ जुलै व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ५ जुलैपासून पुणे जिल्ह्यातून पंढरपूरकडे होणार आहे.