आसाममधील २० जिल्हे पुरामुळे उद्ध्वस्त झाले आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहिती नुसार २० जिल्ह्यांतील सुमारे दोन लाख लोकांना याचा फटका बसला आहे. चाचरमध्ये आलेल्या पुरात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिमा हासाओमध्ये भूस्खलनात दबून तिघांचा मृत्यू झाला आहे.
Read More
ज्ञानवापीच्या वादग्रस्त रचनेत शिवलिंग सापडल्यानंतर आता मथुरेच्या शाही इदगाह मशिदी परिसराबाबत बाबत नवी याचिका दाखल करण्यात आली आहे. ही मशिदीला तात्काळ टाळेबंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तिथले पुरावे नष्ट होऊ शकतात अशी भीती व्यक्त होत आहे.
चीनचे नौदल, हवाईदल आणि ‘स्ट्रॅटेजिक रॉकेट फॉर्सेस’ यांची ताकद अजून वाढणार असल्याची महत्त्वाची बाबही हा अहवाल अधोरेखित करतो. तसेच चीनच्या गोटातील ‘वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन’ म्हणजे अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रे यांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. चीनची आर्थिक ताकद प्रचंड असल्यामुळे त्यांना अशा प्रकारची महागडी शस्त्रे निर्माण करणे सोपे होणार असल्याची चेतावणीदेखील या अहवालातून समोर येते.
देवळाली रेल्वे स्थानकात एक बेवारस बॅग सापडली असून बॉम्ब शोधक नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
येथील प्रभाग क्रमांक ८ मधील उर्दू कन्या शाळेत सोमवारी रात्री ९ ते सकाळी ६ च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शाळेची संरक्षक भिंत तोडून आत प्रवेश करुन शाळेतील वर्ग खोल्यांचे कुलुप तोडून साहित्याची चोरी व नासधूस केल्याचे मंगळवारी उघडकीस आले.