अजित पवारांच्या कार्यालयाकडून जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी पुणे लाचलुचपत विभागाकडून करण्यात येत असलेली चौकशी जुनी असून त्यांच्याशी अजित पवारांचा काहीही संबध नाही, असे कार्यालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.
Read More
एक कोटी रुपयांची लाच घेणाऱ्या अहमदनगर एमआयडीसीतील सहायक अभियंत्याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. एसीबीने अटक केलेल्या संशयिताचे नाव अमित किशोर गायकवाड असे आहे. तर धुळे एमआयडीसीतला कार्यकारी अभियंता गणेश वाघ (तत्कालीन नेमणूक अहमदनगर एमआयडीसी) हा फरार आहे.
भारताचे भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे कठोर धोरण आहे. भारत एक पारदर्शक आणि उत्तरदायी परिसंस्था तयार करण्यासाठी तंत्रज्ञान आणि ई प्रशासनाचा लाभ घेत आहे. कल्याणकारी योजना आणि सरकारी प्रकल्पांमधील गळती आणि तफावत भरून काढली जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
China भारताचा शेजारी देश असलेल्या चीनची कोरोनानंतरही आर्थिक स्थिती सुधारलेली नाहीच. त्यामागचे एक कारण म्हणजे चिनी उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्तींनी या देशातून बाहेर पडण्याचा लावलेला धडाका. कारण, जिनपिंग यांचे सरकार चीनमधील उद्योगपती आणि श्रीमंतांवर सातत्याने आपल्या वर्चस्वाचा फास अधिकाधिक घट्ट करू पाहत आहे. हे सरकारी संकट टाळण्यासाठीच चीनमधील श्रीमंत उद्योजक सिंगापूरकडे धाव घेताना दिसतात. चीनमधील अनेक बड्या उद्योगपतींनी तर अलीकडेच आपली मालमत्ता सिंगापूरच्या बँकांमध्ये हस्तांतरित केली. हा सर्व प्रकार समोर आल
एसीबीने कायदेशीररित्या सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना दोष देता येणार नाही असे स्पष्ट केले