अभिनेते ते राजकारणी झालेल्या कमल हसन यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यांनी म्हटले की, “कन्नड ही भाषा तमिळ भाषेपासून निर्माण झाली आहे.” त्यांच्या या विधानामुळे प्रखर कन्नड समर्थकांनी संताप व्यक्त केला असून, कर्नाटकातील अनेक राजकीय नेत्यांनी देखील या वक्तव्याचा निषेध केला आहे.
Read More
प्रसारमाध्यमे ही समाजाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. ती फक्त माहितीचा स्रोत नसून समाजाचे प्रतिबिंब, आणि दिशादर्शक आहेत. योग्य व जबाबदारीने त्यांचा वापर केला गेला, तर ती लोकशाहीच्या हितासाठी मोलाची ठरू शकतात. माध्यमांच्या बहरलेल्या वटवृक्षाच्या जडणघडणीत आजवर असंख्य सुवर्णहातांचं योगदान लाभलं आहे. पडद्यावर आणि पडद्यामागं राहूनही काही चेहऱ्यांनी केलेली कामगिरी ही सुवर्णमोलाची आहे. माध्यमांना वेगळा आयाम देण्यात या व्यक्तींचा खूप मोलाचा वाटा आहे. या परीसरूपी हातांचं कौतुक होणं आज गरजेचं आहे. माध्यमांच्या आजच्या जड
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. तर
मराठी आणि हिंदी रंगभूमी, चित्रपट तसेच मालिकांमधील आपल्या बहुआयामी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशोक सराफ यांना अखेर राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या या सन्मानाने केवळ सराफ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला अभिमानाची आणि आनंदाची भावना अनुभवायला मिळाली आहे.
तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या 'आंबट शौकीन'चा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये ललित, वरूण आणि रेड्डी हे तीन खट्याळ मित्र दिसत असून ते हसवण्यासोबत विचार करायलाही भाग पाडत आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत हरवलेली ओळख व मानसिक गुंतागुंत हे सगळे या चित्रपटात मांडण्यात आले आहे. सा तिघांच्या आंबटपणामुळे त्यांच्या आयुष्यात काय वादळ येणार, हे पाहाणे रंजक ठरणार आहे.
चेन्नईमध्ये झालेल्या त्यांच्या आगामी चित्रपट Thug Life च्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात दिलेल्या विधानामुळे दिग्गज अभिनेते आणि राजकारणी कमल हसन सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. “तमिळ भाषेने कन्नड भाषेला जन्म दिला” असे विधान करत त्यांनी जे बोलले, त्याचा अर्थ सांस्कृतिक ऐक्य निर्माण करण्याच्या हेतूने घेतला गेला असावा, मात्र ते विधान कर्नाटकमध्ये प्रचंड रोषाला सामोरे गेले आहे.
'अर्जुन रेड्डी' आणि 'अॅनिमल' या चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा सध्या प्रभाससोबतच्या 'स्पिरिट' या आगामी चित्रपटावर काम करत आहेत. या दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर एक तीव्र आणि अप्रत्यक्ष पोस्ट शेअर करत, एका अभिनेत्रीच्या 'डर्टी पीआर' (खराब प्रसिद्धी मोहिमेवर) जोरदार टीका केली. या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचेही थेट नाव घेतले नसले तरी, काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणने या चित्रपटातून बाहेर पडल्याच्या चर्चांनंतर ही प्रतिक्रिया आल्याने लक्ष वेधले आहे.
प्रेम कधी शब्दांत नाही मावत, ते डोळ्यांत दिसतं, हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं. दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल, हेच त्या प्रेमाचं खरं संगीत असतं. याच भावनेला स्वरबद्ध करत शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं एक हळवं गीत "झोका" आता प्रदर्शित झालंय.
संस्कार भारती कोकण प्रांत चित्रपट विधा यांच्या वतीने आयोजित 'सिनेटॉकीज' हा विशेष कार्यक्रम ३१ मे रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत अंधेरीतील एम ए ए, वर्सोवा येथे पार पडणार आहे. या वेळी 'प्रारब्ध' हा भावस्पर्शी लघुपट प्रेक्षकांसमोर सादर होणार असून, त्यानंतर त्या लघुपटाच्या निर्मात्यांसोबत विचारमंथनात्मक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. विशेषतः ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. यामुळे संबंधित पक्षांमध्ये कायदेशीर वाद उभा राहिला असून, मीडिया व चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र या साऱ्या गोंधळात अभिनेता अक्षय कुमार यांनी आपल्या दीर्घकालीन मित्र आणि सहकलाकार परेश रावल यांच्यावर टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले असून, त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आहे.
