अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा वर्षभरापासू सुरु होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच आराध्याच्या शाळेत एका कार्यक्रमादरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र दिसल्यानंतर या सर्व चर्चांना पुर्णविराम लागला. परंतु, या मधल्या काळात ऐश्वर्या आणि अभिषेक ग्रे डिव्हॉर्स घेणार आहेत, वेगळे राहात आहेत अशा असंख्य गोष्टी बोलल्या गेल्या. मात्र, आता २०२५ या नव्या वर्षात आराध्या, अभिषेक आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत. शिवाय यावेळी ऐश्वर्याने मराठीत असं क
Read More
सर्वत्र सध्या केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’. २०२४ हे वर्ष अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ ने तुफान गाजवलं. बॉक्स ऑफिसवर १०००' कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. पण तुम्हाला माहित आहे का भारतात आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा पाहिला गेलेला चित्रपट ‘पुष्पा’ किंवा ‘बाहूबली’ नसून वेगळाच आहे आणि त्या चित्रपटाची तब्बल २५ कोटींची तिकिटं विकली गेली होती.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटांच्या चर्चांवर आता पुर्णविराम लागला आहे. आराध्या बच्चनच्या शाळेत एका कार्यक्रमादरम्यान अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र येत आपल्या मुलीला प्रोत्साहन दिले. याशिवाय सोबत अमितभा बच्चन आणि ऐश्वर्याच्या आईची उपस्थिती घटस्फोटांच्या चर्चा बंद करणाऱी ठरली. सध्या, बच्चन कुटुंबाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यापैकी आराध्याच्या शाळेत ऐश्वर्या आणि अभिषेक सोबत वृंदा राय आल्या होत्या. यावेळी आराध्या, ऐश्वर्या आणि वृंदा यांना एकत्र पाहून नेटकरी आनंदी झाले
गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बचच्न आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला आहे अशा बातम्या जोर धरत होत्या. अनेक कार्यक्रमांना ते दोघे एकत्रित उपस्थित राहात नसल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण नुकताच आराध्या अभिषेक बच्चनच्या शाळेत झालेल्या एका कार्यक्रमाला अभिषेक, ऐश्वर्य़ा आणि अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावून या चर्चांना काहीही न बोलता पुर्णविराम दिला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते बऱ्याच वर्षांनी एकाच मंचावर दिसणार आहेत. नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन लवकरच केबीसी १६ च्या भागात येणार असून या विशेष भागात नाना पाटेकर त्यांचा आगामी चित्रपट वनवासचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. या त्यांच्या भेटीदरम्यान नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे केबीसीमध्ये नाना पाटेकर नाम फाऊंडेशनसाठी खेळत असून शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याचा नाना पाटेकरांचा उद्देश आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. कारण, बराच काळ दोघे कुठल्याही कार्यक्रमांना एकत्रित न दिसल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. मात्र, सध्या एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्या फोटोमधून अभिषेक-ऐश्वर्यामध्ये सारं काही आलबेल असल्याचं दिसत आहे.
अभिषेक बच्चन सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे अधिक चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांतून विविधांगी बूमिका साकारल्या. मात्र, अमिताभ बच्चन यांचा मुलगा असूनही त्यांच्यासारखी अभिननय कला त्याचा अंगी नाही असे टोमणे त्याला बऱ्याचदा ऐकून घ्यावे लागले. अभिषेकने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या अभिनयाच्या क्षमतेवर शंका घेत इंडस्ट्री सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयावर बातचीत केली होती. आणि त्यावेळी वडिल म्हणून अमिताभ बच्चन यांनी कसा आधार दिला होता त्याबद्दलही अभिषेक या मुलाखतीत व्यक्
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांत चर्चेचा विषय ठरला आहे. या दरम्यान, अभिषेक बच्चनचे नाव निमरत कौर सोबत जोडण्यात आले. एकीकडे अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात असताना दुसरीकडे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी निमरत कौरला पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. नेटकऱ्यांनी या पत्राचा संबंध अभिषेक आणि निमरतच्या नात्याशी जोडला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या काही काळात अनेक सेलिब्रिटींची लग्न झाली काहींची मोडली. अशातच गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेत आहेत. अर्थात दोघांनी याबद्दल अजूनही अधिकृतरित्या काहीही जाहिर केलं नाही. मात्र, गेल्या वर्षभरात अभिषेक आणि ऐश्वर्या कोणत्याही कार्यक्रमांना एकत्र हजर न राहिल्यामुळे लोकांचा संशय आता अधिकच वाढला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिषेक जलसावर अमिताभ बच्चन आणि जया बचच्न यांच्यासोबत न राहात असल्याची बातमी आली होती. त्याबद्दलच अभिष
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत एकीकडे सलमान खान विरुदध लॉरेन्स बिश्नोई प्रकरण आणि दुसरीकडे ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या बातम्या अधिक चर्चेत आहेत. गेल्या काळात कोणत्याच समारंभात अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसले नाही आणि त्यामुळेच त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या पसरु लागल्या. दरम्यान, अभिषेक-ऐश्वर्या बद्दल आणखी माहिती जाणून घेऊयात...
हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची लग्न होणं आणि लग्न मोडणं या बातम्या सातत्याने समोर येत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा असून अभिषेकने ऐश्वर्याला धोका दिल्याची सध्या सोशल मीडियावर बोललं जात आहे. अभिषेक दुसऱ्याच एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याने ऐश्वर्या आणि अभिषेकचं नातं तुटल्याचं देखील म्हटलं गेलं. या संबंधित अनेक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. पण आता यावर
ज्येष्ठ उद्योगपती रतन नवल टाटा यांचे बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनावर राजकीय नेते, सर्वसामान्य नागरिक ते अगदी हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा यांना ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील पावरफुल्ल कपल म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन. या दोघांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित काम केलं होतं. दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अँग्री यंग मॅन' या माहितीपटामध्ये जावेद अख्तर आणि सलीम खान यांची मैत्री आणि त्यानंतर त्यांच्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाल्याची कथा सांगण्यात आली आहे. तसेच, याच माहितीपटात अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेण्यात आल्या असून या मुलाखतींमध्ये काही खुलासेही करण्यात आले आहेत. यावेळी एका मुलाखतीत जया बच्चन म्हणाल
हिंदी चित्रपटसृष्टीवर हळूहळू दाक्षिणात्य चित्रपटांचा पगडा वाढताना दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत प्रेक्षकांना भरघोस प्रतिसाद मिळवला होता. यात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन झळकले होते. दरम्यान, याच चित्रपटावर अभिनेता अर्शद वारसी याने आपले मत मांडले असून ‘कल्की’मध्ये प्रभास जोकर वाटत होता असे त्याने थेट म्हटले आहे.
मराठी असो किंवा हिंदी बिग बॉस या शोचे देशभरातच नाही तर जगभरात चाहते आहेत. सध्या मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सुरु असून यंदाच्या शोचा होस्ट रितेश देशमुख आहे. तर यापुर्वी नुकताच हिंदी बिग बॉसच्या ओटीटीचा तिसरा सीझन झाला ज्याचं होस्टिंग अनिल कपूर यांनी केलं होतं. तर टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या हिंदी बिग बॉसचं होस्टिंग सलमान खान गेले अनेक वर्ष करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की यापुर्वी बिग बॉसची ऑफर दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना देण्यात आली होती.
हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या घटस्फोटाबाबत गेले अनेक महिने चर्चा सुरु होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी एकत्रित एन्ट्री न घेतल्यामुळे या चर्चा अधिकच भक्कम होत गेल्या. मात्र, आता स्वत: अभिषेक बच्चन याने या चर्चांवर उत्तर दिले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सध्या प्रत्येक क्षेत्रात केला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI आता सगळ्यांच्याच दैनंदिन जीवनातील एक भाग बनला आहे. 'AI'मुळे सध्या काय घडत आहे आणि भविष्यात काय घडू शकेल, याविषयी अनेक तर्क-वितर्क देखील लावले जात आहेत. सध्या AI चा वापर हा मनोरंजनसृष्टीतही केला जात असून गायक अरिजीत सिंहसाठी तो वापर मात्र आता डोकेदुखी ठरला आहे.
कलाकारांची लग्न किंवा त्यांचा घटस्फोट या चर्चांना कायमच उधाण आलेला असतो. गेल्या काही काळापासून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्यात नेमकं काय सुरू आहे? याबद्दल तर्क वितर्क लावले जात होते. त्यांचा घटस्फोट झाला आहे किंवा होणार असे देखील म्हटले जात होते. पण या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांना स्वत: अभिषेक बच्चन याने पुर्णविराम दिला आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी १२ जुलै २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. लाखोंच्या संख्येने पाहुण्यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. आणि आनंदाची बाब म्हणजे अनंत-राधिकाच्या लग्नाचा अॅनिमेटेड चित्रपट बनविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट २७ जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांना भूरळ पाडली आहेच शिवाय बॉक्स ऑफिसवरी नवा इतिहास रचला आहे. अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन यांसारख्या दिग्गज कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला 'कल्की २८९८ एडी' ने पहिल्या दिवसापासून चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाने आत्तापर्यंत किती कमाई केली.
नाग अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ एडी या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण आणि कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. महाभारतातील कुरुक्षेत्राचे युद्ध ते कल्कि अवतार या भोवती चित्रपटाचे कथानक फिरते. दरम्यान, कथाच महाभारतावर आधारित असून अमिताभ बच्चन यांनीही घरात महाभारताचे ग्रंथ हौसेपोटी आणले होते. पुढे हे ग्रंथ त्यांनी लायब्ररीला दान केले आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नाग अश्विन यांचा कल्की २८९८ एडी हा चित्रपट सध्या जगभरात डंका वाजवत आहे. बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड तयार करत या चित्रपटाने जगभरात ९०० कोटींची कमाई केली आहे. आता लवकरच हा चित्रपट हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. यात अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन व दीपिका पदुकोण यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, सेटवरील गमती सांगताना दिग्दर्शक नाग अश्विन यांनी बच्चन साहेबांबद्दल एक विशेष गोष्ट सांगितली आहे.
दिग्दर्शक नाग अश्विन यांचा 'कल्की 2898 एडी' हा मल्टी स्टारर चित्रपट सध्या देशातच नाही तर जगभरात बॉक्स ऑफिसवर कमालीचा धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चिक्कार कमाई कर जगभरात इतिहास रचला आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशभरात ५१० कोटींच्या पुढे तर जगभरात ८३२ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक मोटी अपडेट समोर आली असून या चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. नियमांनुसार, कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंचर दोन ते तीन महिन्यांनी ओटीटीवर प्रदर्शित केला जातो, पण कल्कीच्या निर्मात्यांनी एका महिन्याच्या आतच चित्रपट ओटीटीवर येणार असल्याचे जाहिर केले आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित कल्की २८९८ एडी हा चित्रपट सध्या तुफान गाजत आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाशी मराठमोळी अभिनेत्री नेळा शितोळे हिचं खास कनेक्शन आहे. या चित्रपटासाठी काय योगदान आहे जाणून घेऊयात…
नाग अश्विन दिग्दर्शित साय-फाय चित्रपट ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. कलियुगाचा भविष्यात होणारा अंत आणि त्यासाठी वाचवायला जन्म घेणाऱ्या कल्कीची कथा यात मांडण्यात आली आहे. अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पडूकोण आणि प्रभास यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. २७ जून रोजी पॅन इंडिया प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या सात दिवसांत ३०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे.
महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध ते भविष्यात कलयुगाचा होणारा अंत आणि सर्व सजीवांचा जीव वाचवण्यासाठी जन्म घेणारा कल्की अवतार या कथनावर आधारित कल्की २८९८ एडी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. नाग अश्विन दिग्दर्शित अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार यासाठी चाहते वाट पाहात आहेत. आणि याबद्दलच चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा खुलासा केला आहे.
‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून यशस्वीपणे त्याने हिंदी, तमिळ आणि अन्य भाषांमध्ये ५०० कोटी कमावले आहेत. नुकताच अभिनेता रणवीर सिंहने आता कल्की २८९८ एडी हा चित्रपट पाहिल्यानंतर पत्नी दीपिकाचे कौतुक केले आहे.
नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाने एक वेगळेच सिनेमॅटिक युनिव्हर्स प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. जगाचा सर्वनाश भविष्यात कसा होणार आहे आणि त्याला कोण वाचवणार आहे या पौराणिक कथांवर आधारित कल्की चित्रपटाचे कथानक बांधण्यात आले आहे. २७ जून रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ४ दिवसांत जगभरात ३०० कोटींचा आणि देशात १०० कोटींच्या पल्ला पार केला आहे.
'कल्की २८९८ एडी' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. २७ जूनला प्रदर्शित होणार्या या चित्रपटाचे प्रदर्शनापुर्वीच कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची हिंदी भाषेतील २ लाख तिकीटं आत्तापर्यंत विकली गेली आहेत. त्यासोबतच या चित्रपटाने अॅडव्हान्स तिकीट बुकिंगमध्ये ५० कोटींचा टप्पा देखील पार केला आहे.
अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पडूकोण यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या कल्की २८९८ एडी या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपसून चर्चा सुरु होती. या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लूकमुळे तर ट्रेलर कधी येणार याचीच प्रेक्षक वाट पाहात होते. आणि आता त्यांची ही उत्सुकता संपली असून कल्की २८९८ एडी या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे या ट्रेलरच्या शेवटी आणखी एका सुपरस्टारची विशेष झलक दिसली आहे.
बहुप्रतिक्षित आणि चर्चित 'कल्की २८९८ एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहिर करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन आणि प्रभास यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून लोकं वाट पाहात आहेत. परंतु, आता प्रतिक्षा संपली असून कल्की चित्रपट येत्या (Kalki 2898 AD) जुन महिन्यात प्रदर्शित होणार हे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील (Smita Patil). अतिशय कमी वर्षांच्या मनोरजंनाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अजरामर कलाकृती प्रेक्षकांच्या स्वाधीन केल्या. यापैकीच एक म्हणजे ‘मंथन’ चित्रपट. आनंदाची बाब म्हणजे तब्बल ४८ वर्षांनी ‘मंथन’ या चित्रपटाचा प्रिमियर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. हा फेस्टिव्हल १४ मे ते २४ मे का कालावधीत संपन्न होणार आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२व्या पुण्यतिथीनिमित्ताने २४ एप्रिल २०२४ रोजी दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, अनेक दिग्गजांच्या यादीत अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandalekar) याच्या गालिब नाटकाचा देखील विशेष सन्मान करत मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना चिन्मय (Chinmay Mand
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २४ एप्रिल रोजी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, यावेळी लता मंगेशकर पुरस्कार पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी मायबाप रसिक प्रेक्षकांचे आभार मानत हा तुम्हा सर्वांचा सन्मान आहे असे म्हटले.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचे चाहते त्यांची पूजा करतात. वयाची सत्तरी जरी पार केली असली तरी आजही प्रमुख नायक म्हणूनच ते चित्रपटांत झळकतात. ‘जेलर’ चित्रपटाचा फिव्हर अजूनही त्यांच्या (Rajinikanth) चाहत्यांवर कायम असतानाच त्यांचा ‘थलायवर १७१’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मास्टर’, ‘विक्रम’ आणि ‘लिओ’, सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे लोकेश कनागराज यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘थलायवर १७१’ (Thalaivar 171) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या
निशिकांत कामत दिग्दर्शित ‘दृश्यम’ चित्रपटामुळे घराघरांत पोहोचलेले, सबइन्सपेक्टर गायतोंडे अर्थात अभिनेते कमलेश सावंत. अगदी खरेखुरे पोलीस वाटावे, अशी सावंत यांची शरीरयष्टी आणि एकूणच देहबोली. तेव्हा, कमलेश सावंत यांचा खाकी वर्दीतला प्रवास, ‘दृश्यम’ चित्रपटादरम्यानचा अनुभव याविषयी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांचा १९७८ साली आलेल्या ‘डॉन’ या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. यानंतर ‘डॉन २’ मध्ये शाहरुख खान झळकला होता. आणि आता याच श्रृंखलेचा तिसरा भाग अर्थात ‘डॉन ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात आता डॉन अभिनेता रणवीर सिंग असणार आहे. याशिवाय या चित्रपटात आला अभिनेत्री कियारा अडवाणी हिची एन्ट्री झाली आहे.
रामायणावर आधारित अनेक कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या स्वाधीन केल्या आहेत. नाटक, मालिका किंवा चित्रपट या मनोरंजनाच्या विविध माध्यमातून रामायण दाखवले गेले. आता पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत 'रामायण' हा चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारी घेऊन येणार असून यात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन महत्वपुर्ण भूमिका साकारणार असे सांगितले जात आहे.
प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत झाली. या ऐतिहासिक सोहळ्याला अनुभवण्यासाठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार देखील उपस्थित होते. यावेळी महानायक अमिताभ बच्चन पुत्र अभिषेक बच्चनसह हजर होते. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मोदींनी उपस्थित मान्यवरांना भेटून त्यांची विचारपूस केली. यावेळी पंतप्रधान बिग बींना हात जोडून अभिवादन करताना दिसले.
संपूर्ण देशातील रामभक्त ज्या ऐतिहासिक दिवसाची गेली अनेक वर्ष वाट पाहात होते तो क्षण आज २२ जानेवारी २०२४ रोजी आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत रामलललाच्या मंदिराचे उद्घाटन होणार असून मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. साधु महंत आणि विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भाग होणार आहेत. या सोहळ्याला हिंदी चित्रपसृष्टीतील कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.
