(MLA Ashish Deshmukh) महायुती सरकारच्या नवनिर्वाचित मंत्रिमंडळातून डावलले गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याने पुढे ते नेमकी काय भूमिका घेणार, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या छगन भुजबळ यांना नेहमीप्रमाणे यंदाही मंत्रीपद मिळणार, याबद्दल अनेकांना खात्री होती. मात्र रविवार, दि. १४ डिसेंबर रोजी नागपूर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी ९ मंत्र्यांच्या यादीत छगन भु
Read More
सावनेरमध्ये आशिष देशमुखांकडून काँग्रेसचा गड उद्धवस्त! | Ashish Deshmukh | Sunil Kedar
विधानसभा निवडणूकीचा निकाल हा काँग्रेससाठी अतिशय लाजीरवाणा असून काँग्रेसच्या आमदारांनी भाजपममध्ये विलीन व्हावे, असे वक्तव्य भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली.
नागपूर : “सावनेरमधील अवैध धंद्यांना लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे. सुनील केदार यांच्या कार्यकाळात विकासाचे नाही, तर दादागिरीचे राजकारण झाले,” अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) केली आहे. सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सावनेर येथील भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. दरम्यान, विकास समजणारा लोकप्रतिनिधी निवडा, असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गडकरी यांच्या नेतृत्वात आम्ही केंद्र सरकार आणि महाराष्ट
सावनेरमधील अवैध धंद्यांना लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे. सुनील केदार यांच्या कार्यकाळात विकासाचे नाही तर दादागिरीचे राजकारण झाले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी सावनेर येथील भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
नागपूर : भाजपा-महायुतीला दिलेल्या एका मतामुळे राज्यात महायुतीचे सरकार येईल.. आपलाच मुख्यमंत्री, आपलाच पालकमंत्री, आपलाच उमेदवार विजयी होणार आहे. भाजपाला मिळणारे एक मत महाराष्ट्र येथील १४ कोटी जनतेचा विकास साधणारे असेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे ( Bawankule ) यांनी केले.
महिन्याचे १०० कोटी वसुल केले म्हणून आमचे काका १३ महिने आत गेले, अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांवर केली आहे. अनिल देशमुखांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
विजयभाऊ आणि नाना भाऊ यांच्यात भाऊ भाऊ आणि एकमेकांना फाडून खाऊ, असं सुरु आहे, असा घणाघात भाजप नेते आशिष देशमुखांनी केला आहे. तसेच त्या दोघांमध्ये अजिबात पटत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी मंगळवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
अनिल देशमुखांचा पेनड्राईव्ह करप्ट आहे. ते फक्त फॅशनसाठी पेनड्राईव्ह वापरतात, अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. तसेच त्या पेनड्राईव्हमध्ये काही असल्यास ते जनतेसमोर उघड करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लोकसभा निवडणूकीला घाबरले आहेत. तसेच पराभवाच्या भीतीने त्यांनी पळ काढला आहे, अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला
उपोषणकर्ते मनोज जरांगे हे पवार गटाकडून (मविआ) लोकसभा निवडणूक लढविणार, असा गौप्यस्फोट भाजप नेत्याने केला आहे. दरम्यान, जरांगेंना आधीपासूनच राजकीय महत्त्वांकाक्षा होती, त्यासाठीच त्यांनी मराठा आरक्षणाकरिता आंदोलन उभे केले असा दावादेखील भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, देशमुख यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
मिलिंद देवरांनंतर आता अशोक चव्हाणांनीही काँग्रेसला रामराम केल्यापासून, महाराष्ट्र काँग्रेसमधील अस्वस्थता उफाळून आली. काँग्रेसफूटीसाठी सर्वस्वी नाना पटोलेच जबाबदार असल्याचा पक्षांतर्गत सूरही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. काही प्रमुख नेत्यांनी नानांबाबतची नाराजी सोनिया गांधींचे दूत रमेश चेन्नीथला (महाराष्ट्र प्रभारी) यांच्या कानावरही घातली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी नानांचा पत्ता कापला जाईल, ही शक्यताच अधिक.
राहुल गांधी उच्च शिक्षित आहेत, मात्र ते चांगले वक्ते नाहीत. असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी खासदार सुस्मिता देव, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार उल्हास पवार, युनिव्हिर्सिटीचे अध्यक्ष राहुल कराड, संस्थापक विश्वनाथ कराड उपस्थित होते.
काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दि. १७ जून रोजी भेट घेतली. यानंतर देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना दि. १८ जून रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानी आशिष देशमुख यांनी ही भेट घेतली. पक्षाविरोधी भूमिकेचा ठपका ठेवत आशिष देशमुख यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली होती.
मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी नुकतिच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर काही कालावधीतच पक्षविरोधी कारवाया केल्याचे कारण देत त्यांच्यावर कारवाई केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांची सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
काँग्रेसमधून निलंबित असलेल्या आशिष देशमुख यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. एक तास चाललेल्या या भेटीनंतर आशिष देशमुख यांनी ही सदिच्छा भेट होती, फडणवीस हे विदर्भाचा विकास घडवणारे एकमेव नेते आहेत आणि पक्ष विरहित संस्कृतीच्या नात्याने ते माझ्याकडे आले होते अशी प्रतिक्रिया दिली.
"काँग्रेसचा बडा नेता मंगळवारी पक्षप्रवेश करेल." असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. देशमुख यांनी आज दि. २४ एप्रिल रोजी सकाळी बावनकुळे यांची भेट घेतली. देशमुख यांनी घेतलेल्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नागपूरमधील कोराडी येथील बावनकुळेंच्या निवासस्थानी ही भेट घडली.
नाना पटोलेंना शिंदेकडून महिन्याला १ खोका दिला जातो. त्याचबरोबर १६ एप्रिलला नाना पटोले हे गुवाहाटीत असतील, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाने आशिष देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंवर गंभीर आरोप देशमुखांनी केले आहेत.
राहुल गांधीनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या विधानबद्दल ओबीसी समाजाची माफी मागावी. कारण ओबीसी समाज राहुल गांधीच्या वक्तव्याने दुखावला आहे. त्यामुळे राहुल गांधीनी माफी मागण्यात काहीच गैर न मानता ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी, असे विधान काँगेस नेते अशिष देशमुख यांनी केले.
सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने कॉग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. सत्यजित तांबेंच्या उमेदवारी बाबत घोळाला नाना पटोले जबाबदार धरत देशमुखांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र लिहिले आहे. नाना पटोलेंना वेळीच प्रदेशाध्यक्षपदावरुन न हटवल्यास तसेच पक्षातली बेबंदशाही न संपल्यास राज्यात काँग्रेस नव्याने आलेल्या शिंदे गटाच्याही मागे पडून पाचव्या नंबरला जाईल, अशी भीतीही देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर प्रदेशच्या इम्रान प्रतापगडी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षात अंतर्गत नाराजी असल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश महासचिव माजी आमदार आशिष देशमुख यांच्याकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी बाहेरचा उमेदवार दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ते आपल्या प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
काँग्रेस नेते आशिष देशमुखांच्या या पत्रामुळे विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
काँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे ते चिरंजीव असून वडिलांप्रमाणेच ते काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता