संपूर्ण जगात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस पुन्हा एकदा जागा होताना दिसतो आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर मुंबईतही दोन संशयित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
Read More
समाजातील दिव्यांग मुले आणि वयोवृद्धांसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे प्रा. महेश पाटील यांच्याविषयी...
'World Health Organization’ने नुकतेच एक महत्त्वाचे पाऊल उचलले. महामारी नियंत्रणासाठी एक आंतरराष्ट्रीय करार तयार करण्याबाबतचा प्रस्ताव या संघटनेने अंतिम केला आहे. या कराराचा उद्देश भविष्यातील साथरोगांचा धोका ओळखून, त्यावर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी जागतिक सहकार्याची नवी चौकट निर्माण करणे हा आहे. या मसुद्यात प्रभावी लसीकरण, वैद्यकीय संशोधन, माहितीचे पारदर्शक आदानप्रदान आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणांतील समन्वय यासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत. पण, या प्रस्तावाची वेळ, स्वरूप, आणि त्यामागची ऐतिहास
व्यवस्थापनातील उच्चपदस्थांचे राजीनामे हे कंपन्यांच्या कामगिरीवर आणि एकूणच कार्यसंस्कृतीवर सर्वांगीण परिणाम करणारे ठरतात. विशेषकरुन ‘कोविड’ महामारीच्या काळात मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्यामुळे विविध कंपन्यांची अवस्था अधिक बिकट झाली होती. पण, सध्या अशा राजीनाम्यांची संख्या घटलेली दिसून येते. त्यानिमित्ताने व्यवस्थापन क्षेत्रातील मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्याचे प्रमाण आणि त्याचे परिणाम यांचा आढावा घेणारा हा लेख...
भारतामध्ये आताच्या घडीला HMPV या व्हायरसचे एकूण ७ रूग्णं आढळले आहेत. HMPV हा मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये आढळून आल्याचे दिसून येत आहे. बेंगलुरू, नागपूर, चेन्नाई आणि अहमदाबाद या शहरांमधील बालकांना याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हा नवीन व्हायरस नसून, चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही.
२०२० साली वर्षभर थैमान घालणाऱ्या कोविड व्हायरसने जगाला घाम फोडला होता. कोव्हिड काळात बसलेल्या आर्थीक तडाख्यातून बाहेर यायला खूप मोठा काळ जावा लागला. अशातच आता चीनमध्ये HMPV (ह्युमन मेटान्यूमोनोव्हायरस) आढळला असून यामुळे अनेकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या अनेक रूगणालयांमध्ये रांगा लागल्या आहेत. अशातच आता भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मोठे वक्तव्यं केलं आहे.
(Asim sarode)“बदलापूरसारख्या संवेदनशीलप्रकरणी पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील असीम सरोदे उबाठाचे निकटवर्तीय असून, ते सिलेक्टिव्ह अॅक्टिव्हीझम करतात,” अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी केली. “चिमुरड्यांवर अत्याचार करणार्या नराधम अक्षय शिंदेचा सरोदे यांना एवढा पुळका का आला?” असा सवाल त्यांनी केला.
बायडेन प्रशासन आपल्यावर दबाव आणत होते. कोव्हिड काळातील माहिती दडपण्यासाठी मेटावर दबाव टाकण्यात आला, असा खुलासा मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका पत्रात नमूद केले आहे.
चीन विस्तारवादी देश आहे, यात काही शंका नाही. चीन दुसर्या देशांचे भूभाग हडपण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातो. चीन जमिनी चोरतो, हे सबंध जगाला माहीत होतेच, मात्र आता याच चीनमध्ये चक्क मृतदेह चोरणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा थाटामाटात लग्न सोहळा १२ जुलै रोजी देश-विदेशातील पाहुण्यांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर १४ जुला रोजी अनंत-राधिकाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा झाला ज्यात बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता अक्षय कुमारची उपस्थिती काहीशी भुवय्या उंचावणारी होती. अक्षय कुमारला कोरोनाची लागम झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र तरीही त्याने अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी कशी लावली असा प्रश्न सध्या केला जात आहे.
‘कोविड’ महामारीच्या संकटानंतर आरोग्य विमा पॉलिसी घेणार्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विमा हा आजारपणानंतरच्या खर्चाचा दावा संमत व्हावा म्हणून काढला जातो. पण, विमा कंपनीकडून/टीपीए (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेशन) कडून काही प्रकरणांत दावा मंजूर केला जात नाही/ फेटाळला जातो. पण, असे होऊ नये, आपला दावा संमत व्हावा, यासाठी नेमकी काय दक्षता घ्यावयास हवी, याची माहिती आजच्या लेखात करुन घेऊया.
मालदीव... पूर्वी कधीही फारसा चर्चेत नसलेला, हा 1 हजार, 192 बेटांचा देश, हल्ली दिवसाआड बातम्यांच्या केंद्रस्थानी झळकताना दिसतो. कधी भारताविरोधी फुटकळ बडबडीमुळे, तर कधी नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू यांना सहन कराव्या लागणार्या देशांतर्गत विरोधामुळे. मालदीवची सध्याची राजकीय स्थिती चिंताजनकच. पण, आता या द्वीपराष्ट्रावरील कर्जबोझा दिवसेंदिवस वाढत असल्याचे ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने (आयएमएफ) जाहीर केले आहे. त्यामुळे चीनच्या कवेत गेलेले, मालदीव हे बुडतीचे बेट ठरण्याचीच शक्यता बळावलेली दिसते. त्यामुळे माल
संजय राऊत, हसी मजाक करा पण कोविड घोटाळ्याचा हिशोब तर द्यावाच लागेल, असे प्रत्युत्तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांना दिले आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप करत किरीट सोमय्यांनी त्यांच्याकडे हिशोब मागावा असे म्हटले होते. यावर आता सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई महापालिकेतील घोटाळ्यासंदर्भात उबाठा गटावर आरोप होत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे अनेक पुराव्यांचे दाखले देत ठाकरे सरकारच्या काळात झालेले घोटाळे पुढे आणत आहेत. यातच आता आदित्य ठाकरेंच्या मित्रावरही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या नावावर असलेल्या म्युच्युअल फंड युनिट्स आणि बँक खात्यांसह शहरातील १२.२ कोटी रुपयांच्या तीन फ्लॅटची मालमत्ता जप्त केली आहे. सुजित पाटकर कोविड फील्ड हॉस्पीटल घोटाळ्यातील सहआरोपी आहेत.
२०२३ -२४ चा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ५० हजार कोटींहून अधिक रुपयांचा होता. म्हणजेच गोवा, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरासारख्या छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाची रक्कम कित्येक पट्टींनी जास्त मानली जाते. त्यामुळेच आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईची ओळख आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ५० ते ७० टक्के खर्च हा पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांचा पगार आणि पेन्शन यावरच होतो. उर्वरीत खर्च विविध कामं, योजना यावर केला जातो, असं ही सांगितले जातं. मा
चीनमध्ये मागच्या काहीदिवसांपासून कोरोना सदृश महामारीने थैमान घातले आहे. तीव्र तापाबरोबरच दम लागणाऱ्या या आजारामुळे हजारो लहान मुलं रुग्णालयात दाखल झाले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा आजारही कोरोनासारखा संसर्गजन्य आहे, एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होतो.
देशांतर्गत विमानवाहतूकीत १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी विमानप्रवाशांच्या नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली. खुद्द केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी ही माहिती दिली. देशांतर्गत विमान उड्डाण करणाऱ्या प्रवाशांची संख्या रविवारी ४ लाख ५६ हजार ९१० इतकी झाली. शनिवारी हा आकडा ४ लाख ५६ हजार ७४८ इतका होता.
बाल हक्कासाठी लढा देणाऱ्या 'क्राय' संस्थेकडून देशभरातील विविध राज्यांमध्ये इंटरनेट वापर संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील लहान मुलांकडून सर्वात जास्त इंटरनेटचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
चीनच्या पोलादी पडद्यामागील घटनांचे अन्वयार्थ लावणे अवघड असतानाच चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांच्या मृत्यूची बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे चीनच्या गूढ राजकारणात या बातमीचा मागोवा घेताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, एखाद्या सरळ असू शकणार्या घटनेकडेही आता सरसकटपणे शंका घेतली जाऊ शकते, अशी ही परिस्थिती.
इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने सरकारी आणि काही जुन्या खाजगी पिढीतील बँक कर्मचार्यांसाठी १५ टक्के पगारवाढ प्रस्तावित केली आहे. तसेच लवकरच आठवड्यातून पाच दिवस काम सुरू करण्याचीही योजना आहे. दि.२६ ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र इतर बदलांसह पगारात आणखी वाढ करण्याची मागणी अनेक संघटना करत आहेत.
सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन, इस्रायल-‘हमास’ आणि अझरबैजान-आर्मेनिया हे तीनही संघर्ष मध्य आशिया प्रांताच्या अवतीभवतीच घडत आहेत. विशेषतः रशिया-युक्रेन आणि अझरबैजान-आर्मेनिया हे संघर्ष तर सोव्हिएतोत्तर देशांमध्येच सुरू आहेत. यामागे सोव्हिएत काळातील सदोष सीमा-आखणी आणि विविध वांशिक-धार्मिक गटांविषयीची चुकीची धोरणे, ही पार्श्वभूमी आहे. तसेच सीमा-वाद आणि भाषिक-वांशिक संघर्ष मध्य आशियातही आहेत. अशाप्रकारे लष्करी बळाच्या जोरावर प्रस्थापित सीमांमध्ये केलेले बदल संपूर्ण युरेशियन प्रांतालाच हादरवून टाकणारे आहेत.
पुण्याच्या ससून रुग्णालयातून कैद्याच्या पलायनाची घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांच्या कारभाराइतकी किंवा कदाचित जास्तच चर्चा रुग्णालयाच्या कारभाराचीही झाली. पुण्यातील हे मोठे सार्वजनिक रुग्णालय नेहमीच चर्चेत असते.
‘कोविड’ काळात उद्धव ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केला, असा भंडाफोड उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. संभाजीनगर व नांदेड येथे घडलेल्या दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहेत परंतु, विरोधकांनी त्याचे राजकारण न करता सूचना कराव्यात, असे आवाहन उद्योगमंत्री सामंत यांनी केले. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नांदेड, नागपूर, संभाजीनगर रुग्णालयातून मृतांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया येत आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत नांदेड प्रकरणावरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कोविड काळात आपण औषधं कानाकोपऱ्यात पोहोचवली. असं ठाकरे म्हणाले आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही आम्ही कोरोनाचा सामना केला. मी मुख्यमंत्री असताना सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. असं ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
करोनाकाळात माणसे मरत असताना मास्क लावून नोटा मोजणाऱ्यांनी आमच्या सरकारवर टिका करू नये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि उबाठाप्रमुख उध्दव ठाकरे यांना शुक्रवारी लगावला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे, ती ८ दिवसात न दिल्यास पिक विमा कंपन्यांनी नियमानुसार होणाऱ्या कारवाईची तयारी ठेवावी, असा इशारा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. सन २०२०-२१ मधील प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास काही पिक विमा कंपन्यांकडून विलंब होत असल्याने त्याबाबत आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उप
जंबो कोविड सेंटर घोट्याळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, पाटकर यांनी कंपनी स्थापन करण्यापूर्वी लाइफलाइन हॉस्पिटलचे लेटरहेड जयस्वाल यांना देण्यास वापरले. पाटकर यांनी संजय राऊत यांच्या नावाचा वापर करून टेंडर मिळवले, यासाठी जयस्वाल यांनी पाटकरांना मदत केली. पाटकर आपल्या राजकीय संपर्काचा वापर करून निविदा प्रक्रियेची पूर्वमाहिती मिळवत होता. वरळी आणि दहिसर कोविड जंबो रुग्णालयाच्या निविदा चर्चेसंदर्भात पाटकर यांनी जयस्वाल यांची भेट घेतल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
मराठी माणूस उद्योगात यायचे म्हटलं की, जरा विचारच करतो. आपल्या अनुभवांचा फायदा इतरांना व्हावा, यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम डोंबिवलीकर केदार पाध्ये करीत आहेत, त्यांच्याविषयी...
कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या आरोेपपत्रात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. बीएमसी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याचे बार, बिस्किटे आणि नाणी वाटण्यात आली, असा दावा ईडीनं केला आहे. जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाल्याचे ईडीने सांगितले आले. या कालावधीत ३२.४४ कोटी रुपये बेकायदेशीररित्या कमावले गेले. शुक्रवारी (२९ सप्टें.) विशेष न्यायालयाने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचीही दखल घेतली. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्
'द कश्मिर फाईल्स', 'द केरला स्टोरी' या चित्रपटांच्या यशानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. करोना काळात जगाला वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कॉवॅक्सिन लसीबद्दलची सत्य कथा मांडणारा हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. त्यांनी त्यावरुन केलेलं एक धक्कादायक वक्तव्य वादाचा विषय झाला आहे. अग्निहोत्री यांनी कॉग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यावर केलेले आरोप सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेचे कारण झाला आहे.
पाश्चिमात्य देशांनी भारताकडे आजपर्यंत कायम एक बाजारपेठ म्हणून व्यावसायिक दृष्टीनेच पाहिले. पण, मागच्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’, ‘मेड इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप्स इंडिया’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करत, भारताला जगातील एक मुख्य उत्पादक देश बनवले. त्याचाच परिणाम आज आपल्याला भारताच्या निर्यातीवाढीतून दिसून येतो. त्याचेच हे आकलन...
अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला द वॅक्सिन वॉर चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून पल्लवी जोशी चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, यावेळी नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषदेत एक महत्वाचे विधान केले आहे. नाना पाटेकर असं म्हणाले की, “स्मशानात लागणारी लाकडं गोळा करुन ठेवली आहेत”. त्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
करोनाच्या सावटातून जगाला वाचवण्यासाठी ‘कोवॅक्सीन’ ही भारतीय लस तयार करणारे डॉ. बलराम भार्गवा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्या महिला शास्त्रज्ञांची गोष्ट ‘द वॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून लवकरच आपल्यासमोर येणार आहे. ‘द काश्मिर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’ असे सत्य घटनांवर आधारित यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केलेले विवेक अग्निहोत्री यांनी पुन्हा एकदा एक नवा विषय मांडण्याचा विडा उचलला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी हिने पत्रकारांशी संवाद साधत चित्रप
करोनाच्या सावटातून लोकांना वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी पुढाकार घेत स्वत:ची कोवॅक्सिन लस तयार केली. डॉ. बलराम भार्गवा आणि त्यांच्या महिला शास्त्रज्ञांच्या चमुने ही करोनावरील लस कशी तयार केली याची सत्य कथा सांगणारा चित्रपट 'द वॅक्सिन वॉर' विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी हिने बातचीत करताना डॉ. भार्गवा यांनी 'गोईंग वायरल' हे पुस्तक कोवॅक्सिन लसीवर लिहिले होते. या पुस्तकाचे मालकी हक्क 'द वॅक्सिन वॉर' चित्रपटासाठी त्यांनी केवळ १ रुप
‘द वॅक्सिन वॉर’ या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित आगामी चित्रपटात डॉ. बलराम भार्गवा यांची भूमिका नाना पाटकेर यांनी साकारली आहे. मात्र, चित्रपटात त्यांची व्यक्तिरेखा साकारण्यापुर्वी नाना कधीच डॉ. भार्गवा यांना भेटले नसल्याचा खुलासा अभिनेते नाना पाटेकर यांनी केला. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे विशेष कौतुक नानांनी केले. “संपुर्ण टीमने विषयाचे सखोल संशोधन केले आहे आणि मला डॉ. भार्गवांबद्दल जी माहिती दिली त्यावरुन मी त्यांची व्यक्तिरेखा साकारली असल्याची कबूली देखील नानांनी दिली. त्यामुळे च
प्रवास विमा तुमच्या प्रवासादरम्यान विविध जोखीमांपासून संरक्षण देतो आणि तुमचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी फायदेशीर ठरतो. प्रवासादरम्यान सामानाची चोरी, वैद्यकीय आणीबाणी, प्रवासादरम्यान अपघात, पासपोर्ट हरवणे, उड्डाण विलंब किंवा उड्डाण रद्द होणे इत्यादी सर्व प्रकारच्या परिस्थितीत या विम्यापासून आर्थिक संरक्षण मिळते. म्हणूनच नियमित प्रवास करणार्या प्रवाशांना प्रवास विम्याजवळ माहिती असणे आवश्यक आहे.
