पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली भारत अंतर्गत सुरक्षेत एका नव्या स्वदेशी स्वरूपात सक्षम झाला आहे. मागच्या ११ वर्षात मजबूत झालेली अंतर्गत सुरक्षा ही देशाच्या स्थिरतेचा कणा बनली आहे. एखाद्या देशाची अंतर्गत सुरक्षा केवळ दहशतवाद आणि हिंसाचाराशी लढण्यापुरती मर्यादित नाही, तर ती त्या देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासावर देखील परिणाम करते.
Read More
आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत अशा संकल्पाकडून सिद्धीकडे जाण्याची मोदी सरकारची ही ११ वर्षे आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवार, १० जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नुकतीच मोदी सरकारने आपल्या कारकिर्दीची एकूण ११ वर्षे पूर्ण केली. ही ११ वर्षे सर्वच क्षेत्रांतील सर्वांगीण प्रगतीची आणि परिवर्तनाची ठरली आहेत. त्यानिमित्ताने मागील दशकभरात लिहिल्या गेलेल्या विकासाच्या या नवअध्यायाचा मागोवा घेणारा हा लेख...
कॅन्ट परिसरात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या चार बांदलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळ्यात एटीएसला यश आले आहे. १२ वर्षांपासून हे घुसखोर भारतात राहत होते दिल्ली पोलीस प्रशासनाच्या एएटीएसने या बांगलादेशी घुसखोरांना पकडले आहे. त्यांच्याकडे बांगलादेशी ओळखपत्रे आणि काही बनावट कागदपत्रे सापडली आहेत.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७४ वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहेत. त्या अनुषंगाने दिनांक ३१ मे ते ०२ जून पर्यंत पनवेलमध्ये तीन दिवस 'कीर्तन महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे.
Burkina Faso West African country that has been experiencing instability in recent years due to terrorist attacks, non-state armed groups, ethnic conflicts बुर्किना फासो हा पश्चिम आफ्रिकेतील देश, जो गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी हल्ले, गैरसरकारी सशस्त्र गट आणि जातीय संघर्षांमुळे अस्थिरता अनुभवतोय.
India will overtake Japan to become the world's fourth largest economy this year भारत-पाक युद्धाचे ढग दाटून आलेले असतानाही, ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने यंदाच्या वर्षी भारत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज व्यक्त केला. भारतीय अर्थव्यवस्थेवर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा कायम असलेला विश्वास यातून अधोरेखित होतोच. शिवाय भारताबद्दल जग किती सकारात्मक आहे, याचेच हे द्योतक!
1975 साली संयुक्त राष्ट्रसंघाने ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ जाहीर केले, त्या घटनेस यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारतातील समाजवादी तसेच डाव्या स्त्रीवादी संघटनांनी व चळवळींनी त्यांचा इतिहास व ऐतिहासिक टप्पे सांगणारे लेख वृत्तपत्रांमधून लिहायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने दि. 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू होऊनही आता अर्धशतक झाले आहे. समाजवादी व डाव्या विचारांच्या संघटना यावर त्यांचे स्त्रीवादी विचारांची गेल्या 50 वर्षांमधील वाटचाल पुस्तक स्वरूपात
( Ten years of the Maharashtra Right to Public Service Act ) राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित झाली आहे. हा अधिनियम 28 एप्रिल 2015 रोजी अंमलात आला असून राज्यात हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीस दहा वर्षे पूर्ण होत आहेत.
RSS Centenary Year वर्षात पदार्पण केले आहे. स्थापनेपासून या संघटनेने सातत्याने विस्तार, संघटनात्मक बळकटी करून आपला प्रभाव वाढवला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संघकार्यांबद्दल जाणून, समजून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खरोखर समजून घेण्यासाठी, त्याचे संस्थापक, प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना समजून घेणे क्रमप्राप्त आहे. डॉ. हेडगेवार हे जन्मजात देशभक्त, ते जुलमी ब्रिटिश राजवटीला घालवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. त्यांच्या संघर्षमय जीवनकार्यावरून याची कल्पना आपल्या येते.
