‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे फक्त भारत-पाकिस्तान संबंधांमध्येच नव्हे, तर भारत-तुर्की आणि अझरबैजान या देशांशी असलेल्या संबंधांमध्येही बदल होत आहेत. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभं राहिलं. तुर्की मात्र पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसले. इतकच नव्हे, तर तुर्कीने बनवलेल्या ‘सोंगर ड्रोन’चा वापर पाकिस्तानने भारताच्या लष्करावर आणि सामान्य नागरिकांवर हल्ला करणायासाठी केला.
Read More
Mahakumbh Mela हा १२ वर्षानंतर भारतात भरत असतो. हिंदू धर्माच्या या मेळाव्यासाठी अनेक काळापासून सुरू असलेल्या परंपरेत मनुष्य हा एकमेकांशी जोडला गेला जातो. यंदाच्या उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळावा भरणार आहे. महाकुंभ मेळावा २०२५ मध्ये जगातील अनेक श्रद्धाळु आपली उपस्थिती दर्शवतात. अशातच आता अॅप्पल कंपनीचे सह संस्थापक स्टिव्ह जॉब यांची पत्नी लॉरेन पॉवेलही दि: १३ जानेवारी २०२५ रोजी आपली उपस्थिती दर्शवणार आहेत. एका मासिकाने याप्रकरणाची माहिती दिली आहे.
अमेरिकन चिप निर्माता कंपनी निव्हिडीया(Nvidia)ने अॅपलला मागे टाकत जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(एआय) चिप्सच्या वाढत्या मागणीमुळे निव्हिडीया कंपनीच्या समभागात देखील वृध्दी दिसून आली आहे. अमेरिकन भांडवली बाजारात विक्रमी स्टॉक रॅलीनंतर निव्हिडीया कंपनीच्या बाजार भांडवलात ३.५३ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढ दिसून आली आहे.
अॅप्पलच्या आयफोन १६ या स्मार्टफोन लाँचींगच्या दरम्यान,अॅप्पलचे सीईओ टीम कूक यांचा एआयने तयार केलेला व्हिडिओ प्रसारीत झाल्याची घटना घडली आहे.
आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, आयफोन १६ प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.
अँपलला बाजार भांडवलात मागे टाकल्यानंतर आता एनवीडिया (Nvidia) कंपनीने मायक्रोसॉफ्ट कंपनीलाही आता मागे टाकले आहे. बाजार भांडवल (Market Capitalisation) मध्ये एनविडिया जगातील सर्वात मोठी क्रमांक १ कंपनी बनली आहे. मंगळवारी एनविडियाचा समभाग ३.५ टक्क्यांनी वाढल्याने १३५ डॉलर्सने कंपनीच्या समभागात वाढ झाली होती. त्यामुळे क्रमांक एक वर कंपनीने पोहोचल्याने क्रमांक दोन व तीन वर अँपल व मायक्रोसॉफ्ट कंपनी पोहोचली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे एलॉन मस्क यांनी अॅपल कंपनीवर अनेक मोठे हल्ले केलेत. अॅपल कंपनीची खिल्ली उडवण्याबरोबरच आयफोन आणि आयमॅकवर बहिष्कार घालण्याची धमकीही एलॉन मस्क यांनी दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर अॅपल कंपनीने आपल्या उत्पादनात ओपनएआयचा वापर केला, तर ते आपल्या कंपनीत अॅपल उत्पादनावर बंदी घालतील आणि अॅपलच्या सर्व मशीन आणि फोन कंपनीच्या गेटवर ठेवतील.
अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) क्वचित पण नेमकं मत कोणत्याही विषयांवर मांडत असतो. सध्या चर्चेत असलेल्या अॅपल कंपनीच्या आयपॅडच्या एका जाहिरातीवर त्याने टीका केली आहे. त्याच्या या विशेष पोस्टने प्रेक्षकांचं (Hrithik Roshan) लक्ष वेधून घेतलं आहे.
