योग करणार्या व्यक्तीला योगातील अष्टांगांपैकी पहिले दोन अंग म्हणजे यम, नियम यांचा अभ्यास करूनच पुढे आसन, प्राणायामाकडे जावं लागतं, अन्यथा घाण बाटली स्वच्छ न धुता त्यात औषध भरले असता जसं ते औषध घेणार्याला उपायाऐवजी अपाय होईल, तसं यम, नियम न अंगीकारता आसन, प्राणायामावर उडी मारणार्याचं होऊ शकतं. म्हणूनच म्हणतात, योगशास्त्र हे सोपं नाही. ते अभ्यासून आपलं समग्र व्यक्तिमत्त्व बदलतं, समग्र जीवनावर त्याचा उत्तम परिणाम होतो. व्यक्तिविकासातूनच समाजाचा विकास साधतो. म्हणून, योगशास्त्राचा खर्या अर्थाने प्रचार-प्रसार
Read More
योगशास्त्रात अहिंसा पालन करण्यास सांगितले आहे. शारीरिक, मानसिक, वाचिक त्याचा ऊहापोह आपण आधीच्या लेखात केलेला आहेच. आपला असा मत्सर होत असल्यास आपली, आपल्या कुटुंबाची प्रगती थांबते, आरोग्य बिघडते वगैरे आणि म्हणून, काही अपवाद वगळता अहिंसापालन करावे.
आज आषाढ शु.1 अर्थात महाकवी कालिदास दिन. तसेच, बुधवार, दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस, असे हे दोन्ही दिवस लागोपाठ येत आहेत. त्यानिमित्ताने कालिदासाच्या साहित्यातील योगशास्त्र शब्दबद्ध करणारा हा माहितीपूर्ण लेख...