लोकांच्या बाह्यकृतीवरुन त्यांच्या अंतरंगाचा नीट अंदाज येत नाही. यासाठी खर्या भक्ताला ओळखायचे, तर त्याच्या अंतरंगाचा, आंतरिक गुणांचा शोध घ्यावा लागतो. त्याच्या मनात काय चालले आहे, हे तर्काने आणावे लागते, तरच सर्वोत्तमाच्या दासाची ओळख होऊ शकते. काही श्लोकातून स्वामी भक्ताला जाणण्यासाठी काही अनुभवी लक्षणे अथवा आधारभूत चिन्हे सांगत आहेत.
Read More
जीवन म्हणजे एक महासंग्राम आहे. यातील प्रत्येक क्षण हा युद्धाचा प्रसंग! पण तो असतो असामान्य धैर्यवंत योद्ध्यांसाठी! हे योद्धे सामर्थ्यशाली असतात. त्यांच्या जीवनात सुख-दु:ख, हानी-लाभ, नफा-तोटा, यश-अपयश, जय-पराजय असे हे विविध द्वंद्वात्मक प्रसंग नेहमीच समोर येतात.
शरीराच्या साहाय्यानेच आपणास सृष्टीतील सर्व भोग्य पदार्थांचे सेवन करता येते. सर्व सुखांचा आस्वाद घेता येतो आणि याच साधनरूप शरीराने जीवनाचे अंतिम साध्य असलेले परब्रह्म साधता येते, इतके या शरीराचे महत्त्व आहे.