महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते केवळ त्यांच्या पदामुळे नव्हे, तर त्यांच्या कर्तृत्वामुळे, दूरदृष्टीमुळे आणि धोरणात्मक निर्णयक्षमतेमुळे ओळखले जातात. अशाच नेत्यांपैकी एक म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते, भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस. त्यांना अनेकदा ङ्गमहाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्यफ असे संबोधले जाते आणि त्यामागे त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील काही अत्यंत महत्त्वाच्या आणि चतुर चालींचा मोठा वाटा आहे.
Read More
ह्युमन वेल्फेअर क्रेडिट अॅंड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (एचडब्ल्यूसी) या संस्थेच्या प्रचारासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेता श्रेयस तळपदे यांनी काम केले होते. या प्रचार जाहिरातीमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे यांना सोमवार दि. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्या के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे.
भारतीय संविधानातील अनुच्छेद १४३ अंतर्गत राष्ट्रपतींनी सादर केलेल्या संवैधानिक संदर्भात सर्वोच्च न्यायालयात येत्या २२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. विधेयकांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेतील राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकारांच्या मर्यादा आणि जबाबदाऱ्यांबाबतचे हे महत्त्वाचे प्रकरण असून, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी पाच न्यायाधीशांचे संविधान पीठ नेमण्यात आले असून, त्यामध्ये मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई, न्या. सूर्यकांत, न्या. विक्रम नाथ, न्या. पी.एस. नरसिंह आणि न्या. ए.एस. चांदुरकर यांचा समावेश आहे.
बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना का
विमान अपघातांनंतर माध्यमांमध्ये होणाऱ्या वार्तांकनाबद्दल नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका शुक्रवार दि.१८ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयात कोइम्बतूर येथील वकील एम. प्रवीण यांनी दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय, नागरी विमान वाहतूक महासंचालक (डीजीसीए) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
वांद्रे पूर्व येथील भारत नगर परिसरात शुक्रवार दि.१८ रोजी सकाळी एक तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. सकाळी ५ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरु केले. या दुर्घटनेत १५ जणांना वाचविण्यात आले आहे.
बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या (युएपीए/ UAPA) तरतुदींना आव्हान देणारी याचिका गुरुवार दि.१७ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत, या कायद्याला घटनात्मकदृष्ट्या वैध ठरवले. न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “सध्याच्या स्वरूपात युएपीए हा कायदा घटनात्मकदृष्ट्या वैध आहे. त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली आव्हान याचिका ही आधारहीन आहे.”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या १८ जुलै २०२५ रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कथाकथनाची
भारतीय अभियांत्रिकीने वेधले जगाचे लक्ष जपानमधील ओसाका येथील वर्ल्ड एक्स्पो २०२५ मध्ये भारतीय रेल्वेच्या अभियांत्रिकी आविष्काराने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. याठिकाणी उभारण्यात आलेल्या भारतीय पॅव्हेलियनने जपानी अभ्यागतांकडून विशेष उत्साहाने विक्रमी संख्या आकर्षित केली आहे. यावेळी उपस्थित नागरिकांना काश्मीर मधील चिनाब रेल्वे पूल तसेच इतर अभियांत्रिकी अविष्कारांसमवेत कॅमेरात कैद होण्याचा मोह आवरत नसल्याची एक चित्रफीत भारतीय रेल्वेने आपल्या समाजमाध्यमांवर शेअर केली.
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे, असा दावा उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ (पूर्वीचे आयपीसी कलम ४९८अ) अंतर्गत दाखल केलेला एका कुटुंबाविरुद्धचा खटला रद्द करत वैवाहिक कलहाच्या वाढत्या घटनांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाचे न्या.नितीन सांबरे आणि न्या.महेंद्र नेर्लीकर यांच्या खंडपीठाने नुकताच दिलेल्या निर्णयात नमूद केले की, “आजकाल क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या वादांमुळे हिंदू समाजातील पवित्र विवाह संकल्पनेला धक्का बसत आहे.”
नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्
भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांनी माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, केरळचे शिक्षक आणि भाजप नेते सी. सदानंदन मास्टर तसेच इतिहासकार मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी शनिवार, दि.१२ जुलै रोजी जारी केलेल्या राजपत्रात या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी टी राजा यांचा तेलंगणायेथील आमदारकीचा राजीनामा शुक्रवारी स्वीकारला. त्यानंतर टी राजा यांनी समाजमाध्यमांवर एक भावनिक पोस्ट केली. ते म्हणाले, 'माझा जन्म हिंदुत्वाची सेवा करण्यासाठी झाला असून मी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वासाठी तत्पर राहून काम करत राहणार.' ११ वर्षांपूर्वी टी राजा यांनी भाजपचे सदस्यत्व घेतले होते.
भारत गौरव योजनेअंतर्गत एक विशेष "स्वर्णिम भारत यात्रा" पर्यटक ट्रेन १४ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्टेशनवरून भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे स्मरण करून निघेल. ९ रात्री आणि १० दिवसांच्या या दौऱ्यात भारताच्या स्वातंत्र्य चळवळी आणि वारशाशी संबंधित प्रमुख ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देईल.
कोठडीत आरोपींवर छळ करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना केवळ सरकारी परवानगी असल्याच्या कारणावरून वाचवले जाऊ शकते, या कायद्याच्या तरतुदीवर केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कौसर एडाप्पागथ यांच्या खंडपीठाने ‘सुधा विरुद्ध केरळ राज्य’ या प्रकरणात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) २०२३ च्या कलम २१८ नुसार पोलिसाच्या सरकारी संरक्षणाबाबतीत निर्णय नुकताच दिला आहे.
अमृत महोत्सवाचा उंबरठा ओलांडून ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ शताब्दी वर्षाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दि. 9 जुलै हा ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चा स्थापना दिवस. तसेच ‘अभाविप’च्या वैचारिक अधिष्ठानाचे उद्गाते यशवंतराव केळकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख...
उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मोहम्मद जावेद या आरोपीने असा दावा केला आहे की, या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशावेळी जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा प्रभाव खटल्यावर होऊ शकतो आणि परिणामी निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतो.
‘केरळ संयुक्त हिंदू कुटुंब व्यवस्था कायदा, १९७५’ मधील कलम ३ आणि कलम ४ हे हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ च्या कलम ६ च्या विरोधात आहे. त्यामुळे ती कलमे अंमलात आणता येणार नाहीत, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ईश्वरन यांच्या खंडपीठाने सोमवार, दि.७ जुलै रोजी दिला आहे.
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने भाजपच्या वतीने देशभरात 'गुरु पौर्णिमा उत्सव' साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, आ. श्रीकांत भारतीय यांची 'गुरु पौर्णिमा' प्रदेश संयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली.
आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमुळे एका वारकऱ्याचे प्राण वाचले आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सेवा मिळाल्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण उपचार मोफत करण्यात आले आहेत.
राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलावर बंदी घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.
भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय कामगिरी गेल्या दशकभरात कमालीची उंचावली आहे. अनेक नवीन खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करत आहेत. यामागे ‘खेलो इंडिया’ या मोहिमेचा वाटा लक्षणीय असाच. आता भारताला क्रीडा क्षेत्रात पहिल्या पाच देशांमध्ये आणण्याचे उदिष्ट ठेवून ‘खेलो भारत निती-२०२५’ हे धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाचा भारतीय क्रीडा क्षेत्रावर होणार्या परिणामांचा घेतलेला हा आढावा...
बिहारच्या जगप्रसिध्द बोधगया येथील महाबोधी मंदिराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या धार्मिक श्रद्धा आणि अधिकारांच्या सन्मानार्थ फक्त बौद्ध धर्मीयांना द्या, अशी मागणी करणारी याचिका सोमवार, दि. ३० जून रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश आणि न्या.के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.