ॲपल उत्साहींना सर्वोत्तम डिवाईसेसचा आनंद घेण्यासाठी अनेक कारणे आहेत, जेथे विजय सेल्स या भारतातील इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळीने बहुप्रतिक्षित ॲपल डेज सेलला पुन्हा एकदा सादर केले आहे. हा सेल विजय सेल्सच्या १३० हून अधिक रिटेल आऊटलेट्समध्ये, तसेच त्यांची ईकॉमर्स वेबसाइट विजयसेल्स डॉटकॉमवर ॲपल डिवाईसेसच्या श्रेणीवर आकर्षक डिल्स देतो. हा सेल २४ मार्च रोजी समाप्त होण्यापूर्वी ग्राहक नवीन आयफोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, ॲपल वॉचेस, एअरपॉड्स आणि ॲपल केअर+ वर आकर्षक सूटचा आनंद घेऊ शकतात.
देशातील पहिली ‘आयफोन’ निर्मिती कंपनी असलेल्या ‘टाटा’तर्फे आता एकूण २८ हजार रोजगारनिर्मिती केली जाईल. त्यासाठी सद्यःस्थितीतील निर्मिती कारखान्यांची क्षमता दुप्पट होऊन, आगामी १८ महिन्यांत ते पूर्णपणे कार्यान्वित होतील. यानिमित्ताने भारतातील मोबाईल निर्मिती क्षेत्रातील बाजारपेठेचा घेतलेला हा आढावा... देशातील पहिली ‘आयफोन’ निर्मिती कंपनी असलेल्या ‘टाटा’तर्फे आता एकूण २८ हजार रोजगारनिर्मिती केली जाईल. त्यासाठी सद्यःस्थितीतील निर्मिती कारखान्यांची क्षमता दुप्पट होऊन, आगामी १८ महिन्यांत ते पूर्णपणे कार्यान्वित हो
अॅपल कंपनीचे आयफोन बनवणाऱ्या फॉक्सकॉनने भारतात १.५४ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची योजना आखली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम १३,५०० कोटी इतकी होते. फॉक्सकॉनने तैवान स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, या गुंतवणुकीमुळे त्याच्या ऑपरेटिंग गरजा पूर्ण करण्यात मदत होईल. फॉक्सकॉनने याआधीच भारतात आपले कर्मचारी आणि गुंतवणूक दुप्पट करण्याची योजना जाहीर केली होती.
मध्य प्रदेश निवडणूकीत प्रचारादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारताच्या मोबाईल उत्पादनावरुन तथ्यहीन वक्तव्य केले होते. त्यावर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडेबोल सुनावले आहे. पण राजकारणा व्यतिरिक्त विचार करायचा झाल्यास सुद्धा मागच्या एका दशकात भारताने मोबाईल उत्पादनात क्रांती केली आहे.
अॅपलमध्ये काम करणाऱ्या नताशा डच नावाच्या महिलेला इस्त्रायल -हमास संघर्षावर पोस्ट करणे महागात पडले आहे. तिने यहुदींच्या विरोधात विधान केले होते. त्यामुळे तिला नोकरीवरून काढण्यात आले आहे. नताशाच्या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये तिने जर्मन आणि यहुदींना दहशतवादी म्हणटले होते. त्यानंतर नताशाविरोधात कारवाईची मागणी सोशल मिडीयावर करण्यात आली होती. दरम्यान इस्त्रायल आणि हमास यांच्यात १ महिन्यांपासून युद्ध सुरु आहे.
भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच राजकारणी आणि इतरांना पाठवलेल्या 'सरकार प्रायोजित हॅकर्सपासून सावध रहा' या संदेशावर ऍपलकडून उत्तर मागितले आहे. आयटी मंत्रालयाने गुरुवारी (२ नोव्हेंबर २०२३) अॅपलला नोटीस पाठवून या दाव्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले. या नोटीसवर मंत्रालयाने अॅपलकडून तत्काळ उत्तर मागितले आहे.
खासदार मोईत्रा यांच्या आवईप्रमाणेच केंद्र सरकारने आमचे फोन हॅक केले, अशी जुनीच बोंब नव्याने मारण्यात आली आहे. आपल्या ‘अॅपल’ कंपनीच्या फोनवर सरकार हॅकिंग करत असल्याचा संदेश आल्याचा दावा विरोधी पक्षांच्या खासदारांनी केला आहे. मात्र, अशाप्रकारचे संदेश हा ‘फॉल्स अलार्म’ असण्याचीच शक्यता सर्वाधिक असून, असा संदेश १५० देशांमध्ये गेल्याचे स्पष्टीकरण कंपनी आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिले आहे.
अॅप्पलनं आपल्या 10th जनरेशन आयपॅडच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीनं ह्या टॅबलेटची किंमत थेट ५००० रुपयांनी कमी केली आहे. नवीन आयपॅड वाय-फाय मॉडेल ३९,९०० रुपयांमध्ये विकत घेता येईल. फेस्टिवल सेलमध्ये ४००० रुपयांचा कॅशबॅकही मिळेल. हा टॅबलेट अॅप्पल स्टोर आणि पार्टनर स्टोरवरून विकत घेता येईल.
जगातील पायोनियर, दर्जेदार इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील अॅपल ने ४ वर्षात ४० कोटींचे लक्ष ठेवले आहे. मेक इन इंडिया संकल्पनेला बुस्टर डोस म्हणून कंपनीने मोठ्या प्रमाणात आयफोन निर्मितीसाठी लक्ष केंद्रीत केले आहे. पीटीआयचा बातमीनुसार या पहिले कंपनीने या आर्थिक वर्षांपूर्वी ७ कोटीचे लक्ष पूर्ण केले आहे.
अॅपल ने १२ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्निया येथे झालेल्या इव्हेंटमध्ये आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली होती . काही दिवसांपूर्वी त्याचे प्री-बुकिंग सुरु झाले होते. आता याची आजपासून विक्री सुरू होणार आहे. यासाठी मुंबईच्या अॅपल स्टोअरमध्ये लोकांनी आयफोन विकत घेण्यासाठी रांगा लावल्या आहेत. याचा व्हिडिओही समोर आला आहे.
भारतात मोबाईल फोनचे उत्पादन ज्याप्रकारे वेगाने वाढत आहे, ते पाहता लवकरच भारत जगातील सर्वात मोठा निर्यातदार होईल. चालू आर्थिक वर्षात भारतातील मोबाइल फोनची निर्यात एक लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकते. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील पहिल्या दोन महिन्यांत मोबाईल फोनची निर्यात १२८ टक्काने वाढली आहे.
मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्तीच्या पायलट प्रोजेक्टसाठी सरकारकडून पोषक वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे उत्पादकांना इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्तीच्या पायलट प्रोजेक्टसाठी पोषक वातावरण तयार होण्यास मदत होईल. तसेच, आयात आणि निर्यातीसाठी आवश्यक मंजुरीसाठी लागणारा वेळ १० दिवसांवरून कमी करण्यासाठी भारत सरकार बदलांची चाचणी घेईल. अवजड आयात-निर्यात नियम शिथिल करून इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्ती केंद्र म्हणून स्वत:ची स्थापना करण्यासाठी भारत या आठवड्यात एक पायलट प्रकल्प सुरू करेल, ज्यामुळे देशात अशा प्रकारच्या ऑपरेश
मुंबई : अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी गेल्या महिन्यात मुंबई येथील बीकेसीत पहिले अॅपल स्टोअर लाँन्च केले होते. या अॅपल स्टोअरला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणांहून अॅपल कंपनीने प्रत्येकी २२-२५ कोटी रुपयांची मासिक विक्री केली आहे. त्यामुळे भारतात अॅपल कंपनीचे ग्राहक वाढताना दिसून येत आहे.
दिल्ली : आयओएस वापरकर्त्यासाठी आता चॅट जीपीटी अॅप येणार आहे. चॅट जीपीटी अॅपमुळे आयओएस वापरकर्त्यांना त्यांचा फायदा घेता येणार आहे. चॅट जीपीटीचा वापर अॅपल फोन व टॅब धारक यांना करता येणार आहे. दरम्यान, अँड्रॉइड वापरकर्त्यांना अद्याप ही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यासंदर्भात आता मोठी माहिती मिळत आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हे अॅप लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. तसेच हे अॅप अॅपल स्टोअरवर फ्रीमध्ये डाऊनलोड करता येते. त्याचप्रमाणे चॅट जीपीटीचे सर्व फीचर्स या अॅपमध्ये उपलब्ध आहेत.