( 10 years of PM Mudra Yojana ) देशातील महिलांच्या बँक खाती आणि डिमेट खात्यांत लक्षणीय वाढ झाल्याच्या सुवार्तेची उचित दखल सोमवारच्याच ‘अर्थ‘पूर्णा’ या अग्रलेखातून आम्ही घेतली. त्यात ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’च्या दशकपूर्तीनिमित्त, या योजनेच्या 70 टक्के लाभार्थी महिला असल्याची समोर आलेली आकडेवारीही तितकीच सुखावणारी. अशी ही महिलांच्या स्वप्नांना बळ देणारी, आत्मनिर्भर भारताची अर्थ‘मुद्रा’ देशातील आर्थिक क्रांतीचे प्रतीक ठरली आहे.
(10 years of Mudra Yojana ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ रोजी जाहिर केलेल्या मुद्रा योजनेने दशकभरात ३२.६१ लाख कोटी रुपयांच्या ५२ कोटींहून अधिक कर्जांद्वारे देशाच्या तळागाळात उद्योजकतेला चालना दिली आहे.
Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सं
( Hindu New Year rally ) लालबाग, परळ आणि काळाचौकी या गिरणगाव विभागातील ‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’च्यावतीने हिंदू नववर्ष शोभायात्रेत यंदा मराठी भाषा ’स्व’त्वाच्या अस्मितेचे आणि संस्कृतीचे प्रतीक यांचा जागर होणार आहे. रविवार, दि. ३० मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त होणार्या या शोभायात्रेत पारंपरिक प्रात्यक्षिकांसह अनेक चित्ररथांचा सहभाग असणार आहे.
Gudi Padwaभारताचा सांस्कृतिक वारसा हा तिमिराकडून तेजाकडे नेणारा अद्भुत प्रवास. या धार्मिक, सांस्कृतिक वारशाच्या प्रतिकांमधील एकी आणि त्यातून प्रतित होणारा आशावादी, प्रेरणादायी विचारांचा अंत:प्रवाह हा थक्क करणारा आहे. या अंत:प्रवाहाला समृद्ध करणारा उत्सव म्हणजे हिंदू नववर्ष होय. चला नववर्षाचे स्वागत करूया...
Hindu New Year Yatra ठाणे पूर्व येथील नावाजलेली व अल्पावधीत आत्यंतिक लोकप्रिय ठरलेली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी ठीक ६.३० वाजता नालंदा शाळा व कोपरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून निघेल व पुढे ठाणेकर वाडी चौक, शिवमंदिर, प्रेम नगर, दौलत नगर, टीजेएसबी बँक, मंगला शाळा, राऊत शाळा, स्वर्गीय नारायणराव कोळी चौक ते नातू परांजपे कॉलनीतील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे विसर्जित होईल.
Dr. Hedgewar शालिवाहन आणि त्याची संजीवनी विद्यामरणपंथाला लागलेल्या माणसाला मरणाच्या दारातून परत आणण्याचे काम करणारी संजीवनी शक्ती. या शक्तीचे हेच काम इतिहासातील परकीय आक्रमणाने मृतप्राय झालेल्या हिंदू समाजाबाबत अनेकांनी केले. ज्याप्रमाणे शालिवाहन या एका सर्वसामान्य माणसाने संजीवन मंत्राच्या साहाय्याने मातीतून योद्धे निर्माण केले, अगदी तसेच डॉ. हेडगेवार या एक सर्वसामान्य कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाने मातीतून कार्यकर्ते निर्माण केले. डॉ. हेडगेवारांनी या निष्प्राण मातीवर संघटनेचा संजीवनी मंत्र टाकला.
( Mahakumbh culture in the Hindu New Year welcome in thane ) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या विश्वातील सर्वात पुरातन पाली भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला. याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यासाठी गुढीपाडव्यादिनी ठाण्यात निघणार्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत शांती व समतेची पाली भाषेची पालखी काढून बौद्ध बांधव व भिक्खु संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा’चे कार्याध्यक्ष संजीव ब्रम्हे यांनी दिली.
येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार नियमावली; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
ग्रेग्रोरियन नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि या वर्षासोबतच एका नव्या पिढीच्या जन्मालासुद्धा. ( New Generation ) ही पिढी म्हणजे ‘जनरेशन बीटा किंवा जेन बीटा.’ दि. १ जानेवारी २०२५ रोजीपासून जन्माला आलेली बालके, ‘जेन बीटा’ म्हणून ओळखली जाणार आहेत. पूर्वीच्या काळी ‘मुलगा-वडील-आजोबा-पणजोबा’ अशा नात्यांच्या क्रमावर आधारित पिढ्या ओळखल्या जायच्या. पण, आताच्या काळात एका ठराविक काळात जन्माला आलेल्या पिढ्यांना, त्या काळाच्या वैशिष्ट्यांनुसार काही ठराविक नावे दिली जातात. या नावांना ‘पिढीनामे’ म्हटले तरी वावगे ठरणार
AI Technology वेगाने विकसित होणार्या तंत्रज्ञानाच्या पाऊलखुणांसह प्रत्येक वर्ष आपले योगदान देत असते. 2024 या वर्षानेदेखील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असेच आमूलाग्र बदल दिसून आले आणि 2025 या वर्षातदेखील तंत्रज्ञान क्षेत्रात नवप्रवाह लक्षवेधी ठरणार आहेत. त्यानिमित्ताने नववर्षातील नवीन तंत्रज्ञानाचा मांडलेला हा भविष्यवेध...
निवडणूकीत नक्की काय घडलं यावर माझे मंथन सुरु असून लवकरच यावर सविस्तर बोलेन, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जे घडले ते विसरून जा आणि कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी मनसैनिकांना केले आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ( Central Government ) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी हिताचे निर्णय घेऊन पीकविमा योजनेचा विस्तार केला आहे. त्याचप्रमाणे डीएपी खतांसाठीदेखील अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
Billion Dollar भारताने 2025 हे ‘संरक्षण सुधारणा वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. शस्त्रांस्त्रांचा आयातदार देश ते प्रमुख निर्यातदार देश अशी भारताची शस्त्रास्त्र बाजारपेठेत नवी ओळख प्रस्थापित होत आहे. 2025 मध्ये पाच अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ते आता सहजसाध्य होईल, असा विश्वास आहे.
लयाला चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी दीर्घकालीन झोपेतून जागे होत, पाकिस्तानने ‘पंचवार्षिक योजना’ जाहीर केली आहे. परंतु, पाकिस्तानच्या विद्यमान स्थितीवर नजर टाकली, तर ही योजना किती यशस्वी होईल, हा प्रश्नच आहे.
आज २०२४ ( Year 2024 ) या वर्षाच्या मैफिलीची भैरवी! सरत्या वर्षातील घडामोडींचे सिंहावलोकन महत्वाचे ठरते. २०२४ या वर्षाने जगासाठी, आपल्या देशासाठी बरेच काही अनुभव दिले. यातील मोजक्या मह्त्वाच्या देश ते राज्य पातळीवरील घटनांचा घेतलेला हा मागोवा...
(CM Devendra Fadnavis) नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात नमूद केला आहे.
नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
नवीन वर्षांसाठी मुंबई नगरी सज्ज झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरीन लाइन्स गिरगाव, दादर, माहिम, जुहू, वर्सोवा या पर्यटन स्थळी थर्टी फर्स्टचा आनंद घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. मुंबईकरच नव्हे तर पुणे, रायगड आणि राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्यावतीने (दि.३० मार्च) गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा २५ वे वर्षे आहे. त्यामुळे यंदाची हि हिंदू नववर्ष ( hindu new year ) स्वागतयात्रा अनोख्या पद्धतीने करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. यंदाच्या स्वागत यात्रेत तरुणाईचा सहभाग वाढावा म्हणुन आयोजकांनी युवा दिनाचे औचित्य साधून १२ जाने. रोजी शहरात युवा दौड आयोजित केली आहे. यासाठी शहरातील विविध संस्थांना जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याग्रोरियन वर्षाची लवकरच सांगता होणार आहे. सरत्या वर्षाबरोबर अनेक गोष्टी संपतात. या संपणार्या गोष्टींपैकी काही गोष्टी अशाही असतात की, काळ त्यांना गिळंकृत करतोय हे सहसा कुणाच्या लक्षातही येत नाही. अशाच गोष्टींपैकी एक म्हणजे भाषा! दरवर्षी अनेक भाषा सरत्या वर्षासोबत या जगाचा निरोप घेतात. 2024 सुद्धा तांडिया, मावेस आणि लुहू यांसारख्या काही भाषांसाठी, निरोपाचे वर्ष ठरणार असल्याची शक्यता गूगलवर उपलब्ध असणार्या काही ऑनलाईन संशोधनांमध्ये वर्तवली गेली आहे.
नागपूर : ‘अडीच वर्षां’चा पेटेंट कायमस्वरुपी उबाठा ( UBT ) गटाच्या नावावर होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने त्यांच्यासमोर अडीच-अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवला असून त्यावर होकार येत नाही, तोवर गटनेता जाहीर करणार नाही, अशी भूमिका घेतल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
नागपूर : शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत सूचक वक्तव्य केले आहे. अडीच वर्षे पूर्ण होण्याआधीच मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो, याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
समाजासाठी काम करत राहिले की, ईश्वर आपल्याला नक्की दीर्घायुषी करतो. असेच श्रीराम मंदिर संघर्षात आपले योगदान देणार्या नाशिकमधील कारसेवक अरविंद वर्तक यांच्याविषयी...
तुमच्या आघाडी सरकारने अडीच वर्षांत काय केले? आणि महायुती सरकारने दोन वर्षांत काय केले हे होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी, आम्ही हिशोब द्यायला तयार असून तुम्ही काय केले ते सांगा अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला खुले आव्हान दिले. निमित्त होते ते कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळ्याचे.
ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (आयएमडीपीसीटी) यांच्या वतीने शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून वेगवेगळ्या श्रेणी अंतर्गत पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. 'टीचर ऑफ इअर २०२३-२४' या शीर्षकाअंतर्गत वेगवेगळ्या विषयवार शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. उत्कृष्टपणे अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. मुंबई जिल्हा को.ऑप हाऊसिंग फेडरेशनचे संचालक विशाल कडणे यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील कार्यरत शिक्षक मान्य
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गत १० वर्षात नियमांचे उल्लंघन केले नसल्यास अशा मंडळांना महानगरपालिकेने पाच वर्षाचे मंडप परवाने अटी शर्तींविना देण्यात यावे, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालयात सन २०२४ च्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीची बैठक आज पार पडली. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विविध अडीअडचणीसंदर्भात समन्वय समितीसोबत चर्चा करण्यात आली.
मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एकमध्ये आणण्याचा निर्णय मंगळवार, दि. ३० जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या निर्णयामुळे ६० वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली निघणार असून, संबंधित जमिनी मूळ मालकाला मिळणार आहेत. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमधील या जमीनींबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याचा विचार करून खालसा झालेल्या इनाम जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घे
दि. १ एप्रिल २०२४ पासून २०२४-२५ या नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. आता मे महिना सुरू झाला आहे. येत्या वर्षात आपले स्वत:चे उत्पन्न किती असेल, याचा प्रत्येकाला अंदाज असतो. या उत्पन्नावर प्राप्तीकरही भरावा लागणार व यासाठी आतापासूनच करनियोजन करणे गरजेचे आहे. देशात असलेले सर्व कर प्रामाणिकपणे भरणे, हे तर आपले भारतीय नागरिक म्हणून कर्तव्यच आहे, पण जुन्या प्राप्तिकर प्रणालीनुसार काही पर्यायांत गुंतवणूक करून, करदाता आपले दायित्व कमी करू शकतो. त्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया.
आज हिंदु नवं वर्ष. घरोघरी सामान्य माणसांसह मराठी कलाकारांनी देखील गुढी उभारुन पाडव्याच्या आणि नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाहूयात मराठी कलाकारांनी कसा साजरा केला गुढी पाडवा.
राष्ट्रीय ऋषी स्वामी विवेकानंद म्हणाले होते - स्वाभीमानाने जगण्याची भावना जागृत करायची असेल, देशभक्तीचे बीज हृदयात पेरायचे असेल, तर हिंदूंच्या राष्ट्रीय कॅलेंडरनुसार तिथींचा आश्रय घ्यावा लागेल. जो कोणी परदेशी लोकांच्या तारखांवर अवलंबून असतो तो गुलाम बनतो आणि स्वाभिमान गमावतो.
जीएसटी कलेक्शनसंबंधी मोठी बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे मार्चमध्ये जीएसटी (Good and Sales Tax) मधील कलेक्शनमध्ये ११.५ टक्क्याने वाढ होत जीएसटीचे संकलन (Collection) १.७८ लाख कोटींपर्यंत पोहोचल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
आज १ सौर चैत्र १९४६. आजपासून भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेचा नव्या वर्षाची सुरुवात होते आहे. ही जगातली सगळ्यात शास्त्रीय आणि निसर्गचक्राशी पूरक दिनदर्शिका आहे. तसेच तिरंगा, राष्ट्रगीत यांच्यासारखीच आपले राष्ट्रीय प्रतीक आहे.पण, भारतीय असून आपल्याला याबद्दल फारशी माहिती नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यानिमित्ताने या दिनदर्शिकेचे महत्त्व विशद करणारा हा लेख...
राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी मंडळाच्या दोन दिवसीय अर्धवार्षिक बैठकीला नुकतीच अतुलनंद कॉन्व्हेंट स्कूल, वाराणसी येथे सुरुवात झाली. समितिच्या प्रमुख संचालिका शांताक्काजी आणि प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्रीजी बैठकीला पूर्णवेळ उपस्थित आहेत. या बैठकीत ३५ प्रांतातील ११५ प्रतिनिधी उपस्थित आहेत.
आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला भारताचा अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प हा एक सर्वसमावेशक योजना म्हणता येईल. या अर्थसंकल्पाचा उद्देश राजकोषीय अंकुश ठेवण्याबरोबरच आर्थिक वृद्धीला चालना देण्याचाही आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
मावळत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना अनेक बर्या-वाईट गोष्टी निदर्शनास येतात. वास्तविक इंग्रजांचे नववर्ष भारतीयांनी का साजरे करावे, इथंपासून ते मद्याचे ओसंडून वाहणारे प्याले एकमागोमाग एक रिचविणार्यांसाठी नववर्ष ही एक पर्वणीच.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधकांना टोला लगावत वाचाळवीरांना सुबुद्धी येवो, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी ईश्वराकडे जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्याचे बळ मागितले. सोमवारी नागपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
प्रत्येक नवी पहाट नवं चैतन्य घेऊन येते. २०२३ हे वर्ष संपत आले. या वर्षात प्रत्येकाच्या जीवनात चांगल्या-वाईट घडामोडी घडून गेल्या. फम येणारं २०२४ हे वर्ष सर्वांच्याच जीवनात नवा आनंद, उत्साह, प्रेम, संधी घेऊन येणार आहे. जुनं वर्ष संपताना या वर्षाला अखेरचा राम राम करत नव्या वर्षाचं मोठ्या उत्साहात आपण सगळेचजण स्वागत करतो. याशिवाय दरवर्षी एक नवा संकल्प करतो जो आपल्याला संपुर्ण वर्षभर अनेक आठवणी आणि शिकवण देऊन जातो. संकल्प केला म्हणजे तो पुर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती झटत असते, प्रयत्नशील असते. तर असेच काही मर
आज इंग्रजी दिनदर्शिकेनुसार २०२३ या आंग्लवर्षाचा अखेरचा दिवस. उद्यापासून २०२४ हे नववर्ष नवचैतन्यासह उगवतीला येईल. आयुष्य, माणसं आणि सभोवतालची परिस्थिती नवीन वर्षातही तशीच असली, तरी एक नवतेची, स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची प्रेरणा यादरम्यान वातावरणात भारावलेली दिसते. त्यातूनच नूतन वर्षाचे नवसंकल्प सोडले जातात. तेव्हा, यंदाही अशाच नवसंकल्पांची गुढी उभारताना ते संकल्प यशस्वीरित्या तडीस नेण्यासाठी नेमके काय करावे, यासंबंधीचे अगदी सोप्या शब्दांत दिशादर्शन करणारा हा लेख....
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात देशाचा नवीन अर्थसंकल्प मांडला जाईल. त्यासाठी केंद्र सरकार तयारीला लागले आहे. पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पची पूर्वतयारी म्हणून सरकारने काही प्राथमिक अहवाल तयार केले आहेत. या अहवालातून सरकारच्या करसंकलनात अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा जास्त वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यासोबतच कर संकलन असच वाढत राहण्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.