‘लूप’ हा इंग्रजी शब्द आपल्या रोजच्या आयुष्यातही अनेकदा वापरला जातो. एखाद्या गोष्टीत पुन्हा पुन्हा अडकणे, एकाच ठिकाणी अडकल्यासारखं वाटणे किंवा सारखं तेच घडत राहणे, अशा अर्थांनी ‘लूप’चा शब्दप्रयोग होताना दिसतो. विज्ञानकथांमधील ‘टाईम लूप’ ही कल्पनादेखील याचाच विस्तार असते. एक अशी परिस्थिती, जिथे एखादी व्यक्ती काळाच्या विशिष्ट क्षणात अडकते आणि तेच तेच दिवस, त्याच घटना किंवा अनुभव पुन्हा पुन्हा एकामागोमाग एक घडत राहतात. काही वेळा ही कल्पना विनोदी अंगाने दाखवली जाते, तर काही वेळा भयावह. पण, ’भूल चूक माफ’ या नव्या
मराठी चित्रपटसृष्टी सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. या परंपरेला साजेसा आणि स्त्री सन्मानाच्या लढ्याला उजाळा देणारा एक सशक्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे – ‘वामा लढाई सन्मानाची’. हा चित्रपट २३ मे २०२५ रोजी महाराष्ट्रासह गोवा, हैदराबाद आणि तेलंगणामधील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पारंपरिक चित्रपट निर्मिती, रिअल टाइम सीजीआय आणि गेमिंग टेक्नॉलॉजी यांचा मेळ घालत सध्या चित्रपट व मनोरंजन सृष्टीत एक नवे क्रांतिकारी पर्व सुरू झाले आहे. व्हर्च्युअल प्रॉडक्शन. या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आज कलाकार, दिग्दर्शक आणि वीएफएक्स तज्ज्ञ अधिक वास्तवदर्शी, भव्य आणि दृष्यदृष्ट्या प्रभावी कथा साकारत आहेत. या क्षेत्रातील वाढती मागणी ओळखून आघाडीची तंत्रशिक्षण संस्था अपटेकने ‘व्हर्च्युअल प्रॉडक्शन अकॅडमी’ सुरू केली असून, त्याअंतर्गत व्हर्च्युअल प्रॉडक्शन स्पेशालिस्ट हा विशेष अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसा
आपल्या भारत देशाला लाभलेला इतिहास हा केवळ गौरवशालीच नाही, तर प्रेरणादायी देखील आहे. हाच इतिहास जपण्याची आणि पुढील पिढीला समजावून सांगण्याची एक सशक्त वाट म्हणजे कला आणि रंगभूमी. डोंबिवलीतील ‘बीइंग कलाकार' या संस्थेने हीच संकल्पना मनात ठेवत, अत्यंत अभिमानाने आणि कलाभिवृद्धीसाठी 'रंगोदय एकांकिका महोत्सव २०२५' चे आयोजन केले आहे.
मराठी चित्रपट सृष्टीतील असंख्य कलाकारांच्या योगदानाचा गौरव करणारा "मातृभाषा सन्मान पुरस्कार" सोहळा यंदा १४ मे २०२४ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे अत्यंत भव्यदिव्य आणि सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला. नारायण देसाई फाउंडेशनतर्फे आयोजित या सोहळ्याचे उद्दिष्ट होते राष्ट्रीय पातळीवर मराठी सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि विकास घडवणे, तसेच सिनेसृष्टीतील गुणवंत कलाकारांना सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे.
उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांची आठवण करून देणारा 'एप्रिल मे ९९' येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक कलाकार समोर आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांची पहिलीच मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ची कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मधील प्रतिष्ठित ‘मार्शे दु फिल्म’ या विभागासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या फिल्म, थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यातर्फे अधिकृत निवड झालेला हा चित्रपट नुकताच जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवात झळकला आहे. मायकेल थेवर आणि सुषमा गणवीर निर्मित, राज प्रीतम मोरे दिग्दर्शित 'खालिद का शिवाजी' या चित्रपटात क्रिश मोरे याने खालिदची भूमिका साकारली असून सोबत प्रियदर्शन जाधव, भर
काही दिवसांपूर्वीच धमाल आणि जबरदस्त किस्से यांचा मनसोक्त डोस घेऊन येणाऱ्या ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले. आता या चित्रपटाचा भन्नाट टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. टीझरमधूनच धमाल कॉमेडी, जबरदस्त पंचेस आणि रंगतदार दृश्यांची झलक पाहायला मिळत असून हा चित्रपट एका धमाकेदार प्रवासाची सुरुवात आहे, असे म्हणायला हरकत नाही. तीन अवलिया मित्रांची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या खट्याळ, अतरंगी मित्रांची मुली पटवण्यासाठी चाललेली धडपड या
श्री शिवाजी मंदिर, दादर येथे ६ मे रोजी ३५व्या मराठी राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. या उद्घाटन सोहळ्यात सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री लीना भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सध्या सोशल मीडियावर एक गाणं जोरदार ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे ‘धतड तटड धिंगाणा’! ‘पी.एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील हे प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत असून विशेषतः तरुण वर्ग यावर मोठ्या प्रमाणावर रील्स आणि व्हिडीओ तयार करत आहे. नुकताच या गाण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातील हूक स्टेप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तरूणाईचा ‘स्टाईल आयकॅान’ असलेल्या अभिनेता अंकुश चौधरीचा या गाण्यातील रूबाबदार लूकही सध्या अनेकांना भावतोय.
'द काश्मीर फाईल्स' आणि 'द ताश्केंट फाईल्स' यांसारख्या वादग्रस्त चित्रपटांचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडवर थेट टीका केली आहे. मोठ्या बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक हे सुपरस्टार्सच्या वागणुकीला कंटाळले असूनही त्यांच्या विरोधात उघडपणे बोलण्याची कोणाचीच हिंमत नसल्याचं अग्निहोत्रींनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांचा रोख विशेषतः अभिनेता रणबीर कपूरकडे होता, ज्याच्यावर ‘अॅनिमल’ या वादग्रस्त चित्रपटामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली, मात्र तरीही त्याचं संरक्षण केलं गेलं.
भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार आणि अभ्यासू अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी आपल्या अभिनयाने अनेकवर्षे रसिकांची मनं जिंकली आहेत. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या या अभिनेत्रीने आता आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. २०२५ सालच्या कान्स चित्रपट महोत्सवात ‘टान्वी द ग्रेट’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्या आपल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला सुरुवात करत आहेत.
बालमनावर राज्य करणारं 'अलबत्या गलबत्या' ह्या नाटकाचा रंगभुमीवर पहिला प्रयोग १२ मे २०१८ रोजी पार पडला आणि प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवलं. ‘अलबत्या गलबत्या’ हे बालनाटक आज सात वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे. याच उत्सवी क्षणात आणखी एक महत्त्वाचा टप्पा या नाटकाने गाठला असून, लवकरच 'अलबत्या गलबत्या' चा १००० वा प्रयोग सादर होणार आहे.
अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला गुन्हेगारी थरारपट ‘रेड २’ बॉक्स ऑफिसवर चांगलीच गती पकडून आहे. प्रदर्शनाच्या ११व्या दिवशी या चित्रपटाने कमाईत उंच झेप घेतली. Sacnilk च्या अहवालानुसार, दुसऱ्या रविवारी ‘रेड २’ ने ११.७५ कोटी रुपयांची कमाई केली, जी शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या कमाईपेक्षा जास्त आहे.
अनुष्का शर्मा ही केवळ एक लोकप्रिय चित्रपट अभिनेत्री नसून एका लष्करी अधिकाऱ्याची कन्या म्हणूनही तिला अभिमान वाटतो. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनुष्काने भारतीय सैन्याचे मन:पूर्वक कौतुक करत एक भावनिक संदेश प्रसारित केला. त्यानंतर तिची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने करगिल युद्धाच्या काळातील अनुभव मोकळेपणाने सांगितले आहेत.
तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विशाल रविवारी (११ मे) तामिळनाडूमधील विल्लुपुरम येथे झालेल्या ‘मिस कूवगम ट्रान्सजेंडर ब्युटी कॉन्टेस्ट २०२५’ दरम्यान अचानक व्यासपीठावर कोसळल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शस्त्रसंधी असूनही पाकिस्तानकडून कुरापती थांबलेल्या नाहीत. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. अशा परिस्थितीत देशाच्या जवानांची शौर्यगाथा सर्वत्र गौरवली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर 'सदीच्या महानायक' अमिताभ बच्चन यांचं मौन कायम होतं. पाहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'नंतरही त्यांनी सोशल मीडियावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हत
प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया उर्फ Beer Biceps यांना अलीकडेच एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे मोठ्या प्रमाणावर टिकेचा सामना करावा लागला. या पोस्टमध्ये त्यांनी “पाकिस्तानी भावंडांनो” असं संबोधत शांतीचा संदेश दिला होता. मात्र त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटताच त्यांनी ती पोस्ट हटवली आणि नंतर भारतीय लष्कराला पाठिंबा दर्शवणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला.
हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील HPCA (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन) स्टेडियममध्ये गुरुवारी एक अनपेक्षित घटना घडली. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला IPL सामना अवघ्या 10.1 षटकांतच अचानक थांबवण्यात आला. यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेले हजारो प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र या सगळ्या परिस्थितीत अभिनेता आणि पंजाब किंग्जची सह-मालक प्रिती झिंटा हिने मोठ्या संयमाने आणि जबाबदारीने परिस्थिती हाताळली. यानंतर तिने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून आपल्या
अभिनेता हर्षवर्धन राणेने नुकतीच एक ठाम भूमिका घेतली जर सनम तेरी कसम या चित्रपटाचा सिक्वेल (भाग २) तयार झाला आणि त्यात पुन्हा पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन सहभागी झाली, तर तो स्वतः त्यात काम करणार नाही. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता चित्रपटाचे दिग्दर्शक राधिका राव आणि विनय सप्रू यांनीही पाकिस्तानातील कलाकारांवर कठोर शब्दांत टीका केली आहे आणि भारतीय प्लॅटफॉर्म्सने त्यांच्याशी कोणताही व्यावसायिक संबंध ठेवू नये, असे म्हटले आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते ज्येष्ठ मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड यांचे आज १० मे २०२५ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांनी ७ वेळा राष्ट्रीय पारितोषिक जिंकले होते आणि भारतीय सिनेसृष्टीत मेकअपच्या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४.३० वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतीय लष्कराने ७ मे २०२५ रोजी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांविरोधात आता भारतात कडक पावले उचलली गेली आहेत. अभिनेता फवाद खान आणि अभिनेत्री माहिरा खान यांनी या कारवाईला "शरमेचे पाऊल" असे संबोधून भारतावर टीका केली होती. यानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आणि या कलाकारांवर बंदीची मागणी केली. आता, ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने या मुद्द्यावर अधिकृत घोषणा करत पाकिस्तानी कलाकार, निर्माते, आणि गुंतवणूकदारांवर पूर्ण बंदी लागू के
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणात प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी पाकिस्तानवर घणाघात करत एक ठोस संदेश दिला आहे. त्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, "मी ईश्वर आणि अल्लाह ताऱ्याजवळ प्रार्थना करतो की बलुचिस्तान लवकरच पाकिस्तानपासून स्वतंत्र होऊन एक स्वतंत्र राष्ट्र बनो, आणि मी स्वतः वीजा घेऊन तिथे जाऊन भेट देईन."
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर टीकेचा सामना करावा लागलेल्या दिग्दर्शक उत्तम महेश्वरी यांनी अखेर माफी मागितली आहे. शनिवारी सकाळी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर त्यांनी स्पष्ट केलं की, “हा चित्रपट प्रसिद्धी किंवा कमाईसाठी नव्हे, तर आपल्या जवानांच्या धैर्य, बलिदान आणि नेतृत्वाने प्रभावित होऊन करतो आहे.”
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचे समर्थन केल्यावर अभिनेत्री सेलिना जेटली हिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मात्र, ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत सेलिनाने ठामपणे सांगितलं – “मी कधीच माफी मागणार नाही.” सध्या ऑस्ट्रियामध्ये असलेल्या सेलिनाने आपल्या देशभक्तीचा अभिमान व्यक्त करत भारतीय सैन्याचे शौर्य आणि बलिदान यांचं कौतुक केलं आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारताने बुधवारी ७ मे पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. या मिशनमध्ये जवळपास ८० दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली आहे.
बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेळी, तिने भारत सोडून पाकिस्तानमध्ये करिअर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे. तिच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
‘बिग बॉस ७’ फेम अभिनेता आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारणारा एजाज खान सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. मुंबईतील एका अभिनेत्रीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर चारकोप पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर एजाज खान फरार असून, त्याचा मोबाईल फोनही बंद आहे. मुंबई पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
मेट गाला २०२५ मध्ये आपल्या पहिल्यावहिल्या उपस्थितीसाठी सज्ज होत असलेल्या अभिनेत्री कियारा अडवाणी हीचा एक गोंडस व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती आपल्या गर्भातील बाळाशी संवाद साधताना, पिझ्झाचा आस्वाद घेताना आणि आपल्या ‘नवीन शरीरात’ हॉट वाटत असल्याचं सांगताना दिसते.
अभिनेता एजाज खानवर रविवारी एका महिला अभिनेत्रीनं बलात्काराचा आरोप करत चर्कोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चित्रपटसृष्टीत संधी देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्या महिलेने केला आहे. याआधीच ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोमुळे एजाज खान वादात सापडले असून, त्याविरोधात अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आली होती.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी एक मोठी घोषणा करत सांगितले की, अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर आता 100 टक्के आयात कर (टॅरिफ) लावला जाईल. त्यांचं म्हणणं आहे की, परदेशी सरकारांनी त्यांच्या देशात चित्रपट निर्मितीला दिलेल्या सवलती आणि प्रोत्साहनांमुळे अमेरिकेतील चित्रपट उद्योग विशेषतः हॉलिवूड वेगाने कोलमडत आहे.
‘जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद 2025’ (वेव्हज)ची सांगता रविवार, दि. 4 मे रोजी पार पडली. जगभरातील गुंतवणूकदार, कलाकार आणि विविध देशांतील पाहुणे मंडळींनी या संपूर्ण कार्यक्रमाला रंगत आणली. या भव्य कार्यक्रमाची ही फलश्रुती...
जागतिक स्तरावरील सर्जनशील आशयनिर्माते, मनोरंजन विश्वातील नामांकित उद्योग कंपन्या, व्हीएफएक्सपासून गेमिंगपर्यंत विविध क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान हे सगळे एका छताखाली आणणारी मुंबईतील वेव्हज शिखर परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. १ ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या निमित्ताने मुंबई भेटीवर असलेल्या विविध देशातील शिष्टमंडळाचे गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. चित्रनगरीत सुरू असलेले चित्रीकरण, विविध सेट्स यांना भेट देत त्यांनी चित्रिकरणाविषयी सविस्तर
Waves conference will shape the future of the entertainment world s jaishankar “जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद’ ही माध्यम आणि मनोरंजनविश्वाच्या भविष्याची रुपरेषा ठरवणार आहे. सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी परस्परांच्या सांस्कृतिक संवेदनशीलता जाणून जागतिक सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवार, दि. 2 मे रोजी केले.
(WAVES 2025 - Rajinikanth praises PM Modi) 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फायटर आहेत. ते सध्या सुरू असलेल्या परिस्थितीशी लढतील. काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करतील', असा विश्वास सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत सुरू असलेल्या चार दिवसीय जागतिक जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज) ते बोलत होते.
करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, आशय (कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो. महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १ मे रोजी केले.
'हाउसफुल' 30 एप्रिल 2010 रोजी प्रदर्शित झालेला साजिद नाडियाडवाला यांचा सिनेमा आज १५ वर्षांचा झाला. या खास प्रसंगी निर्मात्यांनी चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं 'हाउसफुल ५' चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
मराठी बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता रूपेरी पडद्यावर झळकला आहे. ‘झापुक झुपूक’ या त्याच्या पदार्पणातील सिनेमाला नुकतीच प्रेक्षकांची भेट झाली आहे. केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित झाला असून, चार दिवसांतील कमाईची आकडेवारी समोर आली आहे.
सध्या सोशल मीडियावर अभिनेता आमिर खानचा एक व्हिडीओ आणि पोस्टर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो सिख धर्मगुरु श्री गुरु नानक यांच्या रूपात दिसतो. या पोस्टरमध्ये 'लवकरच ट्रेलर येणार' अशी देखील घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि नेटिझन्समध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अनेकांनी हा आमिरचा आगामी चित्रपट समजून चर्चा सुरू केली. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या २३ वर्षांपासून रंगभूमीवर अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेलं ‘सही रे सही’ हे नाटक आजही तितकंच ताजं आणि लोकप्रिय आहे. मराठमोळ्या हास्यनायक भरत जाधव यांच्या दमदार अभिनयाने सजलेलं हे नाटक आजवर ४ हजारांहून अधिक प्रयोग गाठून रंगभूमीवरचा विक्रम प्रस्थापित करत आहे. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतंच या नाटकाबाबत एक अत्यंत मोलाचं विधान केलं आहे. “सही रे सही कधी बंद होणार?” या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर भरत जाधवप्रेमींसाठी अत्यंत भावनिक ठरणारं आहे.