आयफोन निर्माता Apple ने आपल्या iPhone १५ मालिकेतील दोन मॉडेल्स तयार करण्यासाठी भारताची निवड केली आहे. टाटा समूह Apple चे आगामी मॉडेल iPhone १५ आणि iPhone १५ Plus भारतात असेंबल केले जाणार आहेत. याआधी फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि लक्सशेअर सारख्या कंपन्या भारतात आयफोन असेंबल करत आहेत. मात्र आता टाटा समूह सुद्धा या शर्यतीत सामील झाला आहे. टाटा समूह भारतात आयफोन बनवणारी चौथी कंपनी ठरणार आहे.
या दशकाच्या अखेरीस भारत ही जगातील सर्वात मोठी तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणार असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामागील कारणांचा घेतलेला हा आढावा...
तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनीचे ‘सीईओ’ टीम कूक केवळ ‘अॅपल’चे दालन खुले करण्यासाठी भारताच्या आर्थिक राजधानीत दाखल होतात, हा वरकरणी वाटतो तितका सोप्पा विषय नक्कीच नाही. भारतीय बाजारपेठ आज मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्त्य देशांना खुणावत असल्याची ही शुभचिन्हेे आहेत. त्याचेच केलेले हे आकलन...
मुंबई : आयफोन निर्माता ऍपल या कंपनीने मंगळवार १८ एप्रिल रोजी भारतात पहिले ऍपल स्टोर सुरु केले आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरचे उद्घाटन केले. हे स्टोअर २०,००० चौरस फूट परिसरात पसरले आहे. अॅपल स्टोअरची रचना अक्षय ऊर्जेवर केली गेली आहे. म्हणजेच ती पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालते.
आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणात जगभरात सर्वत्रच कामगार कपात होताना दिसून येते. याउलट भारत हा देश तरुणाईला काम देणारा देश, अशी नवी ओळख जगाच्या नकाशावर निर्माण करत आहे. हे नेमके कसे साध्य झाले, ते समजून घ्यायला हवे.
एकीकडे जगभरात कामगार कपात होत असताना भारतात मात्र वर्षभरात अॅपल आणि त्या कंपनीच्या घटक पुरवठादारांनी एक लाखाच्या वर नोकर्या निर्माण केल्या आहेत. ‘मेक इन इंडिया’ला चालना दिल्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. अॅपल ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेमध्ये असून, सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत या कंपनीमधून हजारो कमर्चार्यांची कपात करण्यात आली आहे. मात्र टेक्नॉलॉजी कंपनी असणार्या याच कंपनीने भारतामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये लाखाच्या वर नोकर्या निर्माण केल्या आहेत
आता "गुगल हँगआऊट"ची जागा आता ‘गुगल चॅट’ने घेतली आहे. त्यामुळे सध्या ॲपद्वारे गुगल हे ‘गुगल हँगआऊट’च्या सर्व आवृत्त्या बंद करण्यात आल्याबाबत यूजर्सना माहिती देत आहे. तसेच यातील डाटा देखील डाउनलोड करण्यास युजर्सना सांगितले जात आहे. परंतु हा डाटा डाउनलोड करण्यासाठी १ जानेवारी २०२३ पर्यंतची वेळ देखील युजर्सना देण्यात आली आहे.
सेकेंड हॅन्ड गोष्टी आपल्याला काही नवीन नाहीत. आपल्या घरगुती वापराच्या वस्तूंपासून ते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पर्यंत आपल्याला सर्वच प्रकारच्या गोष्टींच्या सेकण्ड हॅन्ड वस्तूंची सवय आहे. यात आत भर पडली आहे ती आयफोनची. आपल्याला खोटे वाटले तरी ही गोष्ट खरी आहे की आता आयफोन सुद्धा सेकेंड हॅन्ड खरेदी करता येणार आहे
जम्मू-काश्मीरमध्ये प्रशासनातर्फे यंदा प्रथमच सफरचंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन गुरुवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या आयोजनामध्ये ‘विवेक व्यासपीठ’ संचलित ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ अर्थात ‘पार्क’चा सक्रिय सहभाग आहे.
काश्मीरी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ‘विवेक व्यासपीठ’ संचलित ‘पॉलिसी अॅ्डव्होकसी रिसर्च सेंटर’ अर्थात ‘पार्क’ ने पुढाकार घेतला आहे.
आय क्लाऊड हॅक करून चोरले ६ लाखाहून अधिक खासगी फोटो
इस्रायलच्या कंपनी एनएसओ ग्रुपने तयार केलेले सॉफ्टवेअर पेगासस हे भारतातील कथित फोन-टॅपिंग घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे.माध्यमांच्या प्रकाशनाच्या जागतिक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार दोन सेवा देणारे केंद्रीय मंत्री, तीन विरोधी पक्ष नेते, एक घटनात्मक प्राधिकरण, सध्याचे आणि माजी सुरक्षा संघटनांचे प्रमुख, प्रशासक आणि ४० ज्येष्ठ पत्रकार आणि कार्यकर्ते यांचे फोन पेगाससचा वापर करून बग केले गेले होते
Maharashtra 'state mangrove tree' Sonneratia alba or mangrove apple
शंभर पैकी ५० कंपन्या अमेरिकन
मेक इन इंडियाला महत्वपूर्ण बूस्ट ! केंद्र सरकारच्या मेक ईन इंडिया मोहिमेसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.
चीनमधून बाहेर पडत भारतात उत्पादन सुरु करण्याचा घेतला निर्णय!
बंदीनंतर टिकटॉक सरकारसमोर मांडणार आपली बाजू!
आगामी काळात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’च्या मानकांना प्राधान्य देत शहरांची रचना करणे आवश्यक असणार आहे. तसेच रिम कूलाहास यांनी कार्यालयांची रचना कशी असावी, याबाबत बोलताना सांगितले की, भविष्यात अॅमेझॉन, गूगल, अॅपलसारख्या खुल्या व मोठ्या कार्यालयांचे महत्त्व हे नक्कीच वाढणार आहे.
जागतिक बँकेनेही या अँपचे कौतूक करत भारत सरकार कोरोनाशी लढण्यासाठी योग्य पाऊले उचलत असल्याचे म्हणले आहे.
२०१९ जुलै-सप्टेंबर तिमाहीत ४.९ कोटी इतक्या स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक मंदीच्या वातावरणाला पूर्णपणे झुगारत ग्राहकांनी यंदा स्मार्टफोन्सची भरपूर खरेदी केली आहे. काऊंटरपॉईंट या संशोधन अहावालानुसार, कंपनीच्या ब्रॅण्डस् आणि दिवाळी ऑफर्समुळे ही विक्री झाली आहे.
जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी असलेल्या अॅपलने आता आपले लक्ष भारताकडे केंद्रीत केले आहे. स्मार्टफोनच्या दुनियेत आपले अढळ स्थान कायम राखण्यासाठी आता मुंबईत भारतात अॅपलचे पहीले दालन खुले होणार आहे. मुंबईतील जागांसाठी अॅपलने आता एक यादी तयार केली आहे.
इंटरनेटच्या शोधानंतर जगभरात एक नवीनच युग अवतरल्याचे गेल्या दोन दशकांत पाहायला मिळाले. मानवी आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि इंटरनेटच्या शोधापूर्वी ज्या गोष्टी मॅन्युअली कराव्या लागत, त्या ऑनलाईन करता येणे शक्य झाले. कोणत्याही वस्तूच्या खरेदीसाठी प्रत्यक्ष दुकानात जाणे गरजेचेच होते. मित्र-मैत्रिणीदेखील प्रत्यक्ष आयुष्यात भेटी-गाठी घेतल्या तरच होत असत. परंतु, इंटरनेटने या सगळ्यालाच मोडीत काढले.
जगातील आघाडीची मोबाईल कंपनी अॅपल इन्कोर्पोरेशन त्यांच्या फोक्सोकॉन या युनिटच्या भागिदारीसह २०१९मध्ये ‘आयफोन एक्स’ची जोडणी भारतात केली जाणार आहे.
‘अॅपल’च्या उलाढालीचा १ ट्रिलियनचा भलामोठा आकडा दिसत असला तरी त्यामागच्या सृजनकथा ठाऊक असणेही तितकेच गरजेचे आहे.