आर्थिक वर्ष २०२० ते २०२३ या कालावधीत देशात एकूण ५.२ कोटी नवीन रोजगार निर्माण झाले असल्याची माहिती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या अहवालातून नुकतीच समोर आली आहे. देशात बेरोजगारी वाढली असल्याचा खोटा दावा करणार्या विरोधकांना ही आकडेवारी म्हणजे एक सणसणीत चपराक. सर्वच क्षेत्रात रोजगारांची संख्या पुरेशा प्रमाणात वाढत असून, केंद्र सरकारचे उपक्रम रोजगाराला चालना देणारे असेच ठरले असल्याचे, यातून स्पष्ट होते.
ठाकरे गटाच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली असुन मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहेत. बॉडीबॅग घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर यांना समन्स पाठवले आहे. पेडणेकर यांना 11 सप्टेंबरला चौकशीला हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टाकडुन अटकेपासुन तुर्तास दिलासा मिळाला आहे. यापूर्वी किशोरी पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मुंबई हायकोर्टाने पेडणेकरांना तुर्तास दिलासा जरी दिला असला तरी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असणार आहे.
दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे प्रारंभीपासूनच कलाकारांना, त्यांच्या कलाकृतींना व्यासपीठ देणारे एक हक्काचे माध्यम. आमच्या या प्रयत्नांत जेजेच्या प्रा. गजानन शेपाळ यांचे भरीव योगदान. ‘कोविड’पूर्वी विविध कलाप्रदर्शनांचा आढावा घेणारे ‘कलादालन’ हे त्यांचे सदर अगदी अखंडपणे सुरु होते. ‘कोविड’ काळात कलाप्रदर्शनांमध्येही खंड पडला. पण, कलेच्या प्रचार-प्रसाराचे व्रत थांबता कामा नये, म्हणून प्रा. शेपाळ यांनी विविध कलाकार, त्यांच्या कलाशैलीविषयी स्तंभलेखनाची कल्पना मांडली आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’नेही या कल्पनेला मूर्त स्वरुप
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोरोना काळातील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोरोना काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीने किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांना २९ ऑग. अटकेपासुन दिलासा मिळाला आहे.
मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा आवाज उठवला असून यासंदर्भात ते म्हणाले, पालिकेतील खिचडी घोटाळा हा जवळपास १६० कोटी रुपयांचा असल्याचे सोमय्या म्हणाले, यावेळी सोमय्यांनी पुन्हा एकदा खा. संजय राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कोविड काळातील खिचडी घोटाळा संजय राऊत यांनी यांसदर्भातली कंत्राटे मिळवून आपल्या मित्रपरिवाराचा फायदा करून दिल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.
सुजीत पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत. पाटकर हे पेशाने व्यावसायिक आहेत. लाइफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये पाटकर एक भागीदार होते. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता.
जगात कोरोनाने दोन वर्षांपूर्वी धुमाकूळ घातले होते. संपूर्ण जगास वेठीस धरणाऱ्या कोरोनाने विदेशात पुन्हा डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात १ महिन्यात कोरोनाची तब्बल १५ लाख नव्या केसेस समोर आल्या आहेत. याची सर्वसाधारण टक्केवारी पाहिली तर जवळपास ८० टक्के असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोविड सेंटर घोटाळ्याबाबत किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलिस ठाण्यात पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.
कोविड सेंटर घोटाळ्याबाबत किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलिस ठाण्यात पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. या संपूर्ण प्रकारणावर आता भाजपा नेते किरीट सोमय्यांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
पावसाळी अधिवेशनाचा आज (२८ जुलै) दहावा दिवस आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या बिलावरून विधानसभेत गरमागरामीची चर्चा झाली. मुंबई महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार, कोविड काळातील गैरव्यवहाराचा भाजप आमदारांकडून पुनरुल्लेख करण्यात आला. शिवाय यावेळी भाजपा आमदारांनी ठाकरे पितापुत्रांवर घणाघाती टीका केली.
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे (एआय) किंवा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या तंत्रज्ञानामुळे नोकर्यांवर कुर्हाड कोसळणार, ही वस्तुस्थिती असली, तरीही भविष्यात या नव्या तंत्रज्ञानासाठी सुसज्ज होण्याशिवाय कुणालाही पर्याय नाही. मग ते नोकरदार असो वा व्यावसायिक, सर्वांनाच आता यासाठी विद्यार्थ्यांच्याच भूमिकेत शिरणे आवश्यक आहे.