आयटी क्षेत्रातील अग्रणी कंपनी इन्फोसिस सरकारी विमा कंपनीकरिता नव्या पिढीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा अवलंब करणार आहे.
Read More
जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. जागतिक टाईम्स मासिकाकडून जगातील टॉप-१००० सर्वोत्तम कंपन्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. देशातील नामांकित आयटी क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेक या कंपनीने ११२ व्या स्थानी झेप घेतली आहे.
देशातील क्रमांक २ ची आयटी कंपनी इन्फोसिसने काल चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. मागील कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ६१२८ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागिल वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यात कंपनीला वाढ झाली. या वर्षी कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ७९६९ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.कंपनीच्या कामकाजातून महसूलात १.३ टक्क्यांनी वाढत ३७९२३ कोटींवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षात हा नफा ३७४४१९ कोटी रुपये होता.
पब्लिक सेक्टर युनिट म्हणून देशातील नामांकित बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( एसबीआय) ने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर कंपनी इन्फोसिसला मागे टाकत पहिल्या पाचात आपले बीज रोवले आहे. बाजारात मूल्यांकनात ( मार्केट व्हॅल्यएशन) मध्ये भरारी घेत देशातील पाचव्या क्रमांकावर एसबीआय बँक ठरली आहे.
“लोकांना दिलेल्या सेवा आणि अनुदाने. त्या बदल्यात त्यांच्याकडून काहीतरी मागितले पाहिजे, जे त्यांच्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी करण्याची इच्छा जागृत करेल आणि त्यांच्या भविष्यासाठी चांगले होईल." असे विधान इन्फोसिस कंपनीचे संस्थापक एन. नारायण मूर्ती यांनी केले आहे.
ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. यात सुधा मूर्ती यांनी अनेक पदार्थांची जातीनं आठवण काढली आहे. विशेषकरून त्यांनी चितळेंची बाकरवडी आपल्याला प्रचंड आवडत असल्याचे कौतुक त्यांनी व्हिडीओत केले. हा सोशल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खुद्द चितळे बंधूंनी हा व्हिडीओ पाहिला. त्यांनी यासर्वावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी याबाबत सुधा मूर्तींचे बाकरवडीवरचे प्रेम असल्याचे सांगितले आहे. तसेच, त्यांच्याप्रती प्रेमपूर्वक आदर व्यक्त केला आहे.
भारतातील नामांकित आयटी कंपनी इन्फोसिस या कंपनीचे भाग भांडवलाचे भाव शुक्रवारच्या पहिल्या सत्रात १० टक्क्याने घसरले आहेत. इन्फोसिस, परिसिटंट , विप्रो, एचसीएल टेक या कंपनीना झालेल्या नुकत्याच झालेल्या तोट्याची परिणीती म्हणून सिस्टीम इंडेक्स तब्बल ५ टक्क्याने कोसळला आहे. गुरुवारी इन्फोसिस कंपनीचा तिमाही निकाल घोषित झाला.कंपनीचा वार्षिक उत्पन्न वाढीचा ४ ते ७ टक्क्यांची तुलनेत यंदा मात्र १ ते ३ टक्के इतकेच वार्षिक उत्पन्न वाढले आहे.
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ, तसेच सोपी व्हावी या हेतूने ७ जून रोजी ही वेबसाईट सुरू करण्यात आली. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे ही ई-फायलिंग संकेतस्थळाबद्दलचा अनुभव त्रासदायक होता. पहिल्या दिवसापासून या संकेतस्थळाबाबत तक्रारी सुरू झाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे संकेतस्थळ विकसित करणाऱ्या इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलेकणी यांना जाहीरपणे जाब विचारला होता.
महेंद्रसिंह धोनीने आपल्या क्रिकेटमधील आव्हानपर यशाद्वारे, भारतीय व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांना जे मार्गदर्शन केले, तेही धोनीच्या क्रिकेटप्रमाणेच संस्मरणीय ठरणार आहे.
मुंबई शेअर बाजाराने पुन्हा एकदा नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सेन्सेक्सने ४० हजार ४८३.२१ इतका उच्चांक गाठला. यापूर्वी हा सर्वाधिक विक्रमाचा आकडा ४० हजार ३२९.२२ इतका होता. शेअर बाजारात दिवाळीनंतर सलग सातव्या सत्रात तेजी दिसून येत आहे. दिवाळीनंतर शेअर बाजार एकदाही घसरण दिसली नाही. सोमवारी सेन्सेक्स १३६.९३ अंशांनी वधारत ४० हजार ३०१.९६ इतक्या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी अद्याप आपल्या विक्रमापासून दूर आहे. निफ्टी सोमवारी ५०.७० अंशांनी वधारत ११ हजार ९४१.३० इतक्या स्तरावर बंद झाल
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतातली आघाडीची कंपनी इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मंगळवारी शेअर बाजार उघडताच इन्फोसिसचे समभाग १६ टक्क्यांनी घसरले. इन्फोसिसच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यामुळेच हा परिणाम जाणवत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचा फटका गुंतवणूकदारांना बसला.
मेटल, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रातील चौफेर खरेदीमुळे आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स ७७ अंशांनी उसळत ३६ हजार ३४७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १० हजार ९०८.७० च्या स्तरावर बंद झाला.
आयटी आणि सार्वजनिक बॅंकांच्या शेअरच्या खरेदीनंतर सेन्सेक्स निफ्टी १५९ अंशांनी मजबूत होऊन ३५ हजार ५१३च्या स्तरावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५७ अंशांनी वधारुन १० हजार ६८६च्या स्तरावर पोहोचला.
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सध्याचे सरकार पुन्हा सत्तेत येणे फायद्याचे ठरणार आहे. तसेच देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. ही देशासाठी सकारात्मक बाब आहे
वयाच्या 61व्या वर्षी समाजातील अनेक ज्वलंत समस्या सोडविण्याच्या कामामध्ये व्यस्त असलेल्या कुमारी शिबुलाल यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असाच काहीसा आहे.