अलीगढ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात केंद्र सरकारने महाभियोग प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे. हा प्रस्ताव संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे. या प्रकरणामुळे न्यायव्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Read More
अग्निशमन दलामध्ये सध्या वापरात असलेल्या ६४मीटर शिडीपेक्षा अवघ्या एक मजल्या एवढ्या वाढीव ६८ मीटर शिडीसाठी अग्निशमन दलाने एका कंपनीवर तब्बल ४० कोटी रुपयांची उधळपट्टी करण्याचा घाट घातला आहे. हे प्रकरण गंभीर असून या खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी शुक्रवार, दि. २३ मे रोजी केली. यासंदर्भात त्यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांना पत्र लिहिले आहे.
( India-Pakistan Tensions ) “भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघन न करण्याच्या निर्णयानंतर आज हा युद्धविराम संपणार असून पुन्हा दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल,” अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. याबाबत भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की, “दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओं’ची कोणतीही नियोजित चर्चा होणार नाही. दि. १२ मे रोजी झालेल्या शेवटच्या चर्चेत युद्धबंदीचा नियम आणि त्याबद्दलच्या अटी-शर्थी ठरवण्यात आल्या होत्या. तीच भारत-पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’ची शेवटची चर्चा होती.
मुंबईच्या विधानभवन परिसरात आग लागल्याची घटना घडली असून संपूर्ण परिसरात आगीचे धूर निघत आहेत. दरम्यान, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. यशवंत वर्मा यांच्या जळीत नोटाकांडामुळे न्यायालयाच्या नि:स्पृहतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली, अहवाल आले आणि त्यानंतर तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्या. वर्मा यांना राजीनामा देण्याची किंवा निवृत्ती स्वीकारण्याची सूचनाही केली. पण, न्या. वर्मा यांनी ही सूचना अमान्य केल्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीसाठी आता संसदेत ‘महाभियोग’ चालवावा लागेल. पण, भारतीय न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांवरील कारवाईचे हे पहिलेच प्रकरण नसून, यापूर्वीही ‘महाभियोगा’ची
मध्य रेल्वेने आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुरक्षा आणि तयारी वाढवण्याच्या सक्रिय प्रयत्नात, नागरी संरक्षण संघटनेने मुंबईतील प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एक व्यापक मॉक ड्रिलचे यशस्वीरित्या आयोजित केले होते. विविध आपत्कालीन परिस्थितींचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वे कर्मचारी आणि सामान्य जनतेला सक्षम करणे आणि ते मजबूत करणे हा या सरावाचा उद्देश होता.
terrorist attack in Kashmir, there was a firestorm of public anger in the country There was a unanimous voice in the country to teach a lesson to Pakistan काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशामध्ये जनक्षोभाचा आगडोंब उसळला. सातत्याने भारताच्या संयमाचा उपमर्द करणार्या पाकिस्तानला धडा शिकवण्याबाबत जनतेचा एकसूर देशात उमटला. मात्र, असे असले तरीही पहलगामसारखे हल्ले हे एका मोठ्या सापळ्याचा भाग असू शकतात. त्यामुळे, भारत सरकारला जनमताबरोबर देशहिताचा विचार करणे क्रमप्राप्त असते.
Thane Fire कडाक्याचा उन्हाळा सुरू असताना बुधवारी आगीच्या घटनांनी 'ठाणे' अक्षरशः धगधगले. मंगळवारी रात्री गायमुख जकात नाका येथील डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीने घोडबंदर भागात धुराचे लोट बुधवारी दुपारपर्यत दिसत होते. मंगळवारी रात्री लागलेली ही आग तब्बल १२ ते १३ तासानंतर अग्निशमन दलाने आटोक्यात आणली.
( Unique initiative of Kalyan Fire Department ) आग लागल्यास कसा बचाव करावा, कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत कल्याण अग्निशमन दलाच्यावतीने कल्याण पश्चिमेतील शाळेत विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले.
हिंजवडीतील या जळीत कांड प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलंय. टेम्पो ट्रॅव्हलरला लागलेली आग हा अपघात नसून हा घातपात असल्याचं पोलिस तपासांतून उघड झालंय. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला? बसचालकाने
Mahakumbh Mela 2025 उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात २५ ते ३० जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्देवी घटनेनंतर आता महाकुंभामध्ये दुसऱ्यांदा आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवार ३० जानेवारी २०२५ रोजी सेक्टर २२ मध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या असून आग शमवन्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टी धोक्यात आली आहे. लॉस एंजेलिसमध्ये अनेक कलाकारांची घरं असून मोठ्या संख्येने ती जळून खाक झाली आहेत. दरम्यान, या आगीमुळे २ लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्याचे आदेश देण्यात आले असून तेथे आणीबाणी जाहिर करण्यात आली आहेलॉस एंजेलिस हे दक्षिण कॅलिफोर्नियातील सर्वात मोठे शहर आहे. हे अमेरिकेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. या आगीचा फटका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यालाही बसला असून १७ जानेवारी २०२५ रोजी होणारा नामांकनाचा सोहळा पुढे
हॉलिवूड चित्रपटसृष्टीतून अत्यंत दुर्दैवी गटना समोर आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये भीषण आग लागली असून या आगीत जळून आत्तापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून १००० पेक्षा अधिक इमारतींची राख झाली आहे. लॉस एंजेलिसची ओळख हॉलिवूड कलाकारांचे घर अशी असून येथे लागलेल्या भयाण आगीमुळे हॉलिवूडकरांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या आपत्तीजन्य परिस्थितीमुळे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन निवासम यांनी तेथे आणीबाणीची घोषणा केली आहे.
मुंबई : नवी मुंबईच्या सानपाडा येथे गोळीबाराचा ( Navi Mumbai Firing ) प्रकार घडला. पाच ते सहा राऊंड फायर करुन आरोपी फरार झाला आहे. या गोळीबारात १ जण जखमी झाला आहे. सानपाडा रेल्वेस्टेशनजवळच्या डी-मार्ट परिसरात हा प्रकार घडला. दोन आरोपींनी बाईकवर येऊन हा गोळीबार केल्याचा प्रकार दिसला आहे.
मुंबईजवळील कसाऱ्याजवळ एक्सप्रेसला आग लागल्याची घटना घडली आहे. रेल्वे रुळाच्या बाजूलाच गवताला आग लागल्याने नंदीग्राम एक्स्प्रेसला याचा फटका बसला आहे. एक्स्प्रेसला आग लागल्यानंतर प्रवासी जीव मुठीत घेऊन खाली उतरले. अनेक प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या.
अंधेरी लोखंडवाला परिसरातील सेकंड क्रॅास लेनमध्ये दोन बंगल्यांना भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण आगीत दोन्ही बंगले जळून खाक झाले आहेत. दोन बंगल्यांच्या तळमजल्यापासून आणि पहिल्या मजल्यापर्यंत ही आग पसरलेली होती. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. दोन तासानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवता आले.
दिल्ली-एनसीआर भागातील आगीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. एनसीआर क्षेत्रात राजस्थान, गाझियाबाद, नोएडा येथील आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे. विशेष म्हणजे पहिली घटना दिल्ली येथील वसंत विहार भागातील असून येथील एका दुकानाला लागलेल्या आगीत अनेक दुकाने जळून खाक झाली.
मुंबईतील चेंबूर परिसरात गुरुवार दि. ६ रोजी सकाळच्या सुमारास घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटानंतर आग लागल्याने या घटनेत दहा जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना चेंबूरच्या सी जी गिडवाणी मार्गावरील एका घरात घडली.
BMC च्या मुंबई फायर ब्रिगेडशाखेने २६मे पासून शहरातील मॉल्सची तपासणी सुरू केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, या मॉल्समधील गेमिंग झोनची ही कसून तपासणी करण्यात आली. अग्निशमन विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत एकूण ५५ मॉलची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १३मॉलना अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे.
शनिवार, दि. २५ मे २०२४ रात्री उशिरा दिल्लीतील विवेक विहार भागात असलेल्या एका बेबी केअर सेंटरमध्ये आग लागली, ज्यामध्ये सात नवजात बालकांचा मृत्यू झाला. याशिवाय पाच नवजात बालकांची प्रकृती चिंताजनक असून त्यापैकी एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
वारंवार पाहणी करून किंवा नोटीस देऊनही अग्निरोधक प्रणाली न लावणाऱ्या किंवा त्या अद्ययावत न ठेवणाऱ्या मालमत्ता धारकांवर आणि इमारतींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच आगीसारख्या आपत्तींसाठी जबाबदार असलेल्यांवर पोलिसांकडून यथोचित कारवाई केली जाते. त्याच धर्तीवर महानगरपालिकेकडूनही जबाबदारी निश्चित केली जावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबईतील भाजप कार्यांलयाला आग लागली आहे. मुंबईतील नरिमन पाँइंट येथील भाजप कार्यांलयाच्या किचनमध्ये वेल्डींगचे काम सुरु असताना अचानकपणे आग लागली. घटनास्थळी दोन अग्मिशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रदेश कार्यालयात लाकडी आणि पीओपीचं सामान आहे, तिथे आगीचा भडका उडाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ९ व पोलीस चौकीजवळ असणाऱ्या जागेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाद्वारे विशेष जनजागृती प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला नागरिकांचा व विशेष करून लहानग्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याच प्रदर्शनात असणारा आग विझवणारा 'फायर रोबो' हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला, असे मुंबई अग्निशमन दलातर्फे कळविण्यात आले आहे.
मुंबई महानगर अरुंद गल्ल्यांच्या संख्येएवढ्या उंच इमारती आहेत. त्यामुळे मुंबई अग्निशमन दल अग्निसुरक्षा आणि बाहेर काढण्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सदैव तत्पर असते. अग्निशमन कवायती पाहताना प्रत्येक अधिकारी आणि जवानांतील समन्वय, बळ, सांघिक प्रयत्न अतिशय कौतुकास्पद असून हाच समन्वय प्रत्यक्ष घटनास्थळी कायम ठेवण्याची अपेक्षा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केली.
बदलापूर एमआयडीसीतील डी. के. फार्मा या रासायनिक कंपनीला आज मंगळवारी भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग विझवताना अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अग्निशमन दलाने ही आग विझविली असली तरी आगीचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.
‘भारतीय वन सर्वेक्षण विभागा’ने (एफएसआय) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात एकूण 3 हजार, 929 वणवे लागल्याची नोंद करण्यात आली. त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात निसर्गहानी आणि वित्तहानी करणार्या या वणव्यांमागची कारणे, हवामान बदलाचा परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...
चटका बसण्याचा अनुभव आपण सर्वांनीच आयुष्यात कधी ना कधी घेतला असेल. पण, घरात असेल अथवा कारखान्यांमध्ये आगीने भाजवण्याचे अपघात दुर्देवाने घडून येतात. तेव्हा, अशावेळी नेमके प्रथमोपचार काय करावे? असे प्रसंग घडू नये म्हणून कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता येतील? यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
७५व्या प्रजासत्ताक दिन - २०२४ निमित्त, पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण ११३२ कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिका-यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, १८ पोलिस अधिका-यांना शौर्य पदके आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत ४० पदके पोलीस सेवेसाठी, सहा पदके अग्निशमन सेवेसाठी, सात पदके गृहरक्षक आणि नागरी संरक्षण तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ कारागृह अधिका-यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुण्यात दि. ०४ डिसेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास एनआयबीएम रस्त्यानजीक असलेल्या दोराबजी मॉलसमोर पाण्याच्या टाकीत पडल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून कोंढवा खुर्द येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.
बहुचर्चित सलमान खानचा चित्रपट 'टायगर ३' दिवाळीच्या निमित्ताने देशभरात प्रदर्शित झाला. १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला. गेल्या काही काळापासून सलमानच्या चित्रपटांना यश मिळत नव्हते. मात्र, टायगर ३ चित्रपटाने तो रेकॉर्ड मोडित काढला आहे. मात्र, मालेगावमधील चित्रपटगृहात थेट काही टवाळखोरांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घडलेल्या या घटनेबद्दल सलमान खान याने ट्विट केले असून त्याने प्रेक्षकांची कानउघाडणी देखील केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासंदर्भात एक महत्त्वपुर्ण निर्णय दिला आहे. फटाके फोडण्यासाठी दिलेली तीन तासांची मर्यादा आता केवळ दोन तास करण्यात आली आहे. प्रदुषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. तसेच यावेळी “दिल्लीवासी बनू नका, मुंबईकरच रहा" असा सल्लाही न्यायलयाने दिला आहे.
आसामधील करीमगंज येथील २०० वर्ष जुन्या मंदिराला काही समाजकंटकांनी आग लावली आहे. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या या मंदिराला आग लावल्याचा आरोप करण्यात येत आहे.
केरळ उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासंबंधी एक महत्त्वपुर्ण आदेश दिला आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी फटाके फोडणे आवश्यक आहे, असे कोणत्याही धर्मग्रंथात लिहिलेले नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सर्व धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीरपणे साठवलेले फटाके ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत.
महाड एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास घटना उघडकीस आली. गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे.
भिवंडी तालुक्यातील रहणाल गावच्या हद्दीत गोविंद कंपाऊंड मधील केमीकल गोदामात भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रविवार असल्याने गोदाम बंद असल्याने जीवितहानी टळली असली तरी मोठी वित्तहानी झाल्याचे समजते. आगीच्या धुराचे लोट दुरपर्यत पसरले होते. घटनास्थळी भिवंडी, ठाणे आणि कल्याण अग्निशमन दलाच्या पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. आगीचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.
मुंबई उपनगरातील कांदिवली पश्चिमच्या महावीर नगरमध्ये वीणा संतूर इमारतीला सोमवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीच्या दोन मजल्यांवर मोठ्या प्रमाणावर आग लागली असल्यामुळे घटनास्थळी प्रचंड धुराचे लोट दिसत होते.
मुंबई उपनगरातील कांदिवली पश्चिमच्या महावीर नगरमध्ये वीणा संतूर इमारतीला सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास भीषण आग लागली. माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन सेवेने वीणा संतूर इमारतीकडे अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.
नगर-आष्टी रेल्वेच्या डब्याला शिराडोह परिसरात दुपारी तीनच्या दरम्यान भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला पहिल्या दोन डब्यांना लागली होती. परंतू आगीचे लोट एवढे होते की, ही आग पुढे पाच डब्यांपर्यंत पोहोचली. सुदैवाने गाडीत गर्दी नसल्याने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसून रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.
गोरेगाव (पश्चिम) उन्नत नगर येथील जय भवानी इमारतीला भीषण आग लागून या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयामध्ये जाऊन आगीतील जखमींची विचारपूस केली व त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली.
मुंबईतील आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील उन्नत नगर मधील जय भवानी या एसआरए इमारतीच्या पार्किंगमध्ये गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास भीषण अग्नितांडव पाहण्यास मिळाले.
नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथे विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अंबरनाथमध्ये शनिवारी उशिरा आग लागण्याचा दोन घटना घडल्या मात्र अग्निशमन यंत्रणेने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने जीवितहानी टळली आहे. अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम भागात दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या
दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील १५ मजली रेनट्री नामक इमारतीला २३ सप्टेंबर रोजी सकाळी भीषण आग लागली. इमारतीच्या तेराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्तीचे नाव सचिन पाटकर असून ते ६० वर्षीय होते.
मुंबई पश्चिम उपनगरातील ओशिवरा येथे हिरापन्ना मॉलला २२ सप्टेंबर, २०२३ रोजी दुपारी आग लागल्याची घटना घडली आहे. या मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग एल टू प्रकारची असून दुपारी साधारणपणे ३ वाजताच्या सुमारास मुंबई अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळाली होती.
'रिलायन्स जिओ'ने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 'जिओ एअर फायबर' लाँच करणार आहे. यामाध्यमातून रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना अद्ययावत सुविधा पुरविणार आहे. 'जिओ एअर फायबर'ला १.५ जीबीपीएसपर्यंतचा स्पीड मिळणार आहे. त्यामुळे जिओ ग्राहकांना जलदगतीने इंटरनेटसेवा सुविधा पुरविली जाणार आहे.
मुंबईतील सांताक्रूझ येथील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग लागली असून आग लागण्याची घटना दुपारी एक वाजता घडली. दरम्यान, सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या भीषण आग दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर असून हॉटेल रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
चांद्रयान- ३च्या यशस्वी मोहिमेत ठाण्यातील उद्योजकांचाही सहभाग मोलाचा ठरला. अग्निसुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या मिहिर घोटीकर यांच्या एच. डी. फायर प्रोटेक्ट प्रा. लि. कंपनीने एच डी वर्षा 'नॉझल्स' हे उपकरण 'इस्त्रो'ला तयार करून दिले होते. पृष्ठभागावर अवतरण होत असताना प्रचंड ध्वनिलहरी तयार होतात. त्यामुळे इस्त्रोच्या यंत्राचे नुकसान होऊ शकते. ते 'नॉझल्स'मुळे टाळले जाते. तर, या मोहिमेतील इंजिनामध्ये लागणाऱ्या 'फ्रिक्शन रिंग' हा अत्यंत महत्त्वाचा भाग शहापूरच्या साने बंधूंनी त्यांच्या कारखान्यातून बनवला आहे.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा कायद्यानुसार, निवासी संकुलांनी त्यांच्या राहत्या जागी अग्निसुरक्षा उपकरणे ठेवणे बंधनकारक आहे. आणि वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलै महिन्यात अग्निशमन केंद्राला अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा अहवाल महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील एकूण दोन लाख निवासी संकुलांपैकी फक्त 20% संकुलांनी जुलैमध्ये अग्निशमन यंत्रणेच्या देखभालीचा अहवाल सादर केला आहे, असे अग्निशमन सेवांचे राज्य संचालक यांनी म्हटले आहे.
'भारतीय अंतराळ संशोधन संस्था' अर्थात 'इस्त्रो'मध्ये नोकरीची संधी उपलब्ध असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर ISRO Recruitment 2023 बद्दल माहिती जाणून घेऊयात.
ठाणे : पावसाने दडी मारलेली असतानाही ठाण्यात पडझडीची सुरुवात झाली. कळव्यातील खारेगाव परिसरातील हिरादेवी मंदिरा जवळील तळ अधिक दोन मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब व टेरेसची भिंत कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने जिवितहानी टळली असुन एका दुचाकीचे नुकसान झाले.