आपला अभ्यासाचा विषय सोडून ज्या विषयाची माहिती नाही, अशा विषयांवर बेताल आणि बेछूट विधाने फक्त भारतीय बुद्धिजीवीच करतात. अमर्त्य सेन हे नावाजलेले अर्थतज्ज्ञ असले, तरी त्यांनी आजवर भारतातील राजकीय स्थितीवर व्यक्त केलेल्या मतांनी फक्त वादच निर्माण केले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर त्यांनी व्यक्त केलेले विचार हे त्यांची राजकीय आणि सामाजिक समज किती संकुचित, अपूर्ण आणि अतर्क्य आहे, तेच दाखवून देते.
Read More
बारसू ‘रिफायनरी’ विरोधात सर्वेक्षणाचे काम थांबवण्यासाठी काही महिला रस्त्यावर उतरल्या. या महिलांच्या आंदोलनाची चित्र, सोशल मीडियावर प्रसारित करून त्यावर काहीबाही संदेश प्रसारित करण्यात काही आंदोलनजीवी अतिशय व्यस्त आहेत. हा आंदोलनजीवी कसा ओळखावा?
रामनामाच्या नुसत्या उच्चाराने दगडधोंडेही चक्क पाण्यावर तरंगतात. मात्र, जे दगडही नाहीत अन्धोंडेही नाहीत, असे अमर्त्य सेन यांसारखे विद्वान वा ममतांसारखे विक्षिप्तजन आपल्या 'मर्त्य' बुद्धीच्या प्रभावातून रामनामाच्या जयघोषाला विरोध केल्याने तरणार तर नाहीतच उलट स्वतःच बुडतील, असे वाटते.
अमर्त्य सेन यांचा ‘इगो’ दुखावला गेला. त्यानंतर त्यांनी जेथे जेथे संधी मिळेल, तेथ तेथे मोदींवर टीका करायला सुरुवात केली.