१६० किमी प्रतितास वेगाने धावणार पुढील वर्षी जूनपर्यंत तयार होणार पहिली ट्रेन महाराष्ट्रातील लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचे पूर्ण उत्पादन अद्याप सुरू झालेले नसल्यामुळे, सेमी-हाय स्पीड ट्रेनचा पहिली पूर्ण स्लीपर ट्रेन जून २०२६पर्यंत धावेल असा अंदाज आहे.
कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये २४ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीवर झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची दखल म्हणून, सर्वोच्च न्यायालयाचे वकील सत्यम सिंह राजपूत यांनी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना खुले पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो घ्यावा आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय मुक्त आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली.
धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवार, १ जुलै रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
"भारतात आणीबाणी लागू करणार्यांनी केवळ आपल्या संविधानाची हत्या केली नाही; तर न्यायव्यवस्थेलाही त्यांचे गुलाम बनवण्याचा त्यांचा हेतू होता. या काळात लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात आले. शेवटी, जनतेचा विजय झाला, आणीबाणी उठवण्यात आली आणि आणीबाणी लादणार्यांचा पराभव झाला. अनेक लोकांना कठोर छळ करण्यात आला. ‘मिसा’अंतर्गत कोणालाही अटक करता येत होती. विद्यार्थ्यांनाही त्रास दिला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्यात आला,” असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आपल्या ‘मन की बात’ या १२३व्या कार्यक
माजी आयपीएल अध्यक्ष ललित मोदी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाविरुद्ध(बीसीसीआय) दाखल केलेल्या रीट याचिकेवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, दि. ३० जून रोजी नकार दिला आहे. या याचिकेत त्यांनी परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत (फेमा) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लादलेल्या १०.६५ कोटी रुपयांच्या दंडाची भरपाई बीसीसीआयकडून मागितली होती.
समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केले पाहिजे असा सर्वसाधारण नियम आहे. पण या नियमाला अपवाद म्हणजे. रविंद्र चव्हाण अर्थात रवि दादा ! समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही. कारण ते दाखवण्यासाठी करण्यापेक्षा कर्तव्य म्हणून करायचं असतं आणि राजकारणात देश व पक्षनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची व "न्यूज सायकल" मध्ये न अडकता आपल्यावर सोपवलेली जबाबदारी कर्तव्यकठोरपणे पार पाडायची, हाच रवि दादांचा नेहमीचा खाक्या आहे.
अखिल भारतीय साहित्य परिषद, नवी मुंबई साहित्य परिषद आणि योग विद्या निकेतन आयोजित महाकवी कालिदास दिनानिमित्त पाऊस माझा तुझा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. २८ जून रोजी हा कार्यक्रम नवी मुंबई येथे संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद साहित्यिक पत्रकार दुर्गेश सोनार यांनी भूषवले. नंदकिशोर जोशी ,अरुंधती जोशी यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
भारतीय संविधानाच्या कलम ५१-अ नुसार, देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचे समर्थन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. आरोपीने हे कर्तव्य पाळले नाही आणि अश्या व्यक्तींना जामीनावर सोडणे योग्य नाही, असे म्हणत अलाहाबाद उच्च न्यायालयाने अन्सार अहमद सिद्दीकीला फटकारले आहे. फेसबुकवर जिहादचा प्रचार करण्यासाठी “पाकिस्तान जिंदाबाद” अशी पोस्ट टाकणाऱ्या सिद्दीकीला संविधानीक आदर्शांचा अनादर केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
भारतीय मजदूर संघाची पत्रकार परिषद नुकतीच राजधानी दिल्ली येथे संपन्न झाली. अखिल भारतीय महामंत्री रवींद्र हिमते यांनी यावेळी माहिती दिली की, दि. २३ जुलै १९५५ रोजी स्थापन झालेला भारतीय मजदूर संघ (भा.म.सं.) येत्या २३ जुलै रोजी ७० वर्षे पूर्ण करत आहे. ७० वर्षांच्या कालखंडात भारतीय मजदूर संघाने शून्यापासून शिखरापर्यंतची वाटचाल करत श्रमिक क्षेत्रात अनेक ऐतिहासिक उपलब्धी मिळवल्या आहेत आणि इतर श्रमिक संघटनांना मागे टाकत देशातील सर्वात मोठी श्रमिक संघटना म्हणून उदयास आली आहे.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र वाहतूक महामंडळाने (एनसीआरटीसी) दिल्लीच्या सराय काले खान आणि मेरठमधील मोदीपुरम दरम्यानच्या संपूर्ण नमो भारत कॉरिडॉरवर नमो भारत रेल्वेगाड्यांची नियोजित चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यावेळी संपूर्ण ८२ किमीचा प्रवास एका तासापेक्षा कमी वेळात पूर्ण करण्यात आला आहे.
