गोकुळ दूध संघाने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ मेपासून लागू करण्यात येणार आहे. मुंबई व पुण्यात गोकुळ दूध प्रतिलिटर ७४ रुपयांनी, तर कोल्हापूर आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ६८ रुपयांना विकले जाणार आहे.
Read More
Chhatrapati Shivaji Maharaj आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले राज्यातील सर्व गडकोट किल्ले कायमचे अतिक्रमणमुक्त करण्याला प्रधान्य देण्यात येईल. तसेच गोसेवा करणाऱ्या गोरक्षकांना गरज लागेल तेव्हा संरक्षण दिले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, दि. २९ मार्च रोजी केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पुण्यातील वढू येथे आले असता ते बोलत होते.
हरियाणात फरिदाबादामध्ये गो तस्करी करणाऱ्या गोरक्षकांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्या एका वाहनाचा पाठलाग गोरक्षक करत होते. यावेळी तस्कर हे मथूराहून मेवातला गोमाता घेऊन जात होते. यावेळी केएमपी महामार्गावर गोरक्षकांनी त्यांचा पाठलाग केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
Gujrat मधील अहमदाबादमध्ये एका गोरक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याआधी त्यांनी गोमांस तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गोमांस पकडण्याचा प्रयत्न केल्याने आपल्यावर हल्ला करण्यात आला, अशी पीडित गोरक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रारीत दाखल केली. या प्रकरणात हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गोरक्षकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा मोहम्मद हुसेनसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या लगत असलेल्या पैठण भागातून अध्यात्माची कास धरलेला एक तरूण केवळ कीर्तन, भजनच नव्हे, तर गोरक्षण आणि अध्यात्म शिक्षणासारखे कार्य करताना, आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात संस्कारित पिढी घडविण्याचे कार्य करीत आहे. त्या ह.भ.प. हरिश्चंद्र चंद्रभान व्यवहारे यांच्याविषयी...
राज्य सरकारने देशी गायीला 'राज्यमाता' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला असून आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशी गोमाता शेतकऱ्यांचं भाग्य बदलू शकतात, असे ते म्हणाले. त्यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
अंत्यविधीसाठी होणारा लाकडांचा वापर थांबवून, त्याऐवजी गायीच्या शेणापासून तयार केलेले गोकाष्ठ वापरण्याबाबत महायुती सरकारने सकारात्मक पाऊल टाकले आहे.
cow slaughter कट्टरपंथी तरूणांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात घडली. महफूज आणि महमूद नावाच्या दोन सख्ख्य़ा भावांनी केलेल्या गोळीबारातून पोलीस थोडक्यात बचावले, मात्र, प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी आरोपींवर गोळीबार केला असून दोन्ही भाऊ जखमी झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक जिंवत गाय, पिस्तुल, गोळ्या आणि धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. ही घटना ३ सप्टेंबर रोजी घडली आहे.
Cow Smuggling हिंदू धर्मात गोमातेला हिंदूंची माता म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गोमातेची तस्करी होत आहे. उत्तर प्रदेशातील बदयू येथील कट्टरपंथी युवक नाझीमने गोमातेची तस्करी केली आहे. याचपार्श्वभूमीवर इस्लामनगर पोलीस हद्दीत हा प्रकार घडला होता. त्यामुळे पोलिसांनी तस्करी करणाऱ्या कट्टरपंथींना अटक केली आहे. त्याचे दोन साथीदार शकील आणि मोनीश अंधाराचा फायदा घेत फरार झाले.
आसाम पोलिसांनी कट्टर इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती मुकीबुर रहमान अझहरीला अटक केली आहे. त्याला मंगळवार, दि. २ जुलै २०२४ प्रशासनाविरुद्ध भडकाऊ भाषण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. आसामचे डीजीपी जीपी सिंग यांच्या सूचनेवरून दारंग जिल्हा पोलिसांनी त्याला पकडले. मुकीबुर रहमान अझहरी यांनी सोशल मीडियावर लखमीपूर पोलीस स्टेशन आणि एसपी यांना हिंसक आंदोलनाची धमकी दिली होती.
