रोहित पवार हा बिनडोक माणूस आहे. त्याला ज्याने सल्ला दिला असेल ते बेअक्कल आहेत, असा घणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबद्दल ते माध्यमांशी बोलत होते.
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी अडवली आहे. नागपुरात विधानभवनावर जात असलेली यात्रा पोलिसांनी अडवली आहे. सर्व कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे.
आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला सकल मराठा समाजाने विरोध केला आहे. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा सुरु होती. त्याला मराठा समाजाने विरोध केल्यानंतर यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. नेत्यांना अनेकठिकाणी गावबंदी असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर रोहित पवारांनी सोशल मिडीयावर व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरूवात झाली आहे. यात्रेची सुरूवात छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर येथून करण्यात आली. यापूर्वी पहाटे साडेपाच वाजता संगमेश्वर मंदिरात भगवान शंकराच्या पिंडीवर पहाटे अभिषेक करून प्रार्थना केली. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वढू बुद्रुकमध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला २४ ऑक्टो. पासुन सुरूवात झाली. पुण्यात शरद पवार यांच्या सभेनंतर संघर्ष यात्रा सुरु होत आहे. घरातून निघताना रोहित पवार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आई-बाबा आणि सासू-सासरे यांचा आशीर्वाद घेऊन राज्यातील तमाम युवांच्या प्रश्नांवर सीमोल्लंघनासाठी निघाल्याचं रोहित पवार म्हणाले.
आमदार रोहित पवार २४ ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहे. ही यात्रा ८२० किलोमीटर ची पदयात्रा असणार आहे.आणि दसऱ्याच्या दिवशी पुण्यातून ही यात्रा सुरू होणार आहे.आणि नागपूरला याची सांगता होईल. पुण्यातील महात्मा फुले वाडा येथून या यात्रेला सुरवात होणार आहे.त्यांनतर वढू तुळापूर येथे नतमस्तक होऊन, खऱ्या अर्थाने यात्रेचा शुभारंभ होईल. संतांच्या, महाराजांच्या भूमीतून यात्रा जाईल. १३ जिल्ह्यातून यात्रेचा प्रवास होईल.आणि दरोरोज कमीत कमी १६ आणि जास्तीत जास्त २५ किमी असा पायी प्रवास असणार आहे.