जागतिक योग दिनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये पतंजली परिवार युवा भारत आणि नगरसेविका शर्मिलाताई बाबर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत इंटिग्रेटेड योगसाधना चिकित्सक शिबिर आयोजित करण्यात आले. योगऋषी रामदेव यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.
“शिशु मंदिर हे ओडिशाच्या शिक्षण विभागातील नाडीसारखे आहे. ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारे चालवले जाणारे सरस्वती शिशु विद्या मंदिर, भारतीय पद्धती आणि मूल्यांवर आधारित सामान्य लोकांना दर्जेदार शिक्षण देण्यात अतुलनीय भूमिका बजावते,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील सरस्वती विद्या मंदिरात ‘विद्या भारती’ आणि ‘शिक्षा विकास समिती’द्वारा आयोजित प्रदेशिका प्राचार्य परिषदेच्या समारोपादरम्यान ते बोलत होते.
जी व्यक्ती राज्य सरकारच्या नोंदणीकृत सोसायट्यांमध्ये कार्यरत आहे, तिला संविधानाच्या कलम १२ अंतर्गत सरकारी व्यक्ती समजता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, दि. १६ जून रोजी त्रिपूरा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्जल भुयान आणि न्या.मनमोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली
दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित आणि ‘एसएफसी एनव्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज’ प्रस्तुत ‘स्पिसीज अॅण्ड हॅबीटॅट्स वॉरियर्स अॅवॉर्ड-2025’ हा पुरस्कार सोहळा गुरुवार, दि. 5 जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे मान्यवर आणि निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात पार पडला. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘योगायतन पोर्ट ग्रुप’ हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांनी यावेळेस वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनासाठी का
पहलगाम मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने सिंदुर ऑपरेशन करुन पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केला .सिंदुर ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दबल भारतीय सैन्याचे आणि प्रधानमंत्री नरेद्र मोदींचे अभिनंदन करण्यासाठी तसेच सिंदुर ऑपरेशनचा विजय साजरा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभरात भारत जिंदाबाद यात्रा काढण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.त्यांच्या आवाहनाला देशभरात रिपब्लिकन कार्यकर्त्यांने प्रच
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने राष्ट्रीय राजधानीत आपले पहिले १०० दिवसांचे शासन पूर्ण केले आहे. राज्य सरकारने या प्रसंगी एक कार्यपुस्तिका प्रकाशित केली आहे, ज्यामध्ये आयुष्मान भारत योजना, महिला सन्मान योजना आणि यमुना नदी स्वच्छता मोहीम यासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक कल्याणकारी उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
( Prime Minister Modi inaugurated Amrut Bharat stations on Thursday ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वे मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘अमृत भारत स्थानक पुनर्विकास योजने’तून रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. आधुनिक, एकात्मिक वाहतूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भारतातील 1 हजार, 300 हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास हाती घेतला
देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी 'MY भारत' पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवार, १४ मे रोजी केले.
The success of Atmanirbhar Bharat has been highlighted by operation sindoor ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्यापही थांबलेले नाही, हे हवाई दलाने रविवारी स्पष्ट केले आहे. भारताने पाक पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत ही लष्करी कारवाई केली. ‘आत्मनिर्भर भारता’चे यश यातून अधोरेखित झाले आहे. भारताची शस्त्रसज्जता पाहून संपूर्ण जग चकित झाले असले, तरी विरोधकांनी मात्र नेहमीचाच गोंधळ घालायला सुरुवात केली.देशाचा हा गौरव साजरा करण्याचे भानही विरोधकांकडे नाही, हे दुर्दैवच!!!
( Sahakar Bharati Women Self-Help Group Festival ) दि. १० आणि ११ मे २०२५ रोजी, पुणे शहराच्या हृदयस्थानी असलेल्या स्वारगेट येथील "गणेश कला क्रीडा मंच" या प्रतिष्ठित ठिकाणी एक आगळा-वेगळा, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक उपक्रम पार पडला – सहकारभारती महिला बचतगट महोत्सव. हा महोत्सव केवळ उत्पादनांची विक्री किंवा प्रदर्शन नव्हे, तर हा एक सामाजिक परिवर्तनाचा, महिला सक्षमीकरणाचा आणि सहकार तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव होता.
भारतीय रेल्वे हे जगातील चौथे मोठे सर्वाधिक विस्तारलेले जाळे. सध्या भारतीय रेल्वेचा सुवर्णकाळ सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, नववर्षाच्या प्रारंभी एकूण रेल्वे नेटवर्कपैकी 23 हजार किमीपेक्षा जास्त मार्गांवर ताशी 130 किमी वेग (किमी प्रतितास)पर्यंत वाढवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ही उल्लेखनीय प्रगती रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि देशभरातील लाखो प्रवाशांसाठी प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेलाच अधोरेखित करते. भारतातील जवळजवळ एक पंचमांश रेल
दहशतवाद्यांनी केलेला पहलगाम हल्ला पाकिस्तानच्या नापाक कृत्याचे प्रदर्शन घडवून आणणारा होता. या हल्ल्यानंतर भारत सरकार पूर्णपणे एक्शन मोडवर होते. दि. २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’व्दारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय पाकिस्तानवर जोरदार हल्ला करण्याची मागणी करत होते. पंतप्रधान मोदीजीच्या अनेक भाषणातून दहशतवादी आणि त्यांना आश्रय देणाऱ्याला ‘न भूतो न भविष्यते’अशी शिक्षा दिली जाईल असेही सांगितले होते.
राज्याला लवकरच एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात ११ वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून राज्याला लवकरच बारावी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. ही बारावी वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातील दोन राजधान्यांना जोडणारी असेल. सद्यस्थितीत राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर,नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या ११ महत्त्वाच्या मार
गेल्या २३ वर्षांपासून रंगभूमीवर अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेलं ‘सही रे सही’ हे नाटक आजही तितकंच ताजं आणि लोकप्रिय आहे. मराठमोळ्या हास्यनायक भरत जाधव यांच्या दमदार अभिनयाने सजलेलं हे नाटक आजवर ४ हजारांहून अधिक प्रयोग गाठून रंगभूमीवरचा विक्रम प्रस्थापित करत आहे. या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नुकतंच या नाटकाबाबत एक अत्यंत मोलाचं विधान केलं आहे. “सही रे सही कधी बंद होणार?” या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर भरत जाधवप्रेमींसाठी अत्यंत भावनिक ठरणारं आहे.
आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी मागणी केल्यानंतर ‘आरोग्य भवन’ येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणाविषयी बैठक पार पडली. “आंध्र प्रदेशात महाराष्ट्राच्या बरोबरीने अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली असून आजच्या घडीला चेन्नईत मोठ्या प्रमाणावर अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्र मात्र या काहीसा मागे पडला आहे,” असे आ. प्रा. फरांदे यांनी स्पष्ट केले.
न्यायव्यवस्था हा कोणत्याही लोकशाही देशामध्ये महत्त्वाचा आधारस्तंभ. भारतासारख्या देशात तर या न्यायव्यवस्थेवर असलेला कामाचा हा ताण प्रचंडच आहे. अशावेळी ‘एआय’चा वापर विवेकाने करण्याचे धोरण भारतीय न्यायव्यवस्थेने स्वीकारले आहे. न्यायव्यवस्थेमध्ये ‘एआय’चा वापर कसा होतो, याचा घेतलेला हा मागोवा...