योग करणार्या व्यक्तीला योगातील अष्टांगांपैकी पहिले दोन अंग म्हणजे यम, नियम यांचा अभ्यास करूनच पुढे आसन, प्राणायामाकडे जावं लागतं, अन्यथा घाण बाटली स्वच्छ न धुता त्यात औषध भरले असता जसं ते औषध घेणार्याला उपायाऐवजी अपाय होईल, तसं यम, नियम न अंगीकारता आसन, प्राणायामावर उडी मारणार्याचं होऊ शकतं. म्हणूनच म्हणतात, योगशास्त्र हे सोपं नाही. ते अभ्यासून आपलं समग्र व्यक्तिमत्त्व बदलतं, समग्र जीवनावर त्याचा उत्तम परिणाम होतो. व्यक्तिविकासातूनच समाजाचा विकास साधतो. म्हणून, योगशास्त्राचा खर्या अर्थाने प्रचार-प्रसार
युरोपीय महासंघाच्या दूध उत्पादनात यंदा घट होईल, अशी शक्यता एका अहवालात वर्तविण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दूध उत्पादन कमी होणार असल्याने, उपलब्ध दुधाचा वापर कोणत्या उत्पादनासाठी करायचा, याची निवड काळजीपूर्वक करावी लागणार आहे. त्यामुळे भारतातील दुग्ध व्यवसाय क्षेत्रासाठी ही एक नामी संधी ठरु शकते. त्याविषयी सविस्तर...
गुजरातमधील वडोदरा येथील एका दर्ग्याजवळ काही अल्पवयीन मुलांनी दोन गायींवर ॲसिड टाकून त्यांना जाळले. या प्रकरणी पाच मुस्लिम अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुलांनी आधी तेथून जाणाऱ्या गायींना घेरून त्यांचा छळ केला आणि नंतर त्यांच्यावर ॲसिड टाकल्याचे बोलले जात आहे.
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये गोरक्षक आणि गो तस्करांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीनंतर ६ जिवंत गायी जप्त करण्यात आल्या आहेत. गो तस्करांनी गोरक्षकांवर दगडफेक, गोळीबार केला. या गायींची तस्करीसाठी वाहनातून वाहतूक केली जात होती. या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (20 डिसेंबर 2023) घडली.
आसाम आणि मेघालयच्या सीमेजवळ केलेल्या कारवाईत सीमापार गो तस्करीचा प्रयत्न पोलिसांनी रोखला आहे. आसाम आणि मेघालयच्या सीमेजवळ कार्यरत असलेल्या १४ गो तस्करांना पकडण्यात गुवाहाटी शहर पोलिसांना यश आले आहे. २५२ जनावरे वाचवण्यात आली आहेत. सोनापूर पोलिस स्टेशनच्या पथकाने १९ डिसेंबर रोजी टाटा अल्ट्रा (AS01 QC 0994) डिगरू पॉईंटजवळ थांबवून १९ जिवंत गुरांची तस्करी रोखली. पोलिसांनी तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे मोरीगाव जिल्ह्यातील २६ वर्षीय मोहम्मद इफ्तिकार हुसेन आणि ५० वर्षीय मोहम्मद सुरुज अली या दोघांना ताब्यात घेण्यात
गिरिडीहच्या जीटी रोडवरील नेमियाघाट पोलीस स्टेशन हद्दीतील तुरी टोलाजवळ पोलिसांनी गुरांनी भरलेली तीन वाहने पकडली आहेत. मोठ्या संख्येने गायींना भरण्यात आले होते. यात 32 गायींचा मृत्यु झाला होता. ही वाहने बंगाल आणि बांगलादेशात पाठवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरियाणातील नुहमध्ये गोहत्येची घटना घडली आहे. येथे एका शेतात गायीची हत्या करण्यात आली आहे. नुहमधील बिछौर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना दोन जिवंत आणि एक हत्या केलेली गाय आढळून आली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस प्रशासनाला गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर अनेक गुन्हेगारांनी आत्मसमर्पण केले. पकडले जात असताना प्रत्युत्तर देणाऱ्यांनाही पोलिसांनी मारले. दरम्यान, कुशीनगरमध्ये हा प्रकार प्रथमच घडला, जो आजवर घडला नव्हता. येथे महिला पोलिसांच्या पथकाने एका गाय तस्कराचा सामना केला आणि त्याला पकडले. एनामुल उर्फ बिहारी असे या गाय तस्कराचे नाव आहे. त्याच्यावर २५ हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका भागातील असलेल्या गौवंशाला लंपी रोग झपाट्याने पसरत चाललेला आहे.लंपी नामक रोगाने अनेक भागात गाई-बैलांना मृत्यू झाले आहे.तलासरी डहाणू भागातील लंपी रोगाने पीडित असलेल्या गौवंशाला उपचार करिता डहाणू शहराचे विश्व हिंदू परिषद,बजरंगदल,गौरक्षक ऋषीकेश मालविया हे स्वतः पुढे येऊन आपल्या राहत्या घरातच गौवंश उपचार हेतू गौवंश केंद्र सुरु केले आहे.ऋषीकेश मालविया यांनी शेकडो गाई-बैलांचे ओषधो उपचार करुन जीव वाचविण्यात यश आले आहे.ऋषीकेश मालविया यांनी गौवंशाला उपचार हेतू घरीच गौसेवा उपचार केंद्र ब
गोरक्षक, समाजसुधारक नगीना अन्वर खान. वय वर्षे ४१, खानदानी काश्मिरी सौंदर्य, सात्विक साधेपणा, पाच मुलांची आई, गृहिणी. आज तीन-चार वर्षांनी भेटलो होतो. महिला सक्षमीकरणाचे काम करणारी नगीनाभाभी एकदम गोरक्षणापर्यंत कशी पोहोचली? मी तिच्याशी बोलता-बोलता तिची मुलाखतच घेऊन टाकली. त्याचेच केलेले हे शब्दचित्रण...
राज्यात गायींच्या अवैध वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे. अशातच नाशिक जिल्ह्यात गायींना घेऊन जाणारा ट्रक ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले. तसेच, सीमा भागातील पशू वाहतूक संदर्भात भरारी पथकांची स्थापना करुन अवैध पशू वाहतूक रोखण्यात यावी, असे नार्वेकरांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे गोरक्षकांना धमकावण्याच्या, हल्ल्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, तात्काळ चौकशी करुन एफआयआर नोंदविण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधान भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिले.
मंचर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद ची हाक देण्यात आली आहे. लव जिहाद, गोहत्या, धर्मांतर याकडे लक्ष वेधण्यासाठी आंबेगाव तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीने मंचर शहर बंदला व्यावासायाकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंचर शहरातून पथसंचलन केले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ड्रोनद्वारे संपूर्ण शहरावर नजरही असणार आहे.
भारत सरकारविरोधात अपप्रचार करणारी संस्था अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अॅम्नेस्टी इंडियाने दि. २३ मे रोजी कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारसाठी हिंदूविरोधी मागण्यांची यादी प्रसिद्ध केली. त्यात त्यांनी हिजाबवरील बंदी हटवा, गोहत्येला परवानगी द्या आणि मुस्लिम दुकानांवर बहिष्कार टाकणाऱ्या हिंदूंवर कारवाई करण्याचे आवाहन केले.
खोट्या प्रचारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने मानवी हक्कांच्या नावाखाली पुन्हा मुस्लिम तुष्टीकरणाचा सूर आळवला आहे. अॅम्नेस्टीने कर्नाटक सरकारकडे तीन गोष्टींची मागणी केली आहे. त्यात हिजाब बंदी हटवा, गोहत्या कायदेशीर करा आणि मुस्लिम दुकानांवर बहिष्कार टाकणाऱ्या हिंदूंचा बदला घ्या, अशा मागण्या अॅम्नेस्टीने केली आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार बनताच अॅम्नेस्टी इंडिया पुन्हा सक्रिय झाली आहे का? मानवाधिकाराच्या नावाखाली हिंदूविरोधी निर्णय घेण्याची अॅम्नेस्टीची मागणी काँग्रेस पूर्ण करेल का?, असे
आज दि. ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य व्यवस्था, आहार व्यवस्था, अन्नधान्य उत्पादन, साठवणूक व वितरण व्यवस्था यात आमूलाग्र सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करून, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरण, शुद्ध, भेसळमुक्त नैसर्गिक अन्न व खाद्यपदार्थ यांची वाजवी दरात उपलब्धता करून, त्या आधारे पर्यावरणस्नेही निरोगी जीवन जगण्याच्या आपल्या अधिकाराची जपणूक देशोदेशीच्या शासनकर्त्यांनी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला भाग पाडण्याची मागणी जनतेने केली पाहिजे.
पूर्वीपासूनच गोमातेला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. अनेक ग्रंथ व पुराणांमध्येही गोमातेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. मात्र मुंबईतील शिवडी परिसरातील गायवाडी येथे मात्र गाईंना म्हणजेच गोमातेला राहण्यासही नीटनेटका गोठा मिळत नसल्याची धक्कादायक बाब येथीलच स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना उघड केली.
मुंबई : कोरोनाच्या महामारीतून सावरत असतानाच त्वचेशी निगडीत एका जीवघेण्या व्हायरसने सध्या देशभरात थैमान घातलेले आहे. अजून तरी हा व्हायरस गुरांमध्ये आढळून आलेला आहे, पण राजस्थान गुजरात सारख्या राज्यांमध्ये या रोगाने हाहाकार माजवला असून एकट्या राजस्थानातील बिकानेरमध्ये या विषाणूमुळे दररोज ३०० गाईंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. देशातील ५० टक्के गाई-म्हशी या विषाणूच्या विळख्यात आल्या असून हा विषाणू महाराष्ट्रात दाखल झाल्याने राज्याची चिंता वाढलेली आहे.
राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात गुरुवारी दि. २७ जुलै रोजी गोहत्येच्या घटनांवरून राज्य पोलिस आणि स्थानिकांमध्ये सतत संघर्ष सुरू झाल्यानंतर काही कर्फ्यू लागू करण्यात आला. हनुमानगढ जिल्ह्यातील चिरिया गांधी पंचायत आणि गांधी बडी भागात पुढील सूचना मिळेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आंदोलकांनी ११ जुलै रोजी ईदच्या वेळी कथितपणे गोहत्येत सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी गोहत्येच्या आरोपाखाली आरोपी फारुक, अन्वर, अमीन खान आणि सिकंदर खान यांना अटक केली.
“देशातील हिंदू समाज गाईला माता मानतो. त्यामुळे मुस्लीम समुदायाने येत्या बकरी ईदच्या दिवशी गाईची कुर्बानी टाळावी,” असे आवाहन ‘ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे (एआययुडीएफ) वादग्रस्त खासदार आणि आसाम जमियत उलेमाचे प्रदेशाध्यक्ष मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी नुकतेच केले.
महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजे अर्थातच आदेश बांदेकर गेली १८ वर्षे सातत्याने 'होम मिनिस्टर' या झी मराठीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत
गाय वाचली, तर देश वाचेल हा विचार संघाच्या माध्यमातून गौतम कराळे यांच्या मनात रूजला होता. जाणून घेऊया वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत २०० पेक्षा अधिक गोवंश सांभाळणार्या गौतम कराळे यांच्याविषयी...
जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील अवैध कत्तलखान्यावर मोठ्या कारवाईत पोलिसांनी १११ गुरे जप्त केली आहेत. या गुरांना जवळच्या तीन गोशाळांमध्ये पाठवले आहे. अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्ली परिसरात असलेल्या कत्तलखान्यावर १८ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांच्या छाप्यापूर्वी घटनास्थळावरून निघून गेलेले कत्तलखाना चालवणारे अज्ञात गुन्हेगार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
भारतात ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात होणार असून कोविन अॅप आणि संबंधित वेबसाईटवर रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे.
गायींचे महत्त्व परदेशात वाढीस लागत असताना भारतात मात्र, अजूनही गोरक्षणासाठी संघर्ष करावा लागतो.
राज्यातील गायींना वेळेवर वैद्यकीय सेवा देण्यासाठी पोलिसांची आपत्कालीन हेल्पलाइन सेवा 'डायल ११२' च्या धर्तीवर उत्तर प्रदेशचे योगी सरकार एक अभिनव रुग्णवाहिका सेवा सुरू करणार आहे. यूपीचे दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी रविवारी (१४ नोव्हेंबर २०२१) मथुरा येथे सांगितले की राज्यव्यापी स्तरावर ही सेवा सुरू करण्यासाठी ५१५ रुग्णवाहिका तयार करण्यात आल्या आहेत.
इंग्लंडमधील ‘सोमरसेट काऊ फार्म’मध्ये एका गाईला ‘मॅड काऊ डिसीज’ झाल्याने त्या देशातील पशुवैद्यक यंत्रणा गंभीर झाली आहे. इंग्लंडपाठोपाठ ब्राझील देशातही दोन गाईंना हा रोग आढळला आहे. हे लक्षात येताच त्या देशाने चीनला जाणारी त्यांची गोमांसाची निर्यात रोखली आहे. हा रोग संसर्गजन्य रोगासारखा वेगाने पसरणारा नाही. तरीही जगातील एकूण सव्वाशे लाख कोटी रुपयांच्या गोमांस व्यवहारापैकी निम्मा व्यवहार अनियंत्रित व बेकायदा चालतो. त्यामुळे त्याचा धोका नाकारता येत नाही. शिवाय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सारे जग सावध झाले आहे.
कृषिसमृद्धीसाठी गोहत्याबंदीविरोधातील आघाडी वेळीच रोखणे आवश्यक
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा होऊन ६ वर्षे उलटली तरी गोहत्या थांबलेल्या नाहीत. बीफ माफिया आणि कसायांशी काही भ्रष्ट पोलिसांच्या असलेल्या आर्थिक हितसंबंधामुळे राज्यात या कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. बकरी ईदच्या निमित्ताने दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जाते हे सर्वश्रुत आहे. गोवंश हत्याबंदी कायदा अमलात आल्यापासून यामध्ये थोडीफार घट झाली असली, तरी या हत्या थांबलेल्या नाहीत.
आसाम सरकारने तयार केलेला नवा ‘पशुधन संवर्धन कायदा’ म्हणजे अवैध गोहत्याबंदीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. तसेच त्याकडे अर्थव्यवस्थेचा समतोल साधून पशुनियमनासाठी केलेला एक उत्तम प्रयत्न म्हणूनही पाहिले पाहिजे.
मेक्सिको, नायजेरिया, पनामा, युगांडा, पेरू, अझरबैजान, युक्रेन, व्हिएतनाम, इराक यांसारख्या देशांसोबतच कॅनडा, संयुक्त अरब अमिरातीसारख्या तुलनेने विकसित आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर देशांनीही ‘कोविन’मध्ये रस दाखवला आहे.
गाय वासराला जन्म दिल्यानंतरचे दृश्य आम्ही पाहिले आहे काय? ऋषींची दृष्टी तिथे पोहोचली आणि लगेच त्यांनी आपल्या वेदमंत्रात तिचे उदाहरण दृष्टान्त म्हणून वापरले. गाय वासरावर अपार प्रेम करते, पण इतरांपेक्षा अधिक!
देशातील छोट्या शेतकर्याला त्याची शेती फायद्याची ठरली तर त्याचा आणि देशाचा फायदा तर होईलच, पण गेली ७५ वर्षे जे महायुद्ध दीडशे देशांवर लादले आहे आणि त्यात त्या देशातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्या सार्यातून बाहेर येण्यास गोआधारित शेतीची पायवाटच उपयोगी पडेल.
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी हे वर्षे ‘गाय वर्ष’ मानायचे ठरविले आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अतिहलाखीची आहे. गेल्या पंचवीस वर्षात त्या देशात औद्योगिक प्रकल्प असे फारसे उभे राहिले नाहीत. त्यातून मार्ग काढण्यासाठी कांही शेतकर्यांनी गांजा, अफू, चरस यांची शेती करून पाहिली. त्यातून निर्यातीला वावही मिळाला पण तरुण पिढी हाताबाहेर गेली. याऐवजी गाईवर लक्ष दिले तर एका बाजूला जगाच्या बाजारात दुधाची आणि दुधाच्या पदार्थांची निर्यातही करता येईल आणि इंधनाचा प्रश्न सोडविण्
केंद्रातील प्रत्येक मंत्रालयाने त्यांच्या त्यांच्या क्षेत्राला जोडून जेवढे गोविज्ञानाचे क्षेत्र येते, त्यावर ते मंत्रालय काम करत आहे. नुकताच खादी मंत्रालयानेही गाईच्या शेणापासून तयार केलेले रंग विक्रीस घेतले आहेत. त्या रंगाने भिंतींना बुरशी येणे, काही विषारी विषाणूनिर्मिती होणे, हे टळते व पर्यावरणरक्षण होते. कडाक्याच्या उन्हाळ्यात ती घरे थंड राहतात आणि कडाक्याच्या थंडीत ती घरे उबदार राहतात, असा अनुभव आला आहे.
केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रीय कामधेनू आयोगाची स्थापना केली होती. हा आयोग केंद्र सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. गायी आणि गोवंशाचा विकास, संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणे हे आयोगाचे उद्दिष्ट आहे. याच आयोगानं २५ फेब्रुवारी रोजी देशभरात गायींवर आधारित एक परीक्षा आयोजित केलीय.
गो कॅबिनेटच्या स्थापनेसंदर्भातील पहिली बैठक २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता घेण्यात येणार
केरळमध्ये गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी दिलेले अननस खायाला दिल्याच्या घटनेनंतर आता हिमाचल प्रदेशमध्ये एका गाईला बॉम्ब खायला देण्याची घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. गोरक्षेचा दाखला आपल्या देशात दिला जातो तिथेच आता लोक गाभण गाईला विस्फोटक खायला देत आहेत.
'कोरोना' संसर्गाचा उद्रेक सुरू झाल्याने जगातील अनेक संशोधन संस्था त्यावरील उपाययोजनांच्या मागे लागल्या आहेत. याबाबत गेली काही वर्षे गोविज्ञान क्षेत्रात जे प्रयोग झाले, त्यावरुन असे निश्चितपणे म्हणता येईल की, ही आव्हाने पेलण्यास गोविज्ञान समर्थ आहे.
विकारांची माहिती देणारे 'सांडू' संस्थेची चर्चा