देशभरातील तमाम रामभक्त सध्या २२ जानेवारी २०२४ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दिवशी अयोधअयेत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखदारपणे रंगणार आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी श्रीरामनगरी अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या संदर्भातील घडामोडींवर नजर ठेवून आहेत. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी हजेरी लावणार असून यात अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुस
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला एक चित्रपट म्हणजे ‘शोले’. १९७५ साली आलेल्या या चित्रपटाची जादु आजही कायम आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे, आणि त्यांचे प्रत्येक संवाद हे प्रेक्षकांना तोंडपाठ आहे. त्यापैकीच एक पात्र म्हणजे ‘गब्बर’. या पात्राचे नाव आणि त्यासाठी कलाकाराची निवड कसी झाली याचा खास किस्सा संगीतकार जावेद अख्तर आणि लेखक सलीम खान यांनी सांगितला. मनसेतर्फे आयोजित दीपोत्सव २०२३ कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका वृद्धाने एक अजब प्रकार केला असून मुली, महिलांनी सिगारेट ओढल्याने संतापलेल्या या व्यक्तीने धडा शिकवण्यासाठी चक्क कॅफे पेटवून दिले. यामध्ये कॅफे मालकाला सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.
दोन दशकापूर्वी मनोरंजनविश्वात छोट्या पडद्यावर ‘कौन बनेगा करोडपती’ने घातलेले गारुड अद्याप कायम आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्या खर्जातील आवाज, प्रश्नोत्तरांतून होणारी विनोदनिर्मिती आणि उघडणारा माहितीचा खजिना, त्याचबरोबर बक्षिसांची लयलूट, यामुळे या कार्यक्रमाने देश-विदेशातील लोकांना अक्षरश: वेड लावले.
देशात सध्या G-20 परिषद सुरू असून या परिषदेला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना जेवणाचे निमंत्रण राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आले होते. या निमंत्रणावर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असे लिहिल्यानंतर देशाचे नाव भारत की इंडिया असा नवा वाद सुरू झाला आहे. या प्रकरणात राजकारण्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनीच समाज माध्यमावरुन आपली मतं नोंदवली. देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर व्यक्त होण्याचा अधिकार या देशातील नागरिकांना असल्यामुळे भारत आणि इंडिया या नावाच्या वादावर मनोरंजन विश्वातून कलाकारांनी देखील आपले मत मांडले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टी असं उच्चारलं की दोन चेहरे आपसुकच डोळ्यांसमोर येतात, ते म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता शाहरुख खान. हे दोन सुपरस्टार चक्क १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यामुळे या दोन्ही कलाकारांचे चाहते त्यांना पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.
“ये हाथ मुझे दे दे ठाकूर”, हे संवाद आजही प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. १९७५ साली दिग्दर्शक राजेश सिप्पी यांनी एक माईल्ड स्टोन चित्रपट 'शोले' प्रेक्षकांना दिला होता. आज ४८ वर्षांनंतर देखील शोल चित्रपटातील प्रत्येक संवाद, व्यक्तिरेखा, सीन आपल्याला लक्षात आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की चित्रपटातील एक महत्वाचा सीन हा हॉलिवूडमधील एका चित्रपटाच्या सीनसोबत अतिशय तंतोतंत जुळतो.
हिंदी चित्रपसृष्टीचे शहेनशाह अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन वयाची ८० पार केली असली तरी मुख्य भूमिका अजूनही चित्रपटांमध्ये साकारत आहेत. गेली अनेक दशके ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आत्तापर्यंत बिग बी यांनी नायक, खलनायक, वडिल, इतकेच नाही तर मुलगा अभिषेकच्या मुलाच्या भुमिकेत ते दिसले आहेत. दरम्यान आता अमिताभ बच्चन यांच्याबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक निर्मात्या प्रेरणा अरोरा तयार करण्याच्या तयारीत असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा अमित
कॅलिफोर्निया येथील सॅन डिएगो कॉमिक-कॉन इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये चित्रपटाची पहिली झलक समोर आणण्याचा बहुमान ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाला मिळणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित प्रोजक्ट के या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हसन अशा अनेक मातब्बर कलाकारांची फौज झळकणार आहे. २० जुलै ते २३ जुलै दरम्यान पार पडणाऱ्या या कार्यक्रमात वैजयंती मूव्हीज १९ जुलै रोजी ओपनिंग नाईट पार्टीमध्ये प्रोजेक्ट के या चित्रपटाची पहिली झलक दाखवणार आहे. 'प्रोजेक्ट के' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे.